


अवघ्या क्षणभराकरिता चंद्र सूर्याच्या ठीक समोर पण विरुद्ध बाजूला येतो. नेमक्या त्या क्षणी तो पूर्ण उजळून गेलेला असतो. आणि नेमक्या त्याच क्षणी त्याची वाढ होणं थांबतं आणि त्याचा क्षय चालू होतो. त्या क्षणी पौर्णिमा संपते आणि शुक्लपक्षही संपतो हे पाहिलं आहे आपण. आणि त्याच क्षणी कृष्णपक्ष सुरू होतो. ही घटना रात्रीच घडली पाहिजे असं काही नाही. ती अगदी भर दुपारीदेखील घडू शकते.
पण त्यानंतर काय होतं? या ग्रहगोलांना विश्रांती अशी नाहीच. चंद्राचं मार्गक्रमण सुरूच राहतं. आणि मग परत एकदा तो सूर्याच्या ठीक समोर पण सूर्याच्याच बाजूला येतो. नेमक्या त्या क्षणी तो पूर्ण झाकोळलेला असतो. आणि नेमक्या त्याच क्षणी त्याचा क्षय होणं थांबतं आणि त्याची वाढ होऊ लागते. अर्थात, नेमक्या त्याच क्षणी अमावास्या संपते आणि कृष्णपक्षही संपतो. अर्थातच, पुन्हा नव्याने शुक्लपक्ष सुरू होतो.
जशी ‘पौर्णिमा समाप्ती’ ही घटना रात्रीच घडली पाहिजे असं नाही त्याचप्रमाणे ‘अमावास्या समाप्ती’ ही घटनाही रात्रीच घडली पाहिजे असं नाही. उदाहरणादाखल चैत्र अमावास्या २७ एप्रिलला साधारण मध्यरात्री संपेल. वैशाख अमावास्या २८ मे रोजी पहाटे पाचच्या सुमारास संपेल. आणि हेच ज्येष्ठ अमावास्या २५ जून रोजी दुपारी चार वाजताच संपेल.
आता थोडं ‘काळाचे गणित’. पण हे गणित म्हणजे आकडेमोड किंवा बीजगणित नाही. ही चक्क भूमिती आहे! आणि ‘तिथी’ ही संकल्पना कळण्यासाठी ही भूमिती कळणं गरजेचं. खरं तर याला ‘भूमिती’ म्हणणंही गमतीचं. कारण ‘भूमिती’ या शब्दाचं मूळ भू – भूमी – पृथ्वी या शब्दात आहे. आणि आपण गणित सोडवतो आहोत अंतराळातलं! असो.
आता सोबतची आकृती पाहा. त्यात पौर्णिमा समाप्तीचा आणि अमावास्या समाप्तीचा क्षण दाखवला आहे. पौर्णिमा समाप्ती आणि अमावास्या समाप्ती या दोन घटना आहेत. त्या घडतात तेव्हा चंद्र एका विशिष्ट स्थानी – एका विशिष्ट बिंदूपाशी असतो. आणि या दोन बिंदूंमध्ये बरोबर १८० अंशांचं अंतर असतं. अमावास्या संपते तेव्हा चंद्र आणि सूर्य यांच्यात ० अंशाचा कोन होतो. तो वाढत वाढत जातो. आणि पौर्णिमा संपते तेव्हा तो कोन १८० अंश झालेला असतो.
पंचांगकर्त्यांच्या प्रतिभेची आणि बुद्धीची कमाल इथे दिसून येते. त्यांनी काय केलं, या १८० अंशांचे १५ समान भाग केले. यातला प्रत्येक भाग १८० ÷ १५ = १२ अंशांचा होतो. यातला प्रत्येक भाग म्हणजे ‘तिथी’. हे थोडं विस्ताराने सांगू.
