मध्य प्रदेशातील इंदूर शहर स्वच्छतेच्या अनोख्या प्रयोगांसाठीही ओळखले जाते. इंदूरमध्ये वाहतुकीच्या नियमांकडे होणारे दुर्लक्ष रोखण्यासाठी आणि लोकांना वाहतुकीच्या नियमांची जाणीव करून देण्यासाठी एका महिला वाहतूक पोलिसाने एक अनोखी शैली आणली आहे. तसेच अनेकांना आकर्षित करत आहे. महिला पोलीस आपल्या गाण्यांच्या माध्यमातून लोकांना वाहतुकीच्या नियमांची जाणीव करून देत आहेत. चौकातील वाहनचालकांशी संवाद साधणाऱ्या या महिला पोलिसाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले भारतीय नौदलाचे लेफ्टनंट विनय नरवाल यांना त्यांची पत्नी हिमांशी यांनी हृदयस्पर्शी आणि अश्रूपूर्ण निरोप दिला आहे. नरवाल यांचे पार्थिव दिल्लीत आणले असता इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांच्या पार्थिवाला चिकटून त्यांची पत्नी रडली. या दरम्यान ती म्हणत राहिली, “मी कसं जगणार? सात दिवसांपूर्वी १६ एप्रिल रोजी दोघांचा विवाह झाला होता. त्याच्या हाताची मेंहदी अजून कोरडीही झाली नव्हती, इतक्यात त्याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
Pahalgam Terror Attack Last Video Of Newlywed up Shubham Dwivedi before Dead By Terrorists Goes Viral Says Main Sabko Hara Dunga | Pahalgam Terror Attack : “मी सर्वांना हरवीन…” असं म्हणणारा शुभम द्विवेदी हरला जीवनाची लढाई; मृत्यूच्या एक दिवस आधीचा VIDEO
Sooraj barjataya on hum apke hai kon sequel said will not cast madhuri dixit and salman khan for the next part | हम आपके हैं कौन चा दुसरा भाग येणार का निर्माते सूरज बडजात्या माधुरी दीक्षित व सलमान खानचा उल्लेख करीत म्हणाले
Pahalgam Terror Attack: जम्मू-काश्मीर राज्यातील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ लोकांचा मृत्यू झाला आहे, तर १७ जण जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांनी पहलगाम फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांवर त्यांचा धर्म विचारून त्यांच्यावर गोळीबार केला. अनेक प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, त्यांना कलमा पठण करण्यास सांगण्यात आले. जेणेकरून त्यांच्या धर्माची ओळख होईल. ज्यांनी कलमा पठण केले त्यांना दहशतवाद्यांनी जिवंत सोडले. अशा पद्धतीने दहशतवाद्यांनी आसाम राज्यातील एका हिंदू प्रोफेसरलाही गोळी मारली नाही. कारण ते कलमा पठण करू शकत होते. यामुळे आसाम यूनिवर्सिटीमध्ये बंगाली डिपार्टमेंटमध्ये सहाय्यक प्रोफेसर देबाशीष भट्टाचार्य यांचा जीव वाचला.
ठाणे – कळवा येथील पारसिक रेतीबंदर खाडीत बुधवारी एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची नोंद कळवा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. पोलिसांनी हा मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठविला आहे. मृताची ओळख अद्याप पटली नसल्याची माहिती कळवा पोलिसांनी दिली.
कळवा येथील गणपती विसर्जन घाट जवळ असलेल्या पारसिक-रेतीबंदर खाडीमध्ये एका अज्ञात पुरुषाच्या (४०) मृतदेह खाडीच्या किनाऱ्या जवळ आढळला. याची माहिती स्थानिकांनी कळवा पोलिस ठाण्याला दिली. माहिती मिळताच, कळवा पोलीस ठाण्याचे पथक, ठाणे अग्निशमन दलाचे जवान आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
यावेळी पोलिस कर्मचारी आणि स्थानिक नागरिक यांच्या मदतीने खाडीतील मृतदेह बाहेर काढण्यात आला. कळवा पोलीस कर्मचारी यांच्या ताब्यात हा मृतदेह देण्यात आला आहे. या व्यक्तीचा मृतदेह कळवा पोलीस कर्मचारी यांनी पुढील कार्यवाहीसाठी शवावाहिकेतून छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठविला आहे. या मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम सुरू असल्याचे कळवा पोलिसांनी सांगितले.
जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये भयावह दहशतवादी हल्ला झाला. यामध्ये शहीद झालेल्या भारतीय नौसेनाचे अधिकारी विनय नरवाल यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिला. यावेळी नवविवाहित पत्नी हिमानी दिल्ली एअरपोर्टवर पतीचं पार्थिव पाहून कोलमडून गेली. पत्नीने पतीच्या शवपेटीला बिलगून हंबरडा फोडला. यावेळी ती एकच सवाल विचारत होती की,’मी आता कशी जगू?’
सर्वांचे डोळे पाणावले
“Hope his soul rests in peace..”: Widow of deceased Navy officer Lt Vinay Narwal at his wreath laying ceremony
या दृश्याने सर्वांच्या डोळ्यात पाणी आणले. लग्न होऊन अवघे सातच दिवस झाले होते. 16 एप्रिल रोजी त्यांचे लग्न झाले. पण कोणाला माहित होते की एका आठवड्यात हे नवविवाहित जोडपे कायमचे वेगळे होईल.
