Tuesday, July 21, 2026
Home Blog Page 351

वेबमार्क: गुलाबी डॉल्फिन्सचं रम्य अन् रोमांचक रहस्य

0
वेबमार्क:  गुलाबी डॉल्फिन्सचं रम्य अन् रोमांचक रहस्य


  • Marathi News
  • Opinion
  • Sameer Gaikwad Rasik Article On The Beautiful And Exciting Mystery Of Pink Dolphins

समीर गायकवाड5 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

एकेकाळी उपग्रह वाहिन्यांचे जाळे नव्हते, तेव्हा डिस्कव्हरी वाहिनीचे काही कार्यक्रम दूरदर्शनवर रविवारी सकाळी प्रसारित केले जायचे. त्याला मोठा प्रेक्षकवर्ग लाभला होता. कालांतराने या क्षेत्रात मोठी क्रांती झाली आणि चोवीस तास प्रक्षेपण असणाऱ्या शेकडो वाहिन्या अस्तित्वात आल्या. या त्सुनामीतही डिस्कव्हरी वाहिनी आपलं अस्तित्व टिकवून राहिली, याला कारण तिचं वेगळेपण! या वाहिनीवरील कार्यक्रमांचा आशय विषय ज्यांना आवडतो अशांसाठी एका आगळ्यावेगळ्या डॉक्युमेंट्रीची ही माहिती.. ‘द मिस्ट्री ऑफ द पिंक डॉल्फिन’ हे त्या माहितीपटाचं नाव. तो रिलीज होऊन काही वर्षे झाली असली, तरी अॅमेझॉन प्राइम आणि ‘डॉक्यूबे’वर तो नुकताच दाखल झाला आहे. एरिक एलेना यांनी हा माहितीपट दिग्दर्शित केला आहे. अॅमेझॉनमधील ‘गुलाबी नदीय डॉल्फिन’ (Pink River Dolphin) ज्याला ‘बोटो’ म्हणूनही ओळखले जाते, त्याच्या रहस्यमय उत्पत्ती आणि उत्क्रांतीचा शोध यात घेतला आहे. हा माहितीपट म्हणजे विज्ञान, निसर्ग आणि संशोधन यांचा सुंदर संगम असून, त्यात या अनोख्या, दुर्मिळ प्रजातीच्या पंचवीस दशलक्ष वर्षांच्या अनुकूलनाचा प्रवास मांडण्यात आला आहे.

डॉक्युमेंट्रीची सुरूवात अॅमेझॉनच्या दाट पर्जन्यभारित जंगलातील एका अरुंद उपनदीच्या प्रवाहातून होते, जिथे समुद्रापासून हजारो किलोमीटर दूर अंतरावर गुलाबी नदीय डॉल्फिन आढळतात. डॉल्फिन्सच्या उत्पत्तीविषयी बोलताना, ते समुद्री डॉल्फिनचे वंशज आहेत की प्राचीन काळातील वेगळ्या वंशाचे आहेत, यावर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. या माशांनी अॅमेझॉनच्या उष्णकटिबंधीय पर्यावरणाशी कसे अनुकूलन केले, याचा थेसिस रंजक पद्धतीने समोर येतो.

ही डॉक्युमेंट्री दोन भागात विभागली आहे. पहिला भाग माशांच्या जीवाश्म अभ्यास आणि भूवैज्ञानिक पुराव्यांवर आधारित असून, त्याद्वारे डॉल्फिन्सच्या उत्पत्तीचा शोध लावण्यात आला आहे. यात डॉल्फिन्सच्या प्राचीन इतिहासाचा आणि समुद्रापासून नदीपर्यंतच्या प्रवासाचा समावेश आहे. तर दुसऱ्या भागात, गुलाबी डॉल्फिन्सच्या वर्तमान जीवनाचा आणि त्यांच्या पर्यावरणाशी जुळवून घेण्याच्या क्षमतेचा प्रत्यक्ष शोध, ज्यात त्यांचे पाण्यातले देखणे स्ट्रीमिंग आणि त्यांच्या सुरक्षेचे आव्हान या गोष्टी सामील आहेत. वैज्ञानिक शोधाचा प्रवास कथानकाच्या केंद्रस्थानी असल्याने ते रोचक झाले आहे. शास्त्रज्ञांचे प्रयत्न आणि त्यांचे निष्कर्ष प्रेक्षकांची उत्सुकता चाळवतात.

या डॉक्युमेंट्रीतील डॉल्फिन्सचे दर्शन अत्यंत सुखावह आहे. त्यांचे नैसर्गिक वर्तन आणि त्यांच्या प्रांतातला मानवी हस्तक्षेप यामुळे त्यांच्यासमोर उत्पन्न झालेले धोके यांचा गोषवारा विचार करण्यास प्रवृत्त करतो. यातील मांडणी वैज्ञानिक आणि दृश्यात्मक घटकांचा समतोल साधते. अॅमेझॉनच्या जंगलातील सुंदर दृश्ये, शांत संगीत आणि क्रिस्टेल लेड्रोइट यांचे संयमित निवेदन यामुळे डॉक्युमेंट्री पाहताना उत्साह टिकून राहतो. पहिल्या भागात डॉल्फिन्सचे प्रत्यक्ष दर्शन घडत नसल्याने ज्यांना केवळ पिंक डॉल्फिन पाहायचे आहेत, त्यांना पहिला भाग काहीसा अनाकर्षक वाटू शकतो. मात्र, खरी माहिती याच हिश्श्यात आहे. अॅमेझॉनच्या जंगलातील दृश्ये तसेच डॉल्फिन्सचे ड्रोनने टिपलेले काही थेट शॉट्स अतिशय नयनरम्य आणि आकर्षक आहेत. यातला सर्वांत महत्त्वाचा संदेश जो जगभरातील सर्वच नागरिकांना लागू होतो तो म्हणजे, मानवी हस्तक्षेपामुळे निसर्गाचे जीवनचक्र विस्कळीत होत आहे. अनेक प्रजाती लुप्त झाल्यात, तर काही प्रजाती लोप पावण्याच्या मार्गावर आहेत. अशा जिवांच्या बाबतीत आपण कसे दक्ष राहिले पाहिजे, हे अगदी नेमकेपणे स्पष्ट करण्यात आले आहे.

