Tuesday, June 30, 2026
Home Blog Page 3103

Karan Gunhyala Mafi Nahi: ‘कारण गुन्ह्याला माफी नाही’ नवी मालिका येणार प्रेक्षकांच्या भेटीला

0
Karan Gunhyala Mafi Nahi: ‘कारण गुन्ह्याला माफी नाही’ नवी मालिका येणार प्रेक्षकांच्या भेटीला



Karan Gunhyala Mafi Nahi: आपल्या कामात नेहमी तत्पर असणारे इन्स्पेक्टर विजय भोसले यांच्या आयुष्यावर ही मालिका असणार आहे.



Source link

Rang Majha Vegla : आधीच विलन कमी होते का?; आयेशाच्या एण्ट्रीवर चाहत्यांनी व्यक्त केला संताप

0
Rang Majha Vegla : आधीच विलन कमी होते का?; आयेशाच्या एण्ट्रीवर चाहत्यांनी व्यक्त केला संताप


मालिकेचा प्रोमो प्रदर्शित होताच प्रेक्षकांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. एका यूजरने ‘आधीच विलन कमी होते का?आयेशा, श्वेता, कार्तिक, कार्तिकी’ असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने ‘वाटलच होते की असेच काहीतरी होणार’ अशी कमेंट केली आहे. सध्या सोशल मीडियावर मालिकेत होणाऱ्या आयेशाच्या एण्ट्रीवर सडकून टीका केली जात आहे.



Source link

Aai Kuthe Kay Karte: आशुतोष-अरुंधतीच्या आयुष्यात येणार ‘वीणा’ नावाचं नवं वादळ! कोण असणार ही व्यक्ती?

0
Aai Kuthe Kay Karte: आशुतोष-अरुंधतीच्या आयुष्यात येणार ‘वीणा’ नावाचं नवं वादळ! कोण असणार ही व्यक्ती?


मात्र, त्यांच्या या आनंदावर एकाकी विरजण पडणार आहे. पाणीपुरी खात असतानाच आशुतोषला एक फोन येतो. हा फोन बघून आशुतोष हादरून जाणार आहे. त्याला आलेला हा फोन वीणा नावाच्या एका मुलीचा असून, इतक्या वर्षांनी ती आपल्याला का फोन करतेय असा प्रश्न त्याला पडला आहे. या वीणाचा केवळ आशुतोषशीच नव्हे तर, त्याची आई आणि केळकर कुटुंबाशीदेखील काहीतरी नातं आहे. त्यामुळे आशुतोष आईपासून देखील ही गोष्ट लपवण्याचा प्रयत्न करत आहे. आता ही वीणा नक्की कोण असणार? हे मालिकेच्या येत्या भागांमध्ये कळणार आहे.



Source link

Aishwarya Rai: ऐश्वर्याने रागात अभिषेककडे पाहिले अन् नव्याने दिली अशी प्रतिक्रिया, Video Viral

0
Aishwarya Rai: ऐश्वर्याने रागात अभिषेककडे पाहिले अन् नव्याने दिली अशी प्रतिक्रिया, Video Viral



Navya Nanda: सध्या सोशल मीडियावर ऐश्वर्या, अभिषेक आणि नव्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमधील नव्याची रिअॅक्शन पाहून तुम्हालाही हसू अनावर होईल.



Source link

Chandravilas: चंद्र ढगाआड गेला म्हणून अमावस्या… ‘चंद्रविलास’चा हा व्हिडीओ पाहून अंगावर येईल काटा!

0
Chandravilas: चंद्र ढगाआड गेला म्हणून अमावस्या… ‘चंद्रविलास’चा हा व्हिडीओ पाहून अंगावर येईल काटा!


Chandravilas New Promo: या व्हिडीओमध्ये ‘चंद्रविलास’ बनलेले वैभव मांगले आपल्या दमदार आवाजात आणि हटके शैलीत संवाद म्हणताना दिसत आहेत.



Source link

Satyashodhak: पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार ‘महात्मा जोतिबा फुलें’ची जीवनगाथा!

0
Satyashodhak: पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार ‘महात्मा जोतिबा फुलें’ची जीवनगाथा!



Satyashodhak: सत्यशोधक या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. हे पोस्टर पाहून चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते.



Source link

Salman Khan: ३० एप्रिलला सलमानला संपवणार; भाईजानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी

0
Salman Khan: ३० एप्रिलला सलमानला संपवणार; भाईजानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी



Salman Khan Death Threat : एका अज्ञात व्यक्तीने सलमान खानला ३० एप्रिल रोजी मारणार असल्याची माहिती मुंबई पोलिसांना फोनच्या माध्यमातून दिली आहे.



