
[ad_1]
लक्ष्मीच्या पाऊलांनी
‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या मालिकेत सध्या रंजक कथानक पाहायला मिळत आहे. नयना आणि राहुल यांच्या लग्नाची बोलणी सुरू झाली असून, नैनाची आई या लग्नाला आता नकार देताना दिसणार आहे. दुसरीकडे, अद्वैत आणि कला यांनी आता राहुलच्या आईकडून या लग्नासाठी परवानगी मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र. ही परवानगी देण्याच्या बदल्यात राहुलची आई आता अद्वैतकडून एक वचन घेणार आहे. या वचनामुळे कला आणि अद्वैत यांच्या आयुष्यात आता एक नवीन वादळ येणार आहे. दुसरीकडे, आईने नकार दिला तरी मी राहुलशीच लग्न करणार आणि लग्न करून त्याच घरात जाणार, हा स्वतःचा निर्णय नयना सगळ्यांना सांगून मोकळी झाली आहे. मालिकेच्या याच रंजक कथानकाने प्रेक्षकांना मालिकेशी बांधून ठेवले आहे. तर, ६.६चा टीआरपी मिळवत या मालिकेने टीआरपी शर्यतीत दुसरे स्थान पटकावले आहे.
[ad_2]
Source link
