Saturday, July 4, 2026
Home Blog Page 98

स्वामी विवेकानंद नगर येथे शिवसेना (शिंदे गट) व राजे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अनिकेतराजे नाईक निंबाळकर व नगरसेवक पदाचे उमेदवार विकास वसंतराव काकडे व स्मिता शहा यांच्या प्रचार फेरीचा भव्य शुभारंभ

0
स्वामी विवेकानंद नगर येथे शिवसेना (शिंदे गट) व राजे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अनिकेतराजे नाईक निंबाळकर व नगरसेवक पदाचे उमेदवार विकास वसंतराव काकडे व स्मिता शहा यांच्या प्रचार फेरीचा भव्य शुभारंभ

फलटण प्रतिनिधी :- फलटण नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (एकनाथ शिंदे) व राजे गटामार्फत आयोजित प्रचार फेरीचा भव्य शुभारंभ स्वामी विवेकानंद नगर येथे झाला. नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, तसेच प्रभाग क्र. १२ चे नगरसेवक पदाचे उमेदवार विकास वसंतराव काकडे आणि स्मिता शहा यांच्या प्रचार यात्रेची सुरुवात जल्लोषमय वातावरणात करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात  स्वामी विवेकानंद नगरातील श्रीमंत गणपती मंदिरात श्रीफळ वाढवून करण्यात आली. मंदिर परिसरात झालेल्या या कार्यक्रमास मतदार बांधव, महिला आणि विशेषतः तरुण वर्गाचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला.

प्रचार फेरीदरम्यान उमेदवारांनी नागरिकांचे अभिवादन स्वीकारत विविध स्थानिक प्रश्न, विकासकामे, सुविधा आणि भविष्यातील नियोजन याबाबत चर्चा केली. नागरिकांकडूनही विविध समस्या मांडण्यात आल्या व त्यावर सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन उमेदवारांनी दिले. लोकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण करत उमेदवारांनी फलटणच्या सर्वांगीण विकासासाठी आपली भूमिका सुस्पष्ट केली.

उमेदवारांच्या सभोवती दिसणारा ऊर्जावान तरुण वर्ग आणि महिलांचा मोठा सहभाग पाहता प्रचार मोहीमेची जोरदार सुरुवात झाल्याचे चित्र स्पष्ट दिसत होते. समाजातील सर्व घटकांचा सहभाग पाहून आगामी निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) चे उमेदवार प्रभावी स्पर्धा देणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

Lung Cancer: फुफ्फुसांच्या कर्करोगाशी लढणाऱ्या रूग्णांची चिंता मिटली, कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्यास शास्त्रज्ञांना यश? वाचा सविस्तर….

0
Lung Cancer: फुफ्फुसांच्या कर्करोगाशी लढणाऱ्या रूग्णांची चिंता मिटली, कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्यास शास्त्रज्ञांना यश? वाचा सविस्तर….


Scientists Unlock Lung Cancer’s Deadliest Weakness : फुफ्फुसांचा कर्करोग जगभरात जलद गतीने वाढत आहे. वाढते प्रदूषण हे या आजाराचे मुख्य कारण आहे. वेळीच उपचार केल्यास या आरापासून बचाव केला जाऊ शकतो. पण या बऱ्याचदा या कर्करोगाच्या पेशी  इतक्या मजबूत असतात की, उपचाराचाही काही परिणाम होत नाही. अशात आता फुफ्फुसांच्या कर्करोगाशी लढत असणाऱ्या रूग्णांसाठी एक दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. वैज्ञानिकांनी असा एक मार्ग शोधला आहे, ज्यामुळे फुफ्फुसातील ट्यमरला मुळापासून नष्ट करता येऊ शकते. या संशोधनादरम्यान त्यांनी एक अत्यंत महत्त्वाचे प्रथिन ओळखले आहे जे फुफ्फुसात कर्करोगाच्या पेशी तयार करण्यास आणि त्यांचा बचाव करण्यास मुख्य भूमिका निभावतो. या प्रथिनाची क्रिया वेळीस थांबवली तर कर्करोगाच्या पेशी आपोआप नष्ट होऊ लागतील आणि ट्युमरचा आकारही जलद गतीने कमी होईल. 

Add Zee News as a Preferred Source

 

शास्त्रज्ञांना संशोधनात यश :

अमेरिकेतील एनआययू (NIU)लॅंगोग हेल्थचे शास्त्रज्ञ बराच काळ कर्करोगाच्या काही पेशी कशा प्रकारे शरिराच्या रोगप्रतिकारशक्तीला कमकुवत करून वाढत आहेत याचा अभ्यास करत होते. याच अभ्यासादरम्यान त्यांनी एक खास प्रथिने एफएसपी1 याचा (Ferroptosis Suppressor Protein 1) शोध लावला. हे प्रथिने कर्करोगाच्या पेशींचा बचाव करतात. फेरोप्टोसिस ही एक अशी प्रक्रिया आहे ज्यात शरीर अतिशय तणावात असलेल्या पेशींनी आपोआप नष्ट करते. सामान्यतः ही प्रक्रिया शरीराच्या संरक्षण यंत्रणेचा भाग असते, पण कर्करोगाच्या पेशी यापासून बचाव करत वाढत राहतात. संशोधन करताना शास्त्रज्ञांनी सर्वप्रथम उंदरावर प्रयोग केले. या प्रयोगातून समोर आलेला निकाल शास्त्रज्ञांसाठी देखील आश्चर्यकारक होता. 