Source link

उन्हाळी सुट्टीत मुलांना पोहायला शिकवताना ‘अशी’ घ्या काळजी | पुढारी

0









सातारा : पुढारी वृत्तसेवा : शालेय परीक्षा आता बर्‍यापैकी उरकल्या असून, आजपासून बहुतांश शाळांना उन्हाळी सुट्टी लागत आहे. त्यामुळे खेळणार्‍या, बागडणार्‍या मुलांच्या आनंदावर विरजण पडू नये व उद्याचे भविष्य असलेल्या चिमुरड्यांचे जीव वाचवण्यासाठी आता पालकांनीच मुलांच्या खेळण्याकडे व सुट्टीतील त्यांच्या नियोजनाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

मुलांना पोहायला शिकवताना घ्या काळजी

उन्हाळी सुट्टीत नदी, विहिरी, तलाव, बंधारे यावर पोहण्यासाठी अक्षरश: झुंबड उडत असते. पोहायला गेलेल्या मुलांवर विशेष लक्ष असायलाच हवे. कोण कोण पोहायला गेले आहे? त्यांच्यासोबत जबाबदार कोणी आहे का? या बाबी गांभिर्याने पहायला हव्या.

अनेकदा पोहण्याच्या नादात कुणाचा कुणाला ताळमेळ नसतो. जो तो आनंदाने बेहोश होवून मनमुरादपणे पोहण्याचा आनंद लुटत असतो. काहीवेळा पोहता पोहता मस्तीही केली जाते. या गोंगाटात दुर्घटना होण्याची भीती अधिक असते. लहान मुलांना पोहायला शिकवण्यासाठीही नेले जाते. यावेळी आवश्यक ते सुरक्षा साहित्य सोबत नेले आहे का? शिकवणारी व्यक्ती तरबेज अन जबाबदार आहे का? हेही पहायला हवे. अन्यथा वेळ निघून गेल्यावर काहीच उपयोग होणार नाही, हे ध्यानात घ्यायला हवे. खेळाचा मनमुरादपणे आनंद लुटणार्‍या या चिमुरड्यांकडे अनेकदा पालकांचे लक्ष नसते. त्यातून अनेकदा या बालगोपाळांना दुखापतींचा सामना करावा लागतो. इथपर्यंत ठिक, पण एकाद्या दुर्दैवी घटनेत निष्पाप जीव जेव्हा बळी जातो तेव्हा केलेल्या दुर्लक्षाचा पालकांना पश्चाताप होतो. मात्र तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. अशा अनेक घटना गतवर्षी घडल्या आहेत. या घटनांमुळे पालकांनी वेळीच सावध होण्याची गरज निर्माण झाली आहे.

सुट्टीत मुलांची कशी घ्याल काळजी….

* मुले खेळताना दुरुन लक्ष ठेवा
* धोकादायक वस्तू, कीटकनाशके मुलांच्या हाती लागतील
अशी ठेवू नका
* नाकातोंडात सहज जातील अशा छोट्या वस्तू मुलांपासून दूर ठेवा
* अडचणीत अन् काट्याकुट्यात खेळू देवू नका
* जबाबदार व्यक्तींसोबतच पोहायला पाठवा
* उष्म्यामुळे साप गारव्याच्या ठिकाणी आसरा घेत असतात हे गृहीत धरुन मुलांच्या खेळण्याच्या जागा ठरवा
* गारव्यासाठी घराबाहेर झोपणार्‍यांची काळजी घ्या

 











Source link

Video: पलक तिवारी ते शहनाज गिल, ‘किसी का भाई किसी की जान’च्या ट्रेलर लाँचला कलाकारांची मांदियाळी!

0
Video: पलक तिवारी ते शहनाज गिल, ‘किसी का भाई किसी की जान’च्या ट्रेलर लाँचला कलाकारांची मांदियाळी!


Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Trailer Launch: बॉलिवूडचा ‘दबंग’ अर्थात अभिनेता सलमान खान याने आपला आगामी चित्रपट ‘किसी का भाई किसी की जान’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित केला आहे. सिनेप्रेमी या चित्रपटाच्या ट्रेलरची आतुरतेने वाट पाहत होते. नुकताच या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचचा सोहळा दिमाखात पार पडला. या सोहळ्याला बॉलिवूडसह साऊथ कलाकारांनी देखील हजेरी लावली होती. अभिनेता सलमान खान, पूजा हेगडे, शहनाज गिल, पलक तिवारी, जगपती बाबू, जस्सी गिल आणि इतर कलाकार मंडळी ‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँचला उपस्थित होते.



Source link

सावधान… सुट्टी बेतते चिमुरड्यांच्या जीवावर; आजपासून उन्हाळी सुट्टी; पालकांनो घ्या काळजी | पुढारी