अमावास्या संपते तेव्हा चंद्र आणि सूर्य यांच्यात शून्य अंशांचं अंतर असतं. पण अमावास्या संपली म्हणजे कृष्णपक्ष संपला. म्हणजे शुक्लपक्ष सुरू झाला. म्हणजे तिथी शुक्ल प्रतिपदा. आता चंद्र आणि सूर्य यांच्यातलं अंतर वाढत जातं. ते जेव्हा १२ अंश होतं तेव्हा शुक्ल प्रतिपदा संपली आणि शुक्ल द्वितीया सुरू झाली, २४ अंश होतं तेव्हा शुक्ल द्वितीया संपली आणि शुक्ल तृतीया सुरू झाली. असं करत करत १६२ अंश होतं तेव्हा शुक्ल चतुर्दशी संपली आणि पौर्णिमा सुरू झाली आणि अर्थातच, १८० अंश होतं तेव्हा पौर्णिमा संपली, शुक्लपक्ष संपून कृष्णपक्ष सुरू झाला!
एक गोष्ट लक्षात आली का? ‘तिथी’ या संकल्पनेची व्याख्या करताना आपल्याला सूर्योदय, सूर्यास्त, चंद्रोदय, चंद्रास्त यांपैकी कोणत्याही घटनेचा अंतर्भाव करावा लागला नाही. ही व्याख्या फक्त सूर्य-चंद्रामधलं कोनात्मक अंतर या एका गोष्टीवर आधारित आहे. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि आपल्या पुढल्या सगळ्या चर्चेमध्ये याचा उपयोग होणार आहे. ही पुढली चर्चा, अर्थातच पुढल्या भागांत.

ठाणे : शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांचे सहकारी राहिलेले आणि शिंदे यांचे अत्यंत जवळचे मानले जाणारे उद्धवराव जगताप यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्या दरबारात हजेरी लावली. निमित्त होते मित्राच्या मुलाला नोकरी… विशेष म्हणजे, गणेश नाईक यांनी शिवसेना सोडल्यानंतर दिघे आणि नाईकांच्या राजकीय वैराबाबत नेहमी जिल्ह्यात दबक्या आवाजात चर्चा होत असतात. नाईकांच्या दरबारात शिवसेनेचे उद्धवराव आल्याने अनेकंच्या भुवया उंचावल्या. परंतु नाईक यांनी उद्धवरावांचा सत्कार करत उपस्थित छायाचित्रकारांना सोबत फोटो काढण्याची विनंती केली. तसेच ‘हे माझे जुने सहकारी’ म्हणत, त्यांच्या मित्राच्या मुलाला नोकरी देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांचे उद्धवराव जगताप हे अत्यंत जवळचे सहकारी होते. ठाण्यातील जेवढ्या शिवसेना शाखा आहेत तेवढ्या शाखा उद्धवराव जगताप यांच्या नावावर आहेत. मुंब्रा येथील वादग्रस्त शाखा देखील उद्धवरावांच्या नावावर होती. याच शाखेमुळे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे मुंब्रा येथे आले होते. या शाखेवरून शिंदे गट आणि ठाकरे गट एकमेकांच्या समोर आले होते. उद्धवराव जगताप हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याने ठाण्यातील बऱ्यापैकी शाखा ह्या शिंदे गटाकडे आहेत. ‘धर्मवीर आनंद दिघे, मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटात देखील उद्धवराव जगताप यांचे भूमिका ठळकपणे दर्शविण्यात आली होती. टेंभीनाका येथील आनंद आश्रमचा कारभार देखील उद्धवराव सांभाळत असे. आनंद दिघे यांच्या आनंद आश्रमात नोकरी निमित्ताने येणाऱ्यांच्या अनेक नेमणूकाही उद्धवरावांनी केल्या आहेत. दरम्यान, गणेश नाईक हे देखील शिवसेनेचे ठाणे जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते होते. १९९९ मध्ये गणेश नाईक यांनी शिवसेना सोडल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर दिघे आणि नाईक यांच्यामधील राजकीय वैर सर्वश्रुत होते. त्यावेळी निवडणूकीत त्यांचा पराभवही झाला होता. हा पराभव गणेश नाईक यांच्या जिव्हारी लागला होता.
