
२०१७ मध्ये रेवंत रेड्डी काँग्रेसमध्ये सामील झाले. २०१८ च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने त्यांना मलकाजगिरी मतदारसंघातून तिकीट दिले. या निवडणुकीत त्यांचा विजय झाला. २०२१ मध्ये काँग्रेसने त्यांना मोठी जबाबदारी देत प्रदेश अध्यक्ष बनवले.








