Wednesday, July 29, 2026
Home Blog Page 513

Maharashtra Election News LIVE March 7, 2025: राज्यात अनधिकृत होर्डिंगचा सुळसुळाट; विधानसभा अधिनेशनात मुद्दा गाजला

0
Maharashtra Election News LIVE March 7, 2025: राज्यात अनधिकृत होर्डिंगचा सुळसुळाट; विधानसभा अधिनेशनात मुद्दा गाजला


Maharashtra Election 2024 News LIVE: राज्यात अनधिकृत होर्डिंगचा सुळसुळाट; विधानसभा अधिनेशनात मुद्दा गाजला

Maharashtra Election 2024 News LIVE: राज्यात अनधिकृत होर्डिंगचा सुळसुळाट; विधानसभा अधिनेशनात मुद्दा गाजला(HT_PRINT)

Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.

Fri, 07 Mar 202507:28 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: राज्यात अनधिकृत होर्डिंगचा सुळसुळाट; विधानसभा अधिनेशनात मुद्दा गाजला

  • Illegal Hoardings in Maharashtra -राज्यात एकूण ९०२६ ठिकाणी होर्डिंग्जचे ऑडिट करण्यात आले. १८८ ठिकाणी ऑडिट झाले नाही. राज्यात १ लाख ९३८७ होर्डिंग्ज काढून टाकण्यात आले आहे,


Read the full story here

Fri, 07 Mar 202506:23 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: वृत्तपत्रांपासून वेबसाइटपर्यंतच्या बातम्यांवर नजर ठेवणार महाराष्ट्र सरकार, बनवला १० कोटींचा मास्टर प्लॅन

  • कोणतीही बातमी दिशाभूल करणारी आढळली तर त्या वेळी स्पष्ट करण्यात येईल, असे या प्रस्तावात म्हटले आहे. नकारात्मक बातम्याही लवकरात लवकर स्पष्ट केल्या जातील.


Read the full story here





Source link

वृत्तपत्रांपासून वेबसाइटपर्यंतच्या बातम्यांवर नजर ठेवणार महाराष्ट्र सरकार, बनवला १० कोटींचा मास्टर प्लॅन

0
वृत्तपत्रांपासून वेबसाइटपर्यंतच्या बातम्यांवर नजर ठेवणार महाराष्ट्र सरकार, बनवला १० कोटींचा मास्टर प्लॅन


प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल माध्यमांच्या बातम्यांचे विश्लेषण करण्यासाठी महाराष्ट्र सरकार मीडिया मॉनिटरिंग सेंटर स्थापन करणार असून त्यासाठी १० कोटी रुपयांच्या बजेटची तरतूद करण्यात आली आहे. केंद्र सरकार प्रिंट आणि ब्रॉडकास्ट मीडियामध्ये प्रसिद्ध झालेल्या सर्व तथ्यात्मक आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्यांचे संकलन, विश्लेषण करेल आणि तथ्यात्मक अहवाल तयार करेल, असे बुधवारी प्रसिद्ध झालेल्या शासन निर्णयात (जीआर) म्हटले आहे.



Source link

Video : विमानात महिलेने एक-एक करून सर्व कपडे उतरवले, मग ३० हजार फूट उंचीवर..

0
Video : विमानात महिलेने एक-एक करून सर्व कपडे उतरवले, मग ३० हजार फूट उंचीवर..


पूर्वी अशा घटना क्वचितच ऐकायला मिळत असत, पण हल्ली त्या सामान्य झाल्या आहेत. अमेरिकेत विमानातील एका महिलेच्या कृत्याने व्यथित झालेले लोक असेच काहीसे सांगत आहेत. येथे ह्युस्टन ते फिनिक्स हे विमान प्रवाशांसाठी संस्मरणीय ठरले. मात्र, प्रवाशांना ते लवकरच विसरायचे आहे. प्रत्यक्षात या विमानात एका महिलेने गोंधळ घातला. या महिलेने ३० हजार फूट उंचीवर जाऊन अचानक विमानातून उतरण्याचा हट्ट धरला. जेव्हा त्याने नकार दिला तेव्हा त्याने जे केले ते पाहून सर्वजण स्तब्ध झाले.



