फलटण प्रतिनिधी : फलटण नगरपरिषद निवडणुकीत वेगाने वाढत असलेल्या चुरशीला आणखी उधाण देत शिवसेना (शिंदे गट) व राजे गटाच्या संयुक्त प्रचार मोहिमेला आज नवे बळ मिळाले. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत बारसकर गल्ली, मरीमाता मंदिर आणि गणपती मंदिर श्रीफळ वाढवून या भव्य प्रचार फेरीची सुरुवात झाली.
नगरसेवक पदाचे उमेदवार विकास वसंत काकडे आणि स्मिता शहा यांनीही मतदारांशी थेट संवाद साधत विकासाभिमुख दृष्टीकोन मांडला. महिलांचा उत्स्फूर्त सहभाग, तरुणाईची जोशपूर्ण उपस्थिती आणि विविध समाजघटकांचा वाढता प्रतिसाद यामुळे संपूर्ण परिसरात निवडणुकीचा उत्साह दुमदुमला.
उमेदवारांनी सामाजिक न्याय, सर्वसमावेशक विकास आणि नागरिकांच्या प्रगतीसाठी कटिबद्ध भूमिका व्यक्त करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण केले. प्रचारफेरीदरम्यान नागरिकांनी मांडलेल्या समस्या, स्थानिक सुविधांची गरज आणि विकासाच्या मागण्यांवर उमेदवारांनी आश्वासक चर्चा करत समाधानकारक तोडगे देण्याची ग्वाही दिली.
प्रचारफेरीदरम्यान मिळालेला प्रचंड जनसमर्थन पाहता, फलटण नगरपरिषद निवडणुकीची लढत आणखी तीव्र आणि रोचक होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
वयाबराेबरच अनेक लोकांचे करिअरदेखील वाढत आहे. मुंबईत आयोजित एका नोकरी मेळाव्यात ५ हजार ५०० हून अधिक ज्येष्ठांच्या उपस्थितीतून मला हे जाणवले. ते ५९ वर्षांचे होते. त्यांच्या ३८ वर्षांच्या नोकरीत आणखी एक वर्ष जोडल्यानंतर त्यांना नवीन पदनाम मिळेल ते म्हणजे- निवृत्त. ही गाेष्ट त्यांना घाबरवणारी आहे. अजूनही चांगली नोकरी असलेल्या ज्येष्ठांत त्यांचा समावेश हाेता. ते धीराने रांगेत उभे राहून एका टेबलावरून दुसऱ्या टेबलावर जात होते. तेथे त्यांच्या वयानुसार नोकऱ्यांची यादी वाचून दाखवली जात होती.
मी त्यांना विचारले असे का? त्यांनी सांगितले की हा वयापेक्षा लॉजिस्टिक्सचा प्रश्न आहे. दक्षिण मुंबईतील ऑफिस क्वार्टरजवळचे भाडे खूप जास्त आहे. त्यांच्या पत्नीला निवृत्तीपूर्वी चार वर्षे शिल्लक असल्याने त्यांना अजून उपनगरात जायचे नाही. मुंबईच्या भयानक रहदारीत प्रवास करायचा नाही. मुले परदेशात स्थायिक असल्याने त्यांना वाटते की ते अजूनही उत्पादक राहू शकतात. त्यांचा उत्साह कमी झालेला नाही. त्यांनी मला विचारले, मुकेश अंबानी वयाच्या साठव्या वर्षीही विविध महत्त्वाकांक्षी खासगी क्षेत्रातील उपक्रम चालवू शकतात तर मी आयआयटी पदवीधर असल्याने ते का करू शकत नाही? मी फक्त मान हलवली आणि शुभेच्छा दिल्या. मी चालायला सुरुवात करताच तो मागून विनोदाने म्हणाला, “तुम्ही माझ्यापेक्षा खूप मोठे आहात आणि समाजासाठी अजूनही प्रासंगिक आहात.’ मी हसून हात हलवला.
अनेक ज्येष्ठ नागरिक आहेत. ते कामाच्या ठिकाणी राहण्याचे मार्ग शोधत आहेत. कोणीही हे सत्य नाकारू शकत नाही की भारताला स्वतःला तरुण देश म्हणून घेणे आवडते. परंतु कामाच्या ठिकाणी ज्येष्ठांची संख्या वाढत आहे. २०५० पर्यंत ६० वर्षांपेक्षा जास्त लोकसंख्या ३४.७ काेटी हाेण्याचा अंदाज आहे. सुमारे पाचपैकी एक भारतीय ज्येष्ठ नागरिक असेल. मुंबईसारख्या प्रमुख शहरांत हा बदल आधीच दिसून येत आहे. तेथे प्रजनन दर झपाट्याने कमी झाला आहे आणि वयाेमान वाढले आहे. वाढत्या राहणीमानाच्या खर्चामुळे लोकांना शक्य तितके कमाई करत राहण्यास भाग पाडले जात आहे.
