
ठाणे ग्रामीण पोलीस नियंत्रण कक्षाच्या अधिकाऱ्याने सांगितलं की, मुरबाड तालुक्यातील वेळू गावात रविवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. घरगुती कारणावरून आई आणि मुलामध्ये नेहमी वाद होत असत. रविवारी सायंकाळच्या सुमारासही आरोपी व आईचे जेवणाला चव नसल्याच्या कारणावरून भांडण झाले. रागाच्या भरात आरोपीने आईच्या गळ्यावर धारदार विळ्याने वार केला. वार वर्मी बसल्याने आईचा जागीच मृत्यू झाला. मुलाची तक्रार होती की, आई त्याच्यासाठी चवदार जेवण बनवत नाही.






