Tuesday, June 30, 2026
Home Blog Page 66

महाराज आता तिकीट द्या नाहीतर दोरी द्या, इथंच…. उदयनराजे भोसलेंकडे समर्थकाची अजब मागणी

0


सातारा : राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. सातारा जिल्हा परिषद आणि अकरा तालुक्यातील पंचायत समितीची निवडणूक जाहीर झालेली आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या 65 जागांसाठी निवडणूक होणार आहे. मसूर जिल्हा परिषद गटाचं आरक्षण सर्वसाधारण प्रवर्ग असं आहे. या गटातून साताऱ्याचे लोकसभा खासदार उदयनराजे भोसले यांचे समर्थक कुलदीप क्षीरसागर तयारी करत आहेत. आज त्यांनी कुलदीप क्षीरसागर यांनी साताऱ्यात जलमंदिर येथे उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. कुलदीप क्षीरसागर यांनी उदयनराजे भोसले यांच्याकडे उमेदवारी द्या नाहीतर दोरी द्या फास घ्यायला अशी मिश्कील टिप्पणी केली आहे. 

साताऱ्यात सुद्धा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. यामध्ये प्रत्येक उमेदवार आपल्याला पक्षाचे तिकीट कसे मिळेल याकडे लक्ष लावून बसले आहेत.खासदार उदयनराजे भोसले यांचे समर्थक कुलदीप क्षीरसागर हे सुद्धा मसूर जिल्हापरिषद गटामधून जिल्हा परिषदेसाठी इच्छुक उमेदवार आहेत.या आधी सुद्धा झालेल्या निवडणुकांमध्ये त्यांनी उदयनराजे भोसले यांच्या प्रचाराची धुरा समर्थपणे सांभाळलेली आहे. या आधी पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातून कुलदीप शिरसागर हे विधानसभेसाठी उमेदवार म्हणून इच्छुक होते.परंतु उदयनराजे भोसले यांच्या शब्दाला मान देऊन त्यांनी उमेदवारी मागे घेतली होती.त्यामुळे कुलदीप शिरसागर यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपल्या उमेदवारीची मागणी उदयनराजे भोसले यांच्याकडे केली.

“आता उमेदवारी द्या नाहीतर दोरी द्या फास घ्यायला इथंच” अशी मिश्कील टिप्पणी  उदयनराजे भोसले यांच्यासोबत बोलत असताना कुलदीप क्षीरसागर यांनी केली. उदयनराजे भोसले यांना कुलदीप क्षीरसागर यांच्या वक्तव्यामुळं हसू आवरले नाही. 

साताऱ्यात सर्व पक्ष स्वतंत्र लढणार?

साताऱ्यात नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्रपणे लढले होते. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत महायुतीमधील पक्ष एकत्र लढणार की स्वतंत्र याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी “महायुतीत एकमत झाले तर ठीक आहे. *मात्र जर युती झाली नाही, तर प्रत्येक पक्ष स्वतंत्रपणे लढायला मोकळा आहे. प्रत्येक पक्षाची या जिल्ह्यात आपापल्या पद्धतीने ताकद आहे,” असे वक्तव्य केलं आहे.  

आज पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी बोलावलेल्या बैठकीस कोणी उपस्थित राहायचे, याचा निर्णय पक्षातील सर्वजण मिळून घेतील. मात्र बैठकीत काय निष्पन्न होईल, याचा अंदाज बांधता येणार नाही. एकमत न झाल्यास प्रत्येक पक्ष आपापल्या ताकदीवर निवडणूक लढवेल, अशी भूमिका मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी मांडली.

हेदेखील वाचा

आणखी वाचा



Source link

डॉक्टरांनी सांगितलं फ्रिजमध्ये कधीच ठेवू नका 5 पदार्थ, तिसरा पदार्थाबाबत 90% लोकांना माहितच नाही; आजच फेकून द्या

0
डॉक्टरांनी सांगितलं फ्रिजमध्ये कधीच ठेवू नका 5 पदार्थ, तिसरा पदार्थाबाबत 90% लोकांना माहितच नाही; आजच फेकून द्या


What food not to put in the fridge:  रेफ्रिजरेटर आपल्या स्वयंपाकघराचा एक अविभाज्य भाग बनला आहे, जो अन्न जास्त काळ ताजे ठेवण्यास मदत करतो. पण तुम्हाला माहिती आहे का की अशा काही वस्तू आहेत ज्या रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्यास आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात? अमेरिकेतील बोर्ड-प्रमाणित रक्ततज्ज्ञ आणि ऑन्कोलॉजिस्ट डॉ. रवी गुप्ता यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर या संदर्भात एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये त्यांनी अशा पाच वस्तूंवर प्रकाश टाकला आहे ज्या रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्यास त्यामध्ये बॅक्टेरिया किंवा विषारी पदार्थ राहू शकतात, ज्यामुळे अन्न विषबाधा किंवा हार्मोनल असंतुलन यासारख्या समस्या उद्भवू शकतात. चला त्यांच्याबद्दल जाणून घेऊया:

Add Zee News as a Preferred Source

पाच वस्तू रेफ्रिजरेटरमधून बाहेर फेकून द्या

उघडे दही
दह्यात नैसर्गिकरित्या प्रोबायोटिक बॅक्टेरिया असतात, जे पचनासाठी फायदेशीर असतात. तथापि, जेव्हा दही तीन दिवसांपेक्षा जास्त काळ उघडे आणि रेफ्रिजरेटरमध्ये ठेवले जाते तेव्हा हानिकारक बॅक्टेरिया वाढू लागतात. हे बॅक्टेरिया प्रोबायोटिक फायदे नष्ट करतात आणि संसर्गाचा धोका वाढवू शकतात. म्हणून, दही ताजे खाणे आणि ते जास्त काळ साठवणे टाळणे चांगले.

