
महाराष्ट्र सरकारने गेल्या वर्षी मुंबईतील दुकानांवर मराठी पाटी लावण्याचे आदेश दिले होते. मात्र, अनेक दुकानांनी याचे पालन केले नव्हते. त्यामुळे मुंबई महापालिकेच्यावतीने कारवाई इशारा देण्यात आला होता. तर, याबाबत व्यापाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारने गेल्या वर्षी लागू केलेल्या नियमाला त्यांच्या घटनात्मक आव्हानाचा विचार करण्याचे मान्य केले.









