
काय म्हणाले संजय राऊत ?
खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. संजय राऊत म्हणाले, राज्यात विधानसभा निवडणुका लढतांना महाविकास आघाडीला मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा द्यावाच लागणार आहे. सर्वाधिक जागा जास्त त्यांचा मुख्यमंत्री अस कोण म्हणत? मुख्यमंत्री पदाचा चेहरा नसेल तर बिन चेहऱ्याची निवडणूक लढता येणार नाही. राज्याने उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले असून लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला जे यश मिळालं ते उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री म्हणून केलेल्या नेतृत्वाचा परिणाम आहे. लोकसभा निवडणुकीत झालेले मतदान ठाकरे यांच्याकडे पाहुनही झालेलं आहे. या निवडणुकीत तिन्ही पक्षाची ताकद एकत्र होती. त्यामुळे बिन चेहऱ्याचं सरकार, हे अजिबात चालणार नाही. किंबहुना लोक ते स्विकारणार देखील नाही. यामुळे मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा द्यावाच लागेल, असे राऊत म्हणाले.