
काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा सध्या आसाम राज्यातून जात आहे. न्याय यात्रा सतत चर्चेत राहिली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसची ही न्याय यात्रा म्हत्वाची आहे. न्याय यात्रा ११० जिल्ह्यातून जात आहे, त्याच्या माध्यमातून लोकसभेच्या १०० व विधानसभांच्या ३३७ जागांवर विजय मिळवण्याच्या उद्देश्याने आहे. काँग्रेसची यात्रा मणिपूर, नागालँड, आसाम, बिहार, झारखंड, ओडिशा, उत्तरप्रदेश व गुजरात राज्यातून जाणार आहे.







