Saturday, July 4, 2026
Home Blog Page 96

Diabetes and Heart Disease : मधुमेह असणाऱ्यांना हार्ट अटॅकचा दुप्पट धोका! आत्ताच सावध व्हा

0
Diabetes and Heart Disease : मधुमेह असणाऱ्यांना हार्ट अटॅकचा दुप्पट धोका! आत्ताच सावध व्हा


Know How Diabetes Causes Heart Disease : आजकाल मधुमेह आणि हृदयविकाराचा धोक्याचे प्रमाण वाढत चालले आहे. बदलच्या जीवनशैलीमुळे खाण्या-पिण्याच्या सवयी हे या समस्यांचे मुख्य कारण बनले आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, मधुमेह आणि हृदयविकार हे दोन्ही आजार एकमेकांशी खोलवर जोडलेले आहेत. तज्ज्ञांच्या मते मधुमेह असलेल्या व्यक्तींना हृदयविकार होण्याची शक्यता सामान्य लोकांपेक्षा खूप जास्त असते. ज्या मेटाबॉलिक असंतुलनामुळे रक्तातील साखर वाढते यामुळे रक्तवाहिन्या आणि हृदयाला हानी पोहोचवते.

Add Zee News as a Preferred Source

 

डायबिटीज हृदयासाठी का घातक आहे?

जेव्हा रक्तातील साखरेचे प्रमाण सतत वाढत राहते तेव्हा धमन्यांमध्ये सूज आणि कडकपणा येतो, याला एथेरोस्क्लेरोसिस म्हणतात. यामुळे रक्तवाहिन्या आखूड होतात आणि हृदय तसेच मेंदूमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो. मधुमेहामध्ये उच्च रक्तदाब, खराब कोलेस्ट्रॉल आणि लठ्ठपणा या समस्या सामान्य असतात. या सर्व समस्या एकत्रिपणे झाल्यामुळे “मेटाबॉलिक सिंड्रोम” होण्याची शक्यता असते, जे हळूहळू हृदयाला नुकसान पोहोचवते.

 

आरोग्यावर काय परिणाम होतो?

डायबिटीज असलेल्या जवळपास 70% रुग्णांचा मृत्यू हृदयरोगामुळे होतो, जसे की हार्ट अटॅक, स्ट्रोक किंवा हार्ट फेल्युअर. पण योग्य काळजी आणि वेळीच उपचार घेतल्यास हे टाळता येऊ शकते. एका संशोधनानुसार रक्तातील साखर, रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल काटेकोरपणे नियंत्रणात ठेवल्यास हृदयरोगाचा धोका खूप कमी होऊ शकतो. SGLT2 इनहिबिटर्स आणि GLP-1 रिसेप्टर एगोनिस्टसारख्या आधुनिक औषधांमुळे केवळ साखर कमी होत नाही, तर हृदय आणि किडनीचेही संरक्षण होते.

 

यापासून वाचण्यासाठी तुम्ही स्वतः स्वतःची काळजी घ्यायला हवी. नियमितपणे हृदयाची तपासणी करा. नियमितपणे व्यायाम करा आणि वजन नियंत्रणात ठेवा. तुमच्या आहारात फायबरयुक्त संतुलित अन्नपदार्थांचा समावेश करा. धूम्रपान करणे टाळा. 

 

 

 

 

१. मधुमेह असला तरी हृदयरोग टाळता येऊ शकतो का?

उत्तर : होय, पूर्णपणे टाळता येऊ शकतो असं नाही, पण रक्तातील साखर, रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल काटेकोरपणे नियंत्रणात ठेवल्यास हृदयरोगाचा धोका 50-70% पर्यंत कमी होऊ शकतो.

 

 

२. मधुमेहाच्या रुग्णांचा मृत्यू मुख्यतः कशामुळे होतो?

उत्तर : मधुमेह असलेल्या जवळपास 70% रुग्णांचा मृत्यू हृदयविकारामुळे (हार्ट अटॅक, स्ट्रोक किंवा हार्ट फेल्युअर) होतो. म्हणूनच मधुमेहाला “सायलेंट हार्ट किलर”ही म्हणतात.

 

 

३. हृदय आणि किडनी दोन्हींचे संरक्षण करणारी औषधे कोणती?

