Sunday, June 28, 2026
Home Blog Page 38

फलटणमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा तीव्र तुटवडा; एजन्सीसमोर नागरिकांच्या लांबच लांब रांगा

0
फलटणमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा तीव्र तुटवडा; एजन्सीसमोर नागरिकांच्या लांबच लांब रांगा

फलटण : फलटण शहरात सध्या घरगुती गॅस सिलेंडरचा तीव्र तुटवडा निर्माण झाला असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गॅस एजन्सीसमोर सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांना लांबच लांब रांगा लावाव्या लागत आहेत. अनेक ठिकाणी तासन्तास प्रतीक्षा करूनही सिलेंडर मिळत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शहरातील विविध भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत होत नसल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. बुकिंग करूनही वेळेत सिलेंडर मिळत नसल्याचे अनेक नागरिक सांगत आहेत. परिणामी गृहिणींसमोर स्वयंपाकाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
दरम्यान, काही नागरिकांकडून गॅस पुरवठादारांकडून मुद्दाम साठेबाजी केली जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. कृत्रिम तुटवडा निर्माण करून काही ठिकाणी जादा दराने सिलेंडर विक्री होत असल्याची चर्चा शहरात सुरू आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहक अक्षरशः हैराण झाले आहेत.
या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने लक्ष घालण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. शहरात गॅसचा तुटवडा नेमका कशामुळे निर्माण झाला, पुरवठा का कमी झाला आणि साठेबाजी होत आहे का, याची चौकशी करावी, अशी मागणीही पुढे येत आहे.
घरगुती गॅसचा सुरळीत पुरवठा होण्यासाठी प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणावी, अन्यथा नागरिकांचा रोष अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

फलटण नगरपरिषदेकडून सार्वजनिक नळ जोडण्या बंद करण्याच्या कारवाईविरोधात भारतीय युवा पँथरचा इशारा

0
फलटण नगरपरिषदेकडून सार्वजनिक नळ जोडण्या बंद करण्याच्या कारवाईविरोधात भारतीय युवा पँथरचा इशारा

फलटण प्रतिनिधी : फलटण नगर परिषद हद्दीतील सार्वजनिक पाणी नळ जोडण्या बंद करण्याचे काम सध्या नगर परिषदेकडून सुरू आहे. या कारवाईमुळे शहरातील सर्वसामान्य व गरीब नागरिकांसमोर पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.
गरीब, अल्पसंख्याक आणि दलित वस्त्यांमधील अनेक कुटुंबांची आर्थिक परिस्थिती अद्याप सुधारलेली नसल्यामुळे त्यांना नवीन नळ जोडणी घेणे शक्य नाही. त्यामुळे सार्वजनिक नळ जोडण्या बंद करण्याची कारवाई तात्काळ स्थगित करून अशा वस्त्यांमध्ये उलट अधिक सार्वजनिक पाणी नळ जोडण्या उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
ही कारवाई त्वरित थांबवली नाही तर भारतीय युवा पँथर संघटनेच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौरव अहिवळे यांनी दिला.
यावेळी भारतीय युवा पँथर संघटनेचे महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख शुभम गायकवाड, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा सौ. मंगलाताई जाधव तसेच सदस्य आकाश शिंदे, निखील सरोदे, हेमंत कांबळे व इतर महिला सदस्य उपस्थित होत्या.

