[ad_1]
राज्यभरात सोमवारी रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात असतानाच सिंधुदुर्गातून एक मोठी दुर्घटना समोर आली आहे. मासेमारीसाठी गेलेल्या खलाशांची बोट उलटल्याने समुद्रात बुडून तीन जणांचा मृत्यू झाला आहे. या बोटीतून चार जण प्रवास करत होते. मात्र, समुद्रामध्ये निर्माण झालेल्या धुक्यांमुळे बोट दगडावर आपटून उलटली आणि चारही जण समुद्रात बुडाले. यातील एकजण पोहत किनाऱ्यावर आल्याने बचावला तर तीन जणांचे मृतदेह सापडले आहेत.
[ad_2]
Source link