उत्तर :  SGLT2 इनहिबिटर्स (उदा. डापाग्लिफ्लोझिन, एम्पाग्लिफ्लोझिन) आणि GLP-1 रिसेप्टर एगोनिस्ट (उदा. लिराग्लुटाइड, सेमाग्लुटाइड) ही आधुनिक औषधे साखर कमी करतातच, पण हृदय आणि किडनीला अतिरिक्त संरक्षणही देतात.

 

 

(Disclaimer: वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)





Source link

फलटण नगरपरिषद निवडणूक : शिवसेना (शिंदे गट)–राजे गटाची संयुक्त प्रचारफेरी उत्साहात; अनिकेतराजेंच्या नेतृत्वाला दमदार प्रतिसाद

0
फलटण नगरपरिषद निवडणूक : शिवसेना (शिंदे गट)–राजे गटाची संयुक्त प्रचारफेरी उत्साहात; अनिकेतराजेंच्या नेतृत्वाला दमदार प्रतिसाद


फलटण प्रतिनिधी : फलटण नगरपरिषद निवडणुकीतील वाढत्या चुरशीला आज आणखी वेग आला. शिवसेना (शिंदे गट) आणि राजे गटाच्या संयुक्त प्रचारफेरीची सुरुवात नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत बारसकर गल्ली, मरीमाता मंदिर व रंगारी महादेव मंदिर येथे श्रीफळ वाढवून झाली.

नगरसेवक पदाचे उमेदवार विकास वसंत काकडे आणि स्मिता शहा यांनी घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधला. विकासाभिमुख दृष्टीकोन, समस्यांचे समाधान आणि स्थानिक पातळीवरील सुविधा यावर त्यांनी नागरिकांना आश्वस्त केले. प्रचारफेरीत महिलांचा उत्स्फूर्त सहभाग, तरुणांचा जोश आणि विविध समाजघटकांचा मोठा प्रतिसाद यामुळे परिसरात निवडणुकीची रंगत अधिक वाढली.

या संयुक्त प्रचार मोहिमेत उमेदवारांनी सामाजिक न्याय, सर्वसमावेशक विकास आणि नागरिकांच्या प्रगतीची वचनबद्धता व्यक्त केली. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर व गौतम बुद्ध यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.

नागरिकांकडून मांडल्या गेलेल्या सुविधा, पायाभूत गरजा आणि स्थानिक समस्यांवर उमेदवारांनी सकारात्मक तोडग्यांची ग्वाही दिली. वाढत चाललेल्या जनसमर्थनामुळे फलटण नगरपरिषद निवडणुकीची लढत अधिक रंगतदार आणि तीव्र होणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.

राजकीय मंडळींना यशवंतराव चव्हाणांचा विसर? पुण्यतिथीनिमित्य प्रीती संगमावर अद्याप कुणीही नाही

0



कराड, सातारा : महाराष्ट्र पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan) यांची आज 41वी पुण्यतिथी आहे. असे असताना कराडमधील प्रीतीसंगम (Yashwantrao Chavan Priti Sangam) या ठिकाणी राजकीय, सामाजिक क्षेत्रातील लोकांनी अद्याप उपस्थिती लावलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना विसरले आहेत का? असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे. केवळ या ठिकाणी आज खासदार सुप्रिया सुळे यांचा नियोजित दौरा असून या ठिकाणी दरवर्षी पाहायला मिळणारी कार्यक्रमांची रेलचेल दिसून येत नाहीये.

राजकारण, समाजकारण किंवा एखाद्या सभेला संबोधित करताना ज्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे नाव घेऊन सुरुवात केली जाते त्यांनाच आज राजकीय मंडळी विसरली आहे का? असा प्रश्न पडला आहे. असे असताना याच मुद्दयावरुन यशवंतराव चव्हाण पुण्यतिथीला (Priti Sangam) प्रशासन आणि राजकीय पदाधिकारी उपस्थित नसल्याने राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. या संदर्भात मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहणार, अशी माहिती देत खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.

Supriya Sule : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे नव्हे, तर देशाचे नेते

यशवंतराव चव्हाण हे केवळ महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे नेते आहेत. हिमालय अडचणीत असताना देशासाठी यशवंतराव चव्हाण नावाचा हा सह्याद्री धावून गेला होता, हा इतिहास आहे. सरकार कोणाचेही असो, त्यांनी इथे याला हवं होतं. यशवंतराव चव्हाण यांना मानसन्मान पाळलाच पाहिजे. या संदर्भात मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहणार, अशी माहिती देत खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.