लोक मोठ्या वयातही निवृत्ती पुढे ढकलतात याची अनेक कारणे आहेत. काहींसाठी आर्थिक कारणे आहेत. बरेच जण उच्चशिक्षित व्यावसायिक आणि व्यवसाय मालक आहेत. ते खरोखर त्यांच्या कामाचा आनंद घेतात. अनेक दीर्घकालीन कामगार स्वयंरोजगार करतात. कदाचित त्यांच्या कामाच्या वेळापत्रकावर त्यांचे चांगले नियंत्रण असते. काम आवडणारे म्हणतात की त्यांना याद्वारे समाजाशी जाेडून राहता येते. कामाच्या माध्यमातून त्यांचे मन आणि शरीर सक्रिय राहते. काही जण काम सोडू शकत नाहीत. बऱ्याच संस्था जुन्या कर्मचाऱ्यांना ग्राहकांना समजून घेण्याच्या त्यांच्या क्षमतेचा लाभ घेण्यासाठी त्यांना कायम ठेवण्याचा प्रयत्न करतात. त्यांना समस्या सोडवणारे मानले जाते. ते वेळेवर येतात आणि शिस्तीने काम करतात.
तरुण कर्मचारी त्यांच्याकडून शिकतात. अनेक संस्थांनी त्यांच्या सर्व क्षेत्रात “ग्रँड मॅनेजर’ म्हणून अनेक मुख्य अनुभव अधिकारी (सीएक्सआे) नियुक्त केले आहेत. त्यांच्यासाठी पैशापेक्षा प्रासंगिकता आणि उद्देश अधिक महत्त्वाचा आहे. “विस्डम सर्कल’सारखे गट प्रकल्प-आधारित काम आणि सल्लागार भूमिका शोधतात. या गटात १,२०० संस्थांसोबत काम करणारे १ लाखांहून अधिक वरिष्ठ सदस्य आहेत. कंपन्यांना हे समजून घेणे आवश्यक आहे की वरिष्ठ त्यांचे ज्ञान सामायिक करण्यास तयार असतात. परंतु पूर्णवेळ नाही. बांधकाम कंपनीतील एक वरिष्ठ अभियंता साइट प्रभारी म्हणून निवृत्त होऊ शकतो. परंतु ते प्लंबिंगमध्ये उत्कृष्ट असतील तर त्यांना आयुष्यभरासाठी सर्वोत्तम प्लंबर म्हणून लक्षात ठेवले जाईल. कोणत्याही प्लंबिंग समस्येसाठी त्यांनाच बोलावले जाईल.
फलटण प्रतिनिधी : फलटण शहरात सध्या पसरलेल्या दहशतीच्या वातावरणाला आळा घालण्यासाठी शिवसेना, राजेगट राष्ट्रीय काँग्रेस आणि कृष्णा भिमा विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ श्रीराम मंदिराजवळ करण्यात आला. सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी उपस्थितांना आश्वस्त करत सांगितले की, “फलटण शहरातील नागरिकांना निर्भयपणे जगता यावं, असे मोकळे आणि निर्मळ वातावरण एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली आपण निर्माण करणार आहोत. एकनाथ शिंदे यांच्या नावाला साजेसा विजय मिळवण्यासाठी मी तुमच्या पाठीशी ठामपणे उभा आहे.”
सभेत माजी आमदार दीपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, नगराध्यक्षपदाचे उमेदवार श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर, युवा नेते श्रीमंत सत्यजीतराजे नाईक निंबाळकर, काँग्रेसचे सचिन सूर्यवंशी बेडके, शिवसेनेचे सातारा जिल्हा संपर्क प्रमुख शरद कणसे, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव यांच्यासह आजी-माजी पदाधिकारी आणि नगरसेवक पदाचे उमेदवार उपस्थित होते.
फलटणच्या राजे परिवाराने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतल्याचा आनंद व्यक्त करत ना. शंभूराज देसाई यांनी सांगितले, “नगरपालिकेच्या निवडणुकीत राजे गटाला डावपेच सांगण्याची गरज नाही. लोकांची सेवा करण्याची परंपरा या कुटुंबाकडे आहे. 28 तारखेला एकनाथ शिंदे फलटणला येणार आहेत. त्यांच्या रुपाने राज्याचे नगरविकास खाते फलटणला येणार आहे.” याशिवाय, महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभागी असणाऱ्यांवर कडक शासन होईल, असा इशाराही त्यांनी दिला.