फलटणमध्ये नागरी आरोग्यवर्धिनी केंद्राचे उद्घाटन; नागरिकांना मोफत तपासणी व उपचारांची सुविधा

0
फलटणमध्ये नागरी आरोग्यवर्धिनी केंद्राचे उद्घाटन; नागरिकांना मोफत तपासणी व उपचारांची सुविधा


फलटण प्रतिनिधी : फलटण नगरपरिषदेच्या अंतर्गत सोमवार पेठ येथे उभारण्यात आलेल्या नागरी आरोग्यवर्धिनी केंद्राचे उद्घाटन माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, उपनगराध्यक्ष प्रियदर्शिनी रणजितसिंह भोसले, मुख्याधिकारी निखील जाधव, बांधकाम समितीचे सभापती सोमाशेठ जाधव, ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता, ज्येष्ठ नेते मिलिंद नेवसे, भीमदेव बुरुंगले यांच्यासह विविध विषय समित्यांचे सभापती, नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते.
यावेळी बोलताना माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी शहरातील प्रत्येक प्रभागात दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी अशा आरोग्यवर्धिनी केंद्रांची आवश्यकता असल्याचे सांगितले. नागरिकांना त्यांच्या परिसरातच आरोग्य सेवा मिळाल्यास त्यांचा वेळ व खर्च दोन्ही वाचणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
उपनगराध्यक्ष प्रियदर्शिनी रणजितसिंह भोसले यांनी प्रभागनिहाय आरोग्य शिबिरे आयोजित करण्याचा प्रस्ताव मांडला. विशेषतः महिलांसाठी तपासणी शिबिरे घेऊन कॅन्सर तपासणी, रक्त तपासणी, मधुमेह व रक्तदाब तपासणी तसेच डोळ्यांची तपासणी यांसारख्या सेवा नागरिकांपर्यंत पोहोचवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
सोमवार पेठेत सुरु झालेल्या या केंद्राच्या वरच्या मजल्यावर वाचनालय सुरु करण्याचे निर्देश देण्यात आले असून शहरात लवकरच 50 नवीन स्ट्रीट लॅम्प बसवण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
‘500 रुपयांचा खर्च आता शून्य’ — नगराध्यक्ष समशेरसिंह
नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले की, यापूर्वी सोमवार पेठ परिसरातील नागरिकांना साध्या तपासणीसाठी शहरात जावे लागत होते. ओपीडी, औषधे आणि प्रवास खर्च मिळून साधारण 500 रुपये खर्च होत होता. मात्र आता या आरोग्यवर्धिनी केंद्रामुळे नागरिकांना मोफत तपासणी व उपचारांची सुविधा मिळणार आहे.
या केंद्रात रक्त तपासणी, लघवी तपासणी, रक्तदाब, मधुमेह तपासणी तसेच कॅन्सर तपासणीसारख्या विविध चाचण्या उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले.
नागरिकांनी सेवांचा लाभ घ्यावा — प्रियदर्शिनी भोसले
उपनगराध्यक्ष प्रियदर्शिनी रणजितसिंह भोसले यांनी सांगितले की, अनेक वर्षांपासून शहरातील नागरिकांसाठी आरोग्यसेवा केंद्रासाठी जागा उपलब्ध नव्हती. मात्र रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या पुढाकारामुळे हा प्रश्न सुटला असून नागरिकांनी या केंद्राच्या सेवांचा लाभ घ्यावा.
ज्येष्ठ नेते भीमदेव बुरुंगले यांनी सांगितले की, शहरातील दुर्लक्षित भागात आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे हा विकासाचा महत्त्वाचा टप्पा आहे. रणजितदादा आणि समशेरदादा यांच्या नेतृत्वामुळे शहराच्या विकासाला नवी गती मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.
शहरात चार आरोग्यवर्धिनी केंद्रांची योजना
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष कोंडके यांनी नागरी आरोग्यवर्धिनी केंद्राच्या कार्यपद्धतीची माहिती दिली. शहरात एकूण चार आरोग्यवर्धिनी केंद्र सुरु करण्याची योजना असून जागेअभावी ही योजना अनेक वर्षे प्रलंबित होती. नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, नगरसेवक सोमाशेठ जाधव आणि नगरसेवक अशोकराव जाधव यांच्या सहकार्यामुळे हा प्रश्न मार्गी लागल्याचे त्यांनी सांगितले.
ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात मिळणाऱ्या सेवा आता शहरातील नागरिकांना या आरोग्यवर्धिनी केंद्रातून उपलब्ध होणार असल्याने उपजिल्हा रुग्णालयावरील ताण कमी होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच दत्तनगर येथील जुन्या ग्रामीण पोलीस ठाण्याच्या जागेत तिसरे आरोग्यवर्धिनी केंद्र सुरु करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साखरवाडी गटाच्या आशा गटप्रवर्तक सारिका घार्गे यांनी केले.

