
मुंबई – मिझोराममध्ये भाजप येणार नाही, छत्तीसगडमध्ये मुकाबला बरोबरीत दिसत आहे. तेलंगणातही भाजप कुठेच नाही. मध्य प्रदेश, राजस्थानात सुरुवातीचा कल भाजपाच्या बाजुने दिसत आहे. मात्र निकाल स्पष्ट व्हायला अजून वेळ आहे. राजस्थान, मध्य प्रदेशात अटीतटीची लढत सुरू आहे. जरी या राज्यात भाजप जिंकली तरी याचे श्रेय मोदी-शहांना जाणार नाही. मध्य प्रदेशात शिवराज सिंह चौहान आणि राजस्थानात वसुंधरा राजे यांचा हा विजय असेल. अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.