पिंक डॉल्फिन्सची शिकार करण्याच्या पद्धती किती आधुनिक झाल्या आहेत आणि कसे कमालीच्या निर्दयी पद्धतीने त्यांना मारलं जातं, हे पाहून आपण व्यथित होतो. २०१८ मध्ये इंटरनॅशनल नेचर कन्झर्व्हेशन युनियनने धोक्यात असलेली प्रजाती म्हणून ती घोषित केली आहे. या डॉक्युमेंट्रीतील माहितीचे महत्त्व यावरुन लक्षात यावे. नदीपात्रात आढळणाऱ्या पिंक डॉल्फिन्सचा वंश समुद्री डॉल्फिन्सपासून कसा वेगळा आहे, हे यात लक्षणीयरित्या दाखवले आहे. जगभरातील समुद्रकिनारे गलिच्छ होत चाललेत, असं म्हणून आपण सुटका करून घेऊ शकत नाही. कारण आपण नद्यांच्या पात्रात नेमकं काय काय सोडत आहोत, हेच आपल्याला कळेनासे झाले आहे. यातील काही घटकांचा नदीतील जिवांच्या आयुष्यावर थेट परिणाम होतो, तर काहींचे दुष्परिणाम नदीतील पाणी समुद्रात पोहोचलं तरी होतातच. पिंक डॉल्फिन्सना त्यांच्याशी करावा लागणारा संघर्ष पाहून कोणत्याही सहृदयी व्यक्तीच्या मनावर परिणाम होतो. हा माहितीपट वैज्ञानिक दृष्टिकोनातून गुलाबी डॉल्फिन्सच्या रहस्यमय जगाचा शोध घेण्याचा उत्तम प्रयत्न आहे. मुळात डॉल्फिन्स हे मानवी आकर्षणाचा स्नेहबिंदू आहेत, कारण त्यांचं अजातशत्रू वर्तन आणि मायाळूपण! बुद्धिमान आणि निरागसपणा हे दोन्ही गुण त्यांच्या ठायी असण्यानं त्यांना कितीही पाहिलं, तरी समाधान मिळत नाही. ‘आयएमडीबी’वर याला १० पैकी ७.४ रेटिंग आहे.

जाता जाता…

‘इंटरस्टेलर’ हा ऑल टाइम ग्रेट सिनेमा आता ओटीटीवरून रजा घेईल. ख्रिस्तोफर नोलन यांचा हा मास्टरपीस एव्हरग्रीन सायफाय वर्गातील आहे. त्याचप्रमाणे, मनातल्या भीतीवर कशी मात करावी, याचे अद्भुत तत्त्वज्ञान सांगणारा ‘द कराटे किड’ही अल्पकाळच ओटीटीवर असेल. हे दोन्ही सिनेमे अॅमेझॉन प्राइमवर पाहता येतील.

(संपर्क – sameerbapu@gmail.com)