माजी आमदार दीपक चव्हाण म्हणाले, “श्रीमंत रामराजेंनी फलटण तालुक्याला विकासाची दिशा दिली आहे. फलटण शहर एक नामांकित आणि सुसंस्कृत शहर आहे. या शहराचा विकास करण्यासाठी आपण शिवसेनेत सर्व गेलो आहोत. इथली दहशत संपवणे हे आमचे प्राथमिक ध्येय आहे. नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांची तुलना अन्यांशी होऊ शकत नाही; आमचे उमेदवार सुशिक्षित आणि तरुण आहेत. या सर्वांच्या माध्यमातून शहराचा विकास होईल, असा विश्वास आम्हाला आहे.”
श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर म्हणाले, “शिवसेनेच्या माध्यमातून आता आपण वेगळ्या दिशेने निघालो आहोत. फलटण, सातारा, कराड आणि पाटण जेव्हा एकत्र येतात, तेव्हा निर्णायक निकाल येतात. खंबाटकी घाटाच्या अलिकडचा संपूर्ण भाग भगवा करणे हा आमचा उद्देश आहे. कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेली असुरक्षतेची भावना समुळ नष्ट होईल, आणि प्रामाणिकपणे शिवसेनेचे काम चालू राहील.”
श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले की, “फलटणला रामराजेंनी घालून दिलेली शांतता आणि सुसंस्कृतपणाची घडी विस्कटू नये. शहर व तालुक्याला योग्य दिशेने नेण्यासाठी कार्यकर्त्यांच्या भावनेचा आदर करून आम्ही शिवसेनेत प्रवेश केला आहे. आता जे काही बरे-वाईट होईल, ते शिवसेनेतच होईल. नगराध्यक्षपदासाठी श्रीमंत अनिकेतराजे हे चांगले उमेदवार आहेत. फलटणमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई कधीही भासणार नाही. शेती आणि उद्योगासाठी आवश्यक कामे केली जातील. कार्यकर्त्यांनी ही कामे ठासून सांगितली पाहिजेत. ताकदीने निवडणूक पार पाडून चांगल्या मताधिक्याने जिंकणे हे आपले उद्दिष्ट आहे.”
नगराध्यक्षपदाचे उमेदवार श्रीमंत अनिकेतराजे यांनी प्रतिज्ञा केली की, “फलटणसाठी पालिकेच्या माध्यमातून सर्वतोपरी कामे केली जातील. शहरातील पसरलेले भितीचे वातावरण संपवले जाईल, तसेच शासकीय यंत्रणांचा झालेला गैरवापर थांबविला जाईल.”
यावेळी पंचायत समितीच्या माजी सभापती सौ. रेश्मा भोसले, शिवसेनेचे शरद कणसे, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव यांनीही भाषणे केली. आभार आभार मिलींद नेवसे यांनी मानले.
सातारा कराड :कराड नगरपालिका निवडणुकीत (Karad Nagarpalika elections) भाजप विरुद्ध शिवसेना शिंदे गट अशी लढत होत आहे. आहे. एवढेच नाही तर भाजपला या निवडणुकीत हरवण्यासाठी शिवसेना शिंदे गटानं शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या गटाशी हातमिळवणी देखील केली आहे. त्यामुळं कराड नगरपालिकेच्या निवडणुकीकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.
कराड नगरपालिकेच्या 31 जागांसाठी 109 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
कराड नगरपालिकेच्या 31 जागांसाठी 109 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर नगराध्यक्ष पदासाठी 3 प्रमुख राष्ट्रीय पक्षांसह 9 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. महायुतीतील दोन मित्र पक्ष भाजप आणि शिवसेना हे एकमेकांचा विरोधात उभे ठाकले आहेत. एकीकडे भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार अतुल भोसले आपली ताकद लावतायत तर त्याचा विरोधात दुसरीकडे मंत्री शंभूराज देसाई शरद पवार गटाचे माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांनी एकत्र येत प्रचाराचा शुभारंभ केला आहे. शिवसेना आणि शरद पवार राष्ट्रवादी हे यशवंत विकास आघाडी आणि लोकशाही आघाडीच्या माध्यमातून एकत्र निवडणूक लढवत आहे. भाजप वर टीका टाळत कराडच्या विकासासाठी आम्ही एकत्र आल्याचे मंत्री शंभूराज देसाई सांगत आहेत.
