
त्यानंतर जवळपास तासभर त्यांना बाहेर बसवण्यात आलं. त्यामुळं संतापलेले पुंडकर बाहेर पडले आणि त्यांनी नाराजी व्यक्त केली. आम्हाला बैठकीला बोलावून अपमान करण्यात आला, असा आरोप त्यांनी केला. त्यामुळं आता सारं काही फिसकटल्याची चर्चा असतानाच वंचितचा महाविकास आघाडीत समावेश झाल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील (Jayant Patil), शिवसेनेचे संजय राऊत (Sanjay Raut) आणि काँग्रेसचे नाना पटोले (Nana Patole) यांनी केली. या तिन्ही नेत्यांच्या सहीचं पत्र प्रकाश आंबेडकर यांना पाठवण्यात आलं व त्यांना महाविकास आघाडीत सहभागी होण्याची विनंती करण्यात आली.







