
अयोध्येमधील राम मंदिराच्या उद्धाघटन सोहळ्याला केवळ दोन दिवस राहिले आहेत. अनेकांच्या रामजन्मभूमीचे स्वप्न साकार होणार असल्यामुळे सगळीकडे आनंदाचा वातावरण पाहायला मिळते. मंदिरातील रामाच्या प्रतिष्ठापन सोहळ्यासाठी अनेकांना आमंत्रण देण्यात आले आहे. मात्र, या सगळ्यात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या ‘रामायण’ मालिकेचे निर्माते, दिवंगत रामानंद सागर यांच्या कुटुंबीयांना अद्याप आमंत्रण मिळालेले नाही.