चीन सीमेवर कर्तव्य बजावताना पाटणचा सुपुत्र शहीद; ‘ऑपरेशन स्नो लेपर्ड’ दरम्यान वीरमरण

0


पाटण (सातारा): सातारा जिल्हा हा शौर्य आणि बलिदानाची परंपरा असलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो. याच मातीतील आणखी एका सुपुत्राने देशाच्या रक्षणासाठी आपले सर्वोच्च (Satara News) बलिदान दिले आहे. पाटण तालुक्यातील पिंपळोशी गावचे सुपुत्र बाळकृष्ण विलासराव निकम (वय ४२) यांना सिक्कीममधील चीन सीमेवर ‘ऑपरेशन स्नो लेपर्ड’ अंतर्गत कर्तव्य बजावत असताना वीरमरण आले. तब्बल २३ वर्षे भारतीय सैन्यात सेवा बजावल्यानंतर, निवृत्तीच्या उंबरठ्यावर असतानाच त्यांनी मातृभूमीसाठी प्राण अर्पण केले.(Satara News)

कर्तव्य बजावताना काळाचा घाला

शहीद बाळकृष्ण निकम हे भारतीय सैन्यदलात गेल्या दोन दशकांहून अधिक काळ कार्यरत होते. सध्या त्यांची नियुक्ती सिक्कीम येथील अतिदुर्गम आणि उणे तापमानातील चीन सीमेवर होती. ‘ऑपरेशन स्नो लेपर्ड’ सारख्या कठीण मोहिमेवर असताना, निसर्गाच्या प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देताना त्यांना वीरमरण आले. ही बातमी शुक्रवारी लष्करी मुख्यालयातून त्यांच्या गावी कळवण्यात आली आणि अवघ्या काही क्षणांत संपूर्ण पाटण तालुक्यावर दुःखाचा डोंगर कोसळला.(Satara News)

पिंपळोशी गावावर शोककळा

“आपला बाळकृष्ण शहीद झाला,” ही बातमी समजताच पिंपळोशी गावासह संपूर्ण पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती वाऱ्यासारखी पसरली. निकम कुटुंबीयांच्या घरासमोर गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. शहीद बाळकृष्ण हे सुट्टीवर आल्यावर गावातील प्रत्येक लहानापासून थोरापर्यंत सर्वांशी आपुलकीने आणि मनमोकळेपणाने मिसळायचे. त्यांच्या जाण्याने केवळ एका कुटुंबाचा आधार गेला नाही, तर गावाने आपला एक लाडका सुपुत्र गमावला आहे, अशी भावना ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.

निकम यांच्या निधनामुळे त्यांच्या घरातील दृश्य अत्यंत हृदयद्रावक होते. वृद्ध आईचा हंबरडा आणि वडिलांच्या डोळ्यांतील न थांबणारे अश्रू पाहून उपस्थितांचेही काळीज पिळवटून निघाले. शहीद बाळकृष्ण यांच्या मागे आई, वडील, पत्नी पूनम, भाऊ शिवराज आणि बहीण रूपाली असा परिवार आहे. विशेषतः त्यांची अर्णव आणि प्रणव ही दोन लहान मुले आपल्या वडिलांच्या परतण्याची वाट पाहत होती, हे दृश्य पाहून पिंपळोशी गावातील प्रत्येक डोळा पाणावला होता.

शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

शहीद बाळकृष्ण निकम यांचे पार्थिव लष्करी विमानाने पुण्यात आणि तेथून रुग्णवाहिकेने त्यांच्या मूळ गावी पिंपळोशी येथे आणले जाणार आहे. जिल्हा प्रशासन आणि पोलीस दलाच्या वतीने अंत्यसंस्काराची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. शहीद निकम यांना शासकीय इतमामात आणि लष्करी लवाजम्यासह अखेरचा निरोप देण्यात येईल. सातारा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी आणि हजारोंच्या संख्येने नागरिक या वीरपुत्राला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा



Source link

फलटणमध्ये जमीन नोंदींचा गोंधळ; ‘सिटी सर्व्हे’ व ७/१२ दुहेरी नोंदीवरून वाद, स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

0
फलटणमध्ये जमीन नोंदींचा गोंधळ; ‘सिटी सर्व्हे’ व ७/१२ दुहेरी नोंदीवरून वाद, स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

फलटण | प्रतिनिधी : जमिनीच्या नोंदींमध्ये पारदर्शकता असावी अशी अपेक्षा असताना फलटण तालुक्यात मात्र ‘सिटी सर्व्हे’ आणि ‘७/१२’ अशा दुहेरी नोंदींचा गंभीर पेच निर्माण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात महसूल प्रशासनाची कार्यपद्धती संशयास्पद असल्याचा खळबळजनक आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे. विशेषतः प्रांताधिकाऱ्यांच्या निर्णयप्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत या प्रकरणाची तक्रार राज्याचे महसूलमंत्री Chandrashekhar Bawankule यांच्याकडे करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
नेमके प्रकरण काय?
फलटण शहरातील गट नं. ४९/पै या जमिनीबाबत हा वाद निर्माण झाला आहे. एकाच जमिनीचे ‘सिटी सर्व्हे’ आणि ‘७/१२’ असे दोन स्वतंत्र रेकॉर्ड असणे नियमबाह्य मानले जाते. त्यामुळे १० फेब्रुवारी २०२६ रोजी तहसीलदारांनी या जमिनीचा ७/१२ उतारा बंद करण्याचे आदेश दिले होते.
मात्र या आदेशाविरुद्ध प्रांताधिकाऱ्यांकडे अपील दाखल करण्यात आले आणि त्यानंतर या प्रकरणाला नवे वळण मिळाले.
प्रांताधिकाऱ्यांच्या निर्णयावर सवाल
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर आणि ॲड. सचिन शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रांताधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर आक्षेप नोंदवले.
संघटनेच्या मते —
दोन दिवसांत निर्णय : १६ फेब्रुवारीला अपील दाखल झाले आणि अवघ्या दोन दिवसांत म्हणजे १८ फेब्रुवारीला तहसीलदारांचा आदेश रद्द करून निकाल देण्यात आला.
नैसर्गिक न्यायाचा भंग : मूळ अर्जदारांना नोटीस न देता किंवा त्यांची बाजू ऐकून न घेता एकतर्फी निर्णय घेतल्याचा आरोप करण्यात आला.
प्रलंबित प्रकरणे असताना घाई : २०२४ पासून अनेक प्रकरणे प्रलंबित असताना या विशिष्ट प्रकरणात दाखवलेली घाई संशयास्पद असल्याचे संघटनेने म्हटले आहे.
याबाबत बोलताना जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर म्हणाले,
“प्रांताधिकाऱ्यांचा कारभार अंधाधुंदीचा असून सामान्य नागरिकांशी त्यांची वागणूकही योग्य नाही. या अन्यायाविरोधात आम्ही शेवटपर्यंत लढणार आहोत.”
अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचा ‘जैसे थे’ आदेश
प्रांताधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात बाधितांनी सातारा येथील अप्पर जिल्हाधिकारी न्यायालयात धाव घेतली. त्यावर सुनावणी झाल्यानंतर १३ मार्च २०२६ रोजी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणावर ‘जैसे थे’ (Status Quo) ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सध्या प्रांताधिकाऱ्यांच्या निर्णयाला तात्पुरता लगाम बसला आहे.
शेतकरी संघटनेची आक्रमक भूमिका
या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, तसेच महसूल प्रशासनातील कथित अनियमिततेवर कारवाई व्हावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे. महसूल विभागातील गोंधळामुळे सामान्य शेतकरी व नागरिक भरडले जात असल्याचा आरोपही संघटनेने केला.
या पत्रकार परिषदेला फलटण तालुकाध्यक्ष नितीन यादव, प्रवक्ते प्रमोद गाडे, डॉ. रविंद्र घाडगे, किरण भोसले, बाबा कोकरे यांच्यासह संघटनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

