
अर्थमंत्री सीतारामन यांनी सांगितलं की, लखपती दीदींना आणखी प्रोत्साहन दिलं जाणार आहे. देशभरात लखपती दीदी योजनेचं लक्ष्य दोन कोटी असताना १ कोटी महिलांना याचा लाभ मिळाला आहे. आता याचे लक्ष्य दोन कोटीवरून तीन कोटींपर्यंत वाढवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेमुळे ९ कोटी महिलांचे आयुष्य बदलले आहे. लखपती दीदींमुळे अनेक महिला स्वावलंबी झाल्या आहेत. अंगणवाडी कार्यक्रमांना गती दिली जात आहे.