Source link

दुबईहून भारतात किती सोने आणल्यास पकडले जाणार नाही? पुरुष, महिला आणि मुलांसाठा वेगळी आहे मर्यादा

0
दुबईहून भारतात किती सोने आणल्यास पकडले जाणार नाही? पुरुष, महिला आणि मुलांसाठा वेगळी आहे मर्यादा


दुबईला ‘सिटी ऑफ गोल्ड’ म्हणून ओळखले जाते. सोने खरेदीसाठी हे शहर भारतीयांचे आवडते ठिकाण ठरले आहे. उत्तम दर्जाची आणि कमी किमतीची गोष्ट भारताच्या तुलनेत लोकांना आकर्षित करते. पण तुम्हाला माहित आहे का दुबईहून भारतात सोनं आणण्यासाठी कायदेशीर मर्यादा आहे. भारतीय सीमा शुल्क विभाग आणि केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाने (सीबीआयसी) यासाठी कडक नियम केले आहेत, जेणेकरून सोन्याची तस्करी रोखता येईल आणि देशाची आर्थिक स्थिती संतुलित राखता येईल.



Source link

ग्राहकांना लवकरच दिलासा, भारतातील पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार?

0
ग्राहकांना लवकरच दिलासा, भारतातील पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार?



Petrol Diesel Price Today: पेट्रोच्या दरात घसरण होण्याची शक्यता आहे. कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या आहेत.
 



Source link

‘मी पाकिस्तानी मुस्लीम असल्याने भारतात…’, मुंबईत 166 जणांचा जीव घेणाऱ्या राणाचा कांगावा व्यर्थ; आता…

0
‘मी पाकिस्तानी मुस्लीम असल्याने भारतात…’, मुंबईत 166 जणांचा जीव घेणाऱ्या राणाचा कांगावा व्यर्थ; आता…


Mumbai 26/11 Attack Accused: मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 166 निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. या हल्ल्यातील प्रमुख आरोपींपैकी एक असलेला दहशतवादी तहव्वूर राणाला भारताकडे प्रत्यार्पित करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या हल्ल्यानंतर तहव्वूर राणाला अमेरिकी पोलिसांनी अटक केली होती. त्याच्या अटकेनंतर भारताने त्याचे प्रत्यार्पण व्हावे यासाठी अनेकदा प्रयत्न केले असून या प्रयत्नांना आता यश येणार अशी चिन्हं दिसत आहेत.

अमेरिकेमध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकीत सत्तांतर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचा दौरा केला. या दौऱ्यामध्ये दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झालेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणास हिरवा कंदील दाखवला होता. मात्र आता आपलं प्रत्यार्पण होणार हे लक्षात आल्यानंतर तहव्वूर राणाकडून प्रत्यार्पण टाळण्यासाठी वारंवार प्रयत्न केले जात आहेत. ट्रम्प यांनी प्रत्यार्पणास परवानगी दिल्यानंतर आता तहव्वूर राणाने अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून प्रत्यार्पणावर तातडीने स्थगिती मिळावी, अशी याचिका दाखल केली. मात्र ही याचिका अमेरिकी सर्वोच्च न्यायलयाने फेटाळली आहे. त्यामुळे तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाला आहे.

मी पाकिस्तानी मुस्लीम असल्याने…

“भारतात प्रत्यार्पण झाल्यानंतर तेथील तुरूंगात माझा छळ केला जाऊ शकतो,” अशी भिती तहव्वूर राणाने याचिकेमधून व्यक्त केली. “मी पाकिस्तानी मुस्लीम असल्यामुळे माझ्यावर अन्याय होऊ शकतो. या प्रत्यार्पणानंतर कदाचित मी मरूही शकतो. जर प्रत्यार्पणाला स्थगिती दिली गेली नाही, तर अमेरिकेचे न्यायालय आपले अधिकार क्षेत्र गमावून बसेल,” असा युक्तीवाद तहव्वूर राणाने अमेरिकी सर्वोच्च न्यायालयासमोर केला होता.  “मी पाकिस्तानी असल्याने माझ्याविरोधात शत्रूत्वाची भावना ठेवली जाईल, अशा देशात मला पाठवू नका,” अशी विनंती तहव्वूर राणाने याचिकेत केली होती.

ट्रम्प यांनी काय आश्वासन दिलं?