Source link

रसिक स्पेशल: महासंघर्षाच्या उंबरठ्यावर…

0
रसिक स्पेशल:  महासंघर्षाच्या उंबरठ्यावर…




पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे भारतीय उपखंडातील दीर्घ संघर्षाची नांदी झाली आहे. भारत – पाकिस्तानमधील तणाव पूर्वी न अनुभवलेल्या अनिश्चिततेच्या वाटेवर पोहोचला आहे. यात पाकिस्तानचे अस्तित्व आणि भारताचे जागतिक राजकारणातील स्थान पणाला लागले आहे. त्यामुळे दाराशी आ वासून उभ्या असलेल्या महासंघर्षाला तोंड देण्यासाठी आता सर्व भारतीयांना केवळ भावनिकच नव्हे, तर मानसिक, आर्थिक, बौद्धिक आणि भौतिक तयारी करावी लागेल. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याने भारतातील जनमानसात आक्रोश निर्माण झाला आहे. परंतु, हा हल्ला अचानक झालेला नाही. गेल्या दोन वर्षांत जम्मू विभागात सुरक्षा जवानांवर अनेक दहशतवादी हल्ले झाले आहेत. काश्मिरातील दहशतवादाचा नवा प्रकार म्हणून तो समोर आला आहे. एक तर, पूर्वी या भागांमध्ये दहशतवादी हल्ल्याचे प्रमाण अत्यल्प होते. पण, अलीकडे दहशतवाद्यांनी जम्मू विभागाला लक्ष्य केले आहे. ११ जून २०२४ ला वैष्णोदेवीला जाणाऱ्या यात्रेकरूंच्या बसवर हल्ला करत दहशतवाद्यांनी ११ निष्पापांचे बळी घेतले होते. हे दहशतवादी अत्यंत प्रशिक्षित आहेत आणि त्यांना नमवण्यात सुरक्षा दलांची बरीच शक्ती खर्च होत आहे. या सर्व घटना पाहता, जम्मू – काश्मिरातील दहशतवाद संपल्याचे मिथक जाणीवपूर्वक पसरवले गेल्याचे जाणवते. जम्मू-काश्मीरच्या मतदारांचा लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांतील सहभाग तसेच कोरोना महामारीनंतर या केंद्रशासित प्रदेशातील पर्यटनात झालेली वाढ यांना सूचकांक मानत काश्मीर खोऱ्यातील असंतोष कमी झाल्याचे मानण्यात येत होते. परंतु, त्यापूर्वीही तिथल्या मतदारांनी लोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये हिरीरीने भाग घेतला होता आणि त्याआधी अनेकदा काश्मीर खोऱ्यातील पर्यटनही बहरले होते. तरीही तिथे दहशतवादी घटना नित्यनेमाने घडत होत्या, त्याचीच पुनरावृत्ती आता होते आहे. काश्मिरी जनमानसातील गुंतागुंत : काश्मिरी जनमानस अत्यंत क्लिष्ट आहे. काश्मिरी लोकांमध्ये प्रखर मतमतांतरे आहेत. दहशतवाद्यांच्या पूर्णपणे विरोधात असलेला मोठा वर्ग काश्मीर खोऱ्यात आहे, त्याचबरोबर भारतीय सुरक्षा दलांची तैनाती आणि त्यांच्या शोधमोहिमांनी अस्वस्थ होणारा वर्गही तेवढाच मोठा आहे. भारतीय पर्यटकांवर मनापासून प्रेम करणारे काश्मिरी जसे आहेत, तसेच भारत सरकारचा द्वेष करणारेही आहेत. विशेष दर्जाची आस ठेवत भारतीय संघराज्याचा भाग होण्यास हरकत नसलेले काश्मिरी जसे आहेत, तसे पाकिस्तानात अजिबात सामील व्हायचे नाही, ही स्पष्टता असलेले काश्मिरीही आहेत. भारतापासून वेगळे होण्याची आकांक्षा बाळगलेले युवक अद्याप काश्मिरी समुदायात आहेत आणि पाकिस्तानकडून भ्रमनिरास झालेले फुटीरतावादीही त्यात आहेत. पाकिस्तान अशा विखुरलेल्या काश्मिरी जनसमुदायात भारतविरोधी शक्तींना हवा देतो. पण, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून घुसखोरी करणारे दहशतवादी ही भारताची डोकेदुखी आहे. पाकव्याप्त काश्मिरातून होणारी ही घुसखोरी बंद करणे भारताला अद्याप शक्य झालेले नाही. द्विपक्षीय संबंध मृत्युशय्येवर : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याने भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये अभूतपूर्व तणाव निर्माण झाला आहे. २००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याने दोन्ही देशांतील संबंध कमालीचे बिघडले होते आणि २०१९ च्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर द्विपक्षीय संबंध रसातळाला गेले होते. गेल्या ६ वर्षांत जे नाममात्र संबंध उरले होते, तेही आता जवळपास संपुष्टात आले आहेत. व्हिसावर आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना ताबडतोब परतण्यास भारताने सांगितले आहे आणि भारतासोबत जो किरकोळ व्यापार होता, तो पाकिस्तानने स्थगित केला आहे. भारत-पाकिस्तानदरम्यान प्रत्यक्ष व्यापार अगदीच कमी होता. पण, संयुक्त अरब अमिरातीमार्गे दोन्ही देशांच्या वस्तूंचा बऱ्यापैकी व्यापार होतो. अशा तृतीय पक्षीय व्यापारालाही पाकिस्तानने स्थगिती दिली आहे. दोन्ही देशांनी परस्परांच्या दूतावासातील कर्मचाऱ्यांची संख्या निम्म्याने कमी केली आहे. पाकिस्तानची कारस्थाने आणि कोंडी : स्वातंत्र्य आणि फाळणीनंतर भारताने पाकिस्तानचे सार्वभौमित्व मान्य करत द्विपक्षीय संबंधांना समानता व सन्मानाच्या चौकटीत विकसित करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला होता. मात्र, पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताविरुद्ध सातत्याने काश्मीरचे पालुपद वापरल्याने भारताने बांगलादेश मुक्तिसंग्रामाला त्याच्या निष्कर्षाप्रत पोहोचवत द्विपक्षीय संबंधांमध्ये आपले वर्चस्व निर्माण केले होते. काश्मीरचा प्रश्न द्विपक्षीय स्तरावर सामंजस्याने सोडवण्यात येईल, हे भारताने सिमला कराराद्वारे पाकिस्तानला मान्य करण्यास भाग पाडले होते. या करारामुळे काश्मीर प्रश्नाचे आंतरराष्ट्रीयीकरण होणे बंद झाले; पण पाकिस्तानने हा प्रश्न सामंजस्याने सोडवण्याऐवजी छुप्या युद्धाचा मार्ग पत्करला. दरम्यानच्या काळात जागतिक परिस्थिती कमालीची बदलली. शीतयुद्धानंतर पाश्चिमात्य राष्ट्रांसाठी दहशतवादाविरुद्धचे युद्ध ही प्राथमिकता झाल्याने पाकिस्तानची कोंडी झाली. चीन वगळता इतर कोणत्याही मोठ्या देशाचा त्याला पाठिंबा उरला नाही. पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती सातत्याने हलाखीची होत गेली. आज त्या देशाची अर्थव्यवस्था चीन आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने दिलेल्या कर्जांवर कशीबशी श्वास घेते आहे. अण्वस्त्रसज्जतेचा बागुलबुवा : असे असले तरी भारताच्या तुलनेत झालेली स्वत:ची प्रचंड अधोगती पाकिस्तान मान्य करत नाही. १९९८ मध्ये भारताने केलेल्या अण्वस्त्र चाचणीनंतर पाकिस्ताननेही अशी चाचणी करत स्वत:ला अण्वस्त्रधारी देश घोषित केले. भारताप्रमाणे आपल्याकडेही अण्वस्त्रे असल्यामुळे आपण भारताच्या बरोबरीत आहोत, ही भावना पाकिस्तानी लष्कर आणि सत्ताधाऱ्यांच्या मानसिकतेत भिनली आहे. याच मानसिकतेतून भारताला सतत असुरक्षित ठेवायचे आणि जागतिक राजकारणात एक मोठी शक्ती म्हणून उदयास येऊ द्यायचे नाही, हे कुतंत्र पाकिस्तानने अवलंबले आहे. अन्यथा; पंजाब, काश्मीर किंवा भारताचा कोणताही भाग दहशतवादी कारवाया करुन भारतापासून तोडता येणार नाही, हे १९९० च्या दशकाअखेरच स्पष्ट झाले होते. तरीही केवळ अण्वस्त्रांच्या बलाबलाचा फायदा घेत भारताला वेळोवेळी जखमी करत राहायचे धोरण पाकिस्तानने राबवले. तो ठराविक काळानंतर अण्वस्त्र-ढालीची चाचणी घेत असतो. १९९९ ची कारगिलमधील घुसखोरी, २००२ मधील भारतीय संसदेवरील दहशतवादी हल्ला, २००८ चा मुंबई हल्ला, २०१४ चा पुलवामा हल्ला आणि आता पहलगाममध्ये घडवलेले मृत्युकांड या सर्वांतून पाकिस्तानने हेच सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे की दोन्ही देशांदरम्यान प्रस्थापित झालेल्या अण्वस्त्र संतुलनामुळे भारताचे प्रत्त्युत्तराचे पर्याय मर्यादित आहेत. पुलवामा हल्ल्यानंतर भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकने पाकिस्तानचा अण्वस्त्रांचा बागुलबुवा हाणून पाडल्याची खात्री अनेक सुरक्षातज्ज्ञांना वाटत होती. पहलगाम हल्ल्यानंतर याचे पुनरावलोकन करण्याची गरज आहे.
आता पाकिस्तानने भारताच्या पल्ल्यात चेंडू टाकत उपखंडातील दीर्घ संघर्षाची नांदी केली आहे. पाकिस्तानवर वचक ठेवण्यासाठी जे जे करणे गरजेचे होते, ते सर्व उपाय भारताने यापूर्वीही केले आहेत. यावेळी भारताने सिंधू नदी पाणीवाटप करार स्थगित ठेवण्याचे ब्रह्मास्त्र उपसले आहे. परिणामी भारत – पाकिस्तान संघर्ष पूर्वी न अनुभवलेल्या अनिश्चिततेच्या वाटेवर पोहोचला आहे. यात पाकिस्तानचे अस्तित्व आणि भारताचे जागतिक राजकारणातील स्थान पणाला लागले आहे. त्यामुळे २०२५ हे दक्षिण आशियासाठी अत्यंत महत्त्वाचे वर्ष ठरणार आहे. आपल्या दाराशी आ वासून उभ्या असलेल्या महासंघर्षाला तोंड देण्यासाठी आता सर्व भारतीयांना केवळ भावनिकच नव्हे, तर मानसिक, आर्थिक, बौद्धिक आणि भौतिक तयारी करावी लागेल.