 

प्रयोगादरम्यान उंदराच्या फुफ्फुसातील कर्करोगाच्या ट्युमरचा आकार वेगान कमी होऊ लागला. अनेक कर्करोग पेशींनी स्वतःला नष्ट करण्यास सुरूवात केली.  एकूण ट्युमरचा आकार जवळजवळ सुमारे 80% पर्यंत कमी झाला. हे निकाल दर्शवतात की, एफएसपी1 या प्रथिनाला निष्क्रिय केल्याने कर्करोग पेशींना बचाव करण्यासाठी कोणताही मार्ग उरत नाही आणि त्या फेरोप्टोसच्या प्रक्रियेत अडकून नष्ट होऊ लागतात. अनेकदा फुफ्फुसांच्या एडिनोकार्सिस सारख्या कर्करोगाचा उपचार कठीण होतो कारण या पेशी सामान्य उपचारांना प्रतिकार करू लागतात. पण आता प्राप्त झालेल्या निकालावरून ज्यात कर्करोगाच्या पेशी स्वतःच नष्ट होऊ लागतात उपचाराला एक नवीन दिशा मिळण्याची शक्यता आहे. 

 

फुप्फुसाच्या कर्करोगाविरुद्धच्या लढाईला नवीन दिशा :

जरी हे संशोधन अद्याप प्रारंभिक टप्प्यात असले आणि उंदरांवरच प्रयोग झाले असले, तरी शास्त्रज्ञांचा विश्वास आहे की हाच सिद्धांत मानवी उपचारात सुरक्षितपणे लागू झाल्यास फुप्फुसाच्या कर्करोगाविरुद्धच्या लढाईला नवीन दिशा मिळू शकते. आता शास्त्रज्ञ एफएसपी1 थांबवणारी औषधे मानवांमध्ये किती प्रभावी आणि सुरक्षित ठरतील हे समजण्याचा प्रयत्न करत आहेत. जर हे यशस्वी झाले तर पुढील वर्षांत कर्करोग रुग्णांसाठी हे एक क्रांतिकारी पाऊल ठरू शकते. 

 

फुफ्फुसांचा कर्करोग होऊ नये यासाठी काय काळजी घ्याल? 

प्रदुषणाव्यतिरिक्त फुफ्फुसांच्या कर्करोगाचे आणखी एक मुख्य कारण म्हणजे धूम्रपान. जर तुम्ही धुम्रपान करत असाल तर त्वरीत बंद करा. धूम्रपान सोडल्याने कर्करोगाचा धोका लक्षणीयरित्या कमी होतो. शिवाय इतरांच्या धूम्रपानामुळे होणाऱ्या धुरामध्ये श्वास घेणे टाळा. तुमच्या घरातील रेडॉनची पातळी तपासा. रेडॉन हा एक नैसर्गिकरित्या तयार होणारा वायू आहे जो कर्करोगाला कारणीभूत ठरू शकतो. जर पातळी जास्त असेल तर कमी करण्यासाठी उपाययोजना करा. हवेची गुणवत्ता खराब असताना बाहेर जास्त वेळ घालवणे टाळा. फळे आणि भाज्या असा संतुलित आहार घ्या. निरोगी आहारामुळे फुफ्फुसांच्या कर्करोगासह अनेक आजारांचा धोका कमी होतो. नियमित व्यायाम करा. 





Source link

पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम: तुमच्या एकूण कमाईतील‎ 10 टक्के सेवा असावी

0
पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:  तुमच्या एकूण कमाईतील‎ 10 टक्के सेवा असावी


  • Marathi News
  • Opinion
  • Pt. Vijayshankar Mehta’s Column, 10 Percent Of Your Total Income Should Be Service