फेब्रुवारी महिन्यात पंतप्रधान मोदींनी ट्रम्प यांच्यासोबत व्हाइट हाऊसमध्ये घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ट्रम्प यांनी, “आम्ही अतिशय हिंसक माणूस (तहव्वुर राणा) भारताच्या ताब्यात देत आहोत. याबद्दल आमच्याकडे अनेकदा विनंत्या आल्या होत्या,” असं म्हटलं होतं. “गुन्ह्यांसंदर्भात दोन्ही देश (भारत आणि अमेरिका) समन्वयाने काम करतील. गुन्ह्यांच्या बाबतीत भारताला सहकार्य करणारे निर्णय आम्ही घेऊ,” असा विश्वास डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केलेला. आता अमेरिकी राष्ट्राध्यक्षांनी हा निर्णय घेण्याआधी 21 जानेवारी रोजी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने तहव्वूर राणाची याचिका फेटाळून लावली होती. तशीच याचिका तहव्वूर राणाने मोदींच्या दौऱ्यानंतर केली होती. ही याचिकाही फेटाळून लावण्यात आली आहे. 

प्रकृतीच्या कारणाचाही उल्लेख

दहशतवादी तहव्वूर राणाने आपल्या याचिकेमध्ये प्रकृती खालावल्याचेही नमूद केलं आहे. पोटाच्या विकारासहीप आपल्याला पार्किंसंस आजार असल्याचा दावा तहव्वूर राणाने केला आहे. या आजारामुळे आपण अनेक गोष्टी विसरतो. तसेच मूत्राशयाचा कर्करोग होण्याचेही संकेत मिळाले आहेत,” असं तहव्वूर राणाने याचिकेत म्हटलं आहे.





Source link

पाकिस्तानच्या ‘या’ शहरात आहे श्रीराम पुत्र लव यांची समाधी; राजीव शुक्लांनी पहिल्यांदाच समोर आणले Photo

0
पाकिस्तानच्या ‘या’ शहरात आहे श्रीराम पुत्र लव यांची समाधी; राजीव शुक्लांनी पहिल्यांदाच समोर आणले Photo


Champions Trophy 2025: भारतीय क्रिकेट संघानं यंदाच्या वर्षी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात धडक मारलेली असतानाच आता या सामन्याआधी संपूर्ण देशाचं लक्ष वेधणारे काही फोटो तूफान व्हायरल होत आहेत. बीसीसीआय (BCCI) अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी X च्या माध्यमातून हे फोटो सर्वांच्याच भेटीला आणल्यामुळं एका नव्या गोष्टीकडे संपूर्ण भारताचं लक्ष वेधलं आहे. 

दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात पार पडलेला सामना पाहण्यासाठी शुक्ला पाकिस्तानमध्ये पोहोचले होते. गद्दाफी स्टेडियममध्ये या सामन्याचा आनंद घेतल्यानंतर ते दुसऱ्याच दिवशी लाहोर इथं असणाऱ्या एका खास मंदिरात केले आणि तिथं असणाऱ्या एका किल्ल्यालाही भेट दिली. हे तेच ठिकाण आहे, जिथं प्रभू श्रीराम यांचे सुपुत्र लव यांचीही समाधी असल्याचं म्हटलं जातं. 

‘लाहोरच्या प्राचीन किल्ल्यामध्ये प्रभू श्रीराम यांचे पुत्र लव यांची प्राचीन समाधी आहे. लाहोरचं नावही त्यांच्याच नावावरून देण्यात आलं आहे. तिथं जाऊन नतमस्तक होण्याची संधी मिळाली. सोबत पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसीन नकवीसुद्धा होते. ते या समाधीचा जिर्णोद्धार करून घेत आहेत. मोहसीन यांनी मुख्यमंत्रीपदी असताना हे काम हाती घेतलं होतं. लाहोरच्या नगरपालिका नोंदींमध्ये ही बाब नमूद आहे की हे नगर भगवान श्रीराम यांचे पुत्र लव यांच्या नावावरून वसलं असून, कसूर शहराला त्यांचे दुसरे पुत्र कुश यांच्या नावावरून नाव देण्यात आलं आहे. पाकिस्तान सरकारनंही या गोष्टीला मान्यता दिली आहे’, असं शुक्ला यांनी त्यांच्या X पोस्टमध्ये लिहिलं. 

भारत- पाक सामन्यावर शुक्ला यांचं महत्त्वाचं वक्तव्य 

दरम्यान, राजीव शुक्ला यांनी या ठिकाणाला भेट देण्याच्या एक दिवस आधीच भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांदरम्यानच्या द्वीपक्षीय सीरिजवरही वक्तव्य केलं होतं. भारत आणि पाकिस्तानमधील द्वीपक्षीय सीरिजसंदर्भातील स्वीकृतीसाठीचा प्रस्ताव भारत सरकारकडे विचाराधीन आहे. कोणतंही सरकार जेव्हा असे निर्णय घेतं तेव्हा अनेक गोष्टींचा विचार केला जातो आणि निर्णयाचा मुद्दा पूर्णपणे अंतर्गत चर्चेचा विषय ठरतो. 

