
या प्रकरणी न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांनी सुनावणी करताना आदेश दिला आणि सांगितले की, सदर कारवाई थांबवता किंवा इतर कोणत्याही दुसऱ्या तक्रारीसोबत एकत्रित केली जाऊ शकत नाही. कारण, कंगना रनौतने कधीही असा युक्तिवाद केला नाही की, ही प्रकरणे क्रॉस-केस आहेत. तर, जावेद अख्तर यांची तक्रार प्रथम दाखल करण्यात आली. न्यायमूर्ती प्रकाश नाईक म्हणाले की, ‘याचिकेत मागितलेला दिलासा या टप्प्यावर देता येणार नाही. याआधी याचिकाकर्त्याच्या वतीने कधीही असा युक्तिवाद करण्यात आला नाही की, दोन्ही प्रकरणे क्रॉस केस आहेत.’