भाजपच्या विरोधात सगळे एक होतायत म्हणजेच आमच्या चांगल्या कामाला दुजोरा मिळतोय
दुसरीकडे भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार अतुल भोसले यांनी देखील मतदारांच्या घरी जाऊन भेटी गाठी सुरू केल्या आहेत. भाजपच्या विरोधात सगळे एक होतायत म्हणजेच आमच्या चांगल्या कामाला दुजोरा मिळतो आहे आणि भाजप कराड मध्ये पक्षाच्या चिन्हावर लढत आहे. पण इतर पक्ष हे पक्ष चिन्हावर न लढता आघाड्या करून लढत असल्याची टीका अतुल भोसले यांनी केली आहे. कराड पालिका निवडणुकीत काँग्रेस देखील नगराध्यक्ष आणि 15 जागांवर स्वतंत्र निवडणूक लढवत आहे. मात्र भाजप विरुद्ध शिवसेना असा सामना कराड मध्ये होत असल्याने नेमका निकाल काय लागतो याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे
कराड नगरपालिकेच्या निवडणुकीत कोणाला कोणत्या पक्षाकडून संधी?
कराडमध्येभाजपनं विनायक पावसकर, काँग्रेसनंझाकिरपठाण यांना थेट नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे. यशवंत विकास आघाडी आणि लोकशाही विकास आघाडीकडून राजेंद्रसिंह यादव थेट नगराध्यपदाच्या रिंगणात आहेत. या ठिकाणी रणजित पाटील देखील रिंगणात आहेत. दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. अनेक ठिकाणी महायुतीत ठिणगी पडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
Male Fertility Decline: पुरुषांचा स्पर्म काउंट हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. अनेक पुरुषांना ही समस्या भेडसावते. ही समस्या सोडवण्यासाठी ते ऑनलाईन पोर्टल्सची मदत घेत असतात. पण नेहमीच्याच खाण्यातील काही पदार्थ स्पर्म काऊंटवर परिणाम करतात, हे बहुतांशजणांना माहिती नसतं. यासंदर्भातील एक नवीन अहवाल समोर आलाय. काय आहे या अहवालात? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
Add Zee News as a Preferred Source
उंदरांवर प्रयोग
शेतीत वापरल्या जाणाऱ्या “निओनिकोटिनॉइड्स” नावाच्या कीटकनाशकांमुळे पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या आणि गुणवत्ता वेगाने कमी होत असल्याचे नवीन अभ्यासातून समोर आले आहे. प्रयोगशाळेतील नर उंदरांवर केलेल्या चाचण्यांमध्ये या रसायनांमुळे स्पर्म काउंट, त्यांची हालचाल आणि रचना खराब झाल्याचे आढळले. मानवांवरही असाच परिणाम होण्याची शक्यता खूप जास्त असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.
20 वर्षांच्या 21 अभ्यासांचे विश्लेषण
“एन्व्हायर्नमेंटल रिसर्च” जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या पुनरावलोकनात 2005 ते 2025 या कालावधीतील 21 प्रयोगांचा अभ्यास केला. यात निओनिकोटिनॉइड्सच्या संपर्कात आलेल्या प्राण्यांमध्ये वृषणांचे ऊतक (टेस्टिक्युलर टिश्यू) खराब झाले, हार्मोन्सचा तोल बिघडला आणि शुक्राणूंचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले, असे शास्त्रज्ञांना दिसून आले.
अन्नातून थेट शरीरात प्रवेश
ही कीटकनाशके झाडाच्या मुळापासून पानापर्यंत पूर्णपणे शोषली जातात. त्यामुळे फळे-भाज्या कितीही धुतल्या तरी त्यांचे अवशेष राहतात. 50 टक्क्यांहून अधिक लोकांच्या शरीरात आणि मुलांमध्ये तर आणखी जास्त प्रमाणात या रसायनांचे कण सापडले, असे अमेरिकेतील सर्वेक्षणात असे आढळले. म्हणजे आपण रोज जे खातो त्यातून हे विषारी पदार्थ आपल्या शरीरात जातात, असा निष्कर्ष शास्त्रज्ञांनी काढला.
शरीरावर नेमके काय परिणाम होतात?
ऑक्सिडेटिव्ह तणाव वाढून शुक्राणूंच्या पेशी आणि त्यांचे डीएनए खराब होते पुरुष हार्मोन्सचे सिग्नलिंग बिघडते आणि वृषणांचे ऊतक नष्ट होतात, असा निष्कर्ष संशोधनातून निघाला. परिणामी स्पर्म काउंट आणि त्यांची गतिशीलता कमी होते,प्रजनन क्षमता घटते, असे यात पुढे म्हटले आहे.