सिंधु कराराचे ‘गहिरे पाणी’… भारत – पाकिस्तान संबंध १९८० च्या मध्यापासून सातत्याने खालावत गेले आहेत. मात्र, अत्यंत तणावाच्या काळातही ना भारताने सिंधू पाणीवाटप करार रद्द करण्यासाठी पाऊल उचलले होते, ना पाकिस्तानने सिमला करार रद्दबातल ठरवण्याची दिशा पकडली होती. दोन्ही देशांनी केलेल्या या घोषणांचा एकच अर्थ निघतो, तो म्हणजे भारत – पाकिस्तान संबंधांमध्ये आता प्रचंड मोठी उलाढाल होऊ घातली आहे. त्यातही सिंधु पाणीवाटप कराराच्या स्थगितीचे गहिरेपण पाकिस्तानला सर्वार्थाने आणखी खोलात नेईल.
(संपर्क – parimalmayasudhakar@gmail.com)



Source link

कबीररंग: कबीरांच्या तत्त्वचिंतनाला ओशोंचा रसपूर्ण भावस्पर्श

0
कबीररंग:  कबीरांच्या तत्त्वचिंतनाला ओशोंचा रसपूर्ण भावस्पर्श


हेमकिरण पत्की34 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

चंद्रमोहन जैन हे आचार्य रजनीश तथा ओशो या नावानं आपल्याला ज्ञात आहेत. एक भारतीय दार्शनिक, विचारक आणि विश्ववाड्.मयाचे भाष्यकार म्हणूनही ते आध्यात्मिक क्षेत्रात सर्वपरिचित आहेत. धार्मिक रूढीरीतींचे कट्टर विरोधक अशीही त्यांची अनोखी ओळख आहे. वैश्विक वाड्.मयाची सूत्रं आणि मौलिक विचार हाच त्यांच्या भाष्याचा मूलाधार आहे. एक निभ्रांत चिंतनसूत्र ग्रंथित करण्याचा सफल प्रयत्न ही ओशोंची विदग्ध साधना आहे. या जगातला ओशोंचा प्रवेश म्हणजे नव्या माणसाचं, नव्या जगाचं आणि नव्या युगाचं दर्शन आहे. ओशोंची दर्शनसूत्रं कुठल्याही प्रचलित धर्मावर आधारित नाहीत; तसंच ती कुठल्याही विशिष्ट दार्शनिक विचार-पद्धतीतून निर्माण झालेली नाहीत. वर्तमानाशी जोडलेल्या धर्माशी ही दर्शनसूत्रं आपलं नातं सांगतात आणि जीवनाचं रहस्य सहजपणे उलगडून दाखवतात.