8 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

वेळ आली आहे. विक्रीसाठी तयार व्हा. पण आधी तुमची किंमत‎ठरवा. आज आपण राहत असलेले वातावरण खरेदी-विक्रीचे जग‎आहे. म्हणून तुमची किंमत काहीही असो, ती सुधारा आणि तुम्ही‎आधीच बाजारात आहात. फक्त तुमचे योग्य ते मूल्य आहे याची‎खात्री करा. पण लिलावात जाऊ नका. डिजिटल मीडियावर २४/७‎सौदेबाजी सुरू आहे. तुम्हाला नकळत खरेदी-विक्री केली जात आहे.‎संतांची किंमत शास्त्रांवर आधारित होती त्यांचे शब्द देखील कागदाने‎मोजले जात आहेत. पूर्वी, शास्त्र समजून घेऊन शिष्यवृत्ती ठरत होती.‎आजकाल, डिजिटल मीडियावरील रिव्ह्यू संख्येने व्यक्तिमत्व मोजले‎जाते. अशा परिस्थितीत तुमचे मूल्य कसे शुद्ध कसे राखता येईल?‎असे म्हणतात की १०% दान केल्याने तुमचे मूळ उत्पन्न शुद्ध होते.‎म्हणून तुम्ही करत असलेल्या कामापैकी १०% सेवेसाठी वापरावे.‎त्यामुळे कोणत्याही क्षेत्रात प्रामाणिकपणे सेवा करत असताना‎खरेदी-विक्री आपल्याला अशांत करू शकत नाही.‎ ‎



Source link

प्रभाग २ मध्ये महायुतीचा दमदार प्रचार सुरू; मिना काकडे व सूपर्णा अहिवळे रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली मैदानात”

0
प्रभाग २ मध्ये महायुतीचा दमदार प्रचार सुरू; मिना काकडे व सूपर्णा अहिवळे रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली मैदानात”

फलटण प्रतिनिधी :- फलटण नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवार पेठ परिसरात महायुतीच्या उमेदवारांनी प्रचाराची गती वाढवली आहे. प्रभाग क्रमांक 2 आणि 3 मधील अधिकृत उमेदवारांसाठी मतदारांशी थेट संवाद साधण्यासाठी शनिवार, दि. 22 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 9.30 वाजता विशेष पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रचार दौऱ्याचे नेतृत्व सातारा जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य अॅड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर करणार आहेत.

मंगळवार पेठ येथे आयोजित या प्रचार उपक्रमात भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. प्रभाग क्रमांक 2 च्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार सौ. मीना जीवन काकडे आणि सौ. सुपर्णा सनी अहिवळे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित राहणार असून परिसरात उत्साहाचे वातावरण दिसत आहे.

नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार श्री. समशेर नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वात महिला सक्षमीकरण, रस्ते विकास, पाणीपुरवठा, स्वच्छता, तसेच मूलभूत सुविधांवर मतदारांशी संवाद साधण्याचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

या भेटीमुळे प्रभागातील राजकीय वातावरण अधिक रंगतदार होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून नागरिकांमध्येही चर्चांना उधाण आले आहे.

मंगळवार पेठेत प्रभाग 2 व 3 मधील महायुतीच्या प्रचार मोहीमेचा दमदार प्रारंभ

0
मंगळवार पेठेत प्रभाग 2 व 3 मधील महायुतीच्या प्रचार मोहीमेचा दमदार प्रारंभ

फलटण प्रतिनिधी :- फलटण नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवार पेठ परिसरात महायुतीच्या उमेदवारांनी प्रचाराची गती वाढवली आहे. प्रभाग क्रमांक 2 आणि 3 मधील अधिकृत उमेदवारांसाठी मतदारांशी थेट संवाद साधण्यासाठी शनिवार, दि. 22 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 9.30 वाजता विशेष पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रचार दौऱ्याचे नेतृत्व सातारा जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य अॅड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर करणार आहेत.

मंगळवार पेठ येथे आयोजित या प्रचार उपक्रमात भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. प्रभाग क्रमांक 2 च्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार सौ. मीना जीवन काकडे आणि सौ. सुपर्णा सनी अहिवळे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित राहणार असून परिसरात उत्साहाचे वातावरण दिसत आहे.

नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार श्री. समशेर नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वात महिला सक्षमीकरण, रस्ते विकास, पाणीपुरवठा, स्वच्छता, तसेच मूलभूत सुविधांवर मतदारांशी संवाद साधण्याचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

या भेटीमुळे प्रभागातील राजकीय वातावरण अधिक रंगतदार होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून नागरिकांमध्येही चर्चांना उधाण आले आहे.

जखमेवर टाके मारायच्या ऐवजी लावलं फेवीक्विक, तडफडत राहिला 2 वर्षांचा मुलगा; खासगी डॉक्टरचा अजब उपाय

0
जखमेवर टाके मारायच्या ऐवजी लावलं फेवीक्विक, तडफडत राहिला 2 वर्षांचा मुलगा; खासगी डॉक्टरचा अजब उपाय


मेरठमधील दोन वर्षांच्या मुलाच्या वैद्यकीय निष्काळजीपणामुळे आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. जागृती विहार एक्सटेंशनच्या महापाल हाइट्समध्ये राहणारे वित्त व्यावसायिक जसप्रिंदर सिंग यांचा मुलगा मनराज सिंग याला घरी खेळत असताना डोळ्याजवळ खोल जखम झाली. कुटुंब घाबरले आणि त्यांनी भाग्यश्री रुग्णालयात धाव घेतली, परंतु तेथे जे घडले ते सर्वांना धक्कादायक आणि अस्वस्थ करणारे होते.