तज्ज्ञांचा इशारा
“हे संशोधन फक्त प्राण्यांपुरते मर्यादित नाही. सर्व सस्तन प्राण्यांमध्ये शुक्राणू बनण्याची प्रक्रिया सारखीच असल्याने मानवांवरही हा धोका आहे,अन्नातील कीटकनाशकांचे अवशेष हळूहळू पुरुषांची प्रजनन शक्ती कमी करत आहेत’, असे असे प्रमुख संशोधिका सुमैया इरफान आणि वेरोनिका सांचेझ यांनी सांगितले. त्यामुळे आता कीटकनाशकांचा वापर कमी करणे आणि सेंद्रिय शेतीकडे वळणे यांची गरज अधोरेखित झाली आहे.
FAQ
प्रश्न: पुरुषांमध्ये स्पर्म काउंट कमी होण्यामागे आता कोणते नवीन कारण समोर आले आहे?
उत्तर: शेतीत वापरल्या जाणाऱ्या “निओनिकोटिनॉइड्स” नावाच्या कीटकनाशकांमुळे शुक्राणूंची संख्या, गुणवत्ता आणि गतिशीलता कमी होत असल्याचे नवीन संशोधनात सिद्ध झाले आहे. ही रसायने अन्नातून शरीरात जातात
प्रश्न: फळे-भाज्या धुतल्या तरी ही कीटकनाशके निघत नाहीत का?
उत्तर: नाही. ही निओनिकोटिनॉइड्स झाडाच्या आत पूर्णपणे शोषली जातात, त्यामुळे फळे-भाज्या पाण्याने धुतल्यावरही त्यांचे अवशेष राहतात आणि ते आपल्या रोजच्या आहारातून शरीरात प्रवेश करतात.
प्रश्न: हे संशोधन फक्त प्राण्यांवरच आहे की मानवांनाही धोका आहे?
उत्तर: हे संशोधन प्राण्यांवर केले असले तरी सर्व सस्तन प्राण्यांमध्ये (माणूसही) शुक्राणू बनण्याची प्रक्रिया सारखीच असते. अमेरिकेत अर्ध्या लोकांच्या शरीरात आणि मुलांमध्ये तर जास्त प्रमाणात ही रसायने आढळली आहेत. म्हणून मानवांवरही प्रजनन क्षमतेवर गंभीर परिणाम होण्याचा धोका आहे.
Brest Milk Uranium: जगात वेगवेगळ्या प्रकारचे गंभीर आजार आहेत. ज्यामध्ये अनेकांचे मृत्यू होतात. यातील अनेक आजारांवर संशोधनदेखील सुरु आहे. पण अशी वेळ नवजात बालकांवर ओढवत असेल तर त्यापेक्षा दुर्देव काहीच नाही. ज्या बालकांनी अद्याप हे जगच पाहीलं नाही, त्यांच्यावर मृत्यूचा धोका ओढावलाय. आईचं दूध हे नवजात बालकांसाठी अमृत असतं. पण हा धोका त्यांना आईच्या दुधापासूनच ओढवतोय. काय आहे नेमका हा प्रकार? सविस्तर जाणून घेऊया.
Add Zee News as a Preferred Source
नेचर जर्नलमध्ये नवीन अभ्यास प्रकाशित झालाय. बिहारमधील भोजपूर, समस्तीपुर, बेगूसराय, खगडिया, कटिहार आणि नालंदा या सहा जिल्ह्यांतील 40 स्तनपान करणाऱ्या महिलांच्या दूधातील युरेनियम (U-238) चे प्रमाण 0 ते 5.25 मायक्रोग्रॅम प्रति लिटर आढळले. खगडियात सरासरी सर्वाधिक आणि नालंद्यात सर्वात कमी, तर कटिहारमधील एका नमुन्यात कमाल प्रमाण सापडले. सर्व नमुन्यांमध्ये युरेनियम आढळले आहेत. यामुळे साऱ्यांनाच धक्का बसलाय.
अभ्यासाची पार्श्वभूमी काय?
हा अभ्यास ऑक्टोबर 2021 ते जुलै 2024 दरम्यान पटनातील महावीर कॅन्सर इन्स्टिट्यूटमधील डॉ. अरुण कुमार आणि प्रा. अशोक घोष यांच्या नेतृत्वाखाली आणि AIIMS दिल्लीतील डॉ. अशोक शर्मा यांच्या संयुक्त पथकाने केला. 17 ते 35 वर्ष वयोगटातील महिलांच्या दूधाचे नमुने तपासले गेले आहेत.