कबीरांच्या दोह्यांचं आणि पदांचं ओशोंनी केलेलं रसग्रहण अद्भुत आहे. हिंदी वाड्.मयाच्या इतिहासातील मध्यकाळात कबीरांवर आचार्य हजारीप्रसाद द्विवेदी, पंडित सीताराम चतुर्वेदी, डॉ. रामकुमार वर्मा इ. टीकाकारांनी खूप काही लिहून ठेवलं आहे. पण, ओशोंनी कबीरांवर केलेलं भाष्य विस्तृत आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. तत्त्वचिंतनाच्या दृष्टीनं महान आहे. एकाच वेळी ते भाष्य वर्तमानसंगत आणि नवंही आहे. ओशोंनी कबीरांमधील संतकवीला धर्म, दर्शन, विज्ञान, मनोविज्ञान, समाजशास्त्र आणि युगधर्म या टीकांच्या निकषांवर लोकांपर्यंत पोहोचवलं. ‘सुनो भाई साधो’, ‘कहै कबीर मैं पूरा पाया’, ‘कहै कबीर दीवाना’, ‘न कानों सुना न आँखों देखा’ हे ओशोंचे कबीरांच्या दोह्यांवर आणि पदांवर रसपूर्ण भाष्य करणारे ग्रंथ त्याची साक्ष आहेत.

कबीर स्वाभिमानी, स्वतंत्र बाण्याचे कवी आहेत. त्यांची काव्यचेतना समन्वयवादी आणि प्रतिभा बहुमुखी आहे. कबीर साधक, सिद्ध, संत, व्यंगकार, साधू, हठयोगी, प्रेममार्गी, समाजसुधारक, आत्माभिमानी अशी अनेक गुणविशेषणं असलेले कवी आहेत. त्यांच्या भाषेला कवितेचा सुगंध असून ती हृदयस्पर्शी, तर्कशुद्ध आहे. वाचकाच्या मनाला संतुष्ट करणारी ही भाषा ओशोंनी सहजपणे आपलीशी करून तिचं मर्म आपल्यासमोर ठेवलं आहे.

कबीरांचं काव्य महाविद्यालयांच्या पाठ्यपुस्तकांत आहे, विद्यापीठांतील प्राध्यापकांच्या मुखात आहे. कबीरांचे दोहे आणि पदं अनेक विद्वानांनी संग्रहित केले आहेत. श्यामसुंदर दास हे त्याचं उत्तम उदाहरण. कितीतरी लोकगायकांनी कबीरांच्या काव्यातील भक्तिरस आपल्या स्वरांतून सर्वदूर पोहोचवला. अशा प्रकारे लोकचेतनेत सामावून कबीर आपल्यापर्यंत पोहोचले आहेत. एक ओळही ग्रंथात न लिहिणारे कबीर काळाला दूर सारून आजही कवी म्हणूनच आपल्या साऱ्यांच्या स्मरणात आहेत! पोथीतील विचारधन काही अंशी कालबाह्य होणारं असलं, तरी त्यातून मिळणारं आत्मज्ञान मात्र व्यापक आहे. जीवन निरंतर आणि परिवर्तनशील आहे. पोथीतील शास्त्र जड आहे आणि जीवन गतिशील आहे. म्हणून कबीर म्हणतात…

कबीरा संसा दूर कर, पुस्तक देय बहाई।

जीवनाचा गाभा जाणून घ्यायचा, तर तो पोथीतून मिळेल का,असा प्रश्न स्वत:ला करून कबीर पोथीतील शास्त्राला प्रेमाचा विकल्प देतात. प्रेमाचा मार्गच केवळ जीवन समजून घ्यायला उपयोगी पडेल. कबीरांचं हेच सूत्र ओशोंनी आपल्या ओंजळीत ठेवलं आहे. पण, कबीरांना अपेक्षित असलेला प्रेमाचा अर्थ नीट समजून घेण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

पोथी पढि-पढि जगमुआ, पंडित भया न कोय। ढाई आखर प्रेम का, पढै सो पंडित होय।।

या दोह्यावरती ओशो भावसुंदर भाष्य करतात. ते म्हणतात, ‘कबीरांसाठी पांडित्याची परिभाषा ही ज्ञानाची परिभाषा आहे. प्रेमाची अडीच अक्षरं वाचण्याची सोय कुठल्याच विचार पोथीत नाही. प्रेमाची स्थिती जाणून घेऊ इच्छिणाऱ्याला जीवनाची पोथी वाचावी लागेल, आयुष्याच्या शाळेत जाऊन प्रेम म्हणजे काय, ते शिकावं लागेल. ‘प्रेम’ हा अडीच अक्षरं असलेला शब्द आहे. कबीरांना यात गहन अर्थ दिसतो. एखादी व्यक्ती कुणाच्या प्रेमात पडते, तेव्हा अडीच अक्षरं पूर्ण होतात. एक अक्षर प्रेम करणाऱ्याचं, दुसरं ज्याच्यावर प्रेम आहे त्याचं आणि दोघांमध्ये जे अज्ञात आहे, त्यामुळं अडीच अक्षरं होतात. कबीर दोघांमधल्या अज्ञाताला धरून तीन अक्षरं म्हणत नाहीत. याचं एक मधुर कारण म्हणजे प्रेम कधी पूर्ण होत नाही. प्रेम पूर्ण होत नाही, म्हणून मनाला संतुष्टी नाही. प्रेम परमात्म्यासारखं विकसनशील आहे. अपूर्णता हीच त्याची शाश्वतता आहे. प्रेम करणाऱ्या दोघांमधला जो अदृश्य सेतू आहे, तोच द्वैत संपून एकामध्ये रूपांतरित होऊ शकतो.’ माणूस म्हणून जन्माला येण्यानं ‘त्या’ विराट अस्तित्वापासून आपण दूर होतो. हा दुरावा जाणिवेत येण्यानं ‘त्या’ विराटाचा विरह हृदयाला एक अनामिक पीडा देतो. या विरहाची मात्रा म्हणजे प्रेम नाही किंवा त्याचं समाधान म्हणजेही प्रेम नाही. अखंड विरहाची अनुभूती म्हणजे प्रेम आहे. कबीरांच्या दोह्याचा हा अर्थ ओशोंच्या भाष्यामुळे आपल्या ध्यानात येतो. कबीर जसे आपल्या सूत्रशैलीचे शिरोमणी कवी आहेत; तसे ओशो आपल्या भाष्यासाठीचे शिखर-व्याख्याता आहेत.

(संपर्क – hemkiranpatki@gmail.com)



Source link

सहृदय संशोधिकेचा जीवनालेख

0
सहृदय संशोधिकेचा जीवनालेख



डॉ. इरावती कर्वे हे नाव उच्चारलं की सर्वसामान्यपणे डोळ्यासमोर येतात ती ‘युगान्त’, ‘परिपूर्ती’ किंवा ‘आमची संस्कृती’, ‘भोवरा’ या पुस्तकांची नावं. मात्र या पुस्तकांची लेखिका सुमारे शंभर वर्षांपूर्वी जर्मनीला जाऊन तिनं तिथं शारीर मानवशास्त्राचा पदव्युत्तर अभ्यासक्रम पार पाडला होता आणि तेवढ्यावरच न थांबता जर्मनीतील वंश श्रेष्ठत्वाच्या सिद्धांताला आव्हानही दिले होते. हे फारच थोड्यांना माहीत आहे. जर्मनीतून परत आल्यावर इरावतीबाईंनी शारीर मानवशास्त्राला सांस्कृतिक मानसशास्त्र, भारतविद्या, वांशिक-ऐतिहासिक ज्ञानशाखा यांची जोड देऊन पुरातत्त्व शास्त्राच्या आधारे वंश म्हणजे जात हे समीकरण मोडीत काढले.

भारतातील जातीयुक्त समाजाला पूर्वीचे मानसशास्त्रज्ञ ‘जिगसॉ पझल’ची उपमा देत असत. इरावतीबाईंनी ती नाकारली. रंगीबेरंगी गोधडीचा दृष्टांत देऊन इथली समाजरचना स्पष्ट केली. इथल्या समाजरचनेत असलेल्या विविध गटांचे विविध ठिकाणांहून, वेगवेगळ्या वेळी स्थलांतर होणे, त्यांचे इतरत्र अद्याप अस्तित्वात असणे वगैरे स्पष्ट केले.

‘आम्ही भारतीय कोण आहोत आणि आहोत ते तसे का आहोत?’ हा प्रश्न त्यांच्या संशोधनाच्या मुळाशी होता. हे सर्व संशोधन भोवती चार पुस्तकं मांडून बंद खोलीत करता येण्यासारखं नव्हतंच. त्यासाठी त्यांनी उदंड फिल्डवर्क केलं. प्राचीन मानवी सांगाड्याच्या शोधात त्यांनी अवघा महाराष्ट्रच नव्हे तर भारतभर खननकाम केलं. सांगाड्यांची मोजमापे घेतली. प्रवासाची, निवासाची सोय धड असेल की नाही याची पर्वा न करता जिद्दीनं संशोधन करत राहिल्या. सुज्ञ, सुजाण पती डॉ. दिनकर कर्वे यांची सर्वतोपरीने साथ त्या काळात त्यांना होती, हे महत्त्वाचे. १९४०च्या दशकात प्रवासाची सार्वजनिक साधनं म्हणजे आगगाडी आणि बस. चुकून कधी सरकारी जीप मिळाली तरच. संपर्काची साधनेही उपलब्ध नव्हती. अशा परिस्थितीत अत्यंत काटकसरीनं संशोधन मोहीम पार पाडावी लागे. प्राचीन मानवी सांगाडा मिळाला तर प्राचीन व आधुनिक संस्कृतीचं नातं उलगडू शकेल म्हणून पुरातत्त्व विभागाच्या डॉ. सांकळिया यांच्या बरोबर प्राचीन सांगाड्याच्या शोधात त्यांनी गुजरातमध्ये खननकाम केलं. विशेष म्हणजे जिथे कुठे त्यांचं खननकाम चालू असे आणि शालेय सुट्टीचा काळ असेल तर इरावतीबाई आपल्या आणि परिचितांच्या मुलांना अशा मोहिमांवर नेत. सांगाडे साफ करायला, त्यांची मोजमाप घ्यायला शिकवत. (आजचे प्रसिद्ध पर्यावरणतज्ज्ञ माधवराव गाडगीळ त्यांच्या लहानपणी इरावतीबाईंच्या शोधमोहिमांत सहभागी असत.) या मोहिमांत बाईंचा त्या त्या प्रदेशातील संस्कृती, इतिहास, भूगोल, लोकजीवन, राहणीमान, कुटुंबव्यवस्था, नातेसंबंध वगैरेंवरही अभ्यास चाले. १९५१-५२मध्ये त्यांना इंग्लंडमधील स्कूल ऑफ ओरिएंटल अँड आफ्रिकन स्टडीज ऑफ युनिव्हर्सिटी ऑफ लंडनने निमंत्रित केलं. तिथल्या वास्तव्यात त्यांनी बरंच लेखन केलं. इकॉनॉमिक वीकली, नेचरसारख्या जगप्रसिद्ध नियतकालिकातून त्यांना प्रसिद्धी मिळाली. भारतात परतल्यावर त्यांनी ‘किनशिप ऑर्गनायझेशन इन इंडिया’ हा महत्त्वाचा शास्त्रीय ग्रंथ लिहून पूर्ण केला. त्यात भारतातील नातेदारी संघटनसंस्थेचा शोध अनेक अंगांनी घेतला होता. या ग्रंथाचं त्या काळातील विद्वानांनी खूप कौतुक केलं. भारतीय समाजाची संरचना समजून घेण्यासाठी हा ग्रंथ त्यांना उपयुक्त वाटला. विशेष म्हणजे, इरावतीबाईंनी स्वदेशी स्त्रीवादी परिप्रेक्ष्यातून भारतीय कुटुंब व्यवस्थेचे विश्लेषण करण्याचं पायाभूत काम केल्याबद्दल तो उल्लेखनीय ठरला. इरावतीबाईंचा भारतीय संस्कृतीकडे बघण्याचा एक स्वतंत्र दृष्टिकोन या पुस्तकातून व्यक्त झाला आहे. त्यांनी पुढे आपल्या संशोधनावर आधारित ‘हिंदू सोसायटी – अॅन इंटरप्रिटेशन’ हा ग्रंथ लिहिला. महाभारतकालीन समाजव्यवस्थेचे संदर्भ देत त्यांनी जात आणि वर्ण याविषयी सविस्तर मांडणी केली. या ग्रंथाचं मोठ्या प्रमाणावर स्वागत झालं. जगभरातील अनेक विद्यापीठांत तो ग्रंथ पाठ्यपुस्तक किंवा संदर्भ ग्रंथ म्हणून लावला गेला.

