Saturday, September 12, 2026
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्रातील राज्यसभा निवडणूक बिनविरोध; सातही उमेदवारांची निवड निश्चित

महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणूक बिनविरोध; सातही उमेदवारांची निवड निश्चित


मुंबई – महाराष्ट्रातून राज्यसभेच्या सात जागांसाठी होणारी निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता जवळपास निश्चित झाली आहे. या सात जागांसाठी केवळ सात उमेदवारांनीच अर्ज दाखल केल्यामुळे मतदानाची गरज पडणार नसून सर्व उमेदवारांची निवड निश्चित मानली जात आहे.
भाजपकडून विनोद तावडे, माया इवनाते आणि राम वाडकुटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) कडून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना संधी देण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून पार्थ पवार यांना उमेदवारी मिळाली असून शिवसेना (शिंदे गट) कडून जोती वाघमारे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
सात जागांसाठी सातच अर्ज आल्याने राज्यात कोणतीही निवडणूक लढत होणार नाही. त्यामुळे सर्व उमेदवारांची बिनविरोध निवड होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या निवडीमुळे महाराष्ट्रातील भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट तसेच आरपीआय यांचे राज्यसभेतील प्रतिनिधित्व वाढणार आहे. विशेष म्हणजे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या राज्यसभेतील पुनरागमनामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
#राज्यसभा #महाराष्ट्रराजकारण #SharadPawar #ParthPawar #VinodTawde #RamdasAthawale #MaharashtraPolitics

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments