Friday, July 24, 2026
Home Blog Page 392

जिसकी जुबां उर्दू की तरह…

0
जिसकी जुबां उर्दू की तरह…


चार-साडेचार वर्षांपूर्वीची गोष्ट… एका शहरात दिवाळी पहाटेला ‘इर्शाद’ या नावाचा काव्य सादरीकरणाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. आता हे दिवस कसे परस्परांना ‘सूर्ये अधिष्ठिली प्राची’ वगैरे सारखे ‘एसएमएस’ धाडण्याचे. त्यात हा ‘इर्शाद’ शब्द कुठून आला आणि अशा प्रात:काळी चंदनगंधित वातावरणात तो उच्चारायचा तरी कसा? दिवाळी पहाटेच्या मैफिलीत ‘रेशमी कुर्ता’, ‘अत्तर’ हे चालतंच पण ‘इर्शाद’ शब्द काही पचनी पडेना. आपल्या भाषेत काय कमी शब्द आहेत असे म्हणत संस्कृतीरक्षक भाषाप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली. परिणाम असा झाला की तो कार्यक्रमच रद्द करावा लागला.

कधी कधी असं चित्र दिसू लागतं. वाक्यातले सगळे शब्द एका रांगेत बसलेले आहेत. त्यात एखादा ऐटदार, पटकन लक्ष वेधून घेणारा असतो पण तो आपला नाही म्हणत त्याला तिथून हाकला अशी मागणी काही लोक करत आहेत. त्याच्यावर नजरा रोखल्या आहेत आणि हा बिचारा त्या नजरांचा सामना करीत अंग चोरून बसल्यासारखा अवघडून गेलाय. खरंतर त्या वाक्यालाच त्याच्यामुळे रंगत आलीय. शब्दसमूहात तो उठून दिसतोय पण भाषाप्रेमाचे दांडके हातात घेतलेल्यांना तो तिथे नको आहे. काय करणार… साऱ्या शब्दांच्या पंगतीत तो बिचारा पडला अल्पसंख्य.

मराठवाड्यावर दीर्घकाळ निजामाची राजवट होती. इथल्या बोलीत अनेक उर्दू शब्द ‘बेमालूम’ मिसळले आहेत. ते वेगळे काढताच येत नाहीत. मराठवाड्यात जमिनीचे खरेदीखत नसते ‘बयनामा’ असतो. एखाद्याला हिणवण्यासाठी त्याची ‘हैसियत’ काढली जाते. संपत्तीसाठी सर्रास ‘राशीद’ असा शब्द वापरला जातो. सगळ्यांनी माझी ‘राशीद’ खाल्ली आणि आता सांभाळायला कोणीच नाही असे एखादा वृद्ध आपल्या वारसांबद्दल म्हणतो. एखाद्याच्या कृपेने कोणाचा आर्थिक उद्धार झाला तर तो ‘निहाल’ झाला असे म्हटले जाते. भांडण मिटले तर तो ‘सुलानामा’ झालेला असतो. एखाद्या प्रकरणाच्या मिटवामिटवीसाठी ‘तसब्या’ हा शब्द सर्रास वापरला जातो. इथे झालेला खून हा निर्घृण नसतो तो ‘बेरहम’ असतो. असे कित्येक शब्द मराठवाड्यात आजही वापरात आहेत. एकेकाळी असे खास उर्दू शब्द मिश्रित मराठी बोलणारी अनेक माणसे आढळायची. आता कालांतराने त्यातले काही शब्द कमी होत आहेत. तरीही मराठवाड्याच्या जीवन व्यवहारात असे असंख्य शब्द आजही आढळतात.

हेही वाचा

भाषा वाहती असते. तिच्यात कुठले कुठले शब्द येऊन मिसळतात आणि प्रवाहात ते एकजीव होतात. वाहत्या प्रवाहातले घटक वेगळे काढता येत नाहीत. प्रवाहाला मिळणारे ओहळ आणि दोन्ही बाजूचे किनारे यातून सर्व काही पोटात घेऊन प्रवाह पुढे जात राहतो. कुठल्या स्थानावरून प्रवाहात काय मिसळले आहे याचाही अंदाज बांधता येत नाही. कबीरांनीच म्हटलं आहे, ‘भाषा बहता नीर’… भाषेला गाठोड्यासारखे बांधून ठेवता येत नाही. तिच्यातले शब्द कुलूपबंद करता येत नाहीत. भाषेत कोणतेही शब्द शिरू नयेत म्हणून नाकाबंदी करता येत नाही. कुठून कुठून शब्द येतच राहतात आणि भाषा समृद्ध होत जाते. भाषेला जात नसते, धर्म नसतो. ती एखाद्या प्रदेशाची, मुलखाची किंवा समाजाची असते. उर्दू ही तर या मातीतली भाषा आहे.

जुन्या पिढीत मराठवाड्यात अनेक लोक उर्दूचे जाणकार होते. त्यातल्या काहींनी उर्दू, मराठीत मोठं काम करून ठेवलं आहे. द. पं. जोशी यांनी दीर्घकाळ हैदराबादच्या (आताच्या तेलंगणा) मराठी साहित्य परिषदेचे पदाधिकारी म्हणून काम केलं. अनेक उर्दू पुस्तकांचा त्यांनी अनुवाद केला. कुर्रतुलऐन हैदर यांच्या कथासंग्रहाचा ‘पानगळीची सळसळ’ या नावाने त्यांनी केलेला अनुवाद प्रसिद्ध आहे. मिर्झा गालिबच्या पद्याचे अनुवाद सगळीकडे झाले पण गालिबच्या आणि अली सरदार जाफरी यांच्या निवडक मूळ उर्दू पत्रांच्या अनुवादाचे कामही त्यांनी केले आहे.

हिंदीतले प्रसिद्ध लेखक प्रेमचंद यांनी सुरुवातीला बरंच लेखन उर्दूत केलं. नवाब राय या नावाने ते उर्दूत लिहायचे. त्यांनी अनेक कथा उर्दूत लिहिल्या. त्यांची सेवासदन ही कादंबरी मूळ रूपात उर्दूत पहिल्यांदा ‘बाजार ए हुस्न’ या नावाने प्रसिद्ध झाली होती. पंजाबचे लेखक राजेंद्रसिंह बेदी यांचे उर्दू कथासाहित्यात मोठे नाव आहे. ‘एक चादर मैली सी’ या कादंबरीमुळे ते परिचित आहेत.

फिराक गोरखपुरी हे प्रसिद्ध उर्दू शायर. मीर तकी मीर आणि गालिबनंतरचं एक मोठं नाव.

एक मुद्दत से तेरी याद हमें आई नही

और हम भूल गये, ऐसा भी नही

इसी खंडभर मे कही कुछ दिये टूटे हुए

इन्ही से काम चलाओ बडी उदास है रात

अशी त्यांची प्रसिद्ध शायरी. या ‘फिराक’ यांचं नाव रघुपती सहाय. उर्दू भाषेत ज्ञानपीठ पुरस्काराचे ते पहिले मानकरी.

उर्दूचे प्रख्यात समीक्षक गोपीचंद नारंग यांचा जन्म बलुचिस्तानातला. महाविद्यालयीन शिक्षण दिल्लीत पूर्ण केल्यानंतर आयुष्यातला बहुतेक काळ त्यांनी दिल्लीतच विद्यापीठ अध्यापनात घालवला. ते साहित्य अकादमीचे अध्यक्षही होते. उर्दू साहित्याचा चालता-बोलता संदर्भकोश अशीच त्यांची ख्याती होती. हिंदुस्थानी किस्सों से मखूज उर्दू मसनविया, उर्दू भाषा और साहित्य, उर्दू की नई बस्ती, उर्दू गझल और हिंदुस्तानी जेहन- ओ- तहजीब असे उर्दू साहित्याची समीक्षा करणारे अनेक ग्रंथ त्यांनी लिहिले. इंग्रजी, हिंदी आणि उर्दू या तिन्ही भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते. गालिब, अमीर खुसरो यांच्यावर त्यांची अभ्यासपूर्ण व्याख्याने जगभर होत असत. जगातल्या सर्व महत्त्वाच्या विद्यापीठात त्यांनी उर्दूवर भाषणे दिली. नारंग यांचे वैशिष्ट्य हे की उर्दूचा समाजशास्त्रीय अभ्यास त्यांनी केला. भाषा वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही त्यांनी या भाषेचा विविध अंगाने वेध घेतला. भारतीय मानस, पुराणकथा यांचे उर्दू साहित्यात जे प्रतिबिंब उमटले त्याचीही त्यांनी समीक्षा केली. अनेक उर्दू लेखकांचा अभ्यास करताना ज्या सांस्कृतिक अवकाशातून ही साहित्यनिर्मिती झाली त्या पार्श्वभूमीचा धांडोळा त्यांनी घेतला.

हेही वाचा

अन्य कुठल्याही भाषेला एवढे अस्तित्वासाठी झगडावे लागत नाही. भारतात मराठी, कन्नड किंवा गुजराती अशा कुठल्याही भाषेला ती हिंदूंची आहे की मुस्लिमांची असा प्रश्न विचारला जात नाही. पण उर्दूबाबत मात्र हे होते. तिच्याशी धर्म जोडला जातो असे निरीक्षण नारंग यांनीच नोंदवून ठेवले आहे. उर्दूची ७० टक्के शब्दसंख्या इथली आहे आणि तिच्यात ३० टक्के अरबी- फारसी शब्द आहेत. उर्दू आणि हिंदी या दोन्ही भाषांचं अभिन्न नातं आहे, हे नारंग यांनी वारंवार सांगितलं. प्रेमचंद असोत अथवा फिराक गोरखपुरी (रघुपती सहाय), किंवा गोपीचंद नारंग…भाषेला धर्म नसतो आणि ती एखाद्या धर्माला चिकटवता येत नाही हे सांगणारी अशी अनेक उदाहरणे देशभर आहेत. इतकंच काय पाकिस्तानातल्या एखाद्या उर्दू लेखकाच्या लेखनातही कसे भारतीय लोकमानसातले संदर्भ येतात ते ‘ये कैसी सरहदे’ या इंतजार हुसेन यांच्यावरील लेखात इथेच मांडले होते.

भाषा ही जीवन व्यवहारातून आकाराला येते. भाषेला वाहतं ठेवण्यात सर्वसामान्यांचा मोठा वाटा असतो. तेच भाषा घडवत असतात. पण भाषा अनेकदा राजकारणासाठी शस्त्र म्हणूनसुद्धा हाती घेतली जाते. भाषा राजकारणासाठी भांडवल म्हणून वापरली जाते आणि भाषेचंही राजकारण केलं जातं. बोलीभाषासुद्धा काही अंतरावर बदलल्या जातात पण महामार्गावर जसे कोणते शहर किती किलोमीटर अंतरावर आहे ते सांगणारे दगड असतात तसे भाषेच्या बाबतीत नसते. भाषेचा असा कुठला बिंदू नसतो. कारण भाषा अशी कुठल्याही ठिकाणापासून वेगळी काढता येत नाही आणि तिचा अवकाशही मोजता येत नाही. एकवेळ जमिनीची विभागणी केली जाऊ शकते पण भाषेची विभागणी होत नाही. भलेही ती लिपीमध्ये बद्ध असते पण अगणित जिभांवर असलेलं तिचं अस्तित्व असं सहजासहजी पुसता येत नाही.



Source link

loksatta readers feedback and response on waqf amendment act central government लोकमानस : इतर धार्मिक अल्पसंख्याक सुपात

0
loksatta readers feedback and response on waqf amendment act central government लोकमानस : इतर धार्मिक अल्पसंख्याक सुपात


‘‘वक्फ’ करता जो वफा..’ हे संपादकीय (१८ एप्रिल) वाचले. गरज नसताना चुकीच्या वेळी हा कायदा पास केला आहे असे काही सरळ भाबड्या लोकांना वाटत असेल तर त्यांना भाजप सरकारच्या पाताळयंत्री महत्त्वाकांक्षा माहिती नाहीत इतकाच अर्थ आहे. हिंदू धार्मिक संस्थांवर गैरहिंदू सदस्यांना स्पष्ट नकार परंतु मुस्लीम वक्फ बोर्डावर गैरमुस्लीम सदस्यांची नियुक्ती म्हणजे कट्टर हिंदुत्ववादी लोकांना खूश करण्याचा हा प्रकार आहे. हा कायदा अमलात आला म्हणजे सुपात असलेले इतर धार्मिक अल्पसंख्याक बौद्ध, शीख, जैन, ख्रिाश्चन यांच्या बाबतीत कार्यवाही हा पुढील टप्पा आहे.

गरीब लोक फक्त मुस्लीम समाजात जसे आहेत तसे ते हिंदू समाजातही आहेत. भारतातील हिंदू धार्मिक मंदिरे, मठ, संस्थाने यांच्याकडे लाखो हेक्टर जमिनी आहेत. लाखो कोटी रुपयांच्या स्थावर व जंगम मालमत्ता आहेत. या मालमत्ता ८० कोटी गरीब हिंदू जनतेत वाटल्या तर किमान उदरनिर्वाह करण्याचा प्रश्न सुटेल. हजारो शाळा, दवाखाने निर्माण करता येतील. वक्फ बोर्डातच नाही तर सर्वच धार्मिक स्थळांना मिळणाऱ्या देणग्यांमध्ये, मालमत्तांमध्ये अफरातफर केल्याच्या बातम्या येतात. या देणग्या व मालमत्ता सार्वजनिक हितासाठी वापरण्याचा कायदा केला तर खऱ्या अर्थाने देश समृद्ध होईल.

● नंदन नांगरे, नांदेड</p>

महत्त्वाची पण दुर्लक्षित तरतूद….

‘‘वक्फ’ करता जो वफा..’ हे तसेच त्याआधी ४ एप्रिल आणि १५ एप्रिल रोजी प्रसिद्ध झालेली संपादकीये वाचली. या सर्व संपादकीय लेखांत पारंपरिक कायद्यात कालसापेक्ष सुधारणा करण्याचे रास्त समर्थन आणि विसंगत तरतुदींचे समर्पक खंडन केले आहे. या सर्व वादप्रतिवादात आणि सुनावणीत अत्यंत महत्त्वाच्या तरतुदीकडे लक्ष गेलेले दिसत नाही. पूर्वीच्या कायद्यात वक्फ करण्यासाठी धर्माची मर्यादा नव्हती. मुस्लिमेतरांनीही वक्फसाठी दान देण्याची तरतूद होती आणि अनेकांनी अशा प्रकारचे दान केले आहे. पूर्वीच्या ‘‘कोणत्याही व्यक्तीच्या, कोणत्याही स्थावर किंवा जंगम मालमत्तेच्या’’ या शब्दांऐवजी ‘‘कोणतीही व्यक्ती जी किमान पाच वर्षांपासून इस्लामचे पालन करत आहे असे दाखवते किंवा दर्शवते, आणि जी अशा स्थावर किंवा जंगम मालमत्तेची मालक आहे, व ज्या मालमत्तेच्या अर्पणामध्ये कोणतीही बेकायदेशीर नसल्याचे स्पष्ट आहे, अशा मालमत्तेच्या’’ असा बदल करण्यात आला आहे.

हेही वाचा

याचा अर्थ असा होतो की मुस्लिमेतर, नव्याने इस्लाम स्वीकारून पाच वर्षे न झालेले किंवा निधर्मी मुस्लीम वक्फ करू शकणार नाहीत. ही तरतूद नव्याने समावेश करण्याचे कारण अजूनही गुलदस्त्यात आहे आणि त्यावर आक्षेप किंवा भाष्य केल्याचे दिसत नाही. व्यक्तिगत मालमत्ता कशासाठी वापरावी किंवा कोणाला दान द्यावी हा व्यक्तिस्वातंत्र्याचा भाग आहे. मात्र नव्या कायद्यात या अधिकारावर मर्यादा कशासाठी लादण्यात आल्या याची वाच्यता झालेली दिसत नाही.

● डॉ. शमसुद्दिन तांबोळी, अध्यक्ष, मुस्लीम सत्यशोधक मंडळ

सदसद्विवेकबुद्धीचा क्षीण आवाज

‘‘वफ्क’ करता जो वफा…’ हे संपादकीय वाचले. लोकशाही व्यवस्थेत संसदेतील बहुमत ही मनमानी हुकूमशाहीची कायमची सनद नसते. देशातील जनतेच्या सदसद्विवेकबुद्धीचा क्षीण का असेना पण आवाज कोणत्या ना कोणत्या रूपात कुठून तरी अनिर्बंध सत्तेला आवर घालण्यासाठी प्रकट होतो. वफ्कबाबत जे घडले त्याचा हा अन्वयार्थ म्हणता येईल.

● गजानन गुर्जरपाध्ये

विश्वासार्हता गमावली, त्याचे काय?