चिरलेला कांदा
चिरलेला कांदा आणि रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्याने सल्फर वायू बाहेर पडतो, जो इतर पदार्थांना दूषित करू शकतो. शिवाय, चिरलेला कांदा हा बॅक्टेरियांसाठी एक प्रजनन स्थळ आहे आणि त्यामुळे अन्नातून विषबाधा होऊ शकते. म्हणून, जर तुम्हाला कांदे चिरायचे असतील तर ते ताबडतोब वापरा आणि रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू नका.

प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये पाणी
बरेच लोक रेफ्रिजरेटरमध्ये प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये पाणी साठवतात, परंतु ही सवय समस्या निर्माण करू शकते. काही प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये बिस्फेनॉल ए (बीपीए) सोडले जाते, जे एक हानिकारक रसायन आहे जे अंतःस्रावी प्रणालीवर परिणाम करू शकते आणि विशेषतः मुले आणि गर्भवती महिलांसाठी धोकादायक आहे.

दोन दिवसांपेक्षा जुना तांदूळ
दोन दिवसांपेक्षा जास्त काळ रेफ्रिजरेटरमध्ये तांदूळ ठेवणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. त्यात बॅसिलस नावाचे बॅक्टेरिया असतात, जे गरम केल्यानंतरही पूर्णपणे मरत नाहीत आणि खाल्ल्यास उलट्या, जुलाब किंवा अन्न विषबाधा होऊ शकते.

पाच दिवसांपेक्षा जुनी चटणी
धणे असो किंवा चिंचेची चटणी, जर ती पाच दिवसांपेक्षा जास्त जुनी असेल तर त्यात बुरशी किंवा सूक्ष्म जीवाणू असू शकतात. यामुळे चटणी बाहेरून चांगली दिसत असली तरीही संसर्ग होऊ शकतो. म्हणून, जास्त काळ चटणी साठवण्याऐवजी, आवश्यकतेनुसार कमी प्रमाणात तयार करा.

डॉक्टर म्हणतात की अन्न सुरक्षित ठेवणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच ते कसे आणि किती काळ साठवायचे हे जाणून घेणे देखील महत्त्वाचे आहे. अयोग्यरित्या साठवलेले अन्न आपल्या आरोग्यासाठी गंभीर धोका निर्माण करू शकते.





Source link

एन. रघुरामन यांचा कॉलम: कमी शिकलेली आजी, आई पैशांच्या बाबतीत इतक्या हुशार कशा हाेत्या?

0
एन. रघुरामन यांचा कॉलम:  कमी शिकलेली आजी, आई पैशांच्या बाबतीत इतक्या हुशार कशा हाेत्या?