0


सातारा : पुढारी वृत्तसेवा : शालेय परीक्षा आता बर्‍यापैकी उरकल्या असून, आजपासून बहुतांश शाळांना उन्हाळी सुट्टी लागत आहे. गेल्या काही वर्षांतील सुट्टींत घडलेल्या अप्रिय घटना व नुकताच गवडी, ता. सातारा येथे पोहताना दोन चिमुरड्यांचा गेलेला जीव अशा हृदयद्रावक घटनांनी मन हेलावून जाते. सुट्टीत खेळता-बागडताना हकनाक गेलेले बळी काळजी वाढवणारे आहेत. साथीचे बळी, उष्म्याचे बळी, दुष्काळाचे बळी जसे जातात तसेच आता सुट्टीचेही बळी जाऊ लागले आहेत. उन्हाळ्याच्या सुट्टीचा आनंद द्विगुणित करताना अनेक बालके व चिमुरड्यांचा हकनाक बळी गेल्याच्या दुर्दैवी घटना यापूर्वी अनेकदा घडल्या आहेत. पोटच्या गोळ्याचा अन् निष्पाप मुलांचा जीव जाताना पाहिला की हृदयाचा ठाव चुकल्याशिवाय राहत नाही. अनेकदा पालकांचे दुर्लक्षच अशा घटनांना कारणीभूत ठरत असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे खेळणार्‍या, बागडणार्‍या मुलांच्या आनंदावर विरजण पडू नये व उद्याचे भविष्य असलेल्या चिमुरड्यांचे जीव वाचवण्यासाठी आता पालकांनीच मुलांच्या खेळण्याकडे व सुट्टीतील त्यांच्या नियोजनाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

सुट्टी म्हणजे बालगोपाळांसाठी आनंदाची पर्वणीच असते. मग ती सुट्टी कोणतीही असो. त्यात उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे तर या चिमुरड्यांना सोन्याहून पिवळेच. नो आभ्यास, नो कटकट, नो पालकांची झंझट. सुमारे दोन महिने मौज-मजा अन् मस्तीच. शहरी भागात उन्हाळी अभ्यास वर्ग, वेगवेगळे क्लासेस, प्रशिक्षण असले तरी ग्रामीण भागातील मुलांचा आजही खेळण्याकडे कल आहे.

अप्रिय घटनांमुळे उन्हाळ्याची सुट्टी नकोशी व्हायला नको, याची खबरदारी पालकांनी घेण्याची गरज आहे. मुले खेळत असताना ती कोठे आहेत?, काय खेळ खेळताहेत? याकडे लांबून का होईना पण लक्ष असायलाच हवे. पालकांनी वेळीच लक्ष दिले तर दुर्घटना निश्चितपणे टळल्या जातील. उन्हाळ्याच्या सुट्टीतील आनंदाची पर्वणी लुटणार्‍या या चिमुरड्यांच्या खेळाचे व्यवस्थापनही तितकेच गरजेचे बनले आहे.

खेळण्या-बागडण्यावर नको मर्यादा

पालकांनी चिमुरड्यांची काळजी घेवून ते कोठे जात आहेत? काय खेळताहेत? याची काळजी घेतली तर निष्पाप जीवांचे प्राण नक्कीच वाचतील. मात्र त्यासाठी चिमुरड्यांच्या खेळण्या-बागडण्यावर मर्यादा घालू नये. उन्हाळी सुट्टीचे बळी वाचवण्यासाठी पालकांबरोबरच सर्वांनीच जागरूक राहण्याची गरज निर्माण झाली आहे. चिमुरड्यांना खेळण्या-बागडण्याचा आनंद लुटू द्या. उगाच सुरक्षेचा बाऊही करायला नको हेही तितकेच महत्त्वाचे.

मामाचा गाव उरला फक्त पुस्तकातच…

पूर्वीच्या कथा अन् गाण्यातील ‘मामाचा गाव’ आता उरला नसला तरी चिमुरड्यांमध्ये अद्यापही गावाकडची ओढ आहेच. सुट्ट्या लागल्या रे लागल्या की बालगोपाळांना गावाकडचे वेध लागतात. गावी मग मित्र, मैत्रिणी, नात्यातील सहकारी यांची गट्टी जुळली की त्यांच्या खेळण्याला जणू काही आकारच राहत नाही. अगदी देहभान हरपून बालचमू सुट्टीचा आनंद घेत असतात. त्यांचे जेवणाकडेही लक्ष नसते. दिवसभर उन्हातान्हात खेळण्यातच त्यांचा आनंद सामावलेला असतो. पोटात काय असले काय अन् नसले काय, त्या काहीही फरक पडत नाही. भुकेलाही त्यांनी जणूकाही सुट्टीच दिलेली असते.

आठवतोय का भांडीकुंडीचा खेळ…

पूर्वीचे खेळ आता हरवून गेले असून अनेक खेळतर केव्हाच काळाच्या पडद्याआड गेले आहेत. चिमुरड्यांच्या ‘भांडीकुंडी’ खेळाचा बाज मात्र आजही टिकून आहे. ही चिमुरडी मंडळी मिळेल त्या जागेत, कधी कोनाड्यात तर कधी छपरात, कधी काट्याकुट्यात तर कधी अगदी घरातील एकाद्या मोडक्या टेबलखालीही भांडीकुंडीचा संसार थाटत असतात. कोण भरउन्हात पोहायला जातो तर कोण सावलीत पत्त्याचा डाव मांडत असतो. अनेकजण कॅरमसारखे बैठे खेळही खेळत उन्हाची तिरीप घालवतात. उन्ह खाली झाले की क्रिकेटच्या मैदानावर बालगोपाळांची जणूकाही जत्राच भरत असते.



Source link