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २६ ते २८ एप्रिल २०२५ या दरम्यान होणारी राज्य सेवा मुख्य परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. ही परीक्षा आता २७ ते २९ मे दरम्यान होईल. मागील काही वर्षांत आयोगाची कार्यपद्धती ढेपाळत चालली आहे आणि ती नजीकच्या भविष्यकाळात सुधारेल अशी चिन्हे काही दिसत नाहीत. पदाची जाहिरात दिल्यानंतर तिलाही शुद्धिपत्रक निघून सुधारित जाहिरात देण्याची पद्धत तर आता नियमित झाली आहे. निकालात घोळ हा आणखी एक नित्याचा प्रकार. ताज्या परीक्षेबाबतही तेच झाले.

राज्य सेवा पूर्व परीक्षेच्या मुख्य परीक्षेसाठी पात्रता ठरवून जो निकाल जाहीर झाला, त्यात ‘कट ऑफ’ पेक्षा जास्त गुण मिळवूनदेखील काही उमेदवारांस गुणवत्ता यादीत स्थान मिळाले नाही. ते उमेदवार कोर्टात गेले आणि कोर्टाचा निकाल त्यांच्या बाजूने लागला तरी अभ्यास करायला वेळच उरणार नाही, या विचारातून आंदोलन उभे राहिले आणि आयोगाला पुन्हा एकदा माघार घ्यावी लागून परीक्षा पुढे ढकलावी लागली. यावरूनच आयोगाने स्वत:च्या कार्यपद्धतीबद्दल विश्वासार्हता किती गमावली आहे याची कल्पना येते.

●अशोक साळवे, मालाड, मुंबई</p>



Source link

अग्रलेख : हिंदीसक्तीचे ‘संपर्कसूत्र’

0
अग्रलेख : हिंदीसक्तीचे ‘संपर्कसूत्र’



हिंदीबाबतच्या सर्व सरकारी तर्कटाला स्वाभाविक उत्तर हे आहे, की विरोध हिंदी भाषेला नाही, तर मराठी भाषिक राज्यात होणाऱ्या त्या भाषेच्या सक्तीला आहे.

राज्यात इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा शिकावी लागणार, याचा आनंद झालेला वर्ग बहुधा सध्या एकच असेल, तो म्हणजे यासाठी शिकवणी वर्ग सुरू करून त्यातून मिळू शकणारा आर्थिक लाभ पाहू शकणारा. म्हणजे, राजकीय विरोध, शैक्षणिक क्षेत्रातून उमटणारी तीव्र नापसंती आणि सरकारच्या पातळीवर करावी लागत असलेली सारवासारव हे या विषयावरील एक चर्चाविश्व झाले. त्याच्या पल्याड या निर्णयाशी थेट संबंधित असलेले पालक आणि विद्यार्थी यांच्यासाठी या निर्णयाचे आकलन आणखी एका विषयाचे ओझे यापेक्षा वेगळे नसावे. ते पाहता, शिकवणी वर्ग सुरू करण्याचा विचार मनात आलेल्यांव्यतिरिक्त या निर्णयाने खूश होणारे विरळाच. आता, तसे यात ‘एक देश, एक भाषा’ या दिशेने जाण्याच्या मार्गावर आम्हीही कसे आहोत, हे दाखवून केंद्राची तळी उचलल्याचे ‘गुण’ आपल्या प्रगतिपुस्तकात पाडून घेणाऱ्या काही जणांचा समावेशही करावा लागेल, पण ते तसे पुढच्या टप्प्यातील लाभार्थी. सध्या तरी ते, ‘आता हिंदीत’ असे दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या पत्रकारांनी म्हटल्यावर आपल्या मोडक्यातोडक्या हिंदीत, ‘सरकारने ये निर्णय लेकर कोणतीही चूक नही की है’ असे सांगण्यात अधिक मश्गूल.

तर, नवीन शैक्षणिक धोरणातील (एनईपी) त्रिभाषा सूत्राच्या नावाखाली राज्याने मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांत इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य असेल, असा निर्णय घेऊन झालेला आहे. मराठी आणि इंग्रजी याशिवाय इतर माध्यमांच्या ज्या शाळा राज्यात आहेत, तेथील विद्यार्थ्यांना त्या माध्यमाची भाषा शिकण्याव्यतिरिक्त मराठी आणि इंग्रजी या भाषा शिकाव्याच लागत असल्याने त्यांना हा निर्णय लागू नाही. कारण, ते आत्ताच तीन भाषा शिकत आहेत. आता खरे तर ‘एनईपी’मध्ये पहिलीपासून त्रिभाषा सूत्र राबवा, असा काही थेट उल्लेख नाही. तरीही राज्य सरकारला असे काही तरी करावेसे आणि त्यातही हिंदी शिकावेच लागेल, असेच का म्हणावेसे वाटले असावे, या प्रश्नाला काही ठोस उत्तरे अद्याप तरी मिळालेली नाहीत. ‘एनईपी’ची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य अभ्यासक्रम आराखडा तयार करण्यात आला. तो करणाऱ्या सुकाणू समितीनेही असे थेट काही सुचवले होते, असे नाही. तिसरी भाषा शिकवायचीच असेल, तर भारतीय भाषांचे पर्याय द्या, असे समितीने म्हटल्याचे समितीचे सदस्य सांगतात. मग फक्त हिंदीच का? सरकारी अधिकाऱ्यांनी याबाबत काही स्पष्टीकरणे दिलेली आहेत, त्यांचा आधी ऊहापोह करून मग त्यावर भाष्य अधिक योग्य.

शिक्षण विभागाचे अगदी प्राथमिक म्हणणे असे, की मुलांना लहान वयात अधिक भाषा शिकता येतात, हे संशोधनामुळे सिद्ध झालेले असल्याने पहिलीपासून तिसरी भाषा शिकविण्यात काही गैर नाही. ती तिसरी भाषा हिंदी अशासाठी, की मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषांसाठी देवनागरी लिपी वापरण्यात येत असल्याने विद्यार्थ्यांना अक्षरओळख अधिक सुलभ जाईल. शिवाय, परिसरात, दूरचित्रवाणीवरही हिंदीचा प्रभाव दिसतोच. परिणामी, हिंदी लवकर शिकता येईल. दुसरा मुद्दा अधिकारी मांडतात, तो असा, की सध्याच्या प्रचलित व्यवस्थेत इयत्ता पाचवीपासून हिंदी भाषा आहेच, तर आठवीपासून हिंदी किंवा हिंदी-संस्कृत किंवा फक्त संस्कृत असे पर्याय आहेत. आता फक्त पाचवीऐवजी पहिलीपासून हिंदी शिकवायला सुरुवात होणार असून, याला सक्ती म्हणता येणार नाही. पहिलीपासून हिंदी आणण्याच्या निर्णयाच्या बाजूने आणखी एक युक्तिवाद असाही आहे, की शालेय स्तरावर ‘एनईपी’ लागू झाल्यावर ‘अॅकॅडेमिक बँक ऑफ क्रेडिट्स’ म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याचे श्रेयांकांचे खाते तयार होईल. विषय शिक्षण हे त्या-त्या इयत्तांतील गुणांपुरते मर्यादित न राहता, श्रेयांकांमध्ये मोजले जाणार असल्याने आणि ते पुढेही ग्राह्य धरले जाणार असल्याने अन्य माध्यमांच्या (ज्या शाळांत त्या माध्यमाची भाषा आणि मराठी आणि इंग्रजी, अशा तीन भाषा आत्ताही शिकवल्या जातात) विद्यार्थ्यांच्या तुलनेत राज्यातील मराठी आणि इंग्रजी माध्यमाची (ज्या शाळांत सध्या पहिलीपासून दोनच भाषा आहेत) मुले पुढे जाऊन मागे पडू नयेत, यासाठी तिसरी भाषा पहिलीपासून समाविष्ट करणे गरजेचेच होते.

या सर्व सरकारी तर्कटाला अगदी पहिले आणि स्वाभाविक उत्तर हे आहे, की विरोध हिंदी भाषेला नाही, तर मराठी भाषिक राज्यात होणाऱ्या त्या भाषेच्या सक्तीला आहे. लहान वयात मूल अधिक भाषा सहज शिकते, असे संशोधन सांगत असले, तरी ते सक्तीने नाही, हे कसे सोयीस्करपणे विसरून चालेल? दुसरे म्हणजे मराठी आणि हिंदीची लिपी सारखी असली, तरी लेखनाचे, शुद्धलेखनाचे नियम भिन्न आहेत. अगदी विभक्ती प्रत्यय जोडून लिहायचे, की स्वतंत्र, यामध्ये फरक आहे. लिपी सारखी आहे, म्हणून एक वेळ अक्षरओळख झाल्यावर अक्षरे वाचता येतील, पण भाषा कशी समजणार? त्यासाठी ती वेळ देऊन शिकावी आणि शिकवावी लागते. ती योग्य पद्धतीने शिकविण्यासाठी पुरेसे शिक्षक असणे, हा त्यामुळे आणखी एक आनुषंगिक मुद्दा. हिंदी भाषा परिसरात बोलली जाते, दूरचित्रवाणीवर असते, असे म्हणताना केवळ शहरी भागांचा विचार करून कसे चालेल? राज्याच्या सीमांवरील परिसरांत त्या सीमेला लागून असलेल्या राज्यांतील भाषा तेथे अधिक जवळच्या असतील, की हिंदी? म्हणूनच हिंदीबरोबर गुजराती, कन्नड, कोकणी, तेलुगू, उर्दू यापैकी एखादी भाषा शिकण्याचा पर्याय उपलब्ध करून देणे अधिक श्रेयस्कर नाही का? हाच प्रतिवाद ‘अॅकॅडेमिक बँक ऑफ क्रेडिट्स’च्या मुद्द्यालाही लागू होतोच. श्रेयांक कमी पडू नयेत, म्हणून तिसरी भाषा आणायची असेल, तर भाषानिवडीचे वेगवेगळे पर्याय देऊच शकता येतात, हिंदीची सक्ती कशाला?

या सगळ्या प्रतिवादानंतरच्या अवकाशात जे आणखी काही मुद्दे उरतात, त्यांचा मात्र अधिक गांभीर्याने आणि शैक्षणिक दृष्टिकोनातून विचार करणे आवश्यक. ज्या त्रिभाषा सूत्राच्या नावाखाली हिंदीचा समावेश होतो आहे, त्याचे मर्म शिक्षण व्यवस्थेला खरेच कळले आहे का, हा प्रश्न यातील प्राथमिक. मातृभाषा किंवा स्थानिक भाषेतून शिक्षणाला पर्याय नसावाच. पण, त्या जोडीने इंग्रजी आणि एखादी भारतीय भाषा यावी, असा यामागचा साधा, सरळ विचार. म्हणजे, खरे तर उत्तर भारतात हिंदी, इंग्रजीच्या जोडीने तिसरी भाषा म्हणून मराठी, तमिळ, कन्नड, मल्याळम, तेलुगू शिकवले जाण्याचे पर्याय उपलब्ध होणेही अपेक्षित आहे. त्याबद्दल मात्र फारसे कुणी बोलताना आढळत नाही. तेथे यापैकी एखादी भाषा शिकणे अनिवार्य केली जाऊ शकते का, हा प्रश्नही हिंदीसक्तीच्या तर्कटानुसार गैरलागू नसावा. शिवाय, जेव्हा पहिलीपासून इंग्रजी भाषा आणली गेली, तेव्हा त्याला किमान करिअरसाठीच्या व्यावसायिक उपयुक्ततेची जोड होती, आहे. हिंदीला ती आहे का, याचा विचार झाला आहे का? आणि अगदी करिअरसाठी नाही, आनंदासाठी भाषा शिकायची असेल, तरी एक तर ती सक्तीने का? आणि ती अभ्यासक्रमात आणून, मार्काधिष्ठित करून लेखन-वाचनावर भर देण्यापेक्षा ऐच्छिक ठेवून त्यातील भाषिक आनंद घेण्यापुरती का नसावी?

