
‘राजकारणात हार-जीत होत असते. पंडित जवाहरलाल नेहरू यांनाही पराभव पत्करावा लागला होता. त्या पराभवाचं अत्यंत चांगलं विश्लेषण त्यांनी केलं होतं. ‘लहान मुलाला सुरुवातीला आधार देऊन चालवावं लागतं. नंतर ते स्वत: चालतं. चालताना पडतं, पुन्हा उठतं. पुन्हा पडतं आणि पुन्हा उठतं…. नंतर कधीतरी ते चालायला लागतं आणि एकदा ते चालायला शिकलं की पुन्हा कधी पडत नाही, असं नेहरू म्हणाले होते. ‘माणसाला त्रास होतो, पण पुन्हा शक्ती मिळते, हे समजावणारं हे उदाहरण आहे, असं सुशीलकुमार शिंदे म्हणाले.