युरेनियमचे स्रोत काय?
स्तनपान दूधातील युरेनियमसाठी जगात कोणतेही परवानगी मर्यादा नाहीत. युरेनियमचे नेमके स्रोत अज्ञात असले तरी, जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया यासंदर्भात अधिक तपास करत आहे. बिहारमध्ये भूजलावर अत्यधिक अवलंबन, उपचारित नसलेला औद्योगिक कचरा, रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा दीर्घकाळ वापर हे प्रदूषण वाढवणारे प्रमुख घटक आहेत.
नवजात शिशुंसाठी संकट
युरेनियम अन्नसाखळीत प्रवेश करून किडनीचे नुकसान, मज्जासंस्थेच्या समस्या, मुलांमध्ये विकासात्मक विकृती आणि कर्करोगाचा धोका वाढवते. अभ्यासानुसार, सुमारे ७०% शिशुंना गैर-कर्करोगजन्य आरोग्य समस्या होण्याचा धोका आहे. नवजात शिशुंमध्ये विकसनशील अवयव, जास्त विषारी पदार्थ शोषण आणि कमी शरीरभारामुळे धोका अधिक वाढतो. पूर्वी बिहारच्या भूजलात युरेनियम आढळले होते, आता ते दूधातही पोहोचले आहे, त्यामुळे पालकांचे टेन्शन वाढलंय.
तज्ज्ञ काय करतात शिफारस?
युरेनियम अन्नसाखळीत मिसळल्याने मुलांमध्ये कर्करोग आणि मज्जासंस्थेवर गंभीर परिणाम होऊ शकतात, असे तज्ज्ञ डॉ. अशोक शर्मा यांनी सांगितले. संशोधकांनी स्तनपान सुरू ठेवण्याची शिफारस केली असली तरी, प्रदूषण नियंत्रणासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
FAQ
प्रश्न: बिहारमधील आईंच्या दूधात युरेनियम कुठल्या जिल्ह्यांमध्ये आढळले आणि त्याचे प्रमाण किती आहे?
उत्तर: भोजपूर, समस्तीपुर, बेगूसराय, खगडिया, कटिहार आणि नालंदा या सहा जिल्ह्यांतील ४० महिलांच्या दूधात युरेनियम आढळले. प्रमाण ० ते ५.२५ मायक्रोग्रॅम प्रति लिटर इतके आहे; खगडियात सरासरी सर्वाधिक तर कटिहारमध्ये एका नमुन्यात कमाल प्रमाण सापडले.
प्रश्न: आईंच्या दूधात युरेनियम येण्याची मुख्य कारणे कोणती?
उत्तर: बिहारमध्ये भूजलावर जास्त अवलंबन, उपचार न केलेला औद्योगिक कचरा, रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा दीर्घकाळ वापर हे प्रमुख कारण आहे. यामुळे युरेनियम भूजलातून अन्नसाखळीत आणि नंतर आईंच्या दूधात पोहोचले.
प्रश्न: युरेनियममुळे नवजात बाळांना काय धोका आहे? आणि आता स्तनपान थांबवावे का?
उत्तर: युरेनियममुळे किडनीचे नुकसान, मज्जासंस्थेच्या समस्या, विकासात्मक विकृती आणि कर्करोगाचा धोका वाढतो. सुमारे ७०% बाळांना गैर-कर्करोगजन्य आरोग्य समस्या होण्याची शक्यता आहे. तरीही संशोधकांनी सध्या स्तनपान सुरू ठेवण्याची शिफारस केली आहे; मात्र प्रदूषण नियंत्रणासाठी तात्काळ उपाय आवश्यक आहेत.
Shambhuraj Desai फलटण : शिवसेनेपुढे कोणतीही दहशत चालत नाही, उलट आमचीच दहशत आहे. मात्र मंत्री झाल्यापासून शिंदे साहेबांनी शांततेने घ्यायला सांगितले आहे. पण यालाही काहीतरी संयम असतो. असेम्हणत मंत्री शंभूराज देसाईंना (Shambhuraj Desai) मित्रपक्षांना सुचक इशारा दिल्याचेबोललंजातआहे. भाजपकडून शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची फोडाफोडी सुरु असल्याच्या कारणावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यात दुरावा निर्माण झाल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली आहे. एकनाथ शिंदे यांनी अलीकडेच दिल्लीत भाजपचे दुसऱ्या क्रमांकाचे नेते अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी राज्यातील भाजप नेत्यांविषयी अमित शाह यांच्याकडे नाराजीचा सूर लावल्याची चर्चा होती. त्यानंतरआता पालकमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनीहीसूचकइशारादेतयावरभाष्यकेलंय.