सरतेशेवटी, मुळात जेथे ‘एनईपी’च त्रिभाषा सूत्राच्या अंमलबजावणीत कोणत्याही विशिष्ट भाषेचा आग्रह धरत नाही आणि कोणत्याही राज्यावर कोणतीही भाषा लादली जाणार नाही, असे म्हणते, तेथे त्यावरून तयार केल्या गेलेल्या धोरणात तिसरी भाषा सक्तीने येण्याचे कारणच नाही. या सक्तीने मराठी-अमराठीसारख्या राजकीय वादांना खतपाणी घातले गेले, तर आश्चर्य वाटू नये. आत्ताही ते झडत आहेतच. त्यात अजून भर. या सगळ्यात विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांना काय हवे आहे, याचा विचार कधी तरी होणार आहे का? का या घटकांशी संवादाचे ‘संपर्कसूत्र’ व्यवस्था सोयीस्करपणे विसरली आहे?



Source link

साताऱ्यात ४५ गावे, २९८ वाड्यांना ५५ टँकरने पाणीपुरवठा

0
साताऱ्यात ४५ गावे, २९८ वाड्यांना ५५ टँकरने पाणीपुरवठा


सातारा : सातारा जिल्ह्यातील ४५ गावे व २९८ वाड्या तहानलेल्या आहेत. ६९ हजार ८७२ नागरिक व ४२ हजार ७४७ जनावरांना ५५ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. एप्रिल महिन्यातच इतक्या टँकरने पाणी दिले जात असताना मे महिन्यात भीषणता आणखी वाढणार आहे.सातारा जिल्ह्यात दिवसेंदिवस तीव्र उन्हाळा जाणवू लागल्याने पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. उन्हाच्या तडाख्याने भूजल पातळी खालावत चालली आहे. त्यामुळे नदी, नाले, ओढे, विहिरींनी तळ गाठला आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासूनच पाणी टंचाईच्या संकटाने डोकं वर काढलं आहे. त्यामुळे ग्रामीण भागात पाण्याची मागणी वाढली असल्याने टंचाईग्रस्त भागात प्रशासनाने टँकर सुरू केले. दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढू लागल्याने भूजल पातळीत घट झाली आहे. तसेच पाण्याचे स्त्रोतही आटू लागल्याने जिल्ह्यात टंचाईचा प्रश्न गंभीर होवू लागला आहे.

मे महिन्यात उन्हाची दाहकता वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे टँकरची मागणी वाढल्यास प्रशासनाला पाण्यासाठी आणखी पुरवावे लागणार आहेत. माणमध्ये सुरुवातीला शासकीय टँकरनेच पाणीपुरवठा करण्यात येत होता. पण, टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढली असल्याने खासगी टँकरही सुरू करावे लागलेत. सध्या ३० टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. यामध्ये शासकीय १० आणि खासगी २० टँकरचा समावेश आहे. तसेच पाच विहिरी आणि एका बोअरवेलचेही अधिग्रहण करण्यात आले आहे. माण तालुक्यातील बिजवडी, पांगरी, येळेवाडी, पाचवड, राजवडी, जाधववाडी, वडगाव, मोगराळे, मोही, डंगिरेवाडी, थदाळे, वावरहिरे, अनभुलेवाडी, दानवलेवाडी, हस्तनपूर, सोकासन, धुळदेव, वरकुटे म्हसवड, कारखेल, हवालदारवाडी, भाटकी, संभुखेड, खडकी, रांजणी, जाशी, पळशी, मार्डी, खुटबाव, पर्यंती, इंजबाव, भालवडी, पानवण, विरळी, वारूगड, कुळकजाई, टाकेवाडी, उकिर्डे, कोळेवाडी,

परकंदी, आंधळी, महिमानगड, दोरगेवाडी यासह २४ गावे व २९१ वाड्यांना ४७ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.पाटण जाधववाडी, शिद्रुकवाडी (वरची तालुक्यातील जंगलवाडी, खळे), शिद्रुकवाडी (काढणे), भोसगाव (आंबुळकरवाडी), चव्हाणवाडी नाणेगाव असे १ गाव ४ वाड्यांना ४ टँकरने पाणी दिले जात आहे. वाई तालुक्यातील मांढरदेव अंतर्गत गडगेवाडी, बालेघर अंतर्गत कासुर्डेवाडी, अनपटवाडी अशा १ गाव ३ वाड्यांना ३ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. कोरेगाव तालुक्यातील भंडारमाचीलाही टँकर सुरू करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत देण्यात आली.