वयाची साठी ओलांडल्यावरही त्यांचा संशोधकाचा पिंड शांत बसला नाहीच. प्लॅनिंग कमिशनच्या रिसर्च कमिटीला कोयना प्रकल्प विस्थापितांवर सर्वेक्षण अहवाल देऊन त्यांच्या सुस्थापनासाठी उपाय सुचवले. १९६५ सालात त्यांनी केलेलं हे काम पुढे १९८०-९० च्या दशकात सरदार सरोवराच्या निमित्ताने झालेल्या विस्थापनाचा अभ्यास करताना उपयोगी ठरले.

शास्त्रीय लेखनाइतकाच त्यांनी मराठीत ललित लेखन करण्यातही रस घेतला. भरपूर प्रवास केल्यानं त्यांचं अनुभवविश्व समृद्ध होतं. इंग्रजी, संस्कृत वाङ्मयाचं वाचनही दांडगं होतं. संशोधक वृत्ती आणि वर्तमानाचं चिकित्सक भान, त्याला चिंतनशीलतेची जोड यामुळेही त्यांची प्रतिभा ललित लेखनात झळाळून उठली. लेखिका डॉ. प्रतिभा कणेकर यांनी इरावतीबाईंचा हा अनोखा प्रवास बारकाईनं सांगितला आहे. इरावतीबाईंच्या संशोधनामागच्या प्रेरणा, त्यांचा अभ्यास, काळाच्या पुढची त्यांची झेप याविषयी प्रतिभाताईंनी साक्षेपानं लिहिलंय. शक्य तेवढी माहिती जमवून भारतीय मानसशास्त्राच्या प्रांगणातील या आद्या दीपमाळेला मराठीत आणलंय.

इरावतीबाईंच्या शास्त्रीय संशोधन आणि लेखनाइतकाच त्यांच्या महाभारत आणि रामायणावरील अभ्यासपूर्ण लेखनावर प्रतिभा कणेकरांनी स्वतंत्र प्रकरण लिहिलं आहे. त्यांच्या ललित लेखनाची योग्य ती दखल घेतली आहे. त्यांच्या ‘मराठी लोकांची संस्कृती’, ‘आमची संस्कृती’ आणि ‘संस्कृती’ ग्रंथाची माहिती वाचताना इरावतीबाईंचा आवाका पाहून थक्क व्हायला होतं. एका वेगळ्याच ज्ञानशाखेत प्रवेश करून स्वत:चा मार्ग निवडणारी, असीम प्रयत्नांनी त्यात स्वत:चं स्थान निर्माण करणारी मराठी स्त्री शास्त्रज्ञ प्रतिभा कणेकर यांनी मराठीत सादर करून चरित्रवाङ्मयात मोलाची भर घातली आहे. एक मानवशास्त्र संशोधक, गृहिणी, माता, लेखिका, शिक्षिका, सखी, पत्नी… अशा विविध भूमिकांत इरावतीबई आपल्याला या चरित्रात भेटत राहतात. एखाद्या आदिवासीबहुल खेड्यात त्या जितक्या सहजतेनं वावरतात तितक्याच पटुत्वाने त्या कॅलिफोर्निया विद्यापीठात व्याख्यात्या म्हणून लक्षणीय कामगिरीही पार पाडून येतात.

