
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘भाग्यलक्ष्मी’ फेम अभिनेत्याशी माध्यमांनी नुकताच संवाद साधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा अभिनेत्याने या भीषण अपघाताविषयी सांगितले. आकाश म्हणाला की, ‘ट्रक माझ्या गाडीवर कधी आदळला, ते मला कळलेच नाही. या अपघातात मला दुखापत झाली नाही. पण, या अपघाताने आम्हाला हादरवून सोडले आहे. माझी झोप अक्षरशः उडाली आहे. अपघातानंतर मी सुट्टीवर होतो. पण रात्री अजिबात झोप येत नव्हती. रात्रभर मी त्या अपघाताचा विचार करत राहिलो. या अपघातात मला काही झालं असतं तर.. हाच विचार सतत माझ्या मनात येतोय.’