– आनंद दिघे हयात नसताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेची सुत्र गेली होती. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यानंतर ठाणे जिल्ह्यातील बहुतांश पदाधिकारी शिंदे यांच्यासोबत गेले आहेत. उद्धवराव जगताप हे देखील त्यांच्यासोबत आहेत. सध्या उद्धवराव ९८ वर्षांचे आहेत. ठाण्यातील काशिनाथ घाणेकर येथील नाट्यगृहात गणेश नाईक यांचा जनता दरबार आयोजित करण्यात आला होता. गणेश नाईक यांच्यासमोर उद्धवराव येताच, नाईक यांनी ‘किती दिवसांनी भेट झाली म्हणत, त्यांचा सत्कार केला. तसेच त्यांच्यासोबत एक छायाचित्र काढले. उद्धवराव हे त्यांच्या एका मित्राच्या मुलाला नोकरी मिळवून देण्यासाठी आले होते. याबाबत उद्दवरावांना विचारले असता, त्यांनी सांगितले की आम्ही एकाच संघटनेसाठी पूर्वी काम केले होते. खूप दिवसांनी भेटल्यानंतर दोघांनाही आनंद झाला.

गॅबी रीड्स नावाचे बरेच पाहिले जाणारे यूट्यूब चॅनल. अर्धी अमेरिकी आणि अर्धी स्पॅनिश असलेली त्याची यूट्यूबर गॅबी वर्षाला दीड-दोनशे पुस्तके सहज वाचते आणि त्यांच्याबद्दल इतरांना सजग करणारी माहिती देते. ‘जेन झी’ पिढीत दुर्मीळ ठरत चाललेल्या अनेक गोष्टी हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सापडल्यासारख्या वाटतीलच; पण इथल्या अनेक देशांतील इंग्रजीत भाषांतरित झालेली वाचावीत अशी पुस्तकनावे कळतील. रहस्य-भूत-थरार यांच्या तिथल्या जगाविषयीची ही खिडकी आहे. याच यूट्यूबरचे इतर पुस्तकांविषयीचे व्हिडीओदेखील निराश करणार नाहीत.
https:// tinyurl.com/6bpfn69u
मारियाना एन्रीक्वेझ हे दक्षिण अमेरिकी साहित्यातून मोठ्या प्रमाणावर निर्यात झालेले अर्जेंटिनी नाव. ब्यूनोस आयरेसजवळील झोपडपट्ट्या, लहान घरांच्या वस्त्या, शहरांमधील अडनिडी घरे त्यांच्या कथांमध्ये येतात. काळी जादू आणि मृतात्म्यांना जागविण्याचे (प्लँचेटसारखे) खेळ करणाऱ्या मुलीदेखील. ‘बॅक व्हेन वी टॉक टू डेड’ ही पाच शाळकरी मुुलींची ‘ओ हेन्रीएटिक धक्का’ देणारी पूर्ण कथा. ‘द डेंजर्स ऑफ स्मोकिंग इन बेड’ या मारियाना यांच्या नव्या कोऱ्या पुस्तकातून इथे…
https://tinyurl.com/34b24cm5


पुणे : रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा वाद अद्यापही सुटला नसला, तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातले आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून या जिल्ह्यांना निधी दिला आहे. विविध जिल्ह्यांसाठी एकूण २२ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये हा वाद नक्की सुटेल,’ असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे सांगितले. महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त फुले वाड्यात त्यांनी फुले यांना अभिवादन केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा दावा केला.