 





Source link

‘ब्रिटीशांमुळे गंगा प्रदूषित, पाश्चिमात्यांनी भारतीयांना…’; योगी विधानसभेत कडाडले

0
‘ब्रिटीशांमुळे गंगा प्रदूषित, पाश्चिमात्यांनी भारतीयांना…’; योगी विधानसभेत कडाडले


Yogi Adityanath Blames Britishers for Ganga Pollution: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ य़ांनी बुधवारी थेट ब्रिटीशांना लक्ष्य केलं. कानापूरमध्ये गंगा नदी प्रदुषित होण्यासाठी ब्रिटीश जबाबदार असून त्याची सत्ता असतानाच गंगेमध्ये घाण पाणी सोडण्यास सुरुवात झाल्याचं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे. त्यामुळेच पाश्चिमात्य लोकांना भारतीयांना ज्ञान देण्याऐवजी त्यांनी काय करुन ठेवलं आहे आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांबद्दल विचार केला पाहिजे असं आदित्यनाथ उत्तर प्रदेशच्या विधानसभेत म्हणाले.

थेट ब्रिटीशांना दिला दोष

“मात्र त्यांनी (ब्रिटीशांनी) जे दूषित केलं आहे (ती गंगा नदी) आपल्यासाठी पवित्र आहे. आजही लोक गंगेत स्थान करतात आणि ती नदी आपल्याला पवित्र करते,” असं योगी आपल्या भाषणात म्हणाले. प्रयागराजमधील महाकुंभदरम्यान गंगा नदी दूषित झाली होती हा दावा खोडून काढताना योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेश प्रदूषण नियंत्रण बोर्डाने नियमितपणे त्रिवेणी संगमावरील पाण्याचे नमुने गोळा केल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. हे सर्व नमुने निर्धारित मर्यादेनुसार सुरक्षित असल्याचं स्पष्ट झालं. “गंगेच्या प्रदुषणाबद्दल प्रश्न विचारला जातो. गंगा नदी उत्तर प्रदेशमध्ये बिजनौर ते बालिया असा एक हजार किलोमीटरचा प्रवास करते. यापैकी सर्वात महत्त्वाचं ठिकाण कानपूर आहे. मागील 125 वर्षांपासून 4 कोटी लीटर प्रदुषित पाणी सिसामौ येथे गंगा नदीत सोडण्यात आलं,” असं योगी आदित्यनाथ म्हणाले.

मोदींचे आभार मानले

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आम्ही आभारी आहोत की त्यांनी ‘नामामि गंगे’सारख्या योजनेच्या माध्यमातून गंगेच्या स्वच्छतेसाठी काम केलं, असंही योगी आदित्यनाथ म्हणाले. आधीच्या सामाजवादी पार्टीच्या सरकारने केंद्र सरकारकडून नदी स्वच्छतेसाठी मिळालेला निधी नदी स्वच्छ करण्यासाठी वापरला नसल्याचंही योगी आदित्यनाथ म्हणाले. 

नदी स्वत:ची काळजी घेते

वैज्ञानिक संदर्भ देत योगी आदित्यनाथ यांनी वाहतं पाणी सतत स्वच्छ होत असतं असं सांगितलं. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाच्या अहवालामध्ये संगमावरील पाण्याच्या दर्जावर शंका उपस्थित करण्यात आल्याने योगी आदित्यनाथांनी या अवालावरच शंका उपस्थित केली. उत्तर प्रदेश प्रदूषण नियंत्रण बोर्डाने या पाण्याचे नमुने घेतले होते. मात्र त्यामध्ये मर्यादित प्रमाणात विषाणू आढळून आल्याचं योगी म्हणाले. तसेच त्यांनी गंगा नदी नैसर्गिक नियमानुसार स्वत:ची काळजी घेते, असंही योगी म्हणाले.

जो जसा असतो तसं दिसतं

महाकुंभच्या नियोजनावरुन टीका करणाऱ्यांना योगी आदित्यनाथांनी सुनावलं आहे. भगवान श्रीकृष्णच्या विधानाचा संदर्भ देत जी व्यक्ती जशी असते तसं त्याला जग दिसतं असा टोला लगावला. नकारात्मक लोकांना गंगेबद्दल नकारात्मकच गोष्टी सुचणार. पण याच गंगेत महाकुंभमध्ये 66 कोटी लोकांनी स्नान केलं आहे, असंही योगी म्हणाले.