जिल्ह्यातील माण, खटाव, कोरेगाव, खंडाळा, फलटण, वाई, पाटण, जावली व महाबळेश्वर तालुक्यांतील ४७३ गावे व ६५७ वाड्यांमध्ये पाणी टंचाई जाणवण्याची शक्यता गृहीत धरून १४ कोटी ६१ लाख ९० हजार रुपये खर्चाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. याशनी नागराजन, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सातारा</p>



Source link

साखरेला चांगला दर असल्याने उसाचे दुसरे देयक पाचशेने द्या, बळीराजा संघटनेची आग्रही मागणी; आंदोलनाचाही इशारा

0
साखरेला चांगला दर असल्याने उसाचे दुसरे देयक पाचशेने द्या, बळीराजा संघटनेची आग्रही मागणी; आंदोलनाचाही इशारा



baliraja demands 500 second sugarcane installment due to good sugar rates warns of protest || साखरेला चांगला दर असल्याने उसाचे दुसरे देयक पाचशेने द्या, बळीराजा संघटनेची आग्रही मागणी; आंदोलनाचाही इशारा



Source link

घोडा यात्रा आणि चक्रपाणी पालखी महोत्सवाने फलटण भक्तीमय रंगात न्हालं”

0
घोडा यात्रा आणि चक्रपाणी पालखी महोत्सवाने फलटण भक्तीमय रंगात न्हालं”

फलटण – “दक्षिण काशी” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पवित्र श्रीक्षेत्र फलटणमध्ये आज महानुभाव पंथीयांची प्रसिद्ध घोडा यात्रा व चक्रपाणी पालखी महोत्सव दिमाखात पार पडला. संपूर्ण शहरात भक्तिभावाने भारावलेले वातावरण पाहायला मिळाले.

या उत्सवाची सुरुवात श्रीमंत आबासाहेब मंदिर येथे स्थान पूजन व पालखी पूजनाने झाली. यावेळी आमदार सचिन पाटील, सौ. जिजामाला रणजीतसिंह नाईक निंबाळकर, सौ. मनीषाताई समशेरसिंह नाईक निंबाळकर, रणवीरराजे समशेरसिंह नाईक निंबाळकर, फलटण नगरपरिषदेचे CEO मोरे साहेब, नगरसेवक अनुप शहा, सुदामराव मांढरे, महानंदचे डिके पवार, नवामळा झांज पथकाचे माणिक शिंदे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

महाआरतीनंतर पितळी घोडे डोक्यावर घेऊन मानकरी नगरप्रदक्षिणेस निघाले. चक्रपाणी पालखी छबिनाही गुलाल उधळत श्रीमंत आबासाहेब मंदिरातून मार्गस्थ झाला. या पालखीने तेली गल्ली, श्रीकृष्ण मंदिर, शुक्रवार पेठ, रंगारी महादेव मंदिर, अवस्थान मंदिर, बाणगंगा नदी असा प्रवास करत पुन्हा रात्री श्रीकृष्ण मंदिरात पोहोचून महाआरती झाली. अंतिम टप्प्यात पालखी पुन्हा श्रीमंत आबासाहेब मंदिरात सन्मानपूर्वक पोहोचली.

दरम्यान शहरातील गणेश मंडळे, बिल्डर-डेव्हलपर्स, नगरसेवक यांनी सरबत, मठ्ठा, पाण्याची सुविधा दिली. चार टँकरद्वारे रस्त्यावर पाणी फवारणी करून उष्णतेवर नियंत्रण ठेवण्यात आले.

श्रीकृष्ण देवस्थान ट्रस्टच्या वतीने मंदिरांमध्ये भाविकांसाठी सर्व सुखसोई पुरवण्यात आल्या. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष आचार्य कवीश्वर कुलाचार्य शामसुंदर विद्वांस शास्त्री बाबाजी, विश्वस्त सुदामराज बाबा विद्वांस, अर्जुनराव नाळे, बाळासाहेब ननावरे, बाळासाहेब शिंदे, सिताराम शिंदे यांनी मान्यवरांचा सत्कार केला.

व्यवस्थापक मुरलीधर बाबाजी, संत-महंत, तपस्विनी व हजारो देश-विदेशातील सद्भक्तांच्या उपस्थितीने संपूर्ण शहर भक्ति आणि उत्साहाच्या लहरींमध्ये न्हालं.

बाळासाहेबांचा आवाज काढण्यापेक्षा विचार आचरणात आणा, एकनाथ शिंदे

0
बाळासाहेबांचा आवाज काढण्यापेक्षा विचार आचरणात आणा, एकनाथ शिंदे



instead of raising balasahebs voice put his thoughts into practice says eknath shinde || बाळासाहेबांचा आवाज काढण्यापेक्षा विचार आचरणात आणा, एकनाथ शिंदे



Source link

बाबा भिडे पूल दीड महिना बंद, डेक्कन मेट्रो स्टेशन परिसरात पादचारी पूल उभारण्याचे काम सुरू

0
बाबा भिडे पूल दीड महिना बंद, डेक्कन मेट्रो स्टेशन परिसरात पादचारी पूल उभारण्याचे काम सुरू



baba bhide bridge to be closed to traffic from april 21 to june 6 || बाबा भिडे पूल दीड महिना बंद, डेक्कन मेट्रो स्टेशन परिसरात पादचारी पूल उभारण्याचे काम सुरू



Source link

RCB vs PBKS IPL 2025: छोटेखानी लढतीत पंजाबची बंगळुरूवर सरशी; नेहल वढेराची दमदार खेळी

0
RCB vs PBKS IPL 2025: छोटेखानी लढतीत पंजाबची बंगळुरूवर सरशी; नेहल वढेराची दमदार खेळी


पावसामुळे बाधित लढतीत पंजाब किंग्ज संघाने अग्रेसर असल्याचं सिद्ध करत बंगळुरूवर ५ विकेट्सनी विजय मिळवला. पावसामुळे हा सामना १४ षटकांचा खेळवण्यात आला. पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरने टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला. आततायी आक्रमण करणारे आरसीबीचे फलंदाज पंजाबच्या गोलंदाजांसमोर निरुत्तर ठरले. ६३/९ अशा स्थितीतून टीम डेव्हिडने बंगळुरूला सावरलं. डेव्हिडने ५० धावांची खेळी केली आणि बंगळुरूने ९५ धावांची मजल मारली. प्रत्युत्तरादाखल खेळताना पंजाबनेही नियमित अंतरात विकेट्स गमावल्या. नेहल वढेराने