फलटणमध्ये हॉटेल व्यावसायिक आक्रमक; गॅस पुरवठा बंदीच्या निषेधार्थ १७ मार्चला तहसील कार्यालयावर मोर्चा

0
फलटणमध्ये हॉटेल व्यावसायिक आक्रमक; गॅस पुरवठा बंदीच्या निषेधार्थ १७ मार्चला तहसील कार्यालयावर मोर्चा

फलटण: जागतिक स्तरावर इराण-अमेरिका तणावामुळे निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता स्थानिक हॉटेल व्यवसायावरही दिसू लागला आहे. स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या एलपीजी (LPG) गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याने केंद्र सरकारने घरगुती गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या पुरवठ्यावर निर्बंध घातल्याची माहिती समोर आली आहे. या निर्णयामुळे हॉटेल व्यवसाय अडचणीत सापडला असून फलटण तालुका हॉटेल असोसिएशन आक्रमक झाली आहे.

असोसिएशनच्या वतीने या निर्णयाच्या निषेधार्थ मंगळवार, १७ मार्च २०२६ रोजी फलटण तहसील कार्यालयावर धडक देत निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हॉटेल व्यावसायिकांच्या म्हणण्यानुसार, गॅस पुरवठा बंद झाल्यामुळे अनेक हॉटेल्सचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे. यामुळे हजारो कामगारांच्या रोजगारावर संकट निर्माण झाले आहे. परिस्थिती अशीच कायम राहिली तर अनेक हॉटेल्स कायमस्वरूपी बंद करण्याची वेळ येऊ शकते, अशी भीती व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.
या पार्श्वभूमीवर हॉटेल व्यावसायिकांच्या अडचणींवर चर्चा करण्यासाठी आणि सरकारकडे मागण्या मांडण्यासाठी १७ मार्च रोजी सकाळी १०:३० वाजता फलटण तहसील कार्यालय येथे बैठक आणि निवेदन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या वेळी तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांच्यासमोर व्यावसायिक आपली भूमिका मांडणार आहेत.
फलटण तालुका हॉटेल असोसिएशनने तालुक्यातील सर्व हॉटेल मालक आणि संबंधित व्यावसायिकांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे. “सरकारच्या निर्णयामुळे हॉटेल व्यवसाय मोठ्या संकटात सापडला आहे. न्याय मिळवण्यासाठी आणि आपली बाजू सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी हे निवेदन महत्त्वाचे आहे,” असे असोसिएशनच्या वतीने सांगण्यात आले.

सातारा जिल्ह्यातील ह्रदयद्रावक घटना; पोहोण्यास कालव्यात उतरलेल्या तीन कामगारांचा गुदमरुन मृत्यू

0


सातारा: जिल्ह्यातील सुळवस्ती येथे अत्यंत ह्रदयद्रावक घटना घडली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. हिंगणगाव-आदर्की रस्त्यावरील सुळवस्ती (Satara) येथे आज दुपारी ह्रदयद्रावक घटनेत तिघांना दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. धोम-बलकवडी प्रकल्पाच्या पोटकालव्यामध्ये पोहण्यासाठी (Sunk) उतरलेले तीन परप्रांतीय तरुण सिमेंट पाईपमध्ये अडकल्याने त्यांचा जागीच गुदमरून मृत्यू झाला. मृतांमध्ये 20 ते 35 वयोगटातील ओडिसा राज्यातील तरुणांचा समावेश आहे. 