मला अजूनही आठवते की माझी आजी उडीद डाळीच्या डब्यात २५ पैशांची काही नाणी, तूरडाळीच्या डब्यात ८ पैशांची नाणी आणि तांदळाच्या डब्यात पाच, तीन, दोन आणि एक पैशांची छोटी नाणी कशी ठेवायची. ती अनेकदा तिच्या पदराच्या गाठीत एक रुपयाचे नाणे बांधायची. एसएसएलसी परीक्षेची दोन रुपयांची फी भरण्याचा शेवटचा दिवस असेल, तर ती तूरडाळीची डबी किंवा तिच्या पदराची गाठ उकलून काही नाणी काढायची. ती तिच्या मोठ्या मुलाला द्यायची, जेणेकरून तो चांगला अभ्यास करू शकेल, चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊ शकेल आणि कुटुंबाला मदत करू शकेल. कारण तेव्हा माझ्या आजोबांच्या पगारावर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता. तुम्ही 1940 ते 1980 च्या दशकात मर्यादित उत्पन्नाशी झुंजणाऱ्या घरात वाढला असाल तर तुम्हाला एक घटना आठवेल. अचानक येणाऱ्या तातडीच्या खर्चासाठी माझी पणजी, आजी किंवा आई अंतिम आधार ठरत असत. तुम्ही सहमत असाल की त्यापैकी बहुतेक जण कधीच शाळेत गेले नाहीत किंवा ते अर्धवेळ शाळेत गेले. माझी पणजी कधीच शाळेत गेली नाही. माझ्या आजीने पाचवीत शाळा सोडली. कारण तिचे लग्न 11 व्या वर्षी झाले होते. माझ्या आईनेही आठवीनंतर तिच्या भावाची फी भरण्यासाठी शाळा सोडली. त्या सर्वांमध्ये एक गोष्ट समान होती. ती म्हणजे त्या वेळी त्यांच्याकडे असलेले पैसे व्यवस्थापित करण्यात ते सर्वजण खूप हुशार होते. हे कसे घडले, याचे उत्तर संशोधनातून मिळते. कॅनडातील कार्लटन विद्यापीठातील अकाउंटिंग प्रोफेसर ओरियान कोशक्स यांनी त्यांचे संपूर्ण करिअर मोठ्या संस्था आर्थिक हिशेब कसे ठेवतात हे समजून घेण्यात घालवले. पण सहा वर्षांपूर्वी त्या स्वत: आई झाल्या तेव्हा त्यांच्यात काहीतरी बदल झाला. त्यांनी घरगुती हिशेबावर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली. गेल्या महिन्यात त्यांनी “क्रिटिकल परस्पेक्टिव्ह्ज ऑफ अकाउंटिंग” हा एक शोधनिबंध प्रकाशित केला. त्यात मातृत्वामुळे पैशाबद्दल महिलांचे विचार मूलभूतपणे कसे बदलतात यावर लिहिले होते. मूल झाल्यानंतर तिला ते नेहमीच कुशीत ठेवावे लागत असे. म्हणूनच त्यांनी नवनवीन बेबी कॅरिअर खरेदी करण्यास सुरुवात केली. कारण त्यांना जुन्या कॅरिअर्समध्ये त्यांच्या बाळासह स्वयंपाकघरातील काम अस्वस्थ वाटत होते. तिसरा वाहक खरेदी करताना त्यांना जाणवले की हा खर्च बाळासाठी नाही तर स्वतःच्या सोयीसाठी आहे. तेव्हाच त्यांना वाटले, “ही कल्पना कशी सुचली?” यामुळे त्यांना संशोधन करण्यास प्रवृत्त केले आणि त्यांनी सहा वर्षांच्या काळात अनेक मातांच्या मुलाखती घेतल्या. संशोधनानुसार बहुतेक लोकांना माहीत आहे की आई झाल्यानंतर बाळाची काळजी घेण्याची जबाबदारी प्रामुख्याने महिलेवर येते. म्हणून त्यांचे उत्पन्न कमी होते आणि करिअरची प्रगती मंदावते. ही धारणा महिलांमध्ये अशी भावना निर्माण करते की त्यांना उत्पन्नातील तफावत भरून काढण्यासाठी मार्ग शोधण्याची गरज भासू लागते. मातृत्वामुळे दररोजचे आर्थिक विचार आणि वर्तन बदलते. लक्षात ठेवा की महिला त्यांच्या जोडीदाराशी वाटाघाटी करण्यात अधिक चांगल्या का असतात? कारण त्या दररोज खरेदीची जबाबदारी घेतात आणि उत्पन्न-खर्चातील तफावत भरून काढण्यासाठी उपलब्ध पैशाने अधिक खरेदी करतात. “चांगली आई’ होण्याच्या सामाजिक अपेक्षा त्यांच्या आर्थिक वर्तनालाही आकार देतात. ही मानसिकता आई झाल्यानंतर पैशांबाबत त्यांच्या वर्तनालादेखील आकार देते. यामुळे असा विश्वास निर्माण होतो की चांगली आई होण्यासाठी आर्थिक त्याग आवश्यक आहे आणि पैसा मुलांसाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी समर्पित संसाधन आहे. वैज्ञानिकदृष्ट्या याला “सघन मातृत्व” म्हणतात. यात एका चांगल्या आईचे काम मुलांना आनंदी आणि निरोगी ठेवण्यापासून ते त्यांच्या पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचण्यास मदत करण्यापर्यंत आहे. याची खात्री करण्यासाठी त्या शक्य ते सर्व करतात. समाज अजूनही जबाबदारी वडिलांची नाही तर आईची मानतो.
फंडा असा की – स्वयंपाकघरातील डब्यांत पैसे लपवून ठेवणे स्वार्थ नाही, उलट यातून कुटुंबाच्या सुरक्षिततेची भावना वाढते. कोणत्या बँकेत (कंटेनर) किती पैसे आहेत आणि ते कुठे खर्च करायचे हे लक्षात ठेवणे ही एक गुणवत्ता आहे. देवाने केवळ आयांनाच ती बहाल केली आहे.