रायगडच्या पालकमंत्री पदावरून वाद सुरू असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रायगड दौऱ्यावर शनिवारी येणार असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (अजित पवार) सुनील तटकरे यांनी त्यांना भोजनासाठीचे निमंत्रण दिले आहे. त्यामुळे महायुतीतील घटकपक्ष असलेल्या शिवसेनेच्या (शिंदे) स्थानिक नेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. या संदर्भात पवार यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले, ‘मुंबईत मुक्कामी असाल तेव्हा माझ्याकडे भोजनासाठी या किंवा रायगडमध्ये असाल तर सुनील तटकरे यांच्याकडे जावे, अशी विनंती मी अमित शहा यांना केली होती. त्यानुसार तटकरे यांनी शहा यांना हे निमंत्रण दिले आहे. शहा यांच्याबरोबरच माझ्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्या भागातील मंत्री म्हणून भरत गोगावले आणि उदय सामंत यांनाही त्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.’



मुंबई: भांडवली बाजारातील प्रचंड अस्थिरतेमुळे मार्चमध्ये समभागसंलग्न अर्थात इक्विटी म्युच्युअल फंडांतील ओघ सरलेल्या मार्चमध्ये १४ टक्क्यांनी घसरून २५,०८२ कोटी रुपयांवर मर्यादित राहिला. इक्विटी फंडांमधील गुंतवणुकीला उतरती कळा लागल्याचा हा सलग तिसरा महिना ठरला, अशी माहिती म्युच्युअल फंड घराण्यांची शिखर संस्था असलेल्या ‘ॲम्फी’ने शुक्रवारी दिली.
‘ॲम्फी’ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, मार्चमध्ये इक्विटी फंडांमध्ये २५,०८२ कोटी रुपयांचा ओघ दिसून आला, जो फेब्रुवारीत २९,३०३ कोटी रुपये, जानेवारीमध्ये ३९,६८८ कोटी रुपये होता. सलग तीन महिन्यांत तो डिसेंबर २०२४ मधील ४१,१५६ कोटी रुपयांच्या ओघापेक्षा खूपच कमी नोंदवला गेला आहे. तथापि २०२४-२५ या पूर्ण आर्थिक वर्षात, इक्विटी फंडांमध्ये ४.१७ लाख कोटी रुपयांचा एकत्रित प्रवाह दिसून आला, जो आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये नोंदवलेल्या १.८४ लाख कोटी रुपयांपेक्षा लक्षणीयरीत्या जास्त आहे.
इक्विटी फंड श्रेणींमध्ये, फ्लेक्सी कॅप फंडांनी मार्चमध्ये सर्वाधिक ५,१६५ कोटी रुपयांची गुंतवणूक मिळविली. मात्र, फेब्रुवारीतील ५,७११ कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक मिळविणाऱ्या सेक्टोरल/थीमॅटिक फंडांची कामगिरी मार्चमध्ये निराशाजनक राहिली. मार्चमध्ये या फंडात फक्त ७३५ कोटी रुपये गुंतविले गेले. ही घसरण बाजारातील बदलत्या कलाकडे खुणावणारी असून गुंतवणूकदार आता सेक्टोरल फंडातून गुंतवणूक अधिक वैविध्यपूर्ण आणि लवचिक गुंतवणूक पर्यायांकडे वळवत आहे.
मार्चमध्ये, मिडकॅप आणि स्मॉलकॅप म्युच्युअल फंडांनी गुंतवणूकदारांना आकर्षित केले, ज्यात अनुक्रमे ३,४३९ कोटी आणि ४,०९२ रुपयांची गुंतवणूक झाली. त्याआधीच्या फेब्रुवारी महिन्यात मिडकॅप फंडांमध्ये ३,४०६ कोटी रुपये आणि स्मॉलकॅप फंडांमध्ये ३,७२२ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती. याउलट, लार्ज-कॅप फंडांतील ओघ आटला आहे, फेब्रुवारीमधील २,८६६ कोटी रुपयांच्या तुलनेत मार्चमध्ये २,४७९ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली.