छोटेखानी लक्ष्याचा पाठलाग करताना प्रभसिमरन सिंग आणि प्रियांश आर्य यांनी २२ धावांची सलामी दिली. भुवनेश्वर कुमारने प्रभसिमरनचं आक्रमण थोपवलं. पाठोपाठ प्रियांश आर्यला जोश हेझलवूडने तंबूत परतावलं. श्रेयस अय्यर आणि जोश इंगलिस यांनी पडझड रोखत डाव सावरला. खेळपट्टीवर स्थिरावलाय असं वाटत असतानाच जोश हेझलवूडचा चेंडू स्लाईस करण्याच्या प्रयत्नात श्रेयस अय्यर बाद झाला. त्याने ७ धावा केल्या. दोन चेंडूंनंतर जोश इंगलिसही हेझलवूडचीच शिकार ठरला. यानंतर नेहल वढेराने सामन्याची सूत्रं हाती घेतली. फिरकीपटू सुयश शर्माच्या गोलंदाजीवर चौकार, षटकार वसूल करत त्याने धावगतीचं दडपण कमी केलं. मोक्याच्या क्षणी शशांक सिंगला भुवनेश्वर कुमारने बाद केलं.

कमी षटकांच्या सामन्यात कशी बॅटिंग करू नये याचा नमुना सादर करत आरसीबीने पंजाबच्या गोलंदाजांपुढे लोटांगण घातलं. डावखुऱ्या अर्शदीप सिंगला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जोश इंगलिसच्या ग्लोव्ह्जमध्ये जाऊन विसावला. सॉल्टचा कित्ता गिरवत कोहलीनेही अर्शदीपच्या गोलंदाजीवर आक्रमण केलं. पण ते अपयशी ठरलं. या दोघांप्रमाणेच लायम लिव्हिंगस्टोनने झेव्हियर बार्टलेटच्या गोलंदाजीवर आक्रमण केलं. पण तोही अपयशी ठरला. फिरकीपटू युझवेंद्र चहलने जितेश शर्माला माघारी धाडलं. कृणाल पंड्या मार्को यान्सनच्या गोलंदाजीवर झेल देऊन तंबूत परतला. खेळपट्टीवर स्थिरावलेल्या रजत पाटीदारलाही चहलनेच फसवलं. त्याने २३ धावांची खेळी केली. लिव्हिंगस्टोनच्या जागी इम्पॅक्ट प्लेयर म्हणून आलेला मनोज भडागेही एक धाव करून तंबूत परतला. भुवनेश्वर कुमारने ८ धावा करत प्रतिकार केला पण हरप्रीत ब्रारला मोठा फटका मारण्याचा त्याचा प्रयत्न बार्टलेटच्या हातात गेला. पुढच्याच चेंडूवर ब्रारने यश दयाळला पायचीत केलं. ६३/९ अशा स्थितीतून टीम डेव्हिडने आरसीबीला बाहेर काढलं. डेव्हिडने पंजाबच्या गोलंदाजांवर जोरदार आक्रमण करत चौकार, षटकार वसूल केले. त्याने हेझलवूडला स्ट्राईकही दिला नाही. डेव्हिडने २६ चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकारांसह नाबाद ५० धावांची खेळी केली. डेव्हिडच्या अर्धशतकाच्या बळावर आरसीबीने ९५ धावांची मजल मारली. पंजाबतर्फे अर्शदीप सिंग, मार्को यान्सन, युझवेंद्र चहल आणि हरप्रीत ब्रार यांनी प्रत्येकी २ विकेट्स पटकावल्या.



Source link

‘नॅशनल हेरॉल्ड’प्रकरणी सोलापुरात काँग्रेस, भाजप आमनेसामने

0
‘नॅशनल हेरॉल्ड’प्रकरणी सोलापुरात काँग्रेस, भाजप आमनेसामने


सोलापूर : नॅशनल हेरॉल्डप्रकरणी काँग्रेसचे माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या विरोधात सक्तवसुली संचालनालयाने आरोपपत्र दाखल केल्याच्या निषेधार्थ काँग्रेसजणांनी सोलापुरात केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने केली. तर दुसरीकडे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी गांधी कुटुंबीयांची सखोल चौकशी व्हावी म्हणून आंदोलन केले.

काँग्रेसच्या शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने झाले. दहा वर्षांपूर्वी बंद केलेली तपासाची फाईल मोदी सरकारने दुष्ट हेतूने पुन्हा उघडल्याबद्दल नरोटे यांनी या वेळी संताप व्यक्त केला. या आंदोलनात शहर महिला अध्यक्षा प्रमिला तूपलवंडे, पक्षाचे युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, सुदीप चाकोते, श्रीदेवी फुलारे, ॲड. करिमुन्निसा बागवान, संजय गायकवाड, शोभा बोबे, आजी मला नदाफ आदींचा सहभाग होता.

दुसरीकडे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी कन्ना चौकात नॅशनल हेरॉल्डप्रकरणी गांधी परिवाराची सखोल चौकशी व्हावी, या मागणीसाठी आंदोलन केले. भाजयुमोचे शहराध्यक्ष डॉ. किरण देशमुख यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात काँग्रेस आणि गांधी कुटुंबीयांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. गांधी कुटुंबीय ईडी चौकशीला सामोरे जाण्यासाठी का घाबरत आहे, असा सवाल आंदोलकांनी केला. भाजयुमोचे शहर सरचिटणीस रवि कोटमळे, अनिल कंदलगी, जय साळुंखे, अजित गादेकर, नरेंद्र पिसे, राहुल घोडके, सिद्धार्थ मंजेली आदींनी या आंदोलनात सहभाग घेतला होता.



Source link