Source link

आकड्यांपलीकडचा अर्थ: AIMIM विरुद्ध वंचित – दोन राजकीय वाटा

0
आकड्यांपलीकडचा अर्थ: AIMIM विरुद्ध वंचित – दोन राजकीय वाटा

साहस Times :-   महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालांनी एक गोष्ट निर्विवादपणे स्पष्ट केली आहे की राजकारण फक्त भावना किंवा घोषणांवर चालत नाही; ते गणित, समाजरचना आणि सत्तावाटपाच्या वास्तवावर चालतं. AIMIM आणि वंचित बहुजन आघाडीच्या संदर्भात हे वास्तव अधिक ठळकपणे पुढे आलं आहे.
AIMIM च्या यशामागे त्यांचं विशिष्ट तुष्टीकरणाचं राजकारण आणि त्याची सातत्यपूर्ण मांडणी आहे. AIMIM ला तब्बल ९५ जागा मिळाल्या, हा आकडा केवळ निवडणूक यशाचा नाही, तर एका ठराविक राजकीय पद्धतीचा निदर्शक आहे. मुस्लिम समाजाचं सातत्याने, आक्रमकपणे आणि केंद्रित पद्धतीने प्रतिनिधित्व केलं, तर त्या राजकारणाला संख्यात्मक वाढ मिळते, हे या निकालांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे.
AIMIM ने आपला मतदार वर्ग स्पष्ट ठेवला आहे. त्यांचं राजकारण एकरेषीय आहे आणि त्यामुळेच त्यांना निवडणुकीत आकड्यांच्या पातळीवर यश मिळालं. मात्र याच ठिकाणी एक मूलभूत प्रश्न उपस्थित होतो. हे राजकारण समावेशक आहे की संकीर्ण? कारण बहुजन राजकारण जर केवळ एका घटकाभोवती फिरू लागलं, तर दीर्घकालीन सामाजिक परिवर्तनाऐवजी तात्कालिक सत्तालाभालाच प्राधान्य दिलं जातं. AIMIM चं यश आकड्यांमध्ये मोठं असलं, तरी त्याची मर्यादा ही त्याची सामाजिक चौकट आहे, हे दुर्लक्ष करता येत नाही.
दुसरीकडे, या निवडणुकांनी वंचित बहुजन आघाडीबाबत एक महत्त्वाचा राजकीय धडा दिला आहे. वंचितला सत्तेत वाटा मिळाला आहे आणि हे केवळ प्रतीकात्मक यश नसून व्यवहार्य राजकीय उपलब्धी आहे. विशेषतः २३ नवनिर्वाचित नगरसेवक ही संख्या वंचितसाठी दुर्लक्ष करण्यासारखी नाही. या सर्व नवनिर्वाचित प्रतिनिधींचं मनःपूर्वक अभिनंदन करायलाच हवं.
या निकालांनी वंचितच्या पाठीराख्यांनाही एक वास्तव स्पष्टपणे दाखवून दिलं आहे की “एकला चलो रे” करून प्रत्येक वेळी फायदा होत नाही. राजकीय व्यवस्थेत युती–आघाडीशिवाय पर्याय नाही, हे उदाहरणासह समोर आलं आहे. याचा अर्थ वैचारिक माघार नाही, तर रणनीतिक शहाणपण आहे. स्वतंत्र विचार आणि स्वतंत्र ओळख कायम ठेवत, सत्तेत सहभागी होण्याचे मार्ग शोधणं हा राजकारणाचा पुढचा टप्पा आहे.
सत्ता बाहेर उभं राहून केवळ नैतिक श्रेष्ठत्व मिरवणं आणि सत्ता आत जाऊन धोरणांवर प्रभाव टाकणं या दोन्ही गोष्टींमध्ये मूलभूत फरक आहे. वंचितने या निवडणुकांतून दुसऱ्या मार्गाची चाचपणी सुरू केली आहे, हे नाकारता येणार नाही.
तिसरा आणि तितकाच महत्त्वाचा मुद्दा म्हणजे संघर्ष आणि सत्तेचा समतोल. वंचित बहुजन आघाडीचा मूळ संघर्ष आजही कायम आहे. दलित, आदिवासी, ओबीसी, भटके-विमुक्त, कामगार आणि शेतकरी यांची स्वतंत्र राजकीय ताकद उभी करणं. मात्र आता या संघर्षाला सत्तेचा प्रत्यक्ष स्पर्श मिळायला हवा, हे या निकालांनी अधोरेखित केलं आहे.
AIMIM चं यश सांगतं की ओळखाधारित राजकारणाला आजही बाजार आहे. वंचितचं यश सांगतं की बहुजन राजकारणाला टिकायचं असेल, तर रणनीती बदलावी लागते. शेवटी, आकड्यांपेक्षा दिशा महत्त्वाची असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे. आज कोणाला किती जागा मिळाल्या, यापेक्षा उद्याची दिशा कोण ठरवणार आहे, हे अधिक निर्णायक ठरणार आहे. AIMIM चं राजकारण वाढेल, हे स्पष्ट आहे. पण बहुजन समाजाला दीर्घकालीन न्याय, प्रतिनिधित्व आणि सत्ता हवी असेल, तर वंचितसारख्या व्यापक राजकीय मंचाला संघर्ष आणि सत्तावाटप यांचा समतोल साधावा लागेल.

संघर्ष चालू ठेवत, सत्ता हातात घेण्याची तयारी ठेवणं हीच पुढील काळातील बहुजन राजकारणाची खरी कसोटी आहे.

श्री. सोमीनाथ पोपट घोरपडे, सामाजिक कार्यकर्ते
मोबाईल नं. 9284658690

एन. रघुरामन यांचा कॉलम: तुम्ही पैशांच्या बाबतीत पुरेसे हुशार आहात का?

0
एन. रघुरामन यांचा कॉलम:  तुम्ही पैशांच्या बाबतीत पुरेसे हुशार आहात का?




