
महाविकास आघाडीत लोकसभेच्या रामटेक, हिंगोली, वर्धा, भिवंडी, शिर्डी, दक्षिण मध्य मुंबई आणि उत्तर पश्चिम मुंबई या ७ मतदारसंघाचा निर्णय झालेला नाही. जागावाटपासंदर्भात आता २ फेब्रुवारीला पुन्हा बैठक होणार असून त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ३ फेब्रुवारीला दिल्लीमध्ये बैठक होणार आहे. महाआघाडीकडून १० फेब्रुवारीपर्यंत जागावाटपाचा तिढा सोडवायचा प्रयत्न आहे.






