
पुढे आदित्य ठाकरे म्हणाले की, “महाराष्ट्राने यापू्र्वी कधीच अशी अराजकता पाहिली नव्हती. कायदा सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडताना पाहणे धक्कादायक आणि सुन्न करणारे आहे. सामान्य माणसाच्या रक्षणासाठी यंत्रणा अस्तित्वात तरी आहे का? कायद्याचा धाक उरलाय का? प्रशासन आणि व्यवस्था संपूर्णपणे ढासळली आहे, हे भीषण आहे.”