कालव्यात पोहण्यासाठी उतरल्यानंतर झालेल्या दुर्घटनेत ज्योतीराम नाईक, श्रीराम जगाई हेबरम आणि सतीन बीवजी नाईक या तिघांचा पाण्यात बुडून, गुदमरुन मृत्यू झाला. दुर्दैवी घटनेतील मृत तिघेही मूळचे ओडीसा राज्यातील असून कामानिमित्त सातारा जिल्ह्यात वास्तव्यास होते. या घटनेची माहिती मिळताच लोणंद पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तिन्ही युवकांचे मृतदेह सिमेंटच्या पाईपमधून बाहेर काढण्यात आले आहे. तसेच, या घटनेची नोंद लोणंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

रॅश ड्रायव्हिंगने घेतली बळी

भंडाऱ्यात रॅश ड्रायव्हिंगने स्टील उत्पादक सनफ्लॅग कंपनीत प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षक असलेल्या तरुणाचा बळी घेतला. ही घटना भंडाऱ्याच्या वरठी येथील सनफ्लॅग कंपनीच्या प्रवेशद्वारावर दोन दिवसांपूर्वी घडली होती. कर्तव्यावर असलेला हा सुरक्षारक्षक प्रवेशद्वार बंद करीत असताना त्याचवेळी भरधाव आणि रॅश ड्रायव्हिंग करून कंपनीत प्रवेश करणाऱ्या एका कार चालकानं त्याला जबर धडक दिली, यात तो गंभीर जखमी झाला. प्रथम भंडाऱ्यात आणि नंतर त्याच्यावर नागपूर इथं उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. सितीन रहांगडाले (25) असं मृतकाचं नावं असून तो मुळचा गोंदिया जिल्ह्याच्या तिरोड्यातील डव्वेटोला येथील रहिवासी आहे. कुटुंबीयांनी आज त्याचा मृतदेह थेट सनफ्लॅग कंपनीच्या प्रवेशद्वारावर ठेवला. सुरक्षा रक्षक पुरविणाऱ्या एजन्सीनं मृतकाच्या कुटुंबाला आर्थिक मोबदला आणि मृत्युनंतरचे सर्व आर्थिक लाभ द्यावे, अशी मागणी करण्यात आली. सायंकाळी उशिरापर्यंत हा मृतदेह कंपनीच्या प्रवेशद्वारावर ठेवण्यात आला होता. त्यानंतर सनफ्लॅग कंपनी प्रशासनं आणि सुरक्षारक्षक पुरविणाऱ्या एजन्सीनं मृतकाच्या कुटुंबीयाला आर्थिक मोबदला आणि लेखी आश्वासन दिल्यानंतर प्रकरण निवळलं. दरम्यान, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, याकरिता वरठी आणि भंडारा पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

हेही वाचा

जय पवार हे तुमचाच भाऊ आहे, टेलिफोन करायला पण वेळ नाही का? सुधीर मुनगंटीवारांचा रोहित पवारांवर पलटवार