बाजारपेठेत शेअर्सच्या किमतीत चढ-उतार होण्याची अनेक कारणे असतात. परंतु एक हुशार गुंतवणूकदार नेहमीच आपले डोळे, कान आणि नाक उघडे ठेवतो. तो जागतिक परिस्थिती आणि सरकारी धोरणांवर बारकाईने लक्ष ठेवतो. कारण आजकाल शेअर बाजाराची वाढ या घटकांवर अवलंबून असते. या जानेवारीत घर खरेदी करणारे किमान तीन लोक मला माहिती आहेत. गेल्या काही वर्षांत मी जानेवारीत लोकांना कार खरेदी करताना पाहिले. कारण डीलर्स जुन्या कारवर मोठी सूट देतात. पण जानेवारीमध्ये घर खरेदी करणे माझ्यासाठी नवीन होते. अलीकडेच एका वेबसाइटने २०१५ ते २०२४ दरम्यानच्या बाजार परिस्थितीचे विश्लेषण केले आणि उघड केले की जानेवारी हा घर खरेदी करण्यासाठी सर्वात स्वस्त महिना आहे. वर्षातील इतर ११ महिन्यांच्या तुलनेत या महिन्यात सर्वाधिक बचत होते. तुम्ही जानेवारीत खरेदी करू शकत नसाल तर फेब्रुवारी हाही चांगला पर्याय आहे. कारण १० वर्षांत हा दुसरा सर्वात स्वस्त महिना आहे. तुम्हाला जाणून घ्यायचे असेल की घरे सर्वात महाग कधी असतात तर तो महिना मे आहे. अशा प्रकारे हुशार गुंतवणूकदार वेळ आणि परिस्थितीनुसार त्यांच्या रणनीती ठरवतो. इराणमध्ये सुरू असलेल्या निदर्शनांत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी “मदत येत आहे” असा संदेश पाठवताच गुंतवणूकदारांना हा संक्षिप्त संदेश जाणवला. अमेरिका लवकरच इराणवर हल्ला करू शकते असे सूचित होते. युद्धाच्या भीतीमुळे संरक्षण कंपन्यांच्या शेअर्सच्या किमती वाढल्या. दुसरीकडे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी २० जानेवारी २०२६ पासून क्रेडिट कार्ड व्याजदर १०% पेक्षा जास्त नसावेत असा प्रस्ताव मांडला तेव्हा बँकांचे शेअर्स कोसळले. कारण या नियमामुळे बँकांच्या दीर्घकालीन व्यवसाय पद्धतींवर परिणाम होईल. गेल्या वर्षी बहुतेक काळ जागतिक बाजारपेठेत तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील शेअर्सनी चांगली कामगिरी केली. कारण प्रत्येक जण कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) बद्दल उत्सुक होता.परंतु वर्षाच्या अखेरीस गुंतवणूकदार सावधगिरी बाळगू लागले आणि इतरत्र संधी शोधू लागले. खरेच सरकारी धोरणे आता गुंतवणूकदारांचे पैसे कुठे गुंतवायचे हे ठरवत आहेत.
थोडक्यात, गुंतवणूक हा केवळ आकड्यांचा खेळ नाही तर योग्य वेळी अचूक निर्णय घेण्याची कला आहे. बदललेला वारा ओळखतात आणि त्यांच्याशी जुळवून घेतात तेच खरे विजेते असतात. म्हणूनच गर्दीच्या मागे जाण्याऐवजी तुमच्या अंतःप्रेरणेवर विश्वास ठेवा आणि तुमचा आर्थिक प्रवास नवीन उंचीवर नेण्यासाठी शहाणपणाने वागा.



Source link

मधुमेहाच्या रुग्णांसाठी सूर्यप्रकाश आहे संजीवनी, फायदे ऐकून थक्क व्हाल!

0
मधुमेहाच्या रुग्णांसाठी सूर्यप्रकाश आहे संजीवनी, फायदे ऐकून थक्क व्हाल!


Sun Light For Diabetic Persons Health: आजकाल सर्वजण आरोग्याच्या बाबतीत जागरुक झाले आहेत. आरोग्याची योग्यरित्या काळजी घेत असतात. पण बदलती जीवनशैली आणि धावपळीमुळे खाण्या-पिण्याच्या वेळांकडे आणि पद्धतीकडे दुर्लक्ष होते. यामुळे कितीही काळजी घेतली तरी आरोग्याच्या कोणत्या न कोणत्या समस्या उद्भवत असतात. चुकीच्या आहारामुळे मुख्यतः मधुमेह होण्याची शक्यता अधिक असते. मधुमेह झाला की, आयुष्यभर औषधे घ्यावी लागतात, पथ्ये पाळावी लागतात. पण तुम्हाला माहित आहे का की, मधुमेहाच्या रुग्णांसाठी दिवसाचा प्रकाश किती फायदेशीर आहे? त्यांच्यासाठी दिवसाचा आजार संजीवनी प्रमाणे कार्य करतो. 

