
या प्रश्नाचा स्क्रिनशॉट शेअर करताना धनश्रीने म्हटले की, ‘काय कारायचं अशा लोकांचं?’ असं म्हटलं आहे. धनश्री काडगावकर ही मुळची पुण्याची असली, तरी कामाच्या निमित्ताने ती मुंबईत स्थायिक झाली आहे. मात्र, आजही तिला पुण्याची भरपूर ओढ आहे. नुकतीच तिची ‘तू चाल पुढं’ ही मालिका ऑफ एअर गेली आहे. आता सध्या ती ब्रेकवर असून पुण्यात फिरायला जाण्याचा प्लॅन करत आहे.








