
पुणे दौऱ्यावर असलेल्या शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत म्हटले की, निकाल यापेक्षा वेगळे लागतील अशी आमची अपेक्षा नव्हती. तरीही यावर सायंकाळी सहा नंतरच भाष्य केलेले बरे. चार पैकी दोन राज्यात भाजपची सत्ता होती. तिथं त्यांनी अधिक लक्ष केंद्रीत केलं होतं. मुख्यत: राजस्थानचा मुद्दा आहे. मागची पाच वर्षे राजस्थानमध्ये काँग्रेसची सत्ता होती. त्यामुळे आता नव्या लोकांना संधी द्यावी, असा मूड राजस्थानच्या जनतेचा दिसतो. अशी या राज्याची परंपराही राहिली आहे. त्याला साजेसा असा निकालाचा सुरुवातीचा कल दिसतो आहे, असं शरद पवार म्हणाले.



