
एक्सवर केलेल्या ट्वीटमध्ये पंतप्रधान मोदी म्हणतात, ‘भारतातील लोकांचा विश्वास केवळ सुशासन आणि विकासाच्या राजकारणावर आहे हेच मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडच्या निवडणुकीच्या निकालावरून दिसून आलं आहे. त्यांचा विश्वास भाजपवर आहे हेही सिद्ध झालंय. मी या सर्व राज्यांतील माझ्या कुटुंबीयांचं मनापासून आभार मानतो. खासकरून माता, भगिनी, मुली आणि आमच्या तरुण मतदारांनी भाजपवर व्यक्त केलेला विश्वास आणि दिलेल्या आशीर्वादाबद्दल मी आभारी आहे.’