Add Zee News as a Preferred Source

कुटुंबाच्या म्हणण्यानुसार, रुग्णालयातील डॉक्टरांनी जखमेवर टाके मारण्यास नकार दिला. त्यांनी सांगितले की टाके मुलाच्या चेहऱ्यावर एक जखम सोडतील, म्हणून त्यांनी पाच रुपयांचा फेविक्विकचा तुकडा आणला ते जखमेला लावून पट्टी बांधली. डॉक्टरांवर विश्वास ठेवून, कुटुंबाने फेविकविक आणला.

डॉक्टरांनी मुलाच्या डोळ्याजवळील कापलेल्या भागावर फेविक्विक लावताच, दोन वर्षांचा मनराज वेदनेने ओरडला.  डॉक्टरांनी त्याकडे दुर्लक्ष केले, कारण ते मुलाच्या भीतीमुळे होते असं त्यांचं म्हणणं होतं. कुटुंबाच्या म्हणण्यानुसार, त्यांना लगेचच मुलाची प्रकृती गंभीर असल्याचा संशय आला. रात्रभर वेदना वाढतच राहिल्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी एक धक्कादायक सत्य उघड झाले.

वेदना कमी होण्याऐवजी वाढतच गेल्या. जखमेजवळ फेविक्विकचा एक थर कडक झाला. सकाळी मनराजला तेथील दुसऱ्या रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टर निष्काळजीपणामुळे स्तब्ध झाले. फेविक्विक काढण्यास जवळजवळ तीन तास लागले. या काळात, मूल वेदनेने ओरडत आणि ओरडत राहिले. अडकलेला भाग काळजीपूर्वक काढून टाकल्यानंतर, डॉक्टरांनी जखमेवर उपचार केले आणि चार टाके घातले. बराच वेळानंतर मूल बरे झाले.

कुटुंबाचा रोष

गंभीर निष्काळजीपणामुळे व्यथित झालेले वडील जसप्रिंदर सिंग भाग्यश्री रुग्णालयात गेले आणि डॉक्टरांकडून उत्तरे मागितली. कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने, जसप्रिंदर सिंग यांनी मेरठच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांना (सीएमओ) ही बाब कळवली. त्यांच्या तक्रारीत स्पष्टपणे म्हटले होते की जर फेविक्विकमधील रसायन मुलाच्या डोळ्यात गेले असते तर त्यामुळे नुकसान होऊ शकले असते. हे केवळ डॉक्टरांचा निष्काळजीपणा नाही तर मुलाच्या जीवाला थेट धोका आहे.

सीएमओने या प्रकरणाची दखल घेतली आहे आणि चौकशीचे आदेश दिले आहेत, ज्याला एका आठवड्यात अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जर रुग्णालय दोषी आढळले तर गंभीर कारवाई केली जाऊ शकते.





Source link

दत्तनगरमध्ये शिवसेना (एकनाथ शिंदे गट) व राजेगटाच्या प्रचार फेरीचा उत्साहात शुभारंभ ; नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या उमेदवारांचा जनसंपर्क दौरा; मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0
दत्तनगरमध्ये शिवसेना (एकनाथ शिंदे गट) व राजेगटाच्या प्रचार फेरीचा उत्साहात शुभारंभ ; नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या उमेदवारांचा जनसंपर्क दौरा; मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

दत्तनगरात शिवसेना (एकनाथ शिंदे गट)च्या प्रचार फेरीचा उत्साहात शुभारंभ ; नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या उमेदवारांचा जनसंपर्क दौरा; मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फलटण लागली प्रतिनिधी :- फलटण नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (एकनाथ शिंदे) व राजे गटामार्फत आयोजित प्रचार फेरीचा भव्य शुभारंभ दत्तनगर येथे झाला. नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर तसेच प्रभाग क्र. १२ चे नगरसेवक पदाचे उमेदवार विकास वसंतराव काकडे आणि स्मिता शहा यांच्या प्रचार यात्रेची सुरुवात जल्लोषमय वातावरणात करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते दत्तनगरातील खंडोबा मंदिरात श्रीफळ वाढवून करण्यात आली. मंदिर परिसरात झालेल्या या कार्यक्रमास मतदार बांधव, महिला आणि विशेषतः तरुण वर्गाचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला.

प्रचार फेरीदरम्यान उमेदवारांनी नागरिकांचे अभिवादन स्वीकारत विविध स्थानिक प्रश्न, विकासकामे, सुविधा आणि भविष्यातील नियोजन याबाबत चर्चा केली. नागरिकांकडूनही विविध समस्या मांडण्यात आल्या व त्यावर सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन उमेदवारांनी दिले. लोकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण करत उमेदवारांनी फलटणच्या सर्वांगीण विकासासाठी आपली भूमिका सुस्पष्ट केली.

