श्रावण पौर्णिमेला पाली भाषेत सावन्त मासो म्हणतात. ही पौर्णिमा साधारणतः ऑगस्ट महिन्यात येते. श्रावण पौर्णिमेला बुद्धाच्या जीवननात काही महत्वपूर्ण घटना घडल्यात.
१. अंगुलीमालाची धम्मदीक्षा
२. अनाथपिंडकाचे मुखोद्गत सुत्तपठन
- पहिली बौद्ध धम्मसंगीती
१. अंगुलीमालाची धम्मदीक्षा कोसलदेशात एक सुविख्यात अंगुलीमाल नावाचा डाकू दरोडेखोर राहत होता कोसलदेशाचा राजा प्रसेनजीत होता. डाकू अंगुलीमाल जंगलातून जाणाऱ्या येणाऱ्या वाटसृन्न ठार मारून त्यांच्या हाताची करंगळी कापून गळ्यातील माळेत गुंफत असे. त्यामुळे त्याचे नाव अंगुलीमाल पडले. अंगुलीमालाचे मूळ नाव अहिंसक. अहिंसक हा अतिशय हुशार आज्ञाधारक व गुरुभक्त होता. त्याने अनेक विद्या इतरांच्या मनाने लवकर ग्रहण केल्या म्हणून तो गुरू मनिभद्राचा आवडत शिष्य झाला. इतर शिष्यांना हे बघवले नाही म्हणून त्यांनी गुरू मनीभद्राजवळ
नाते सांगून गुरूंना अहिंसक विरुद्ध भडकवण्यात आले. रागावलेल्या गुरूंनी अहिंसक ला हजार माणसांची हत्या करून त्याचा पुरावा देण्याची शिक्षा सुनावली. म्हणून त्याने मिळेल त्याची हत्या करून त्याची करंगळी कापून माळेत ओवत होता. सदाचारी अहिंसक दुराचारी, क्रूरकर्मा अंगुलीमाल बनला. त्याने त्याच्या माळेतील करंगळींची संख्या मोजली ती ९९९ भरली. एकच अंगुलीची आवश्यकता होती.
जेतवनात तथागत राहत असतांना अंगुलीमालविषयी ऐकले. त्याला सदाचारी बनवण्याचा निश्चय केला व एकटेच अंगुलीमालाला शोधायला निघाले. ज्या जंगलातून मोठ्या समूहाने कोणी जाऊ शकत नव्हते त्या वाटेने एकटे तथागतांना येताना बघून त्याला नवल वाटले. त्याच्या मनात ठार मारण्याचा विचार आला. तो भगवंताचा पाठलाग करू लागला. त्याच्या जवळ असलेले हत्यार घेऊन भगवंताचा पाठलाग करू लागला परंतु तो भगवंताला गाठू शकला नाही. तो मोठ्याने ओरडून भगवंताला थांबण्यास सांगू लागला. भगवंत म्हणाले “मी केव्हाच थांबलो आहे. मी तुला
आपलासा, सदाचाराच्या मार्गावर आणावा या साठी तुझ्याकडे आलो आहे. तुझ्यात अजूनही कुशल आहे, त्या कुशल कर्माला संधी दिली तर तुझा कायापालट होईल.” अंगुलीमाल म्हणाला “मी काय करू?” त्यावर झाडाचे पान तोडून आणून ते जोडण्यास सांगितले. शेवटी भगवंत म्हणतात ज्याला जोडता येत नाही त्याला तोडायचे नसते. कोणाला जीवन देता येत नसेल तर त्याचे घेण्याचे पातक सुद्धा करू नये. भगवंताच्या दिव्य वाणीने व दैदिप्यमान शांत चेहरा बघून अंगुलीमाल ने हातातील तलवार व गळ्यातील माळ काढून खोल खड्यात फेकली. भगवंताचे पाय धरून संघप्रवेअहाची इच्छा व्यक्त केली. तथागतांनी “भिक्खवे आवे!” म्हणून संघात प्रवेश दिला. तो दिवस होता श्रावण पौर्णिमेचा, इ. स. पू. ५०४ हा होता. ज्याला बलाढ्य सेना, तिर तलवार याचा वापर करूनही हरवू शकला नाही अशा क्रूरकर्माला करुणा वाणीने भिक्खू बनवले.
२. अनाथपिंडकाचे मुखोद्गत सुत्तपठन अनाथपिंडक म्हणजे सुदत्त. अनाथांना पिंड म्हणजे भोजन देणारा म्हणून लोक त्यास अनाथपिंडक या नावाने ओळखत. भगवान बुद्ध राजगृह मध्ये असतांना अनाथपिंडक आपल्या खाजगी कामानिमित्त त्याचा मेहुणा धनपाल यांच्या कडे आला.
अनाथपिंडक ज्यांच्याकडे उतरला होता त्यांच्या कडे भगवंताचे दर्शन घेतले. भगवंताकडे एखाद्या धार्मिक विषयावर प्रवचन ऐकण्याची इच्छा व्यक्त केली व भगवंतांनी प्रवचन दिले. भगवंताचे प्रवचन ऐकून व शंका निरसन केल्यानंतर अनाथपींडक भगवंताच्या चरणी नतमस्तक झाला व संघात सामील करण्याची इच्छा व्यक्त केली.