#WATCH | Delhi | Indian Navy Lieutenant Vinay Narwal’s wife bids an emotional farewell to her husband, who was killed in the Pahalgam terror attack
लेफ्टनंट नरवाल यांचे पार्थिव इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचताच कुटुंबातील सदस्य, लष्करी अधिकारी आणि तेथे उपस्थित असलेले सामान्य लोक दुःखी झाले. नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश के त्रिपाठी यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आणि अभिवादन केले. त्यांच्यासोबत हवाई दल प्रमुख आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनीही शहीदांना श्रद्धांजली वाहिली.
Navy Chief Admiral Tripathi pays tribute to Lieutenant Vinay Narwal, killed in Pahalgam attack
कर्तव्य बजावताना आपल्या प्राणाची आहुती देणारा एक आशादायक अधिकारी देशाने गमावला आहे. दुसरीकडे, पत्नीचे आनंदी वैवाहिक जीवन सुरू होण्यापूर्वीच कोलमडून गेले. लेफ्टनंट विनय नरवाल यांच्या हौतात्म्याने आपल्याला पुन्हा एकदा आठवण करून दिली आहे की किती तरुण सैनिक आपल्या सुरक्षेसाठी शांतपणे आपली स्वप्ने अर्पण करतात. त्यांच्या अंत्ययात्रेला भेट देण्यासाठी आलेले लोक केवळ दुःखी नव्हते तर देशाला असे शूर पुत्र मिळाल्याचा अभिमानही बाळगून होते.
Retired soldier Anil Mane posted in Srinagar and Pahalgam recall old memories | काश्मिरमध्ये दगड झेलले… पण सध्या स्थिती खूपच सुधारली होती; श्रीनगर, पहलगाममध्ये तैनात निवृत्त जवानांनी आठवणींना दिला उजाळा
Indian Cricketers Emotional Post on Pahalgam Terror Attack: काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या आतंकवादी हल्ल्यानंतर देशभरात शोकाकुल वातावरण आहे. आतंकवाद्यांनी केलेल्या या भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान भारतीय क्रिकेटपटूंनीदेखील याबाबत शोक व्यक्त करत या भ्याड हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याची मागणी केली आहे. पहलगाममध्ये पर्यटकांना त्यांचा धर्म विचारत त्यांच्यावर बेछुट गोळीबार केला.
सध्या भारतात आयपीएलचे सामने खेळवले जात असून सर्व खेळाडू या स्पर्धेत खेळताना दिसणार आहेत. पण घटनेबद्दल पोस्ट करत खेळाडूंनी आपला निषेध व्यक्त केला आहे. भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद सिराजने सोशल मीडियावरील पोस्टद्वारे आपला संताप व्यक्त केला आणि जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला. दोघांनीही ऑल आईज ऑन पहलगाम हा फोटोही शेअर केला.
मोहम्मद सिराज यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर गृहमंत्री अमित शहा यांचा मृतांना श्रद्धांजली वाहतानाचा फोटो शेअर केला. त्यांने लिहिले की, “पहलगाममधील भयानक आणि धक्कादायक दहशतवादी हल्ल्याबाबत वाचलं. धर्माच्या नावाखाली निष्पाप नागरिकांना लक्ष्य करणं आणि त्यांची हत्या करणं हे अत्यंत वाईट आहे. कोणतंही कारण, कोणताही विश्वास, कोणतीही विचारसरणी अशा राक्षसी कृत्याचे कधीही समर्थन करू शकत नाही. हा कसला वाद आहे? जिथे माणसाच्या जीवाला काहीच किंमत नाही.”
हेही वाचा
सिराजने पुढे लिहिले, “त्या कुटुंबांना किती वेदना होत असतील याची तर मी कल्पनाही करू शकत नाही. कुटुंबांना या असह्य दुःखातून बाहेर पडण्याची शक्ती मिळो. मला आशा आहे की हे सगळं लवकरच संपेल आणि या दहशतवाद्यांना शोधून काढत त्यांना कोणतीही दया माया न दाखवता त्यांना शिक्षा केली जाईल.”
हेही वाचा
मोहम्मद सिराजव्यतिरिक्त भारतीय संघाच्या आजी माजी सर्व खेळाडूंनी या ह्रदयद्रावक घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. विराट कोहली, रोहित शर्मा, सचिन तेंडुलकर, मोहम्मद शमी या व अशा अनेक खेळाडूंनी पोस्ट शेअर केल्या आहेत. याशिवाय आयपीएलमधील सर्वच संघांनी पहलगाममधील या हल्ल्याबाबत पोस्ट शेअर केल्या आहेत.
I am deeply saddened to address the tragic terrorist attack in Pahalgam. This heinous act has resulted in significant loss of innocent lives and has left families shattered. Such violence not only targets individuals but also undermines the fabric of our society. In these testing… pic.twitter.com/aQxHZgItxR
Shocked and deeply saddened by the tragic attacks on innocent people in Pahalgam.
The affected families must be going through an unimaginable ordeal – India and the world stand united with them at this dark hour, as we mourn the loss of lives and pray for justice.
Budh make kendra trikon rajyog three rashi will be successfull l नुसता पैसाच पैसा! बुध निर्माण करणार शक्तिशाली केंद्र त्रिकोण राजयोग; ‘या’ तीन राशींचे नशीब फळफळणार