
पुढे त्या म्हणाल्या की, “पुस्तकात जर काही गोष्टी लपवल्या असत्या, तर ते आत्मचरित्र झाले नसते. फक्त चांगल्या घटना लिहायच्या असत्या, तर ती कादंबरी झाली असती. त्यामुळे मी सगळ्या खऱ्या घटना लिहिल्या आहेत. पण, यामागे माझा हेतू अगदी चांगला आहे. माझे दोष, त्यांचे दोष या सगळ्या गोष्टी मी चांगल्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. माझे हे पुस्तक फार आधीच लिहून झाले होते. पुस्तक छापायला मी देणार होते. पण, त्याआधीच त्यांचे निधन झाले. त्यानंतर माझ्या जवळच्या लोकांनी माझ्या विचारांना आणखी दिशा दिली. पुढे, मी पुस्तकात त्यांच्या निधनानंतर घरात बदललेली परिस्थिती व त्यानंतरचे माझे विचार या गोष्टी देखील लिहिल्या.”