उमेदवारांच्या सभोवती दिसणारा ऊर्जावान तरुण वर्ग आणि महिलांचा मोठा सहभाग पाहता प्रचार मोहीमेची जोरदार सुरुवात झाल्याचे चित्र स्पष्ट दिसत होते. समाजातील सर्व घटकांचा सहभाग पाहून आगामी निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट)चे उमेदवार प्रभावी स्पर्धा देणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

मूर्ती 9-9-6 साठी आग्रही; भारतीयांचा 10-5-5 साठी हट्ट! पण हे 9-9-6 आणि 10-5-5 कल्चर आहे काय?

0
मूर्ती 9-9-6 साठी आग्रही; भारतीयांचा 10-5-5 साठी हट्ट! पण हे 9-9-6 आणि 10-5-5 कल्चर आहे काय?


9-9-6 Rule of 72 Hour Work Week Vs 10-5-5 Working Culture: भारतातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींपैकी एक असलले इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी केलेलं एक विधान सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या विधानावरुन दोन गट पडले असून मूर्ती यांनी कर्मचाऱ्यांनी आठवड्यांतील जास्तीत जास्त वेळ काम करण्याच्या आपल्या पूर्वीच्या आग्रहाचा पुन्हा उल्लेख केला आहे. यावेळी त्यांनी चीनचे उदाहरण दिलं आहे. चिनी कंपन्यांकडून अंमलात आणल्या जाणाऱ्या 9-9-6 नियमाबद्दल मूर्ती बोलले आहेत. 

Add Zee News as a Preferred Source

9-9-6 नियम काय आहे?

9-9-6 नियम हा काही चीनमधील तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांशी संबंधित असलेल्या कामाच्या संस्कृतीसंदर्भातील आहे. विशेषतः गेल्या दशभरात चीनमधील कर्मचारी वर्गाच्या वेळापत्रकाचे वर्णन 9-9-6 नियमाच्या माध्यमातून केलं जातं. या नियमानुसार येथील कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून सहा दिवस सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत काम करावे अशी अपेक्षा असते.

या नियमाचे पालन करणारे कर्मचारी आठवड्यातून 72 तास प्रभावीपणे काम करतात. तथापि, ही पद्धत अत्यंत त्रासदायक आणि तणावपूर्ण असल्याने कर्मचाऱ्यांचं शारीरिक तसेच मानसिक आरोग्यांबरोबरच वर्क-लाईफ बॅलेन्सवर परिणाम करू शकते असं म्हटलं जातं. म्हणूनच या 9-9-6 वर्क कल्चरला मोठ्या प्रमाणावर विरोध होताना दिसतो.  2021 मध्ये, चीनच्या सर्वोच्च न्यायालयाने 9-9-6 कामाच्या तासांची पद्धत बेकायदेशीर ठरवली. मात्र त्यानंतरही ही बंदी किती प्रमाणात लागू केली गेली आहे हे स्पष्ट नाही.

नारायण मूर्तीकडून 9-9-6 नियमाचं समर्थन

9-9-6 वर्क कल्चरबद्दल इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी ‘रिपब्लिक टीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत कामाची ही पद्धत एक सकारात्मक उदाहरण म्हणून पाहता येईल असं म्हटलं. मूर्ती यांनी 2023 मध्ये राष्ट्र उभारणीसाठी भारतीयांनी आठवड्यातून 70 तास काम करावे असे सांगून राष्ट्रीय स्तरावर नवीन वादाला तोंड फोडलं होतं. आता त्यांनी चीनचे उदाहरण देऊन आपल्या जुन्या भूमिकेचे समर्थन केले आहे. 

मूर्ती नेमकं काय म्हणाले?

“चीनमध्ये एक म्हण आहे, 9-9-6! तुम्हाला माहिती आहे का याचा अर्थ काय? सकाळी 9 ते रात्री 9, आठवड्याचे 6 दिवस काम करणे. म्हणजेच हा 72 तासांचा आठवडा होतो,” असे त्यांनी मुलाखतीत सांगितले आणि भारतातील तरुणांनी याच पद्धतीचे पालन करावे असेही मूर्ती यांनी सांगितले. आयुष्य जगायला वेळ हवा असं म्हणणाऱ्यांनाही मूर्ती यांनी सुनावलं. प्रथम ‘जगण्यासारखं आयुष्य मिळवा आणि नंतर वर्क-लाइफ बॅलेन्सची काळजी करा,” असा टोला मूर्तींनी लगावला.

