
रणबीर कपूरच्या अभिनयाविशषी बोलायचे झाले तर तो पडद्यावर सगळ्यांचे लक्ष वेधून घेतो. त्याचा अभिनय हा पाहण्यासारखा आहे. जवळपास रणबीरने संपूर्ण चित्रपट खल्ला आहे. पहिल्या भागातच रणबीरची लव्हस्टोरी दाखवण्यात आली आहे. दुसऱ्या भागात सगळे ट्विस्ट येतात. बॉबी देओलची एण्ट्री होते. पण बॉबीला एकही डायलॉग नाही. त्याची एण्ट्री थोडच वेळापूर्ती असते पण भाव खाऊन जाते. बॉबी आणि रणबीरच्या वडिलांची दुश्मनी असते. या सगळ्यात एक महिला रणबीरच्या आयुष्यात खबरी बनून असते. हा पोस्ट क्लायमॅक्स सीन प्रेक्षकांची उत्सुकता आणखी टाणताना दिसतो.