अनाथपिंडक याने श्रावस्ती येथे एक मोठे विहार बांधले त्याचे नाव “जेतवन” ठेवले. अनाथपिंडकाने हे विहार भगवंतांना जगातील भिक्खूसंघाच्या उपयोगासाठी दान दिले. तथागतांनी या दानाचा स्वीकार केला. याच जेतवनात भगवंतांनी २५ वर्षावसाचे दिवस घालवले.
अनाथपिंडकाने तथागताला धम्मदीक्षेची
विनंती केली. तेव्हा भगवंतांनी
विनंती केली, तेव्हा भगवंतांनी उपासकाची (गृहस्थ शिष्य) दीक्षा दिली. तो वर्षावासात दररोज भगवंताच्या दर्शनासाठी व धम्मदेशना ऐकण्यासाठी जेतवनात जात असे. अनाथपिंडकाबद्दल भगवंत एके ठिकाणी म्हणतात श्रावण पौर्णिमेला १६० सुत्त महिलांना मुखोद्गत संगीतले, एवढे त्याचे पाठांतर अद्भूत होते.
- पहिली बौद्ध धम्मसंगीती बुद्धाच्या महापरिनिब्बानंतर पहिली धम्मसंगीति राजगृहाच्या वैभार पर्वतावर सप्तपर्णी नामक गुहेत संपन्न झाली. म्हास्थविर महाकश्यपच्या अध्यक्षतेखाली भिक्खू संघाने ही पहिली संगिती घेण्यात आली सुत्तपिटकाकरिता आनंद महास्थाविरांना प्रमुख नेमण्यात आले आणि विनयपिटकाकरिता उपली महस्थविर यांना प्रमुख नेमण्यात आले. ही धम्मसंगीति घेण्यामागील प्रमुख कारण म्हणजे तथागतांच्या निर्वाणाच्या वेळी त्यांचे जेष्ठ शिष्य महामोग्गल्यायन व सारीपुत्त हे दोघेही हयात नव्हते. त्याकाळी लिपीचा शोध लागला नव्हता त्यामुळे सर्व सूत्त, वचने शिष्यांनी कंठस्थ त्यामुळे सर्व सुत्त, वचने शिष्यांनी कंठस्थ केली होती. त्यात थोडाफार बदल होण्याची शक्यता होती. बुद्धवचनांचे आणि पदांचे शुद्धत्व राखण्यासाठी धम्मासंगीतिचे आयोजन करणे आवश्यक होते. त्यावेळी उत्तर वयात संघात सामील झालेला सुभद्र नावाचा भिक्खू होता . भगवंताच्या महापरि निब्बान झाल्यानंतर समस्त शिष्यांना म्हणाला “आपण श्रमण गौतमाच्या निर्बंधातून मुक्त झालो हे बरे.” व आनंदित झाला. संघात अधम्म व अविनय वाढू नये म्हणून धर्म आणि विनय याचे सांगायन केले.
या संगीतित ५०० भिक्खू उपस्थित होते व ही संगिती जवळपास सात महिणे चालली. या संगीतित तथागतांनी सांगितलेल्या ८४,००० उपदेशांना उपस्थित शिष्यवर्गाकडून कंठस्थ करण्यात आले. या धम्मसंगीतिचे आयोजक व संरक्षक मगध नरेश अजातशत्रू हे होते. या संगीतित भक्खूंचे चार स्तर मानले गेले. जे भक्खूगन शिक्षण घेत त्यांना शैक्ष्य म्हणत. त्यांना स्रोतापन्न, संस्कृतागामी, अनागामी, व अर्हत या चार अवस्था मान्य करण्यात आल्या. हे अर्हत
मत्सर, लोभ, द्वेष, मोह यापासून धम्मासगाातच आयाजन करण आवश्यक होते. त्यावेळी उत्तर वयात संघात सामील झालेला सुभद्र नावाचा भिक्खू होता . भगवंताच्या महापरि निब्बान झाल्यानंतर समस्त शिष्यांना म्हणाला “आपण श्रमण गौतमाच्या निर्बंधातून मुक्त झालो हे बरे.” व आनंदित झाला. संघात अधम्म व अविनय वाढू नये म्हणून धर्म आणि विनय याचे सांगायन केले.
या संगीतित ५०० भिक्खू उपस्थित होते व ही संगिती जवळपास सात महिणे चालली. या संगीतित तथागतांनी सांगितलेल्या ८४,००० उपदेशांना उपस्थित शिष्यवर्गाकडून कंठस्थ करण्यात आले. या धम्मसंगीतिचे आयोजक व संरक्षक मगध नरेश अजातशत्रू हे होते. या संगीतित भक्खूंचे चार स्तर मानले गेले. जे भक्खूगन शिक्षण घेत त्यांना शैक्ष्य म्हणत. त्यांना स्रोतापन्न, संस्कृतागामी, अनागामी, व अर्हत या चार अवस्था मान्य करण्यात आल्या. हे अर्हत मत्सर, लोभ, द्वेष, मोह यापासून संपूर्णपणे मुक्त असत. ही धम्म संगिती श्रावण पौर्णिमा इ. स. पु. ४८३ रोजी सुरू झाली.