दुसरीकडे, फेब्रुवारीमध्ये गुंतवणूकदारांनी १,९८० कोटी रुपयांचा निधी ओतल्यानंतर गेल्या महिन्यात गोल्ड एक्स्चेंज ट्रेडेड फंडातून (ईटीएफ) ७७ कोटी रुपयांचा निधी काढून घेण्यात आला. शिवाय, फेब्रुवारीतील ६,५२५ कोटी रुपयांच्या तुलनेत मार्चमध्ये डेट अर्थात रोखेसंलग्न फंडांमधून २.०२ लाख कोटी रुपयांचा निधी काढून घेण्यात आला.एकूणच, मार्च महिन्यात म्युच्युअल फंडातून १.६४ लाख कोटी रुपयांचा निधी काढून घेण्यात आला. हा निधी बाहेर पडूनही, म्युच्युअल फंड उद्योगाच्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता मार्चअखेर किंचित वाढून ६५.७ लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे, जी मागील महिन्यातील ६४.५३ लाख कोटी रुपये नोंदवली गेली होती.
गुंतवणुकीचा शिस्तशीर पर्याय असलेल्या ‘एसआयपी’च्या माध्यमातून मार्च महिन्यात २५,९२५ कोटी रुपयांचा प्रवाह म्युच्युअल फंडात आला. मात्र ही त्याची चार महिन्यांतील नीचांकी पातळी आहे. याआधी, फेब्रुवारीमध्ये ‘एसआयपी’च्या माध्यमातून २५,९९९ कोटी रुपये, जानेवारीमध्ये २६,४०० कोटी रुपये आणि डिसेंबरमध्ये २६,४५९ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये, सरासरी मासिक ‘एसआयपी’ योगदान २४,११३ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. मागील आर्थिक वर्षात सरासरी मासिक योगदान १६,६०२ कोटी रुपयांवर होते.

फलटण :- फलटण तालुक्यातील साखरवाडी येथे बुद्ध विहाराच्या मागणीसाठी गेले 60 दिवस सातत्याने तहसील कार्यालयासमोर आंदोलन सुरू होते. प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने आंदोलनकर्त्यांनी 60 व्या दिवशी खुल्या जागेत तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीची स्थापना केली. या प्रकारानंतर प्रशासनाने कठोर पवित्रा घेत बौद्ध समाजातील महिला व पुरुषांवर लाठीमार केला आणि तब्बल 30 भीमसैनिकांना अटक केली.
या घटनेनंतर सामाजिक कार्यकर्ते आणि कायदेशीर लढवय्ये तात्काळ मैदानात उतरले. विशेष सरकारी वकील अॅड. बापूसाहेब शिलवंत, अॅड. संदीप शिवाजीराव कांबळे, अॅड. मनोज जावळे, अॅड. मेघा आहिवळे, अॅड. निलेश भोसले, अॅड. प्रेम आहिवळे, अॅड. शाम आहिवळे, अॅड. अजित चाबुकस्वार, अॅड. मनीष काकडे, अॅड. प्रबुद्ध मिसळ आदींनी न्यायालयात दमदार युक्तिवाद करत सर्व 30 भीमसैनिकांची जामिनावर मुक्तता करून घेतली.
पोलिसांनी सांगितलेली मूर्तीची जागा ही पोलीस प्रशासनाची असल्याचा दावा करत लाठीमार केला गेला. यात अनेक आंदोलक जखमी झाले, तर अटकेत घेतलेल्यांना फलटणपासून तब्बल 150 किमी लांब कराड पोलिस ठाण्यात नेण्यात आले.
या लढ्याचे नेतृत्व आणि खबरदारीचे काम युवा नेते व फलटण दर्शनचे संपादक सुधीर अहिवळे, अध्यक्ष संजय दादा गायकवाड, कामगार संघर्ष संघटनेचे अध्यक्ष महादेव गायकवाड (आझाद समाज पार्टी), तसेच इतर कार्यकर्त्यांनी उचलून धरले. साखरवाडीच्या युवकांनी सांगितले की, “आपण सगळे एकत्र होतो, म्हणूनच हा लढा यशस्वी झाला.”