Supriya Sule :  या संदर्भात मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहणार

महाराष्ट्र पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan) यांची आज 41वी पुण्यतिथी असून खासदार सुप्रिया सुळे या समाधी स्थळी अभिवादनासाठी दाखल झाल्या. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, सातारा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुवर्णा पाटील, शिवसेना गटाचे नेते राजेंद्रसिंह यादव त्यांच्यासोबत लोकशाही आघाडी आणि यशवंत विकास आघाडीचे सर्व नगरसेवक नगराध्यक्ष पदाचे उमेदवार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळावर अभिवादानाला आले आहेत.

हेही वाचा

आणखी वाचा



Source link

पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम: अंतर्मनात खाेल रुजावी‎ अशी आपली भाषा असावी

0
पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:  अंतर्मनात खाेल रुजावी‎ अशी आपली भाषा असावी


  • Marathi News
  • Opinion
  • Our Language Should Be Such That It Can Be Absorbed Into The Heart By Pt. Vijayshankar Mehta’s Column.

16 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

भाषा शब्दांशी जोडली गेली असली तरी, आजकाल ती आवाजाशी‎जोडली गेली आहे. आवाज मोठा आणि कर्कश असलेल्यांची भाषा‎लोक ऐकतात आणि समजून घेतात. मोबाईल फोनच्या युगात भाषेने‎वेगळे रूप धारण केले आहे. नवीन पिढी मोबाईल फोनची भाषा बोलते‎आणि समजते. म्हणून सुज्ञ लोक त्यांच्याशी त्यांच्याच भाषेत बोलू‎लागले आहेत.

भगवान शिव यांनी गरुडाला काकभूशुंडीकडे पाठवले‎तेव्हा पार्वती विचार करत होती, तुम्ही स्वतः रामकथा सांगू शकला‎असता. मग तुम्ही पक्ष्यांच्या राजाला काकभूशुंडीकडे का पाठवले?‎भगवान शिव यांनी उत्तर दिले, //”कछु तेहि ते पुनि मैं नहिं राखा,‎समुझइ खग खगही कै भाषा।.’ भगवान शिवाचा हा विचार आज‎आपल्यासाठी खूप उपयुक्त आहे. आपली भाषा आवाजाशी‎जोडलेली नसली तरी किमान आपण बोलत असलेल्या लाेकांना‎त्याचा अर्थ समजायला हवा आणि अपेक्षित गाेष्ट साध्य व्हायला‎पाहिजे. भाषा अशी खोलवर पोहोचणारी असावी.‎ ‎



Source link

Heart Attack vs Acidity Symptoms: हार्ट अटॅक आणि ऍसिडिटीच्या लक्षणांमध्ये काय आहे फरक?

0
Heart Attack vs Acidity Symptoms: हार्ट अटॅक आणि ऍसिडिटीच्या लक्षणांमध्ये काय आहे फरक?


तुम्हाला अचानक छातीत दुखणे येते आणि तुम्हाला भीती वाटते की हा हृदयविकाराचा झटका असू शकतो? किंवा तुम्हाला वाटते की ते फक्त गॅस किंवा अ‍ॅसिडिटीमुळे आहे? जर असेल तर हा लेख तुमच्यासाठी आहे. पोषण आणि आहार तज्ञ सोनिया नारंग त्यांच्या इंस्टाग्राम चॅनेल @sonianarangsdietclinics वरील एका खास व्हिडिओमध्ये स्पष्ट करतात की तुम्ही छातीत दुखण्याशी संबंधित लक्षणे कशी समजून घेऊ शकता आणि ते हृदयविकाराचे लक्षण आहे की फक्त अ‍ॅसिडिटी कसे ठरवू शकता. खरं तर, भारतात दरवर्षी लाखो लोकांना हृदयविकाराचा झटका येतो. लोक अनेकदा सुरुवातीच्या लक्षणांना हलके मानतात, त्यांना वाटते की ते फक्त अपचन किंवा गॅस आहे. अशा परिस्थितीत, वेळेवर ओळख आणि प्रतिसाद जीव वाचवू शकतो. 

Add Zee News as a Preferred Source

छातीत दुखण्याची लक्षणे?

जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मते, दरवर्षी जगभरात सुमारे ६८ दशलक्ष लोकांचा मृत्यू होतो. यापैकी बहुतेक मृत्यू हृदयरोग, स्ट्रोक आणि श्वसनाचे आजारांमुळे होतात. भारतात दरवर्षी लाखो लोकांना हृदयविकाराचा झटका येतो. लोक अनेकदा सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात, जे धोकादायक असू शकतात. छातीत दुखणे हृदयविकाराचा झटका, आम्लता, गॅस, स्नायूंचा ताण आणि ताण यासारख्या अनेक कारणांमुळे होऊ शकते. तथापि, जर वेदना वारंवार होत असतील किंवा इतर लक्षणांसह असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नये.

हृदयविकाराचा झटका आणि ऍसिडिटी यात फरक कसा करायचा?

१. वेदना कुठे पसरत आहे?

सोनिया नारंग यांच्या मते, जर वेदना घशापुरती मर्यादित असतील तर ते सहसा आम्लतेचे लक्षण असते. तथापि, जर वेदना तुमच्या खांद्यावर, जबड्यात किंवा डाव्या हातापर्यंत पसरत असतील तर ते हृदयविकाराच्या झटक्याचे चेतावणी चिन्ह असू शकते.

२. वेदनांचे स्वरूप काय आहे?

जर तुम्हाला जळजळ वाटत असेल तर ते आम्लतेचे असू शकते. तथापि, जर तुम्हाला तुमच्या छातीत जडपणा किंवा दाब जाणवत असेल तर ते हृदयविकाराचे लक्षण असू शकते. हे टाळले पाहिजे.

३. झोपल्यावर वेदना वाढतात का?

सोनिया नारंग म्हणतात, जर झोपल्यावर वेदना वाढल्या तर ते आम्लपित्त असू शकते. तथापि, जर झोपल्याने काही फरक पडला नाही आणि वेदना कायम राहिली तर ते हृदयरोग असू शकते.

४. तुमच्या तोंडाला वाईट चव येते का?

जर तुम्हाला तोंडात कडूपणा, ढेकर येणे किंवा पोटात जळजळ जाणवत असेल तर ही आम्लपित्तची लक्षणे आहेत. तथापि, जर तुम्हाला घाम येणे, चक्कर येणे किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल तर ताबडतोब सावध रहा, कारण ही हृदयविकाराच्या झटक्याची उत्कृष्ट लक्षणे आहेत.

आम्लपित्तेसाठी घरगुती उपाय

एक ग्लास कोमट पाण्यात थोडे लिंबू आणि मध मिसळून प्या.

चमूटभर ओरेगॉन आणि काळे मीठ चावा.

जेवल्यानंतर लगेच झोपणे टाळा.

चहा, कॉफी आणि तळलेले पदार्थ टाळा.

तणाव कमी करण्यासाठी योग आणि ध्यान करा.

डॉक्टरांना कधी भेटावे

छातीत सतत जडपणा येणे

घाम येणे, चक्कर येणे किंवा मळमळ होणे

श्वास घेण्यास त्रास होणे

खांदा, जबडा आणि डाव्या हातापर्यंत वेदना पसरणे. 

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)





Source link

December Bank Holiday: वर्षाअखोर अर्ध्याहून जास्त महिन्यात बॅंकेला सुट्टी, आताच करा नियोजन!

0
December Bank Holiday: वर्षाअखोर अर्ध्याहून जास्त महिन्यात बॅंकेला सुट्टी, आताच करा नियोजन!


December Bank Holiday: 2025 हे वर्ष संपायला 1 महिना आणि काही दिवस राहिलेयत. यानंतर आणखी एका वर्षाला आपण निरोप देऊ. डिसेंबर या 31 दिवसांच्या महिन्यात अनेक सुट्ट्या आहेत. विशेष म्हणजे अर्ध्या महिन्याहून अधिक दिवस बॅंक हॉलीडे आहे. त्यामुळे तुम्हाला बॅंकेसंदर्भातील काही कामे करायची असतील तर आधीच उरकून घ्यावी लागतील. कधी आहेत या सुट्ट्या? सविस्तर जाणून घेऊया. 