 

 

 

 

 





Source link

एकमेकांचा अभ्यास काढला, सातारच्या निंबाळकरांमध्ये पाणी प्रश्नावर जुंपली

0


Sanjeevraje Naik Nimbalkar on Ranjeetsinha Naik-Nimbalkar, Satara : निरा देवघर पाणी प्रश्नावरून माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि भाजपचे माजी खासदार रणजीत नाईक निंबाळकर यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. या आरोपावरून रामराजे यांचे बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी माजी खासदार रणजीत निंबाळकर यांनी केलेल्या टीकेला प्रतिउत्तर दिलंय…..”रामराजे नाईक निंबाळकर यांचा निरा देवकर आणि धोम बलकवडी पाणी प्रश्न संदर्भात काही अभ्यास नाही, असे भाष्य करणारे हे एकमेव माजी खासदार आहेत… रामराजे नाईक निंबाळकर यांचा कृष्णा खोरे संदर्भात किती अभ्यास आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला आणि जाण असणाऱ्या तज्ज्ञ मंडळींना माहित आहे. कृष्णा खोरे महामंडळात च्या स्थापनेपासून मागील 30 ते 32 वर्षापासून तोच अभ्यास सातत्याने होत असल्याचे पाहायला मिळतंय. यामुळे माजी खासदारांचा यावर किती अभ्यास आहे. याची मला किव  वाटते…. आपल्याला यातील काहीही ज्ञान नसताना ते रेटत बसायचं… खंडाळा, फलटण, माळशिरसच्या लाभक्षेत्रालाच निरा देवघर धरणातील पाणी मिळावं ही रास्त मागणी आहे. यामागे कोणतेही राजकारण नाही… कृष्णा खोरे ची स्थापना आणि कृष्ण खोरे मधून पाणी अडवण्याची आवश्यकता होती. ते अडवण्यामध्ये कोणाला यश आल असेल ते म्हणजे रामराजे नाईक निंबाळकर. त्यांचा यामध्ये अभ्यास नाही असे म्हणणे पूर्णपणे चुकीचे:” असल्याचे मत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले आहे 

भाजपचे माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी रामराजे यांच्यासह संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यावर टीका केलीये. 1997 साली कृष्णा महामंडळाचे उपाध्यक्ष झालेले रामराजे एक वर्ष मागे जावून मीच कृष्णा महामंडळाला जन्म दिला असं सांगत आहेत. धोम बकलवडीचा प्रस्ताव 1992 मध्ये शासनाकडे आला असल्याचे पुरावे आहेत. तरीही ते सांगतात कृष्णा महामंडळाचा मी जनक आहे, धोम बलकवडी धरण मी केलं. वास्तविक त्यांचा धोम बलकवडीशी काडीमात्र संबंध नाही’’, असा घणाघाती आरोप माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी कागदोपत्री पुरावे दाखवत केलाय.

रामराजे बाळकर यांना पाणी प्रश्नावर कमी माहिती, रणजीतसिंह निंबाळकर यांची टीका

निरा देवघर ‘धरण कुठं झालं आहे ते त्यांना माहित नाही. धरणाला किती खर्च झाला आहे हे त्यांना माहित नाही. कॅनॉल कुठपर्यंत झाले आहेत हेही त्यांना माहित नाही. योगायोगाने ते उपाध्यक्ष असताना धोम-बलकवडीला प्रशासकीय मान्यता मिळाली. निरा खोर्‍यात आणखीन पाणी आहे; ते स्वत:ला पाणीदार म्हणवणार्‍यांनी आणून दाखवावे या आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या आव्हानाला उद्देशून देताना रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले ज्यांनी बादलीभरसुद्धा तालुक्यासाठी पाणी आणलं नाही, ज्यांनी साधा पाझर तलाव आणलेला नाही त्यांनी माझ्याविरोधात पत्रकार परिषद घेतली. त्यांना उत्तर देण्यात काहीही तथ्य नाही. त्यांनीही अभ्यास न करता माझ्यावर बोलू नये’’, असा टोलाही श्रीमंत संजीवराजे यांचे नाव न घेता त्यांना उद्देशून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी लगावला.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

रील स्टारला लाजवेल असे ड्रोन चित्रिकरण, 12 च्या ठोक्याला पोलिस स्टेशनच्या दारातच बर्थडे सेलिब्रेशन; पिंपरीतील पोलिसाचा प्रताप

 

 

अधिक पाहा..