टीकेची झोड

मूर्तींच्या वक्तव्यावरील बहुतेक प्रतिक्रिया नकारात्मक होत्या. भारतात ओव्हरटाइम वेतनाचा अभाव असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. ओव्हरटाइम काम करण्याचे फायदे वरिष्ठ व्यवस्थापनाकडून कनिष्ठ कर्मचाऱ्यांना न देणे, जास्त कामाच्या तासांशी संबंधित आरोग्य धोके, स्थिर वेतन, कामाभोवती आयुष्य केंद्रित करण्याचे धोके आणि बऱ्याच गोष्टींचा उल्लेख करत मूर्तींच्या भूमिकेवर टीका करण्यात आली.

9-9-6 ला 10-5-5 ने उत्तर

मूर्ती यांना उत्तर देताना अनेकांनी 10-5-5 वर्क कल्चरचा संदर्भ देत उत्तर दिलं आहे. “युरोपमध्ये एक म्हण आहे, 10-5-5. तुम्हाला माहिती आहेच की याचा अर्थ काय आहे – सकाळी 10 ते संध्याकाळी 5, आठवड्यातून 5 दिवस काम करणे. हे कर्मचारी फिरायला जातात, ट्रेकिंग करतात, मित्रांना भेटतात आणि जीवनाचा ‘आनंद’ घेतात,” असे एक्स युझर आकाश तिवारीने म्हटलं आहे.

“तुम्ही तासाला पैसे द्याल का? नाही ना? तुम्हाला कर्मचाऱ्यांनी 24×7 काम करावे असे वाटते जेणेकरून तुम्ही तुमच्या 9 महिन्यांच्या नातवाला 250 कोटी रुपयांचे शेअर्स हस्तांतरित करू शकाल आणि तुम्ही त्या कर्मचाऱ्याला दरवर्षी 3.6 लाख रुपये देता,” असे दुसऱ्या व्यक्तीने मूर्ती यांना सुनावलं आहे. 





Source link

हिवाळ्यात अंघोळ थंड पाण्याने करणे फायद्याचे की तोट्याचे?

0
हिवाळ्यात अंघोळ थंड पाण्याने करणे फायद्याचे की तोट्याचे?


निलेश खरमरे झी 24 तास पुणे : हिवाळा सुरु झाला आहे. हाडं गोठवणारी थंडी पडली आहे. अशाही वातावरणात काहीजण थंड पाण्यानं आंघोळ करतात. थंड पाण्यात आंघोळ करणं आरोग्यासाठी फायदेशीर आहे की तोट्याचं असा प्रश्न निर्माण झालाय. हिवाळ्यात थंड पाण्यानं आंघोळ करणं तुम्हाला गंभीर आजारांच्या दारात नेत असल्याची माहिती समोर आली आहे. 

Add Zee News as a Preferred Source

भारतीय माणूस रोजच्या दिवसाची सुरुवात आंघोळीनं करतो. भारतीय संस्कृतीत आंघोळीला अतिशय महत्व आहे. आंघोळीनंतरच दिनचर्येला सुरुवात करायची असा अलिखित दंडकच आहे. अगदी पहाटे पाचला उठून लोकं हाड गोठवणा-या थंडीतही आंघोळ करतातच… फक्त ऋतूनुसार काही लोकं थंड पाणी, गरम पाणी किंवा कोमट पाण्याचा वापर करतात.  काही भारतीय तर तीनही ऋतू थंड पाण्यानं आंघोळ करतात. अगदी थंडीच्या दिवसातही ही लोकं थंड पाण्यानं आंघोळ करतात. ही झाली सवयीची गोष्ट पण साधारणपणे सर्वसामान्य माणूस पावसाळ्यात आणि हिवाळ्यात गरम पाण्यानं आंघोळ करतात. उन्हाळ्यात गरम पाण्याऐवजी साध्या पाण्यानं आंघोळ करण्यास प्राधान्य देतात. हिवाळ्यात थंड पाण्यानं आंघोळ करण्याचे आपले फायदे तोटे आहेत. थंड पाण्यानं आंघोळ करणं सोप्पं आणि आरोग्यदायी असेल असं वाटत असलं तरी सगळ्यांसाठीच ते फायदेशीर नाही. हिवाळ्यात थंड पाण्यानं आंघोळीची तर कल्पनाच करवत नाही. हिवाळ्यात थंड पाण्यानं आंघोळ कुणी करु नये याचे काही नियम असल्याचं तज्ज्ञ सांगतात.

थंड पाण्यानं आंघोळ केल्यास काय होतं?

सर्दी, खोकला, ताप, अशक्तपणा, हायपोथर्मिया हे आजार होतात. तसेच हिवाळ्यात थंड पाण्यानं आंघोळ केल्यानं ह्रदयावर दबाव येतो. थंड पाण्यात आंघोळ केल्यास ह्रदयगती वाढते. थंड पाण्यामुळं श्वास घेण्यास त्रास होतो. ह्रदयरोगाचा त्रास असलेल्यांनी हिवाळ्यात थंड पाण्यात आंघोळ करू नये असं वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात.