Add Zee News as a Preferred Source

 

टाइप-2 मधुमेहाचा धोका टाळता येतो

दिवसाच्या नैसर्गिक प्रकाशाचे मधुमेहाच्या रुग्णांना अनेक फायदे होतात. प्रकाशात मुख्यतः व्हिटॅमिन डी मोठ्या प्रमाणात असतो. ज्यामुळे शरीराच्या पूर्ण आरोग्य तर सुरळीत राहतेच, रक्तातील साखरेचे प्रमाण देखील नियंत्रणात राहते. शरीरात व्हिटॅमिन डीचे प्रमाण कमी झाल्यास स्वादुपिंडाला शरीरात इन्सुलिन निर्माण करण्यास अडथळे निर्माण होऊ शकतात. ज्यामुळे टाइप-2 मधुमेहाचा धोका वाढू शकतो. सूर्यप्रकाश घेतल्याने शरीरातील इन्सुलिन संवेदनशीलता वाढण्यास मदत होते. ज्यामुळे शरीराच्या कार्यात रक्तातील साखरेचा वापर अधिक चांगल्या प्रकारे होतो आणि साखर नियंत्रणात राहते. म्हणूनच दररोज कमीत कमी 10 ते 15 मिनिटे कोवळ्या उन्हात बसणे किंवा चालणे फायदेशीर ठरते. 

 

इन्सुलिन निर्माण होण्यास मदत होते

नैसर्गिक सूर्यप्रकाशामुळे शरीरातील ‘मेलाटोनिन’ आणि ‘सेरोटोनिन’ या हार्मोनचे संतुलन राहते. यामुळे शारीरिक आणि मानसिक ताण कमी होतो. ज्यामुळे शरीरातील ऊर्जा टिकून राहते. तसेच पचनसंस्था सुधारल्यामुळे वजन नियंत्रणात ठेवणे सोपे होते. वजन नियंत्रणात राहिल्यास मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासही मदत होते. कारण, वजन जास्त असल्यास अतिरिक्त चरबीमुळे शरीरात इन्सुलिन तयार करण्यास अडथळे येतात. ज्यामुळे रक्तातील साखर अचानक वाढण्याची शक्यता असते. 

 

रोगप्रतिकारशक्ती वाढते

योग्य प्रमाणात सूर्यप्रकाश घेतल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. मधुमेहाच्या रुग्णांमध्ये जखमा भरून येण्यास वेळ लागतो. किंवा कोणताही संसर्ग लवकर होतो. आजार बरा होण्यासही वेळ लागतो. म्हणूनच मधुमेहाच्या रुग्णांना सूर्यप्रकाशाची अत्याधिक आवश्यकता असते. पण फक्त मधुमेहाच्या रुग्णांनीच नाही तर समान्य व्यक्तींनीही आवर्जून सकाळी किंवा दुपारी सूर्यप्रकाश घ्यायला हवा. मुख्यतः लहान मुलांनी सूर्यप्रकाश घेणे अधिक महत्त्वाचे आहे. वाढत्या वयात शरीराच्या विकासासाठी अधिक फायदेशीर ठरते. 

 

(Disclaimer: वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)





Source link

नुकत्याच पार पडलेल्या फलटण नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत नव्याने निवडून आलेल्या अध्यक्ष व नगरसेवकांची पहिली सर्वसाधारण

0
नुकत्याच पार पडलेल्या फलटण नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत नव्याने निवडून आलेल्या अध्यक्ष व नगरसेवकांची पहिली सर्वसाधारण

फलटण : नुकत्याच पार पडलेल्या फलटण नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत नव्याने निवडून आलेल्या अध्यक्ष व नगरसेवकांची पहिली सर्वसाधारण सभा गुरुवार (दि. 22) दुपारी 11 वाजता नगरपरिषदेच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.या सभेत उपनगराध्यक्षपदाची निवड, तसेच नामनिर्देशित सदस्य (स्वीकृत नगरसेवक) नियुक्तीची व विविध विषय समितीच्या सभापती व सदस्य निवडीची प्रक्रिया पार पडणार आहे. सभेचे पीठासीन अधिकारी म्हणून नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर हे कामकाज पाहणार आहेत.
उपनगराध्यक्ष पदासाठी इच्छुक उमेदवारांनी गुरुवारी सकाळी 11 ते दुपारी 12 या वेळेत मुख्याधिकारी यांच्याकडे नामनिर्देशन अर्ज सादर करायचे आहेत. दुपारी 12 वा.अर्जाची छाननी होणार आहे.गरज भासल्यास तत्काळ मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
नगरपरिषदेमधील पक्ष किंवा गटांच्या संख्याबळानुसार कमाल 3 स्वीकृत नगरसेवक नियुक्त केले जाणार आहेत.यासाठी संबंधित पक्ष,गट व आघाडी प्रमुखांनी मा.जिल्हाधिकारी सातारा यांच्याकडे बुधवार (दि. 21 ) दुपारी 11 ते 2 वा.पर्यंत अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. त्याच दिवशी अर्जाची अधिकृत छाननी होणार आहे. तसेच दिनांक 22 रोजी फलटण नगरपरिषदेमध्ये पिठासीन  अधिकारी यांच्याकडे सदर अर्ज दुपारी 2 वाजेपर्यंत दाखल करायचे आहेत.

उपनगराध्यक्ष पदासाठी नवनियुक्त नगरसेवकांमध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे.फलटण नगर परिषदेमध्ये नवनिर्वाचित सदस्य भाजप -12 सदस्य, राष्ट्रवादी (अजित पवार गट) 4 सदस्य , शिवसेना (शिंदे गट) 7 सदस्य , राष्ट्रीय काँग्रेस -1 सदस्य, कृष्णा भीमा आघाडी – 1 व अपक्ष – 2 अशी एकूण सदस्य संख्या आहे. उपनगराध्यक्ष कोण होणार, याबाबत शहरात प्रचंड उत्सुकता वाढली आहे.


स्वीकृत नगरसेवकांवर चर्चा


स्वीकृत नगरसेवक पदासाठी अनेक इच्छुक मैदानात उतरल्याने निवडणुकीत थांबलेले व पक्षश्रेष्ठींनी शब्द दिलेले कार्यकर्ते यांची पंचाईत होण्याची शक्यता आहे.पहिली सर्वसाधारण सभा फलटणच्या राजकारणाची पुढील दिशा ठरवणारी असून, उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक कोण होणार याकडे शहराचे लक्ष लागले आहे. दरम्यान सत्ताधारी भाजप आघाडीला दोन तर शिवसेना (शिंदे गट) आघाडीला एक स्वीकृत सदस्य नेमता येणार आहेत

अकलूज : मुस्लिम बांधवांकडून नवनिर्वाचित नगरसेवकांचा हृदयस्पर्शी सत्कार

0
अकलूज : मुस्लिम बांधवांकडून नवनिर्वाचित नगरसेवकांचा हृदयस्पर्शी सत्कार

अकलूज : दि. १६ जानेवारी २०२६ रोजी बागवान गल्ली, आझाद चौक, अकलूज येथे मुस्लिम बांधवांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सत्कार समारंभात नवनिर्वाचित नगरसेवक व नगरसेविकांचा अत्यंत उत्साहात आणि आपुलकीच्या वातावरणात सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात अकलूज नगरपरिषदेचे गटनेते तथा उपनगराध्यक्ष आदरणीय श्री. शिवतेजसिंह (बाबा) मोहिते-पाटील, नगरसेवक आदरणीय श्री. सयाजीराजे मोहिते-पाटील यांच्यासह सर्व प्रभागांतील नगरसेवक व नगरसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अकलूज शहर बागवान समाज, भैया माढेकर मित्र परिवार तसेच बागवान गल्लीतील सर्व मित्र मंडळांनी एकत्र येऊन हा सत्कार समारंभ यशस्वीपणे पार पाडला. मुस्लिम समाजातील बांधवांनी व्यक्त केलेले प्रेम, आपुलकी आणि विश्वास नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींसाठी प्रेरणादायी असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
विकासाच्या प्रक्रियेत समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन पुढे जाणे, हे मोहिते-पाटील परिवाराचे संस्कार असून बागवान गल्ली व परिसरातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी तसेच या भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे यावेळी सांगण्यात आले. हा सत्कार समारंभ सामाजिक सलोखा आणि एकतेचे उत्तम उदाहरण ठरला.

मुधोजी महाविद्यालयात ‘श्रीमंत शिवाजी राजे करंडक’ राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचा दिमाखदार उद्घाटन सोहळा

0
मुधोजी महाविद्यालयात ‘श्रीमंत शिवाजी राजे करंडक’ राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचा दिमाखदार उद्घाटन सोहळा


फलटण प्रतिनिधी :- दि. १६ जानेवारी २०२६ — मुधोजी महाविद्यालयात आज श्रीमंत शिवाजी राजे करंडक २०२५–२६ राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे भव्य उद्घाटन उत्साहात पार पडले. या उद्घाटन सोहळ्याचे उद्घाटक म्हणून संस्थेचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर उपस्थित होते, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एच. कदम होते.
या प्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य सौ. भोसले वाय. एस., आय.क्यू.ए.सी. विभागप्रमुख डॉ. टी. पी. शिंदे, राज्य स्पर्धा समितीचे चेअरमन प्रा. वेळेकर, समितीचे सर्व सदस्य, स्पर्धेचे प्रायोजक श्री. विराज नाईक निंबाळकर यांच्या वतीने उपस्थित प्रा. डॉ. सविता नाईक निंबाळकर, परीक्षक, वरिष्ठ, कनिष्ठ व आय.टी. विभागातील प्राध्यापक, महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयांतून आलेले स्पर्धक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात श्रीमंत मालोजीराजे व श्रीमंत शिवाजी राजे यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. प्रास्ताविकात स्पर्धा समितीचे चेअरमन प्रा. वेळेकर यांनी स्पर्धेचा उद्देश स्पष्ट केला. त्यानंतर प्रमुख मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
उद्घाटक श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या भाषणात श्रीमंत मालोजीराजे व श्रीमंत शिवाजी राजे यांच्या कार्याचा आढावा घेत मुधोजी महाविद्यालयाने वक्तृत्वाची समृद्ध परंपरा जपल्याचे गौरवोद्गार काढले. महाराष्ट्राच्या विविध भागांतून स्पर्धक आवर्जून सहभागी होत असल्याने ही परंपरा पुढे नेण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. पी. एच. कदम यांनी स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याचा आढावा घेत सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. मुधोजी महाविद्यालय व फलटण एज्युकेशन सोसायटीने महाराष्ट्राला अनेक नामवंत वक्ते दिल्याचे नमूद करून, प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या वक्तृत्वातून महाविद्यालयाची ओळख निर्माण झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा ही विद्यार्थ्यांसाठी पर्वणी असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. संग्राम निंबाळकर यांनी आभार मानले, तर सूत्रसंचालन प्रा. सौ. देशमुख एन. डी. यांनी केले. अशा प्रकारे राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचा उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला.