आणखी वाचा



Source link

बारामती विधानसभा पोटनिवडणूक : अंतिम मतदार यादी जाहीर; मतदारसंख्या 3.83 लाख

0
बारामती विधानसभा पोटनिवडणूक : अंतिम मतदार यादी जाहीर; मतदारसंख्या 3.83 लाख


पुणे : बारामती (२०१) विधानसभा मतदारसंघाच्या आगामी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १ जानेवारी २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीचे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण करण्यात आले असून १० मार्च २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अंतिम यादीनुसार मतदारसंघातील एकूण मतदारसंख्या ३ लाख ८३ हजार ७६७ इतकी झाली आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या ६ फेब्रुवारी २०२६ रोजीच्या पत्रानुसार बारामती विधानसभा मतदारसंघासाठी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार ९ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यानंतर ९ फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत दावे व हरकती स्वीकारण्यात आल्या. प्राप्त अर्जांची छाननी करून आवश्यक दुरुस्त्या केल्यानंतर १० मार्च २०२६ रोजी अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात आली.
अंतिम मतदार यादीतील तपशीलानुसार पुरुष मतदारांची संख्या १,९३,४९६, महिला मतदारांची संख्या १,९०,२७१, तर इतर मतदारांची संख्या २४ आहे. एकूण मतदारसंख्या ३,८३,७६७ इतकी नोंदविण्यात आली आहे.
यापूर्वी २० ऑक्टोबर २०२४ रोजी प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीत एकूण मतदारसंख्या ३,६०,६०८ इतकी होती. तर ९ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीत ही संख्या ३,८८,३७१ इतकी नोंदविण्यात आली होती.
सदर अंतिम मतदार यादी नागरिक व राजकीय पक्षांसाठी पाहण्यासाठी उपलब्ध करण्यात आली आहे. या यादीसंदर्भात लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५० मधील तरतुदीनुसार अपील करण्याची सुविधा आहे. संबंधित अपील जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, पुणे यांच्याकडे १५ दिवसांच्या आत दाखल करता येईल, अशी माहिती मिनल कळसकर यांनी दिली.

वेगाने दुचाकी चालवण्यास विरोध केल्याचा राग; गॅरेज मालक व भावावर लाकडी दांडक्याने हल्ला, चौघे अटकेत

0
वेगाने दुचाकी चालवण्यास विरोध केल्याचा राग; गॅरेज मालक व भावावर लाकडी दांडक्याने हल्ला, चौघे अटकेत

फलटण (प्रतिनिधी): रस्त्यावरून वेगाने दुचाकी चालवण्याबाबत जाब विचारल्याचा राग मनात धरून गॅरेज मालक आणि त्यांच्या भावावर लाकडी दांडक्याने गंभीर मारहाण करणाऱ्या टोळीतील आरोपींना फलटण शहर पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात काही अल्पवयीन मुलांचाही सहभाग असल्याचे निष्पन्न झाले असून पोलिसांनी चार मुख्य आरोपींसह तीन विधीसंघर्षित बालकांना ताब्यात घेतले आहे.
नेमकी घटना काय?
ही घटना २२ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री सुमारे ९.३० वाजण्याच्या सुमारास घडली. अनिल विठ्ठल हिरणवाळे हे शंकर मार्केट येथील त्यांचे गॅरेज बंद करून बाहेर थांबले होते. त्याचवेळी गोसावी गल्ली परिसरातील ७ ते ८ तरुण दुचाकींवरून मोठा आवाज करत आणि अतिवेगाने त्या ठिकाणाहून जात होते.
यावेळी अनिल हिरणवाळे यांनी त्यांना “एवढ्या वेगाने गाड्या का चालवता? कुणाला तरी धडक लागेल,” असे सांगत समज दिली.
मात्र ही समज टोळीला मान्य झाली नाही. या कारणाचा राग मनात धरून काही वेळाने संशयित आरोपी पुन्हा त्या ठिकाणी आले आणि अनिल हिरणवाळे तसेच त्यांचे भाऊ संतोष हिरणवाळे यांच्यावर लाकडी दांडक्याने आणि हाताने बेदम मारहाण केली. या हल्ल्यात अनिल हिरणवाळे गंभीर जखमी झाले.
पोलिसांत गुन्हा दाखल
या घटनेप्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५८/२०२६ नुसार विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. हल्ल्यानंतर आरोपी फरार झाले होते. मात्र पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत आरोपींचा शोध घेऊन अटक सत्र सुरू केले.
आरोपींना अटक
पोलिसांनी या प्रकरणात पुढील आरोपींना अटक केली आहे:
संदीप विठ्ठल जाधव (वय २०)
सुनील उर्फ सतिश राजू मोरे (वय २०) – यांना २४ फेब्रुवारी रोजी अटक
गणेश अजय जाधव (वय १८) – याला ६ मार्च रोजी अटक करून ११ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली
प्रशांत सुनील जुवेकर (वय २१) – याला ९ मार्च रोजी अटक करून पोलीस कोठडीत रवानगी
याशिवाय या गुन्ह्यात सहभागी असलेल्या तीन विधीसंघर्षित बालकांना देखील पोलिसांनी ताब्यात घेऊन सातारा येथील बाल न्यायमंडळासमोर हजर केले आहे.
पोलिसांचा इशारा
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिनेश शिंदे करत आहेत. शहरातील नागरिक, व्यापारी तसेच सामान्य जनतेला त्रास देणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांनी दिला आहे.