Source link

Crime News : पायात 10 खिळे, हातावर पट्टी अन्…; महिलेचा मृतदेह पाहून उडाला थरकाप, जादूटोण्याचा संशय

0
Crime News : पायात 10 खिळे, हातावर पट्टी अन्…; महिलेचा मृतदेह पाहून उडाला थरकाप, जादूटोण्याचा संशय


Crime News : बिहारमधील नादंला इथे अल्पवयीन मुलीच्या हत्येमुळे एकच खळबळ माजलीय. या तरुणीचा मृतदेह पाहून परिसरात भीतीचं वातावरण आहे. या मुलीची निर्घृण हत्या करण्यात आली असून तिच्या पायावर 5-5 खिळे ठोकले होते. हा मृतदेह कोणाचा आहे अद्याप  समजू शकलेले नाही. पण प्रथमदर्शनी हत्येचा संबंध काळ्या जादूशी जोडला जातोय. या तरुणीचं वय 26 असल्याच म्हटलं जातंय. 

सध्या पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी बिहार शरीफ सदर रुग्णालयात पाठवला असून हे प्रकरण हरनौत ब्लॉकमधील सार्था पंचायतीतील बहादुरपूर गावाचे आहे. बुधवारी, काही गावकऱ्यांना महामार्गावरील जंगलाजवळ एक मृतदेह दिसला. त्या महिलेने लाल रंगाची नाईट घातली होती. त्याच्या एका हातावर पट्टी बांधलेली होती. शिवाय, प्रत्येक पायात पाच खिळे ठोकण्यात आले. पोलीस सध्या महिलेची ओळख पटवण्यात व्यस्त आहेत.

एसएचओने सांगितले की, पोलिसांनी सोशल मीडिया आणि जवळच्या पोलीस ठाण्यांशी संपर्क साधून महिलेची ओळख पटवण्यास सुरुवात केली आहे. सध्या मृतदेह ओळख पटविण्यासाठी सदर रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आला आहे. त्यांनी सांगितलं की हे प्रकरण लवकरच सोडवलं जाईल.

तर दुसरीकडे गावकऱ्यांमध्ये चर्चा आहे की, ज्या पद्धतीने महिलेच्या हाताला पट्टी बांधली आहे, त्यावरून असे दिसते की उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला असावा. पोलीस केस टाळण्यासाठी, महिलेचा मृतदेह येथे फेकून दिला गेला असावा. काही गावकऱ्यांच्या मते, जादूटोण्यासाठी अशा प्रकारे नखे वापरली जातात. काळ्या जादू आणि जादूटोण्यामुळे महिलेची हत्या झाली असण्याची शक्यता आहे. किंवा त्या महिलेचा बळी दिला गेला असावा. याशिवाय, काही लोक असेही म्हणतात की प्रेमप्रकरणातील वादामुळे एखाद्या वेड्या व्यक्तीने महिलेची हत्या केली असावी. मात्र, सत्य काय आहे ते चौकशीनंतरच स्पष्ट होईल.

डीएसपी सुमित कुमार काय म्हणाले?

या संपूर्ण प्रकरणात 24 तास उलटूनही मृतदेहाची ओळख पटलेली नाही. गुरुवारी हिल्साचे डीएसपी सुमित कुमार म्हणाले की, बुधवारी चांडी पोलिस ठाण्याला रस्त्याच्या कडेला एका महिलेचा मृतदेह पडल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर चौकशी झाली. महिलेच्या दोन्ही पायांच्या तळव्यात काही खिळे अडकले होते. मानेवर राखेचे चिन्ह होते. मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही. सर्व मुद्द्यांवर चौकशी सुरू आहे.

राजद नेत्याने सरकारवर हल्लाबोल केला

या घटनेबाबत राजदने सरकारवर हल्लाबोल करण्यात आला आहे. राजद प्रवक्ते अज्या यादव यांनी  X वर लिहिलं की, “महिला अत्याचार आणि छळात बिहार हे अव्वल राज्यांमध्ये आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांना लाज वाटते पण त्यांना लाज नाही! जर त्यांच्या गृहजिल्ह्यात घडलेल्या या आत्मचिंतक, भयानक घटनेने आणि क्रूरतेने कोणी प्रभावित झाले नाही, तर तो माणूस नाही! तसे, या घटनेला निर्लज्ज भाजप आणि एनडीएच्या सत्तेच्या लालसेने ग्रस्त लोक रामराज्याची चांगली घटना देखील म्हणतील आणि ते म्हणतील की 15 व्या शतकात काय घडायचे?” 





Source link