Shambhuraj Desai : शिवसेनेचा पालकमंत्री म्हणून सांगतो, त्याला सोडणार नाही
फलटण येथील घटना ही दुर्दैवी आहे. याची सध्या चौकशी सुरू असूनयाप्रकरणी SIT नेमलेली आहे. सरकारने याकडे कडक भूमिका घ्यायचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेचा पालकमंत्री म्हणून सांगतो, या प्रकरणात ज्या व्यक्तींचा संबंध आहे त्या व्यक्तीला गोवल्याशिवाय पकडल्याशिवाय ही शिवसेना शांत बसणार नाही. मयत डॉक्टरला ज्यानं हे कृत्य करायला भाग पाडलं त्याला सोडणार नाही. असागंभीरइशारा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिलाआहे. आचारसंहिता चालू आहे मात्र. ही आचारसंहिता संपल्यानंतर मी शब्द देतो या डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील प्रत्येक दोषीवर कडक कारवाई झाल्याशिवाय शांत बसणार नसल्याचा इशाराही यावेळी शंभूराज देसाई यांनी दिला आहे.
Shambhuraj Desai : लोक मंत्रिपद मिळण्यासाठी पक्ष बदलतात, मात्र आम्ही असणारी मंत्री पद सोडली, कारण…
आम्ही मंत्री पद असताना देखील शिंदे साहेबांच्या सोबत गुवाहाटीला गेलो होतो. लोक मंत्रिपद मिळण्यासाठी पक्ष बदलतात, मात्र असणारी मंत्री पद आम्ही सोडली. कारण जीवाला जीव देणारे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. 28 नोव्हेंबरला फलटणमध्ये एकनाथ शिंदे येणार आहेत. यावेळी फलटणकारांनी अनिकेतराजे माध्यमातून पुढील पाच वर्षासाठी काय रोड मॅप प्लॅनिंग करायचं ते करूया. असेहीमंत्री शंभूराज देसाई म्हणाले.
Employee Leave During Wife Delivery: आजच्या कॉर्पोरेट संस्कृतीत वर्क-लाईफ बॅलन्स किती मोठं आव्हान बनलं आहे याचं आणखी एक धक्कादायक उदाहरण सोशल मीडियावर समोर आलं आहे. पत्नीची डिलिव्हरी जवळ आली असल्याने दोन दिवसांची रजा मागणाऱ्या एका कर्मचाऱ्याला त्याच्या मॅनेजरने दिलेलं उत्तर ऐकून नेटिझन्स संतापले. ही पोस्ट रेडिटवरील ‘Indian Workplace’ सबरेडिटवर शेअर झाली आणि काही तासांतच मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली.
Add Zee News as a Preferred Source
ओळख न उघडण्याची अट
त्या कर्मचाऱ्याने सांगितलं की तो आपल्या कंपनीचे नाव किंवा स्वतःची ओळख उघडपणे सांगू शकत नव्हता. कारण कंपनीचा वातावरणच असं आहे की थोडंही विरोध केल्यास नोकरीवर घाला येण्याची भीती असते. पत्नी प्रसूतीसाठी हॉस्पिटलमध्ये भरती असूनही रजा मागताना त्याला भीती वाटत होती “माझा मॅनेजर परवानगी देईल का?”
कर्मचारी म्हणतो,“मी शांतपणे दोन दिवस रजा मागितली, कारण पत्नी अॅडमिट होती. पण माझ्या बॉसनं मला जे उत्तर दिलं, ते कल्पनेबाहेरचं होतं.”
मॅनेजरचे प्रश्न आणि तर्क अधिक धक्कादायक,
“ही रजा नंतर घेऊ शकतोस का?”
“तुझे आई-वडील नाहीत का? ते पत्नीला सांभाळू शकत नाहीत का?”
“अगदी गरज असेल तर हॉस्पिटलमधूनच वर्क फ्रॉम होम करू शकतोस.”
कर्मचारी सांगतो की, “मी समजावण्याचा प्रयत्न करत होतो की हॉस्पिटलच्या रूममध्ये मी लॅपटॉप घेऊन बसू शकत नाही. पत्नीची आणि बाळाची काळजी माझी जबाबदारी आहे. पण तो काहीच समजून घ्यायला तयार नव्हता.”