आपली शाळा बालवर्गाचे वार्षिक स्नेहसंमेलन हर्षोल्हासात संपन्न

0
आपली शाळा बालवर्गाचे वार्षिक स्नेहसंमेलन हर्षोल्हासात संपन्न

आपली शाळा बालवर्गाचे वार्षिक स्नेहसंमेलन हर्षोल्हासात संपन्न

फलटण :प्रगत शिक्षण संस्थेच्या मंगळवार पेठ फलटण येथील ‘आपली शाळा, येथील बालवर्गाचं वार्षिक स्नेहसंमेलन अत्यंत हर्षोल्हासात, आनंदी व उत्साही वातावरणात संपन्न झाले. सन २०२५–२०२६ या शैक्षणिक वर्षातील या स्नेहसंमेलनात शिशुगट, मधला गट व मोठा गटातील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत, नृत्ये, गाणी, नाट्यछटा व विविध सादरीकरणांतून आपल्या कलागुणांचे मनमोहक दर्शन घडवले.

बालआनंदाचा रंगतदार उत्सव
कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने झाली. त्यानंतर “फ्लावर्स डान्स”, “दादाजी की छडी”, “इवले इवले सुख चिमुकले”, “Wheels on the Bus”, “I Am So Happy”, “बम बम बोले” यांसारख्या सादरीकरणांनी उपस्थितांची मने जिंकली. संपूर्ण कार्यक्रम बालकांच्या निरागस हसण्यात, टाळ्यांच्या कडकडाटात आणि उत्स्फूर्त आनंदात रंगून गेला.
मान्यवरांची प्रमुख उपस्थिती
या स्नेहसंमेलनासाठी प्रगत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष झिया कुरेशी, संस्थेचे विश्वस्त तथा सचिव व शिक्षण समन्वयक मधुरा राजवंशी, कार्यकारी अधिकारी प्रकाश अनभुले, कमला निंबकर बालभवन (प्राथमिक विभाग) यांच्या मुख्याध्यापिका प्रियदर्शनी सावंत, बालवाडीच्या मुख्याध्यापिका समीरा कुरेशी, संस्थेचे जनसंपर्क अधिकारी सोमीनाथ घोरपडे तसेच मानद सल्लागार व शिक्षक विश्वास जगदाळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
शिक्षकांचे नियोजन, विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी
विद्यार्थ्यांच्या वार्षिक स्नेहसंमेलनासाठीची संपूर्ण तयारी बालवाडी विभागाच्या मुख्याध्यापिका समीरा कुरेशी यांच्या मार्गदर्शनाखाली बालशिक्षिका व साधन व्यक्ती निलोफर शेख, देवकी जगताप, पल्लवी गाडेकर, योगिता काकडे, सुजाता शिंदे यांनी अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने केली. शिशुगट, मधला गट व मोठा गटातील विद्यार्थ्यांचा वयोगट लक्षात घेऊन अभिनय, गीते, नृत्य व नाट्य यांची सुयोग्य निवड करण्यात आली होती.
“गगला गगली” नाटिकेला भरभरून दाद
विशेषतः “गगला गगली” या नाटिकेने कार्यक्रमात विशेष रंगत आणली. या नाटिकेला उपस्थित मान्यवर, पालक व प्रेक्षकांकडून भरभरून दाद मिळाली. विद्यार्थ्यांनी अत्यंत आत्मविश्वासाने सादर केलेल्या नृत्य-नाट्य व अभिनयामुळे प्रेक्षकांची मने जिंकली. पालकांनीही मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दर्शवून विद्यार्थ्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सहकार्यामुळे कार्यक्रम यशस्वी
यावेळी कमला निंबकर बालभवन येथील बालवाडी प्रमुख व बालशिक्षिका मनीषा जाधव, निशिगंधा झेंडे, अमृता धडंबे, अश्विनी यादव, स्वाती कदम, विना बेंद्रे, नंदिनी लोखंडे, आसमा मणेर, आरती काकडे यांनी उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.
स्मरणात राहणारा आनंदोत्सव एकूणच, बालकांच्या निरागस आनंदाने, सर्जनशीलतेने व कलागुणांनी नटलेले हे वार्षिक स्नेहसंमेलन उपस्थितांच्या मनात दीर्घकाळ स्मरणात राहणारा खरा आनंदोत्सव ठरला.