
मटणासाठी वर पक्षाने घातला गोंधळ
मिळालेल्या माहितीनुसार, चौपारण ब्लॉकच्या गोविंदपुरतांड गावात एक लग्न सोहळा आयोजित करण्यात आला होता, या लग्न समारंभात मटण खाण्यावरून लग्नातील पाहुण्यांनी गोंधळ घातला. वऱ्हाडी मंडळीला मटण उशिरा वाढल्याने वर पक्षातील पाहुणे मंडळीना राग आला. त्यांनी यावरून वधू पक्षातील पाहुणे मंडळींशी वाद घालण्यास सुरुवात केली. ही बाब वराला समजल्यावर तो थेट लग्न मंडपातून बाहेर गेला. दरम्यान मंडपात दोन्ही पक्षात जोरदार हाणामारी झाली. यानंतर वर लग्न करण्यास तयार झाला. मात्र, लग्नात झालेल्या या प्रकारामुळे वधू नाराज झाली. एका किरकोळ कारणामुळे मोठा गोंधळ झाल्याने अपमानित झालेल्या वधूने वरासोबत लग्न करण्यास नकार दिला. तिच्या या निर्णयाला तिच्या आई वडिलांनी देखील पाठिंबा दिला. यामुळे वर पक्षाला नवरीशिवाय माघारी परतावे लागले.








