
जुलमी कायदा रद्द होईपर्यंत शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरूच ; सरकारने आमच्याशी चर्चा करावी, आंदोलन तोडण्याचा प्रयत्न करू नये : बाबा कांबळे
दिल्ली : राज्यातील ट्रक, टेम्पो चालकांच्या विरोधात अन्यायकारक कायदा आणलेला रद्द करावा, या मागणीसाठी दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरूच आहे. करणे आमच्याशी चर्चा करून योग्य तोडगा काढावा. आंदोलन तोडण्याचे प्रयत्न करू नयेत. जुलमी कायदा रद्द होईपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील असा निर्धार ऑटो, रिक्षा, बस, ट्रक, टेम्पो फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांनी व्यक्त केला.
केंद्र सरकारने हिट अँड रन प्रकरणी 3 जानेवारी पासून दिल्ली जंतर मंतर येथे बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनासाठी देशभरातील ऑटो, बस, ट्रक, टेम्पो ड्रायव्हर संघटनेचे प्रतिनिधी दिल्ली येथे दाखल झाले आहेत. या वेळी मार्गदर्शन करताना बाबा कांबळे बोलत होते.