
राज ठाकरे यांच्या एका मुलाखतीचा हा व्हिडिओ आहे. त्यात ते कायदा सुव्यवस्थेवर बोलत आहेत. ‘आपल्या देशात कायदे आहेत. लॉ आहे, ऑर्डर नाहीत. त्या ऑर्डरची गरज आहे. ठरवलं तर सगळ्या गोष्टी सुरळीत होऊ शकतात. माझा मुंबई पोलिसांवर, महाराष्ट्र पोलिसांवर शंभर टक्के विश्वास आहे. पोलिसांना ४८ तास द्या, त्यांना सांगा महाराष्ट्र साफ करून द्या. सगळ्या गोष्टी त्यांना माहीत असतात, पण ऑर्डर नसतात. रिस्क कोण घेणार?, असा प्रश्न त्यांनी केला.




