Friday, August 28, 2026
Homeदेश-विदेशRahul Gandhi Statement | राहुल गांधींच्या अडचणी वाढणार? पीएम मोदींना पनौती म्हणणे...

Rahul Gandhi Statement | राहुल गांधींच्या अडचणी वाढणार? पीएम मोदींना पनौती म्हणणे पडले महागात ; वक्तव्याविरोधात भाजप निवडणूक आयोगात तक्रार | Navarashtra (नवराष्ट्र)

Rahul Gandhi Statement | राहुल गांधींच्या अडचणी वाढणार? पीएम मोदींना पनौती म्हणणे पडले महागात ; वक्तव्याविरोधात भाजप निवडणूक आयोगात तक्रार | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

rahul gandhi

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्याबाबत भाजपने गुरुवारी (२२ नोव्हेंबर) निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. याशिवाय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याविरोधातही आयोगाचा दरवाजा ठोठावण्यात आला आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्याबाबत भाजपने गुरुवारी (२२ नोव्हेंबर) निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. याशिवाय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याविरोधातही आयोगाचा दरवाजा ठोठावण्यात आला आहे. (Rahul Gandhi Statement against PM Narendra Modi)

केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया, भाजप नेते ओम पाठक आणि राधामोहन दास अग्रवाल यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार करून खर्गे आणि राहुल गांधी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. राहुल गांधी यांनी मंगळवारी (21 नोव्हेंबर) राजस्थानमधील एका निवडणूक सभेत “पीएम म्हणजे पनौती मोदी” असे म्हटले होते.

तर काँग्रेस अध्यक्ष खरगे यांनी दावा केला होता की, पंतप्रधान मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांची जात ओबीसी यादीत समाविष्ट करण्यात आली होती. त्यांनी पंतप्रधान मोदींना खोटारडे सरदार म्हटले होते.

काय म्हणाले राहुल गांधी?

भारत-ऑस्ट्रेलिया क्रिकेट विश्वचषक फायनल दरम्यान अहमदाबाद स्टेडियममध्ये पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीने देशाच्या संघाचे दुर्दैव घडले आणि तो सामना हरला, असे राहुल गांधी म्हणाले होते.

भाजपने केली ‘ही’ मागणी?

या संपूर्ण प्रकरणात राहुल गांधींनी माफी मागावी, अशी मागणीही भाजपने केली होती. माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद म्हणाले की, गांधींनी देशाच्या पंतप्रधानांबद्दल केलेले वक्तव्य लज्जास्पद, निषेधार्ह आणि अपमानास्पद आहे.

पक्षाच्या वतीने पत्रकार परिषदेत संबोधित करताना ते म्हणाले की, “त्यांनी आपले खरे रंग दाखवले आहेत, परंतु त्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की त्यांच्या आई सोनिया गांधी यांनी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री मोदी यांना ‘मृत्यूचा सौदागर’ म्हटल्यानंतर काँग्रेस गुजरात कसे बुडले ते आठवत नाही का?” असा सवाल देखील रविशंकर प्रसाद यांनी यावेळी केला



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments