Monday, August 3, 2026
Home Blog Page 575

Mumbai Fire : मालाडमध्ये अग्नीतांडव; खडकपाडा फर्निचर मार्केटला भीषण आग, ५ गोदामं जळून खाक! VIDEO

0
Mumbai Fire : मालाडमध्ये अग्नीतांडव; खडकपाडा फर्निचर मार्केटला भीषण आग, ५ गोदामं जळून खाक! VIDEO


Mumbai Fire news : मुंबई पश्चिम उपनगर असलेल्या मालाड परिसरात भीषण आगीची घटना समोर आली आहे. मालाड-दिंडोशी दरम्यान खडकपाडा परिसरातील फर्निचरच्या गोदामांना आग लागली आहे. सुरुवातीला एका फर्निचरच्या गोदामाला लागलेली आग अन्य गोदामांत पसरली. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसले तरी अनेक गोदामं आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत. संपूर्ण आकाशात आग व काळ्या धुराचा प्रचंड लोळ उठल्याचे दिसत आहे. धूर दूर अंतरावरून दिसत असल्याने आगीची तीव्रता लक्षात येते.



Source link

Western Railway: पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक; पण सकाळी कामाधंद्याला जाणाऱ्या लोकांचे होतायेत हाल!

0
Western Railway: पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक; पण सकाळी कामाधंद्याला जाणाऱ्या लोकांचे होतायेत हाल!


Mumbai Local News: पश्चिम रेल्वेने माहीम आणि वांद्रे मार्गावरील स्थानकांदरम्यान पुलाच्या पुनर्बांधणीसाठी काल रात्रीपासून तीन दिवसांचा रात्रकालीन जम्बो मेगाब्लॉक जाहीर केला आहे. हा मेगाब्लॉक रात्री ११ ते सकाळी ८.३० वाजेपर्यंत असेल, अशी माहिती पश्चिम रेल्वेने आधीच दिली आहे. मात्र, या रात्रकालीन ब्लॉकमुळे सकाळी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत, ज्याचा व्हिडिओ पीटीआय वृत्त संस्थेने ट्वीट केला आहे.



Source link

निर्मात्याने ऑस्कर नॉमिनेशनवर उपस्थित केला प्रश्न, प्रियांकाच्या ‘अनुजा’वर साधला निशाणा?

0
निर्मात्याने ऑस्कर नॉमिनेशनवर उपस्थित केला प्रश्न, प्रियांकाच्या ‘अनुजा’वर साधला निशाणा?


अनुजा या चित्रपटाला ऑस्कर २०२५ साठी सर्वोत्कृष्ट लाइव्ह अॅक्शन शॉर्ट फिल्मच्या यादीत नामांकन मिळाले आहे. चित्रपटाच्या नॉमिनेशननंतर सोशल मीडियावर प्रियांका चोप्रा जोनास आणि गुनीत मोंगा यांची चर्चा आहे. प्रियांका आणि गुनीत या चित्रपटाच्या निर्मात्यांपैकी एक आहेत. दरम्यान, टीव्ही निर्माती विनता नंदा यांनी ऑस्करमध्ये चित्रपटांच्या नामांकन प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.



Source link

Amul Milk Price: अमूल दूध झाले स्वस्त! जाणून घ्या अमूल गोल्ड, अमूल ताजा आणि अमूल टी स्पेशलचे नवे दर

0
Amul Milk Price: अमूल दूध झाले स्वस्त! जाणून घ्या अमूल गोल्ड, अमूल ताजा आणि अमूल टी स्पेशलचे नवे दर


Amul Milk New Rates: गेल्या काही काळापासून दुधाच्या दरात सातत्याने वाढ होत होती. मात्र, आज ग्राहकांना दिलासा देणारी माहिती समोर येत आहे. अमूलने दुधाच्या दरात कपात केली आहे. अमूलने त्यांचे तिन्ही उत्पादन अमूल गोल्ड, अमूल ताजा आणि टी स्पेशलच्या किंमतीत प्रत्येकी १-१ रुपयांची कपात केली आहे.



Source link

Pune Accident: वाढदिवसाची पार्टी करून परत येताना भरधाव कारची बसला धडक, दोघांचा मृत्यू, ४ जण जखमी

0
Pune Accident: वाढदिवसाची पार्टी करून परत येताना भरधाव कारची बसला धडक, दोघांचा मृत्यू, ४ जण जखमी



Pune Car-Bus Collision: पुण्यात बाह्यवळण महामार्गावर वडगाव ब्रिजजवळ भरधाव कारने बसला धडक दिली. या धडकेत दोघांचा मृत्यू झाला. तर, सहा जण जखमी झाले आहेत.



Source link

भारताला मोठं यश! 26/11 हल्ल्यातील दोषी तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा

0
भारताला मोठं यश! 26/11 हल्ल्यातील दोषी तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा



Tahawwur Rana’s extradition: मुंबई हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा. राणाच्या भारताकडे प्रत्यार्पणाला अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाची मंजुरी



Source link

प्रजासत्ताक दिनी संविधान उद्देशिकेचे वाचन व आंबेडकर प्रतिमा लावण्याची मागणी; अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा

0
प्रजासत्ताक दिनी संविधान उद्देशिकेचे वाचन व आंबेडकर प्रतिमा लावण्याची मागणी; अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा

सातारा: प्रजासत्ताक दिनी राष्ट्रध्वजारोहण करताना भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा लावून संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करावे, अन्यथा आमरण उपोषण छेडले जाईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते हरिष उर्फ आप्पा काकडे यांनी सहकाऱ्यांसह जिल्हाधिकारी सातारा यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.

हरिष काकडे, राकेश जगताप, दत्तात्रय अब्दागिरे, राजू कांबळे, सनी कदम यांनी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा दक्षता व संनियंत्रण समिती, सातारा यांच्या कार्यालयात जाऊन हे निवेदन सादर केले.

संविधानाच्या सन्मानासाठी आंदोलनाची भूमिका
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधान संविधान सभेसमोर सादर केले, ज्याचा अंमल 26 जानेवारी 1950 पासून सुरू झाला आणि भारत प्रजासत्ताक बनला. या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ दरवर्षी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र, या दिवशी राष्ट्रध्वजारोहणावेळी डॉ. आंबेडकर यांचा उल्लेख वा त्यांची प्रतिमा लावली जात नाही, याकडे शासन व प्रशासनाचा दुर्लक्ष होत असल्याचा आरोप काकडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केला आहे.

त्यामुळे यंदा प्रजासत्ताक दिनी राष्ट्रध्वजारोहणावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा लावून संविधान उद्देशिकेचे वाचन करावे, अशी मागणी त्यांनी केली. जर प्रशासनाने या मागणीची दखल घेतली नाही, तर आमरण उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

या निवेदनावर हरिष काकडे, राकेश जगताप, दत्तात्रय अब्दागिरे, राजू कांबळे, सनी कदम यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. प्रशासन यावर काय निर्णय घेते, याकडे आता लक्ष लागले आहे.

फलटणमध्ये LIC ऑफिससमोर धक्कादायक चोरी – मोटारसायकलच्या डिग्गीतून लाखोंचा ऐवज लंपास

0
फलटणमध्ये LIC ऑफिससमोर धक्कादायक चोरी – मोटारसायकलच्या डिग्गीतून लाखोंचा ऐवज लंपास

फलटण | शहरातील नारळीबाग येथील एल.आय.सी. ऑफिससमोर एका धक्कादायक चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. दयानंद बाजीराव शिंदे यांच्या होंडा ग्राझिया (क्र. MH 11 CY 5907) या मोटारसायकलच्या डिग्गीतून सोन्याचे गंठण, रोख रक्कम आणि एफ.डी. पावती अज्ञात चोरट्याने लंपास केली आहे.

घटना कशी घडली?

ही चोरी 24 जानेवारी 2025 रोजी दुपारी 2.15 ते 3.00 वाजताच्या दरम्यान घडली. फिर्यादी शिंदे यांनी एल.आय.सी. ऑफिससमोर मोटारसायकल लावली होती. डिग्गीतील पर्समध्ये त्यांनी खालील ऐवज ठेवला होता –

सोन्याचे गंठण: ₹2,48,700

चांदीची जोडवी: ₹1,000

रोख रक्कम: ₹55,000

एफ.डी. पावती (पत्नीच्या नावे – विजय ग्रामीण पतसंस्था, बिबी शाखा): ₹1,00,000

थोड्या वेळाने परत आल्यावर त्यांना डिग्गीतील वस्तू गायब असल्याचे लक्षात आले.

पोलीस तपास सुरू

या चोरीची एकूण रक्कम ₹3,04,700 इतकी असून, याप्रकरणी फलटण शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्र. 32/2025 नोंदवण्यात आला आहे. भा.दं.वि. कलम 303(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक दिनेश शिंदे तपास अधिकारी म्हणून नियुक्त झाले आहेत. गुन्हा दाखल करण्याची वेळ 24 जानेवारी 2025, रात्री 10.44 वाजता असल्याचे समजते.