Add Zee News as a Preferred Source

डिसेंबरच्या सुरुवातीला विविध राज्यांत स्थानिक सण-उत्सवांमुळे बँकिंग सेवा विस्कळीत होणार आहेत. 1 डिसेंबरला अरुणाचल प्रदेशात आदिवासी श्रद्धा दिनानिमित्त बँका बंद राहतील. 3 डिसेंबरला गोव्यात सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या स्मृती दिवसानिमित्त, तर 12 डिसेंबरला मेघालयात पा टोगन नेंगमिंजा संगमा यांच्या स्मृतीनिमित्त बँकांना सुट्टी जाहीर. हे दिवस स्थानिक वारसा जपणारे असल्याने RBI ने घोषित केले आहेत.

जयंती आणि मुक्ती दिवस

महिन्याच्या मध्यभागी छत्तीसगडमध्ये 18 डिसेंबरला गुरु घासीदास जयंतीनिमित्त आणि मेघालयात यू सोसो थाम यांच्या स्मृती दिवसानिमित्त बँका बंद राहतील. 19 डिसेंबरला गोव्यात मुक्ती दिन साजरा होईल, ज्यामुळे बँकिंग व्यवहार थांबतील. या सुट्ट्या राज्यिक महत्त्वाच्या असल्याने मतदारांना बँकेत जाण्यापूर्वी यादी तपासावी लागेल.

नाताळ उत्सव

ख्रिसमसचा उत्सव डिसेंबरला रंगवतो. 24 डिसेंबरला मेघालय आणि मिझोराममध्ये नाताळ पूर्वसंध्येनिमित्त बँका सुट्टी असतील. 25 डिसेंबरला देशभरात नाताळमुळे बहुतेक राज्यांत बँकिंग सेवा बंद राहतील. हा राष्ट्रीय स्तरावरील उत्सव असल्याने RBI ने सर्वत्र सुट्टी जाहीर केली असून, ऑनलाइन सेवा मात्र चालू राहतील.

26-27 डिसेंबर

26 डिसेंबरला नाताळच्या दुसऱ्या दिवशी मेघालय, मिझोराम आणि तेलंगणात बँका बंद राहतील. हरियाणात शहीद उधम सिंह जयंतीनिमित्तही सुट्टी असेल. 27 डिसेंबरला गुरु गोविंद सिंह जयंतीमुळे हरियाणा, पंजाब आणि हिमाचल प्रदेशात बँकांना सुट्टी मिळेल. या दिवसांत धार्मिक आणि शहीद स्मृती जपण्यावर भर आहे

नववर्ष 

30 डिसेंबरला मेघालयात यू किआंग नांगबाह दिनानिमित्त आणि सिक्कीममध्ये तमू लोसार उत्सवानिमित्त बँका बंद राहतील. 31 डिसेंबरला मिझोराम आणि मणिपूरमध्ये नवीन वर्षानिमित्त बँकिंग सेवा थांबतील. एकूण 18 दिवसांच्या या सुट्ट्यांमुळे बँक ग्राहकांना RBI च्या अधिकृत यादीचा संदर्भ घेऊन कामे आधीच पूर्ण करावी लागणार आहेत.RBI च्या गाईडलाईननुसार राज्यनिहाय सुट्ट्या जाहीर होतात, म्हणून स्थानिक बँकेकडून पडताळणी करणे उचित ठरेल.

FAQ

प्रश्न: डिसेंबर २०२५ मध्ये बँका किती दिवस बंद राहणार आहेत?

उत्तर: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या यादीप्रमाणे डिसेंबरमध्ये बँका एकूण १८ दिवस बंद राहतील. यात रविवार, दुसरा व चौथा शनिवार आणि राज्यनिहाय प्रादेशिक सण-उत्सवांच्या सुट्ट्या समाविष्ट आहेत. मात्र ही संख्या राज्यांनुसार बदलू शकते.

प्रश्न: नाताळमुळे किती दिवस बँका बंद राहतील?

उत्तर: २४ डिसेंबरला मेघालय आणि मिझोरममध्ये नाताळ पूर्वसंध्या, २५ डिसेंबरला देशभरात नाताळ आणि २६ डिसेंबरला मेघालय, मिझोरम, तेलंगणा आणि हरियाणात (शहीद उधम सिंह जयंतीसह) बँका बंद राहतील. म्हणजे नाताळच्या निमित्ताने सलग ३ दिवस अनेक ठिकाणी बँकिंग सेवा बंद असतील.

