Friday, August 14, 2026
Homeदेश-विदेशएक असा सीरियल किलर ज्याने 10, 20, 30 नव्हे तब्बल 931 जणांना...

एक असा सीरियल किलर ज्याने 10, 20, 30 नव्हे तब्बल 931 जणांना ठार मारलं!

एक असा सीरियल किलर ज्याने 10, 20, 30 नव्हे तब्बल 931 जणांना ठार मारलं!

[ad_1]

Crime Story Of Serial Killer Behram: भारतात असे अनेक सिरिअल किलर आलेत ज्यांनी केलेल्या निर्घृण हत्या व गुन्हे ऐकल्यावर अंगावर काटा येतो. 18 आणि 19 शतकात भारतात असा एक सिरीअल किलर होता ज्याच्या नावाने इंग्रजही थरथर कापत. त्याने इतक्या जणांची निर्घृण हत्या केलीये की त्यांना किंग ऑफ ठग असंही म्हणतात. भारतातील या सर्वात खतरनाक सिरिअल किलरचे नाव आहे ठग बेहराम. कोण होता हा ठग बेहराम, जाणून घेऊया. 

बेहरामबद्दल बोललं जातं की, सन 1790 ते 1840 च्या दरम्यान तो इतका कुख्यात होता की इस्ट इंडिया कंपनीचे अधिकारीदेखील त्याला घाबरत होते. कारण तो लुटीसाठी लोकांवर हल्ला करायचा आणि त्याच्या विशिष्ट्य पद्धतीने तो लोकांची गळा घोटून हत्या करायचा. बेहरामची स्वतःची अशी टोळी होती. त्याच्या टोळीतील लोक व्यापारी आणि पर्यटकांमध्ये वेष बदलून फिरत असायचे आणि संधी साधून लोकांची हत्या करायचे आणि सर्व सामान लुटून पसार व्हायचे. 

ईस्ट इंडिया कंपनीचा एक अधिकारी जेम्स पेटॉनने लिहलं होतं की, बेहरामने त्याच्या संपूर्ण आयुष्यात 931 जणांची हत्या केली होती. त्याने हत्येचा गुन्हा कबूलदेखील केला होता. जेम्स पेटॉनने दिलेल्या माहितीनुसार, तो नेहमी त्याच्यासोबत एक पिवळा रुमाल ठेवत असायचा आणि त्यात रुमालाने लोकांची गळा घोटून हत्या करायचा. त्याने 900 हून अधिक लोकांची गळा दाबून हत्या केली होती. त्याच्या या अमानुष कृत्यामुळं त्याच नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्येही नोंद आहे. 

बहरामची दहशत इतकी होती की, दिल्ली ते ग्वालिअर, झांशी आणि जबलपूरपर्यंतच्या व्यापाऱ्यांनी आणि पर्यटकांनी, सैनिकांनी त्या रस्त्यांवरुन फिरणे बंद केले होते. जिथे कुठे बेहरामच्या हल्ल्याची शक्यता वाटायची तिथे लोक जाणेच टाळायचे. कारण बेहराम त्याची संपूर्ण टोळी घेऊन अशापद्दतीने लोकांना गायब करायचा की पोलिसांना त्यांचा मृतदेहदेखील सापडायचा नाही. 

असं म्हणतात की, ठग एका खास भाषेत बोलायचा जी कोणालाही समजायची नाही. ही भाषा समजण्यासाठी ब्रिटिश हेरांनी खूप प्रयत्न करुनही समजली नाही. बेहरामच्या टोळीतील ठग ज्या खास भाषेत बोलायचे त्याला रामोसी असं म्हटलं जायचं. रामोसी एक सांकेतिक भाषा आहे. प्रवासाला निघणारे लोक जेव्हा झाडाखाली किंवा एखाद्या आश्रय घेऊन झोपायचे तेव्हा ते ठग गिधाडाच्या आवाजात रडायचे आणि हल्ल्याचा इशारा द्यायचे. त्यानंतर बहराम त्याच्या टोळीसह तिथे पोहचायचा आणि पिवळ्या रंगाच्या रुमालात शिक्का बांधून त्या लोकांचा गळा आवळून खून करायचा. लोकांचे मृतदेह विहिरीत टाकून किंवा एखाद्या ठिकाणी दफन करुन निघून जायचे. 

बेहरामच्या या भयानक कृत्याची माहिती इंग्लंडपर्यंत पोहोचली. तेव्हा ईस्ट इंडिया कंपनीने 1809 साली एक ब्रिटिश अधिकारी कॅप्टन स्लीमॅनकडे ही जबाबदारी सोपवली. त्यानंतर तपासात समोर आले की ठग बेहरम आणि त्याच्या टोळीनेच हत्या करुन मृतदेह गायब केले आहेत. कॅप्टन स्लीमॅन यांनी खुलासा केला की ठग बेहरामच्या टोळीत 200 हून अधिक ठग आणि हल्लेखोर आहेत. 

कॅप्टन स्लीमॅन यांनी बेहरामच्या शोधासाठी मोठी चळवळ उभारली होती. त्यानंतर अखेर 10 वर्षांनी त्यांना खतरनाक ठग आणि सिरीअल किलर सापडण्यात यश आले. बेहरामला जेव्हा अटक केली तेव्हा त्याचे वय 75 वर्षे होते. त्यानंतर 1840 साली त्याला त्याच्या अपराधांसाठी मृत्यूदंड देण्यात आला. याच बहराम ठगावर आधारित एक चित्रपटदेखील प्रदर्शित झाला होता. ठग्स ऑफ हिंदुस्थान. यात अमिताभ बच्चन, आमिर खान, कॅटरीना कैफ आणि फातिमा सना शेख यांनी भूमिका साकारली आहे. 



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments