
Zee Samvaad With Real Heroes: जर आपण आपल्या हिंदू राष्ट्रात हिंदू राष्ट्राबद्दल, सनातन धर्माबद्दल बोलणार नाही, तर मग काय पाकिस्तानमध्ये बोलणार का? असा प्रश्न भाजपा नेते नितेश राणे यांनी विचारला आहे. ‘झी रिअल हिरोज संवाद’च्या मंचावर नितेश राणे यांनी हजेरी लावली. “योग्य देशात योग्य भूमिका घेणे खूप महत्वाचे आहे. आम्ही इतर कोणत्याही धर्माचा अवमान करत नाही, परंतु आमच्या धर्माकडे घाणेरड्या नजरेने पाहणाऱ्यांना आम्ही त्यांची जागा दाखवतो,” असंही यावेळी ते म्हणाले.
नितेश राणेंना यावेळी विचारण्यात आलं की, ‘तुम्ही निर्भय आहात, तुम्ही धाडसी आहात, पण इतकीही भीती कशाला ज्यामुळे इतर धर्माचे लोकही घाबरतील?’. त्यावर नितेश राणे यांनी उत्तर दिलं की, “माझे रक्त भगवे आहे म्हणून, मी निर्भय आहे आणि माझ्या भगव्या रक्तामुळे मी धाडसी आहे. जर आपण आपल्या हिंदू राष्ट्रात हिंदू राष्ट्राबद्दल, सनातन धर्माबद्दल बोलणार नाही, तर मग काय इस्लामाबाद, पाकिस्तानमध्ये बोलणार का?”
पुढे ते म्हणाले की, “योग्य देशात योग्य भूमिका घेणे खूप महत्वाचे आहे. आम्ही इतर कोणत्याही धर्माचा अवमान करत नाही, परंतु आमच्या धर्माकडे घाणेरड्या नजरेने पाहणाऱ्यांना आम्ही आमची जागा दाखवतो”. पण तुम्ही काहीही बोलून टाकता? तुम्ही कोणाला दुखावता का? यावर नितेश राणे म्हणाले की, ठदुसरा धर्म लव्ह जिहादच्या नावाखाली आमचा धर्म, आमच्या मुला-मुलींना नष्ट करू शकतो. दुसरा धर्म स्वतःच्या धर्माचा प्रचार करण्यासाठी आमच्या मंदिरांच्या जागी मशिदी बांधू शकतो का? हे आमचे हिंदू राष्ट्र आहे, येथे हिंदूंचे हित प्रथम जपले जाते. नंतर इतरांचा विचार केला जातो”.
भाजपचे उपाध्यक्ष कृपाशंकर सिंह देखील व्यासपीठावर होते. त्यांना विचारलं असता त्यांनी सांगितले की, एक इंग्रजी वाक्य आहे – continuity with change. भूतकाळाच्या पायावर भविष्याची उभारणी. सनातन धर्म होता, आहे आणि राहणार. पण सोबतच विकास हा भाजपचा मूळ मंत्र आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इतके तरुण आहेत की, नितेश राणे आणि त्यांच्यात फरक वाटणार नाही. जर आपल्याकडे धर्म नसेल तर आपण कसे काम करणार. म्हणूनच हिंदुस्तान हा हिंदुस्तान आहे. जेव्हा जेव्हा धर्माचे नुकसान होते तेव्हा नीच आणि अहंकारी राक्षस वाढतात (जब जब होई धर्म की हानि, बाड़हि असुर अधम अभिमानी). प्रत्येकाने धार्मिक असले पाहिजे, परंतु जर कोणी म्हटलं की, मी माझ्या धर्मासाठी सर्वस्व ठेवतो आणि इतर धर्म काहीच नाही, तर नितेश राणे हे अशा लोकांसाठी एक उदाहरण आहेत. ते पुढे म्हणाले की, प्रत्येकाने धार्मिक असले पाहिजे, पण कट्टर नाही








