या दुसऱ्या पेटीच्या मिळण्याने इंद्राणीला तिच्या कलियुगात असण्याचा अर्थ कळतो. पेटीमध्ये इंद्राणीसाठी एक मजकूर असतो जे वाचून तिला कळत की इंद्राणी आणि नेत्राचं सोबत असणं एका खास गोष्टीसाठी गरजेच आहे. पहिल्या दोन पेट्या इंद्राणी आणि नेत्राच्या हाती लागल्या आहेत हे बघून रुपालीच रक्त खवळत आणि ती मनात गाठ बांधते कि तिसरी पेटी ती त्यांच्या हाती लागू देणार नाही. इंद्राणीला आणि नेत्राला पंचपीटीकेतल्या दुसऱ्या पेटीमधून कोणतं रहस्य उलगडणार? की आणखी काही प्रश्न निर्माण होणार? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. मालिकेच्या आगामी भागात त्यांना या प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत.