कर्मचार्याने कबूल केले की कंपनीत ‘नो ऑर्ग्युमेंट’ संस्कृती आहे. कोणतंही वाजवी कारण सांगितलं तरी विरोध केला तर मॅनेजमेंट नाराज होतं. याच भीतीपोटी तो बोलायलाही असमर्थ होता. तो म्हणतो की, “मी स्वतःच्या बाळाच्या जन्मापेक्षा मॅनेजरला पटवण्यात जास्त वेळ घालवत होतो… हे किती विचित्र आहे!”
चॅट स्क्रीनशॉटने उघडली खरी कथा
पोस्टसोबत टाकलेल्या चॅटमध्ये दिसतं की, कर्मचारी शांतपणे रजा कळवतो. मॅनेजर कामाच्या डेडलाईनचं कारण देत रजा नाकारणाचा प्रयत्न करतो. ‘आई-वडील सांभाळतील’ असा तर्क देतो. शेवटी कामच जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतो. कर्मचारी म्हणतो, “मी पुन्हा-पुन्हा सांगत होतो की टीममधील इतर लोक काम सांभाळू शकतात. पण तो माझ्याच मागे लागला होता.” शेवटी खूप संघर्ष केल्यानंतरच बॉस म्हणाला की, “ठीक आहे, रजा हवी असेल तर ईमेल करून ठेव.”
ही घटना एक साधा तणावपूर्ण प्रसंग नसून भारतीय कॉर्पोरेट संस्कृतीतील वर्क-लाईफ बॅलन्स, कुटुंबासमोरील जबाबदारी आणि मॅनेजरच्या संवेदनशीलतेचा अभाव यावर मोठा प्रश्न उभा करते. अनेक युजर्सच्या एकच मते “कुटुंब सर्वात आधी येतं. नोकरी नंतर.”
फलटण प्रतिनिधी :- प्रभाग क्रमांक 2 मध्ये भावी नगरसेविका मीनाताई काकडे आणि सुपर्णाताई अहिवळे यांच्या प्रचार मोहिमेचा शुभारंभ जोरदार उत्साहात पार पडला. नारळ फोडून प्रचाराची औपचारिक सुरुवात करण्यात आली.
या वेळी ऍड. सौ. जिजामाला नाईक-निंबाळकर (वाहिनी), RPI चे ज्येष्ठ नेते विजय येवले, माजी नगरसेवक सनी अहिवळे, माजी नगरसेवक सचिन अहिवळे, कामगार संघर्ष संघटनेचे अध्यक्ष सनी काकडे, प्रशांत (आप्पा) काकडे, हरीश अप्पा काकडे, विक्की बोके, सनी मोरे, मंगेश जगताप, अवी सरतापे, सुनील अहिवळे, कट्टर खासदार समर्थक महेश जगताप तसेच शेकडो कार्यकर्ते आणि विशेषतः महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमातील उत्साह, ऊर्जावान वातावरण आणि एकतेचा अनमोल क्षण उपस्थितांनी अनुभवला.
फलटण प्रतिनिधी :- फलटण नगरपरिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदाचे उमेदवार अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रचार मोहिमेचा अधिकृत शुभारंभ रविवार, दि. २३ नोव्हेंबर २०२५ रोजी होणार आहे. सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीरामचरणी नतमस्तक होऊन प्रचाराचा नारळ फोडण्यात येणार आहे.
श्रीराम मंदिरात भव्य सभा
कोळकी गावचे राजे गटाचे नेते व कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक अक्षय (भैय्या) गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवार, दि. २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ ते १२ या वेळेत फलटणच्या ग्रामदैवत श्रीराम मंदिर परिसरात हा शुभारंभ सोहळा पार पडणार आहे. या वेळी अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ भव्य सभेचे आयोजन करण्यात आले असून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व कृष्णा–भीमा–कोरेगाव आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
पालकमंत्र्यांच्या उपस्थितीने उत्साह दुणावला
महायुती आणि राजे गटाच्या उमेदवारासाठी स्वतः पालकमंत्री शंभूराज देसाई मैदानात उतरल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. श्रीराम यात्रेच्या पवित्र मुहूर्तावर होत असलेल्या या शुभारंभामुळे प्रचार मोहिमेत दमदार शक्तीप्रदर्शन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नागरिकांना उपस्थितीचे आवाहन
“फलटणच्या सर्वांगीण विकासासाठी आणि अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांच्या विजयासाठी प्रत्येक नागरिक, तरुण व कार्यकर्त्यांनी या सभेला उपस्थित रहावे,” असे आवाहन अक्षय (भैय्या) गायकवाड यांनी केले आहे.