सहावीच्या विद्यार्थिनींकडून दहावीचे पेपर तपासले? फलटणमध्ये खळबळ

0


SSC Exam Satara : दहावीच्या परीक्षेशी संबंधित एक धक्कादायक प्रकार सातारा जिल्ह्यात समोर आला आहे. फलटण (Phaltan) तालुक्यातील विडणी गावातील उत्तरेश्वर हायस्कूलमध्ये शिक्षकानं थेट सहावीच्या दोन विद्यार्थिनींकडून दहावीच्या पेपरची तपासणी करून घेतल्याची प्राथमिक माहिती आहे. वैभव शेंडे असं या शिक्षकाचं नाव असून दहावीचा मराठी विषयाचा पेपर सहावीच्या विद्यार्थिनींच्या मदतीनं तपासला जात असल्याचा आरोप होत आहे. या संदर्भातील CCTV फुटेजही समोर आलं आहे. या घटनेमुळं शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

Satara School Controversy : CCTV फुटेजमुळं प्रकरण उघड

शिक्षक वैभव शेंडे हे दहावीच्या मराठी विषयाचे पेपर तपासत असताना सहावीच्या दोन विद्यार्थिनींकडून मदत घेत असल्याची प्राथमिक माहिती आहे. या संपूर्ण घटनेचा CCTV फुटेज समोर आल्यानंतर हा प्रकार उघड झाला. या घटनेनंतर संबंधित शिक्षकावर शिक्षण विभागाकडून काय कारवाई केली जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

School Response : मुख्याध्यापिकांनी बोलण्यास नकार

या प्रकरणाबाबत शाळेच्या मुख्याध्यापिका शुभांगी शिर्के यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्यांनी फोनवर बोलण्यास नकार देत प्रत्यक्ष भेटून माहिती देऊ, असं सांगितलं. 

Pune Paper Leak : पुण्यात दहावीचा गणिताचा पेपर टेलिग्रामवर लीक

दरम्यान, राज्यात दहावी बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त आणि तणावमुक्त वातावरणात पार पडाव्यात यासाठी राज्य मंडळाकडून प्रयत्न केले जात आहेत. मात्र तरीही विविध गैरप्रकार समोर येत आहेत. नागपूरमधील पेपर फुटीच्या प्रकरणानंतर आता पुणे जिल्ह्यात दहावीचा गणिताचा पेपर टेलिग्रामवर लीक झाल्याची घटना समोर आली आहे. यामुळं शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे.

Math Paper Leak Pune : तीन दिवस आधीच प्रश्नपत्रिका ग्रुपवर

मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या गणित विषयाची प्रश्नपत्रिका परीक्षा होण्यापूर्वीच एका टेलिग्राम ग्रुपवर शेअर करण्यात आली होती. विशेष म्हणजे गणित भाग-2 चा पेपर परीक्षा होण्याच्या तीन दिवस आधीच ग्रुपवर टाकण्यात आला होता. बोर्डानं अधिकृत प्रश्नपत्रिकेशी पडताळणी केल्यानंतर दोन्ही पेपर तंतोतंत जुळत असल्याचं स्पष्ट झालं आहे. या प्रकरणी पुणे बोर्डानं पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

ही बातमी वाचा :

आणखी वाचा



Source link