कोयत्याने हल्ला, पती-पत्नीला मारहाण; भिगवण पोलिसांकडून पाच जणांवर गुन्हा दाखल

0
कोयत्याने हल्ला, पती-पत्नीला मारहाण; भिगवण पोलिसांकडून पाच जणांवर गुन्हा दाखल

भिगवण, ता. २५: “आमच्यावर दाखल गुन्हा मागे घ्या” असे म्हणत पाच जणांच्या टोळीने शहाजी काळे यांच्यावर कोयत्याने हल्ला केला. ही घटना घडल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या हल्ल्यात शहाजी काळे गंभीर जखमी झाले असून, त्यांना सोडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्यांच्या पत्नी मालन यांच्या उजव्या मनगटावरही कोयत्याने वार करण्यात आला. तसेच, पती-पत्नीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत, त्यांच्या मुलाला जीवंत सोडणार नाही, अशी धमकी देण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

याप्रकरणी किशोर गजरे, राजेश मोरे व त्यांच्या इतर साथीदारांविरोधात भिगवण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित आरोपींवर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा, बेकायदेशीर जमाव जमवणे, हत्यार घेऊन दंगल माजवणे, जिवे मारण्याचा प्रयत्न करणे या गंभीर कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड पुढील तपास करत आहेत. या हल्ल्यामुळे गावात भीतीचे वातावरण असून, नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

रस्त्यांच्या मधोमध का लावली जातात झाडं? कारण खूपच इंटरेस्टिंग 99% लोकांना माहितच नाही

0
रस्त्यांच्या मधोमध का लावली जातात झाडं? कारण खूपच इंटरेस्टिंग 99% लोकांना माहितच नाही


प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी कारण असते असे म्हणतात. पण बऱ्याच वेळा आपल्या नजरेला दिसत असतात पण त्यामागचं कारण कळत नाही किंवा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही. आपण सर्वजण अनेकदा महामार्गावरून कुठेतरी प्रवास करतो. अशा परिस्थितीत, तुम्ही महामार्गाच्या मध्यभागी लावलेली झाडे आणि झुडुपे पाहिली असतील. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, रस्त्याच्या मधोमध झाडे का लावली जातात? कदाचित तुम्ही याकडे कधीच लक्ष दिले नसेल. महामार्गावर झाडे का लावली जातात. ही झाडे आणि रोपे लावण्याचे कारण काय आहे? महामार्गावर झाडे लावण्याची गरज का होती? या गोष्टींबद्दल जाणून घेऊया. दररोज नजरेला पडणारी ही गोष्ट जवळपास 99% लोकांना माहितच नाही. 

महामार्गावर वाहनांच्या अप आणि डाउन लाईनमध्ये डिव्हायडर बनवून झाडे लावली जातात. हे अशा प्रकारे केले जाते कारण वाहनांमध्ये समान अंतर असेल. दोन वाहनांमध्ये किमान 8 फूट अंतर असावे. यामुळे अपघातांची शक्यता कमी होते. जर महामार्गांवर झाडे लावली नसती तर दररोज किती अपघात झाले असते याची कल्पना करा.

गाडी चालवताना, तुमचे लक्ष आणि डोळे फक्त रस्त्यावर असले पाहिजेत. तसेच, आपल्या सर्वांना माहित आहे की हलके रंग डोळ्यांना थंडावा देतात. महामार्गावर झाडे लावण्याचे हे देखील एक कारण आहे. झाडांचा रंग हिरवा असल्याने, त्यामुळे चालकाच्या डोळ्यांना त्रास होत नाही. तसेच, यामुळे डोळ्यांमध्ये कोणतीही जळजळ होत नाही.

झाडे लावल्याने प्रदूषण कमी होते हे आपल्या सर्वांना माहित आहे. म्हणूनच असे म्हटले जाते की, जास्तीत जास्त झाडे लावा आणि प्रदूषण कमी करा. म्हणूनच महामार्गांवर झाडे लावली जातात. जरा स्वतः विचार करा, जर महामार्गांवर झाडे लावली नाहीत तर किती प्रदूषण होईल. म्हणून, प्रदूषण कमी करण्यासाठी झाडे लावली जातात.

महामार्गावरून हजारो वाहने ये-जा करतात. त्यामुळे महामार्गांवर ध्वनी प्रदूषण ही एक सामान्य गोष्ट आहे. तसेच, महामार्गांवर झाडे लावण्याचे एक कारण म्हणजे ध्वनी प्रदूषण कमी करणे. महामार्गांवर झाडे लावल्याने ध्वनी प्रदूषण कमी होते. झाडे आवाज शोषून घेतात त्यामुळे ध्वनी प्रदूषण कमी होते.

महामार्गावर गाडी चालवणाऱ्या लोकांना सतर्क करण्यासाठी अनेक फलक लावले जातात. या फलकांमध्ये तुम्हाला ड्रायव्हिंगशी संबंधित अनेक चिन्हे आणि चिन्हे आढळतील. तुम्हीही महामार्गावर अनेकदा महत्त्वाची माहिती असलेले फलक पाहिले असतील. हे फलक ड्रायव्हिंगशी संबंधित माहिती किंवा इतर आवश्यक माहिती प्रदान करतात. पण कल्पना करा, जर महामार्गाच्या मध्यभागी झाडे आणि रोपे लावली गेली नाहीत तर तुम्हाला ही महत्त्वाची माहिती कशी मिळेल? या कारणास्तव महामार्गाच्या मध्यभागी झाडे लावली जातात.





Source link