प्रश्न: डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात कोणत्या राज्यांत बँका बंद राहतील?

उत्तर:  २७ डिसेंबर: हरियाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश (गुरु गोविंद सिंह जयंती)  
३० डिसेंबर: मेघालय (यू किआंग नांगबाह), सिक्कीम (तमू लोसार)  
३१ डिसेंबर: मिझोराम, मणिपूर (नवीन वर्ष पूर्वसंध्या)
त्यामुळे या राज्यांतील ग्राहकांनी आधीच बँकेची कामे उरकून घ्यावीत किंवा ऑनलाइन-एटीएम सेवांचा वापर करावा.





Source link

Herpes : शरीरावर आलेल्या पाणीदार जखमांकडे अजिबात करु नका दुर्लक्ष, असा करा बचाव

0
Herpes : शरीरावर आलेल्या पाणीदार जखमांकडे अजिबात करु नका दुर्लक्ष, असा करा बचाव



Genital Herpes Infection : जगभरात दर सेकंदाला किमान एका व्यक्तीला जननेंद्रियाच्या नागीण संसर्ग होतो, दरवर्षी ४२ दशलक्ष प्रकरणे होतात.



Source link

साताऱ्यात दोन्ही राजेचं मनोमिलन मात्र कार्यकर्ते काही केल्या तयार होईनात! फटका बसणार?

0



Satara Nagar Palika Election: सातारा नगरपालिका निवडणुकीत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि खासदार उदयनराजे भोसले यांनी मनोमिलन केलं आहे. मात्र, दोघांकडील इच्छुक कार्यकर्त्यांना उमदेवारी न मिळाल्याने नाराज कार्यकर्त्यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी देत दोन्ही राजेंच्याच उमेदवारांच्या विरोधात शड्डू ठोकून आव्हान दिलं आहे. त्यामुळे दोन्ही राजेंची डोकेदुखीत वाढ झाली आहे. आम्ही अनेक वर्ष दोन्ही राजेंचं काम केलं, यांच्यासोबत समाजकार्य करून देखील आम्हाला डावलले गेल्याचा आरोप या अपक्ष उमेदवारांनी केला.

अनेक ठिकाणी बंडखोरांनी आव्हान उभे केले

दोन्ही राजेंचे मनोमिलन झालं असले तरी खाली कार्यकर्त्यांचे मात्र मतमिलन झालेलं नाही, त्यामुळे बंडखोरी केलेल्या अपक्ष उमेदवारांचा फटका या दोन्ही राजेंना किती बसतो हे 3 डिसेंबरलाच कळणार आहे. भाजपने अनेकांना पक्षात घेऊन उमेदवाऱ्या दिल्या. ऐनवेळी पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांवर भाजपविरोधातील मंडळी आगपाखड करू लागले आहेत. अतिशय शेलक्या शब्दांमध्ये ते पक्षातून बाहेर पडलेल्यांवर तोंडसुख घेतानाही पाहायला मिळत आहेत. उदयनराजे भोसले व ना. शिवेंद्रराजे भोसले या दोन्ही राजेंची एकत्रित मोट बांधण्यात भाजपला यश आले असले तरी अनेक ठिकाणी बंडखोरांनी आव्हान उभे केले आहे. 

नऊ नगरपालिका व एका नगरपंचायतीच्या निवडणुकीचे घमासान

दरम्यान, जिल्ह्यात नऊ नगरपालिका व एका नगरपंचायतीच्या निवडणुकीचे घमासान सुरू आहे. सातारा, कराड, मलकापूर, वाई, फलटण, महाबळेश्वर, पाचगणी, म्हसवड, रहिमतपूर या नगरपालिका व मेढा नगरपंचायतीसाठी प्रचार शिगेला पोहोचला आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी महायुतीतच घमासान सुरु आहे. भाजपने स्वबळ आजमावण्याचा प्रयत्न केला असून घटक पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) यांनी भाजपविरोधात शड्डू ठोकला आहे. वाईत राष्ट्रवादी विरुध्द भाजप सामना रंगला आहे. मकरंद पाटील, जयकुमार गोरे यांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. गोरे यांच्या रसदीमुळे माजी आमदार मदन भोसले गटाला ताकद मिळाली आहे. फलटणमध्ये अजित पवार आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी रामराजे गटाला आव्हान दिलं आहे. रहिमतपुरात अजित पवार, मकरंद पाटील, नितीन पाटील यांनी सुनील माने यांचे हात बळकट केले आहेत. काँग्रेस, शिवसेना (शिंदे गट) यांना सोबत घेऊन त्यांनी भाजपचे  मनोज घोरपडे यांना आव्हानं दिलं आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा



