
विधानसभा निवडणुकीत पराभवाचा अनपेक्षित धक्का बसलेल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेपुढं आता टिकून राहण्याचं आव्हान निर्माण झालं आहे. मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक ही ठाकरेंच्या शिवसेनेसाठी कसोटी ठरणार आहे. विधानसभेला महाविकास आघाडीचा फारसा फायदा न झाल्यानं मुंबईची निवडणूक स्वबळावर लढण्याचा विचार पक्षात सुरू आहे.