
देशमुखांना काही त्रास होऊ नये म्हणून आशुतोषने घराबाहेर सुरक्षा रक्षक उभे असतात. मात्र, जेव्हा त्यांच्या घरावर दगडफेक होते तेव्हा ते चहा प्यायला गेलेले असतात. ते जेव्हा येतात तेव्हा अनिरुद्ध चिडलेला असतो. तो त्या रक्षकांना कामावरुन काढून टाकतो. मालिकेच्या आगामी भागात त्या मुलाची आई स्वत: आरोहीला मदत करण्यासाठी केळकरांच्या घरी येते. त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराला वाचा फोटोण्यासाठी त्या एक पाऊल पुढे टाकतात. आता त्या मुलाची आई आरोहीला न्याय मिळवून देण्यास मदत करेल का? अनिरुद्ध आता काय निर्णय घेणार? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.