Source link

फलटण नगरपालिकेत सुशासनाची नवी दिशा

0
फलटण नगरपालिकेत सुशासनाची नवी दिशा

फलटण प्रतिनिधी :- फलटण नगरपालिकेतील कामकाजात मोठा बदल घडवून आणण्याचा ठाम निर्धार भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला आहे. ‘ त्यांनी आपल्या कामकाजाच्या पद्धतीबाबत अनेक महत्त्वाचे मुद्दे स्पष्ट केले.

नाईक निंबाळकर म्हणाले की, लोकांनी त्यांना संधी दिल्यास “नगरपालिका ही नागरिकांचीच आहे” असे प्रत्येकाला वाटेल असे प्रशासन उभे करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. पिण्याच्या पाण्याची उपलब्धता अधिक कार्यक्षम आणि सर्वांसाठी सुलभ करण्यास ते प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पालिकेत बसवलेली लिफ्टची सोय कायमस्वरूपी सर्व नागरिकांसाठी खुली ठेवण्यात येईल, ही नागरिकांसाठी दिलासादायक घोषणा त्यांनी केली. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती आणि कामकाज यावर काटेकोर लक्ष ठेवण्यासाठी हालचाल नोंदवही (अटेंडन्स रजिस्टर) अनिवार्य करण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

सध्या जन्म आणि मृत्यू दाखल्यांसाठी नागरिकांना ताटकळत उभे राहावे लागते, ती गैरसोय दूर करून सोपे व पारदर्शक प्रशासन देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. कामाच्या ठिकाणी गैरहजर राहणाऱ्यांवर नियंत्रण ठेवून नागरिकांची कामे वेळेत पूर्ण होतील याची पूर्ण काळजी घेतली जाईल, असे ते म्हणाले.

त्यांच्या या भूमिकेमुळे फलटण शहरात सुशासनाबाबत नवीन आशा निर्माण झाली असून आगामी नगराध्यक्ष निवडणुकीला वेगळी दिशा मिळत आहे.

,

फलटण नगरपरिषद निवडणूक प्रचाराला उत्साहाचा जल्लोष; शिवसेना (शिंदे गट) व राजे गटाची दमदार फेरी

0
फलटण नगरपरिषद निवडणूक प्रचाराला उत्साहाचा जल्लोष; शिवसेना (शिंदे गट) व राजे गटाची दमदार फेरी

फलटण प्रतिनिधी :- फलटण नगरपरिषद निवडणुकीचा जल्लोषपूर्ण माहोल अधिक रंगतदार बनवत शिवसेना (एकनाथ शिंदे) व राजे गटाच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर तसेच नगरसेवक पदाचे उमेदवार विकास वसंतराव काकडे व स्मिता शहा यांच्या प्रचार मोहिमेला आज नवीन उर्जा मिळाली. म्युनिसिपल कामगार वसाहतीतील खोडीयार माँ मंदिर येथे श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यातआला.                                                                                                                                                                                 खोडीयार माँ मंदिरा पासून काढण्यात आलेल्या या भव्य प्रचार फेरीत कार्यकर्ते, महिला वर्ग आणि तरुणाईने उत्साहाने सहभाग नोंदवला. त्यानंतर क्रांतीज्योती सावित्रीबाईं फुले सभागृहात तथागत गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून उमेदवारांनी सामाजिक न्याय आणि विकासनिष्ठ भूमिकेची  घोषणा केली.

प्रचार फेरीदरम्यान नागरिकांनी मांडलेल्या स्थानिक समस्या, विकासकामांची गरज आणि सुविधा यावर उमेदवारांनी सकारात्मक संवाद साधत समाधानकारक तोडग्यांची ग्वाही दिली. उमेदवारांच्या सभोवती दिसणारा प्रचंड उत्साह आणि विविध समाजघटकांचा सहभाग पाहता निवडणुकीतील स्पर्धा अधिक चुरशीची होणार हे स्पष्ट झाले आहे.