या ग्रंथात प्रतिभा कणेकरांनी इरावतीबाईंचे पती डॉ. दिनकर धोंडो कर्वे यांचीही योग्य ती दखल घेतलेली आहे. खरं तर त्यांचं अस्तित्व थंडावा देणाऱ्या सावलीसारखं सर्वत्र जाणवत राहतं. पत्नीची इच्छा आणि तिचा कल पाहून तिला सर्वतोपरीने प्रोत्साहन देणारा, तिला उच्च शिक्षणासाठी, आपल्या वडिलांच्या आणि सासऱ्यांच्या मनाविरुद्ध जाऊन जर्मनीला पाठवणारा तिच्या व्यक्तिमत्त्वाचा मान राखणारा, पत्नी संशोधनकार्यासाठी बाहेर गेल्यावर तिच्या अनुपस्थितीत मुलांचा प्रतिपाळ करणारा, त्यांच्या सांगोपनात रस आणि सहभाग घेऊन घर सांभाळणारा, झाडपेरात रमणारा, तिच्या लेखन कार्यात मदत करणारा, ती आजारी असताना तिच्या लेखांचं शब्दांकन करणारा, तिच्या मृत्यूनंतर तिच्या अप्रकाशित लेखांचा संग्रह संपादित करणारा बुद्धिमान आणि सुस्वभावी सहचर या पुस्तकात कुठे ना कुठे भेटत राहतो. हृद्या अनुभव देतो. प्रतिभा कणेकरांनी असे क्षण निगुतीनं टिपलेत. इरावतीबाई आणि डॉ. दिनकर यांचं मैत्रीपूर्ण नातं सुरुवातीलाच त्या काळात त्यांनी एकमेकांना दिनू आणि इरू अशा संबोधण्यातूनच व्यक्त होत जातं. एक देखण्या, बुद्धिमान, कर्तबगार, चिंतनशील, विचारी आणि तितक्याच सहृदय संशोधक स्त्रीचा हा जीवनालेख ललित्यपूर्ण झाला आहे, हे विशेष.

‘भारतीय मानवशास्त्राच्या प्रांगणातील आद्या दीपमाळ : डॉ. इरावती कर्वे’ – प्रतिभा कणेकर, प्रकाशक – इंडस सोर्स बुक्स, पाने- २७०, किंमत- ४५०

veena.gavankar@gmail.com



Source link

mla rohit Pawar faced setback as amrit Kaldates group leader application was rejected

0
mla rohit Pawar faced setback as amrit Kaldates group leader application was rejected



mla rohit Pawar faced setback as amrit Kaldates group leader application was rejected | कर्जतच्या नगराध्यक्षांची २ मे रोजी निवड, गटनेतेपदी संतोष मेहेत्रे, अमृत काळदाते यांचा अर्ज फेटाळला





Source link

शिर्डी विमानतळावर आणखी दोन हेलिपॅड, ८ वाहनतळ

0
शिर्डी विमानतळावर आणखी दोन हेलिपॅड, ८ वाहनतळ



राहाता : आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे दोन हेलिपॅड व ८ वाहनतळ उभारण्यास व विमानतळाचे विस्तारीकरण, अद्ययावतीकरणास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणाच्या मुंबईत झालेल्या बैठकीत मान्यता दिली. महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणाच्या संचालक मंडळाची ९१ वी बैठक मुंबईत झाली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. प्राधिकरणच्या उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

शिर्डी येथील विमानतळाच्या कार्गो टर्मिनलचे काम वेगाने सुरू आहे. नाशिकपासून शिर्डी विमानतळ जवळ असल्याने नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या वेळेस हवाई मार्गाने येणाऱ्या भाविकांना शिर्डी विमानतळ सोयीचे होणार आहे. त्यावेळी होणाऱ्या संभाव्य गर्दीचा विचार करून व नाशिक येथील विमानतळाची क्षमता लक्षात घेता शिर्डी विमानतळाचे विस्तारीकरण प्रस्तावास मान्यता देण्यात आली. यामध्ये ८ वाहनतळे, दोन हेलिपॅडसह टर्मिनलच्या अद्यावतीकरणाचा समावेश आहे. याचा फायदा कुंभमेळ्यादरम्यान येणारी विमाने व हेलिकॉप्टर सेवेसाठी होणार आहे. प्राधिकरणाचे संचालक तथा वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, परिवहनचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलरासू आदी उपस्थित होते.



Source link

jaundice has spread in rajur in akole taluka with 97 jaundice like patients found in a week

0
jaundice has spread in rajur in akole taluka with 97 jaundice like patients found in a week



jaundice has spread in rajur in akole taluka with 97 jaundice like patients found in a week | राजुरमध्ये काविळीची साथ; आठवडाभरात ९७ रुग्ण, प्रतिबंधक उपाय सुरू; आरोग्य पथकाकडून सर्वेक्षण





Source link

minister Prakash abitkar announced health department fund for treatments exceeding 5 lakh

0
minister Prakash abitkar announced health department fund for treatments exceeding 5 lakh



minister Prakash abitkar announced health department fund for treatments exceeding 5 lakh | आरोग्याच्या ५ लाखांवरील खर्चासाठी राखीव निधी उभारणार, प्रकाश आबिटकर





Source link

mahavitaran Chief engineer swapnil Katkar urged power staff to adapt and change work methods

0
mahavitaran Chief engineer swapnil Katkar urged power staff to adapt and change work methods



mahavitaran Chief engineer swapnil Katkar urged power staff to adapt and change work methods | महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड ऑफिसर्स असोसिएशनचे अधिवेशन





Source link

green pune movement opposed ramanath Jha led group reconsidering bdp construction on reserved hills

0
green pune movement opposed ramanath Jha led group reconsidering bdp construction on reserved hills



green pune movement opposed ramanath Jha led group reconsidering bdp construction on reserved hills | ‘बीडीपी’त बांधकाम नकोच! पुनर्विचार अभ्यास गटाला ‘ग्रीन पुणे मूव्हमेंट’चा विरोध





Source link