
‘आम्ही कोणालाही लग्न करा किंवा ब्रह्मचारी राहा असं सांगत नाही. लग्न करायचं की नाही हा ज्याच्या-त्याच्या आवडीचा आणि निवडीचा प्रश्न आहे,’ असा खुलासा अध्यात्मिक गुरू सद्गुरू जग्गी वासुदेव यांची संस्था ईशा फाऊंडेशननं केला आहे. मद्रास उच्च न्यायालयानं केलेल्या एका टिप्पणीवर संस्थेनं ही प्रतिक्रिया दिली आहे.