Friday, August 21, 2026
Homeसाताराफलटणचा शकुनी मामा कधीच जिंकणार नाही, जयकुमार गोरेंचा रामराजे निंबाळकरांना टोला

फलटणचा शकुनी मामा कधीच जिंकणार नाही, जयकुमार गोरेंचा रामराजे निंबाळकरांना टोला

फलटणचा शकुनी मामा कधीच जिंकणार नाही, जयकुमार गोरेंचा रामराजे निंबाळकरांना टोला

[ad_1]

Jayakumar Gore on Ramraje Naik Nimbalkar : रामायणापासून महाभारतापर्यंत षडयंत्र  करणारा शकुनी मामा कधीही जिंकला नाही. मग फलटणचा शकुनी सुद्धा जिंकणार नाही, असे म्हणत मंत्री जयकुमार गोरे यांनी नाव न घेता माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकरांवर यांच्यावर टीका केली. सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यामध्ये मार्डी गटाच्या वतीने ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर टीका केली.

फलटणचा शकुनी जिंकणार नाही

जयकुमार गोरे यांनी रामराजे नाईक निंबाळकर यांचे नाव न घेता त्यांना शकुनी मामाची उपमा  दिली. रामायणापासून महाभारतापर्यंत षडयंत्र करणारा शकुनी मामा कधीही जिंकला नाही मग फलटणचा शकुनी सुद्धा जिंकणार नाही अशी जहरी टीका जयकुमार गोरे यांनी केली आहे. यमाने जीआर काढला आहे, पोटाला यायचं बंद केलं आहे. स्मशानभूमीत जायच्या आधीच ते फेडल्याशिवाय त्याला स्मशानभूमीत घेऊन जाणार नाही असा जीआर यमाने काढला असल्याचे गोरे म्हणाले. 

मी बारामतीची तडजोड केली असती तर माझ्या आमदारकीचा त्रास कमी झाला असता

जिल्हा परिषद सदस्य होताना संघर्ष केला त्यानंतर आमदार झालो संघर्ष केला. एकही वेळ अशी नाही की मी संघर्ष केला नाही. त्यामुळं परमेश्वराने सर्व गोष्टींवर मार्ग काढून दिला आहे. मान खटावच्या मातीचा सुपुत्र कधी झुकला नाही कधी वाकला नाही. मी बारामतीची तडजोड केली असती तर माझ्या आमदारकीचा त्रास कमी झाला असता. मी फलटणशी आणि साताऱ्याशी तडजोड केली असती तर राजकारणातील संघर्ष, त्रास कमी झाला असता. मात्र माण खटावच्या मातीला स्वाभिमानाने उभं करु शकलो नसतो. त्यांना पाणी देऊ शकलो नसतो असे गोरे म्हणाले. 

मला संपवता संपवता तेच घरी बसले

माझी बाजू सत्याची होती मी संघर्ष केला. सत्याचा आयुष्य जास्त असते. आजपर्यंतचा इतिहास आहे रामायणापासून महाभारतापर्यंत षडयंत्र करणारा कधीही जिंकला नाही. शकुनी मामा जिंकला नाही मग फलटणचा शकुनी सुद्धा जिंकणार नाही. मला संपवता संपवता मी संपलो नाही मात्र त्यांना संपावे लागलं. त्यांना घरी बसावं लागलं. त्यामुळेच मी स्वाभिमानाने उभा असल्याचे जयकुमार गोरे म्हणाले. अनेकांना काळजी आहे, अनेकांनी केसमध्ये नाव आहे की नाही माहिती नसताना जामीन घेऊन ठेवले. त्यामुळं जयकुमार गोरे कधीही चुकीची कारवाई कोणावर करणार नाही. सत्ता असली किंवा नसेल तरी सुद्धा कोणाच्या वाळक्या पाचोळ्यावर पाय देणार नाही असेही गोरे म्हणाले. 

महत्वाच्या बातम्या:

Jaykumar Gore : ‘जे कधी पाकिस्तानात घडले नाही ते त्यांनी इथे करून दाखवले’; मंत्री जयकुमार गोरेंची माळशिरसच्या सभेतून तूफान फटकेबाजी

 

अधिक पाहा..

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments