
चेतन आनंदच्या ‘आखिरी खत’ या चित्रपटामधून पदार्पण करणारे राजेश खन्ना हे एकेकाळी बॉक्स ऑफिसवर सर्वात जास्त कमाई करणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक मानले जायचे. ४०व्या अकादमी पुरस्कारांमध्ये आखरी खतने भारतातील सर्वोत्कृष्ट परदेशी भाषेतील चित्रपटाचा पुरस्कार जिंकला होता. यानंतर राजेश खन्ना यांनी ‘राज’, ‘औरत’, ‘बहारों के सपने’, ‘इत्तेफाक’ आणि ‘डोली’ या चित्रपटांमध्ये काम केले. राजेश खन्ना यांनी त्यांच्या काळात असे स्टारडम पाहिले आहे, ज्याची कल्पना करणे देखील अशक्य आहे.