थंड पाण्यानं आंघोळ करणं हे सुदृढ आरोग्याचं लक्षण मानलं गेल आहे. जो माणूस थंड पाण्यानं आंघोळ करतो तो आरोग्यदायी जीवन जगतो असं मानलं जातं. पण सरसकट सगळ्यांनाच हिवाळ्यात थंड पाणी मानवत नाही. रेसलिंग किंवा कुस्तीपटू नेहमीच बाराही महिने थंड पाण्यात आंघोळ करतात. थंड पाण्यात आंघोळीचेही काही फायदे आहेत.

थंड पाण्याने आंघोळ केल्यानं रक्ताभिसरण सुधारते. थंड पाण्यात आंघोळीनं तणावमुक्तीची अनुभूती त्वचा आणि केसाचे आरोग्य सुधारतं. थंड पाण्यानं आंघोळीचे काही फायदे असले तरी या फायद्यांसाठी दुसरा करतो म्हणून त्याचं अनुकरण करू नका… स्वतःला झेपत नसेल तर हिवाळ्यात थंड पाण्यानं आंघोळ टाळाल.  तसं केलं नाहीतर तुम्हाला उगाचच दवाखान्याचे हेलपाटे मारावे लागतील.





Source link

कोणतेही मोठे काम टिकून राहण्यासाठी एक भक्कम रचना आवश्यक असते. फक्त उत्साहाने वर्षानुवर्षे काम सुरू ठेवता येत नाही.” – मॅक्सिन बर्नसन

0
कोणतेही मोठे काम टिकून राहण्यासाठी एक भक्कम रचना आवश्यक असते. फक्त उत्साहाने वर्षानुवर्षे काम सुरू ठेवता येत नाही.” – मॅक्सिन बर्नसन


