Friday, August 14, 2026
Homeदेश-विदेश350 राण्यांपैकी कोणासोबत तो शयनगृहात जाणार ते असं ठरायचं; लैंगिक उत्तेजन वाढविण्यासाठी...

350 राण्यांपैकी कोणासोबत तो शयनगृहात जाणार ते असं ठरायचं; लैंगिक उत्तेजन वाढविण्यासाठी करायचा खास उपाय, तर विवस्त्र असेल तरच महालात…

350 राण्यांपैकी कोणासोबत तो शयनगृहात जाणार ते असं ठरायचं; लैंगिक उत्तेजन वाढविण्यासाठी करायचा खास उपाय, तर विवस्त्र असेल तरच महालात…

[ad_1]

Maharaja Bhupinder Singh :   भारतातील इतिहास जेवढा वाचला तेवढा कमी आहे. भारतात मुघल सम्राटसोबत अनेक राजे, महाराजे होऊन गेले आहेत. प्रत्येक राजे, महाराजांची आपली अशी खासियत आणि इतिहास आहे. मुघल सम्राट हे अय्याशासाठी ओळखले जायचे. भारतात एक असाही हिंदू राजा होत्या ज्याचा तब्बल 365 राण्या आणि 83 मुलं होती. या हिंदू राजाबद्दल अनेक गोष्टी आजही जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. दिवाण जरमनी दास यांच्या ‘महाराजा’ या पुस्तकात या राजाबद्दल अनेक खुलासे करण्यात आले आहेत. 

आम्ही ज्या राजाबद्दल बोलत आहोत, त्याच नाव भूपिंदर सिंग असून तो भारतातील सर्वात अय्याश राजा म्हणून ओळखला जायचा. भूपिंदर सिंग हे 1900 ते 1938 पर्यंत ब्रिटीश भारतातील पटियाला संस्थानाचे राज्य करणारे महाराजा होते. वयाच्या अवघ्या 9 व्या वर्षी तो राजा झाला. 18 वर्षांचा झाल्यानंतर त्यांनी राज्याच पदभार स्विकारला आणि त्याने 38 वर्षे पटियालावर राज्य केलंय. या राजाची उंची 6 फूट 4 इंच तर वजन 178 किलो होते.  भूपिंदर सिंग यांच्या 365 राण्यांपैकी 10 प्रमुख राण्या होत्या. या राण्यांपासून महाराजांना 83 मुलं झाली आणि त्यापैकी फक्त 53 मुलं जिवंत राहिली. भूपिंदर सिंग यांचे त्यांच्या राण्यांवर खूप प्रेम होते. 

दिवाण जरमनी दास यांनी त्यांच्या ‘महाराजा’ या पुस्तकात महाराजा भूपिंदर सिंग यांच्या आयुष्याबद्दल अनेक गोष्टी लिहिल्या आहेत. या पुस्तकानुसार या राजाने लीला भवन किंवा उत्सव करणाऱ्यांसाठी महाल बांधलं होतं. या महालात एक नियम होता त्यानुसार विवस्त्र लोकांना महालात प्रवेश मिळायचा. पटियाला शहरातील भूपेंद्रनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर बहरदरी बागेजवळ हा महाल बांधला आहे.   

या महालात एक अशी खोलील आहे जिला प्रेम मंदिर असं म्हटलं जातं. ही खोली महाराजांसाठी खास असून तिथे दुसऱ्या लोकांनाही तिथे जाण्याची परवानगी नव्हती. या खोलीत राजाच्या सुखसोयींची पूर्ण व्यवस्था असायची. त्याच्या वाड्याच्या एक स्विमिंग पूल होता ज्यामध्ये एकाच वेळी सुमारे 150 जण आंघोळ करु शकायचे. याठिकाणी राजा अनेक पार्ट्या करायाचे. असं म्हणतात जेव्हा राजा या स्विमिंग पूलला आंघोळीला जायचा तेव्हा हरमच्या मुलींना विवस्त्र उभं केलं जात होतं. 

महाराजांच्या महालात दररोज 365 कंदील पेटवले जात होते. या कंदिलाच वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्यावर 365 राण्यांचं नाव लिहिलं होतं. असं म्हणतात या 365 कंदीलपैकी जी कंदिल पहिले विझलेल त्यावर ज्या राणीचं नाव असेल ती राणी राजाच्या शयनगृहात रात्री जायची. 

भूपेंद्र सिंह यांनी महालातील महिलांचे कपडे, मेकअप, दागिने इत्यादींसाठी तज्ज्ञ लोकांची नेमणूक केली होती. हरममधील महिलांना सतत आकर्षक ठेवण्यासाठी ते कपडे आणि दागिने डिझाइन करायचे. महाराजांना आवडेल असा मेकअपवर भर दिला जायचा. एवढंच नाही तर महिलांच्या शरीरात त्यांच्या इच्छेनुसार बदल करण्यासाठी फ्रेंच, इंग्लिश आणि भारतीय प्लास्टिक सर्जनचीही नेमणूक करण्यात आली होती. यासाठी एक प्रयोगशाळाही उघडण्यात आली होती. 

महाराजांच्या खोलीत कामुक कलाकृती बनवल्या होत्या. या कलाकृती प्राचीन मंदिरांमध्ये पाहायला मिळतात. त्या कलाकृतींमध्ये चित्रित केलेल्या प्रेम आणि लैंगिक जीवनासाठी महाराजांना प्रेरणा मिळायची असं या पुस्तकात सांगण्यात आलंय. विविध आसनांचा सराव करण्यासाठी त्याने आपल्या खोलीच्या एका कोपऱ्यात रेशमी तारांनी बनवलेला झुलाही टांगला होता असं म्हणतात. 

शारिरीकदृष्ट्या मजबूत असूनही महाराज सर भूपेंद्र सिंह विविध प्रकारची कामोत्तेजक औषधे घ्यायचे असं या पुस्कात उल्लेख करण्यात आलाय.  भारतीय डॉक्टर मोती, सोने, चांदी आणि लोखंड, विविध प्रकारची औषधे तयार करायचे. एकदा तर खास बारीक चिरलेलं गाजर आणि चिमणीचा मेंदू पासून त्यांच्यासाठी औषध तयार करण्यात आलं होतं. 

त्याच्या आहाराचा आणि थाटाचा उल्लेख डॉमिनिक लॅपियर आणि लॅरी कॉलिन्स यांनी त्यांच्या ‘फ्रीडम ॲट मिडनाईट’ या पुस्तकातही करण्यात आला आहे. महाराजा एका दिवसात सुमारे 10 किलो अन्न खायचा असं म्हणतात. चहा पिताना दोन कोंबड्या खाणे हे त्यांचा नाश्ता असायचा. खाजगी जेट खरेदी करणारे ते पहिले भारतीय व्यक्ती होते. 

महाराजा भूपिंदर सिंग यांनाही मद्यपानाची आवड होती. कदाचित तुम्हाला माहित नसेल सध्या लोकप्रिय असलेल्या पटियाला पेगचा शोध त्यांनीच लावला होता. तर त्याच्याकडे 44 रोल्स रॉयस कार होत्या, त्यापैकी 20 कारचा ताफा दैनंदिन कामांसाठी वापरला जायचा. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की महाराजा भूपिंदर सिंग हे भारतातील पहिले व्यक्ती होते ज्यांच्याकडे स्वतःचे विमान होतं. जे त्यांनी 1910 मध्ये ब्रिटनकडून खरेदी केलं होतं. 

 



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments