आंबेनळी घाट चढली, पण उतरलीच नाही…; स्कॉर्पिओ दरीत कोसळली, 24 तास मृतदेह पडून, अंगावर काटा येण

0
3


Raigad Accident Ambenali Ghat: रायगडच्या आंबेनळी घाटात स्कॉर्पिओ  कार 1200 फूट खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातामध्ये 8 जणांचा मृत्यू झाला होता. या अपघाताबाबत आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. आंबेनळी घाटात (Ambenali Ghat) दाभिळ टोक याठिकाणी हा अपघात झाला. मुळात हा अपघात शनिवारी रात्री झाला होता. मात्र, रात्रीच्या अंधारात स्कॉर्पिओ गाडी दरीत (Car Accident) कोसळल्याचे कोणाच्याही लक्षात आले नाही. मात्र, या तरुणांच्या कुटुंबीयांनी रविवारी सकाळपासून शोधाशोध सुरु केल्यानंतर रविवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास स्कॉर्पिओ कार 1200 फूट खाली दरीत पडल्याचे निदर्शनास आले आणि अपघात झाल्याचे निष्पन्न झाले. या नव्या माहितीमुळे या संपूर्ण प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. एखादा अपघात होतो किंवा गाडी दरीत कोसळते याचा पत्ता 24 तास उलटूनही पोलीस आणि संबंधित यंत्रणांना लागत नाही, याबद्दलही आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (Raigad Accident news)

रायगड आणि सातारा जिल्ह्यांच्या सीमेवरील अत्यंत धोकादायक समजल्या जाणाऱ्या आंबेनळी घाटात अनेकदा अपघात घडतात. या घाटात अनेक तीव्र उतार आणि वळणे आहेत. यामध्ये शनिवारी आणखी एका अपघाताची भर पडली. मुळात या अपघाताचा पत्ता आणखी काही काळ लागला नसता. मात्र, आपली मुलं घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरु केल्याने स्कॉर्पिओ कार दरीत कोसळून आठ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. या अपघातामध्ये मृत पावलेल्या आठ जणांपैकी पाच जण हे साताऱ्याच्या आसगाव येथील आहेत. हे सर्वजण एकाच गावात राहत असून बालपणीपासूनचे मित्र होते. सगळेजण एकमेकांच्या घरापासून काही अंतरावर राहत होते. मृतांपैकी रितेश लोखंडे याच्या वडिलांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना आपला मुलगा हर्णे येथून रविवारी नव्हे तर शनिवारी रात्री निघाल्याचे सांगितले. आम्ही अनेकदा सांगूनही रितेश त्याच्या मित्रांसोबत पिकनिकला गेला. शुक्रवारी रात्री ते साताऱ्यातून निघाले. शनिवारी पहाटे ते हर्णे येथे पोहोचले. दिवसभर त्याठिकाणी समुद्रावर खेळले, फिरले. त्यांनी मौजमजा करतानाचे स्टेटसही मोबाईल फोनवर टाकले होते. रितेशने आईला फोन करुन आम्ही मच्छी खाल्ल्याचे सांगितले. शनिवारी संध्याकाळी सात वाजता रितेशने मला फोन केला. तो मला म्हणाला की, रात्री 10 वाजता आम्ही निघणार आहोत. रात्री दहा वाजता ते जेवून साताऱ्याच्या दिशेने निघाले. रविवारी सकाळी मी कामावरुन घरी आलो. पोरगा घरी आला नाही म्हणून मला चिंता वाटायला लागली. दिवसभर माझं मन लागत नव्हतं, मी दिवसभर फोन करत होतो. मी त्याला 50 ते 60 फोन केले, फोनची रिंग वाजत होती, पण कोणी उचलत नव्हतं. नंतर मी संध्याकाळी सात वाजता माझ्या मोठ्या भावाला फोन केला, त्यांनी माझ्या भाचीला फोन करुन मुलं घरी आली नसल्याचे सांगितले. तिथून पुढे आम्ही शोध सुरु केला. मी अजिंक्यतारा रुग्णालयात सुरक्षारक्षक म्हणून काम करतो. तेथील डॉक्टरांनी मला मदत केली. आम्ही  पोलीस स्टेशनला फोन केले. आम्ही मुलांचे फोन ट्रॅक केले. रात्री एक-दोन वाजेपर्यंत आम्ही हे बघत होतो. तेव्हा आम्हाला कळाले की गाडी दरीत कोसळली आहे. हे कळाल्यानंतर माझ्या पायाखालची जमीन सरकली, असे रितेश लोखंडेच्या वडिलांनी सांगितले. 

Satara news: आंबेनळी घाटातील दरीत कार कोसळल्याचे कसे समजले?

स्कॉर्पिओ कार आंबेनळी घाटातील दरीत कोसळून आठ जणांचा मृत्यू झाल्याचे तब्बल 24 तासांनी उघड झाले. मुलांच्या कुटुंबीयांनी शोधाशोध सुरु केल्यानंतर हा सगळा प्रकार उघड झाला. या अपघातामध्ये मृत्यू झालेल्या रितेश लोखंडे याच्या वडिलांनी पोलीस आणि आपल्या नातेवाईकांना सांगून शोधाशोध सुरु केली. पोलिसांनी मुलांच्या मोबाईल फोनवरुन त्यांचे लोकेशन शोधून काढले. त्यांचे शेवटचे लोकेशन पोलादपूर आणि आंबेनळी घाटाच्या परिसरात आढळून आले. त्यावेळी पोलिसांना त्यांच्या कारचा अपघात होऊ गाडी दरीत कोसळल्याचा संशय आला. त्यानंतर ट्रेकर्सला पाचारण करुन अपघाताच्या परिसरात शोधाशोध सुरु झाली. त्यावेळी दरीत एक कार दिसून आली. मात्र, ही कार पूर्वीच्या अपघातामधील असल्याचे निष्पन्न झाले. दुसऱ्यांदा पुन्हा तपासणी केल्यानंतर खोल दरीत स्कॉर्पिओ कार पडल्याचे दिसून आले. रात्री कारमधून मृतदेह काढून वर आणणे शक्य नव्हते. त्यामुळे सोमवारी सकाळी ट्रेकर्सनी दोरीच्या साहाय्याने एका स्ट्रेचरला बांधून सर्व मृतदेह वर आणले. 

आणखी वाचा

Raigad Accident Ambenali Ghat: कार 800 फूट खोल दरीत, दोरीला बांधलेल्या पिवळ्या स्ट्रेचरमधून मृतदेह वर आणला, आंबेनळी घाटातील रेस्क्यू मोहीमचे PHOTOs

आणखी वाचा



Source link