फलटण प्रतिनिधी :- प्रगत शिक्षण संस्थेच्या ४० वर्षपूर्तीनिमित्त फलटणच्या भूमीवर भरलेल्या या सोहळ्यात, जणू चार दशके जपलेले स्वप्न, संघर्ष आणि जिद्दीचे प्रतिबिंबच साकार झाले होते. मनात भावनांची ओल, डोळ्यांत कृतज्ञतेची चमक, आणि सभागृहात एक अदृश्य पण जाणवणारा उत्साह अशा वातावरणात संस्थेच्या संस्थापक, प्रसिद्ध भाषातज्ज्ञ डॉ. मॅक्सिन बर्नसन यांनी आपल्या मनातील सत्य शब्दांच्या स्वरूपात व्यक्त केले. त्या म्हणाल्या, “कोणतेही मोठे काम टिकून राहण्यासाठी एक भक्कम रचना आवश्यक असते. फक्त उत्साहाने काम पुढे नेता येत नाही.”आणि त्यांनी पुढे जोडले.
“A structure that will last. Enthusiasm alone can’t keep you going for years. But structure will remain.”
त्या क्षणी त्यांच्या आवाजातील गांभीर्य आणि डोळ्यांतील शांत तेज पाहून संपूर्ण जमलेला माजी विद्यार्थी आणि शिक्षक समुदाय थोडा क्षण नि:शब्द झाले. कदाचित ती वाक्यं ४० वर्षांच्या संस्थात्मक प्रवासाचा सार होता. योजनाबद्धता, चिकाटी आणि माणसांबद्दलची नि:स्वार्थ आस्था.त्या पुढे म्हणाल्या, “योग्य रचना दीर्घकाळ टिकते. उपक्रमाला स्थैर्य, सातत्य आणि आत्मा देण्यासाठी भक्कम पाया असणे अत्यावश्यक आहे.” त्यांच्या प्रत्येक शब्दामागे आयुष्यभराच्या अनुभवाची शिदोरी होती.शैक्षणिक तत्त्वज्ञानाबद्दल बोलताना त्या एकदम सौम्य झाल्या. जणू काही फुलाच्या पाकळ्यांसारख्या त्यांचा शब्दांचा स्पर्श सभागृहावर उमटत होता. त्या म्हणाल्या, “माझं स्वप्न खूप साधं आहे.कोणतेही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये. शाळा मुलांची भीती वाढवणारी इमारत नसावी; ती त्यांच्या कल्पनांना दिशा देणारा, त्यांच्या आत्मविश्वासाला पंख देणारा एक खुला आकाश असावा.”त्या पुढे म्हणाल्या, “शिक्षण म्हणजे मुलांना स्वप्न पाहण्याची आणि ती पूर्ण करण्याची ताकद देणं. मुलं शाळेत केवळ उपस्थित राहण्यासाठी नसतात. त्यांनी आपल्या शब्दांत, आपल्या भाषेत, आपल्या अनुभवातून स्वतःला व्यक्त करता येणं आवश्यक आहे. भाषा, बोली आणि अनुभव हीच त्यांची खरी ओळख आहे. हा पाया मजबूत असेल तर ते कोणत्याही संकटातून उभं राहू शकतात.”गेल्या ४० वर्षांत प्रगत शिक्षण संस्थेने केलेले काम म्हणजे फक्त उपक्रमांची यादी नाही. तर हजारो हृदयांमध्ये उजेड पेरण्याची कहाणी आहे. अनेक जिल्हा परिषद शाळा, नगरपरिषद प्राथमिक शाळा, अंगणवाड्या आणि शिक्षक यांच्यासाठी ही संस्था आशेचा दिवा ठरली आहे.
संस्थेच्या उपाध्यक्षा डॉ. मंजिरी निंबकर यांनी संस्थेच्या जमीनीवरील कामाचा जिवंत इतिहास सांगितला. फलटण, माण आणि औसा तालुक्यातील शाळांमधील प्रयोग, शिक्षक प्रशिक्षण, भाषिक उपक्रम, आणि मुलांच्या गरजांकडे पाहण्याचा संवेदनशील दृष्टीकोन. त्या म्हणाल्या, “आमची शाळा ही एक प्रयोगशाळा आहे. इथले प्रयोग म्हणजे केवळ सिद्धांत नाही. ते मुलांच्या जीवनात भिनलेले अनुभव आहेत.” या सत्राचे संयोजन संस्थेचे कार्यकारी अधिकारी प्रकाश अनभुले यांनी केले आणि त्यांनी त्यांच्याच डॉ.मक्सीन बर्नसन यांच्यावरील स्वप्नवेडी या कवितेने सत्राची सांगता करून सत्र अधिक भावनिक केले.
कार्यक्रमातील “माणसं घडवणारा आणि जोडणारा” हा सत्राचा भाग तर अविस्मरणीय ठरला. जेव्हा माजी व विद्यमान शिक्षक, बालवाडी सेविका, कर्मचारी, ग्रंथपाल, माजी विद्यार्थी आणि अगदी आजी विद्यार्थिनीही आपल्या आठवणी सांगू लागल्या. तेव्हा शब्द नव्हे, तर भावना बोलत होत्या.अनिता कुलकर्णी, निलोफर शेख, आशा चव्हाण, माधुरी भगत, प्रदीप ढेकळे, ऍड. श्याम अहिवळे, प्रितम पवार, राजेश्वरी भिरंगी प्रत्येकाने सांगितलेली आठवण म्हणजे जणू या संस्थेच्या मनातील एका कड्यावरून उघडलेली दारं होती. अनेकांच्या आवाजात दमछाक होती, काहींच्या डोळ्यांत दाटून आलेला ओलावा होता, पण प्रत्येक कथेत एकभावना होती—“ही संस्था आमचं घर आहे. ”पुढील भागात डॉ. मंजिरी निंबकर यांनी ‘मातीत रुजलेलं आभाळ’ या पुस्तिकेतील अंश वाचले. चौथ्या बॅचमधील धनश्री (मिंटी) जोशी-दांडेकर हिचं पत्र ऐकताना मंडपातील सगळेच अंतर्मुख झाले. त्या पत्रात एक मुलगी, एक विद्यार्थीनी, एक शिक्षक, आणि एक कृतज्ञ मन सगळं एकत्र घडलं होतं. त्यानंतर ‘कहाणी प्रगत शिक्षण संस्थेची’ या फिल्मने तर संपूर्ण प्रवास डोळ्यांसमोर सजीव केला.
कार्यक्रमाची सुरुवात ‘प्रगत’ गीताने झाली. जे संस्थेच्या सचिव मधुरा राजवंशी यांनी लिहिलं होतं आणि बालभवनच्या मुलांनी अतिशय निरागसपणे सादर केलं. ‘आ चल के तुझे’ या गीताच्या सादरीकरणाने तर उपस्थितांच्या मनात एक वेगळाच स्पर्श उमटला. जणू काही भविष्यकाळाची हाक होती.कार्यक्रमाला झिया कुरेशी, डॉ. चंदा निंबकर, नीलिमा गोखले, डॉ. नंदिनी निंबकर, ऑस्ट्रेलियन हितचिंतक गॅवन ब्रोमिलो, पर्यावरणप्रेमी सुनील करकरे, प्राचार्य डॉ. सुधीर इंगळे, आबा करडे, रणजित कोकाटे, दत्ता अहिवळे, अंगणवाडी पर्यवेक्षिका दीपा हेंद्रे, विजय केंकणे आणि आजी-माजी शिक्षक, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन संस्थेचे जनसंपर्क अधिकारी सोमीनाथ घोरपडे यांनी इतक्या सहजपणे, इतक्या नेटकपणे केले की कार्यक्रमाचा प्रवाह गुणवत्ता आणि आत्मीयता दोन्ही जपून ठेवला. अखेरीस, कार्यक्रमाची सांगता ‘पसायदान’ने झाली जणू काही चार दशकांच्या प्रवासावर मोहर उमटवणारा शांत क्षण सगळे अनुभवत होते.