




फलटण :- फलटण शहर हे ऐतिहासिक वारसा लाभलेले आणि नियोजनबद्ध रचना असलेले शहर असून, त्याची स्वतंत्र ओळख राज्यभरात आहे. या ओळखीला बळकटी देत फलटणचा चौफेर विकास साधावा, बारामतीची नक्कल न करता स्वतःची ओळख निर्माण करावी, असे मत श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी बिल्डर असोसिएशनच्या २०२५-२६ पदग्रहण समारंभात व्यक्त केले.
या वेळी व्यासपीठावर माढा लोकसभेचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, माजी नगरसेवक श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, बिल्डर असोसिएशन इंडिया महाराष्ट्रचे चेअरमन जगन्नाथ जाधव, फलटण बिल्डर असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष महेंद्र जाधव, सेक्रेटरी मंगेश शिंदे, उपाध्यक्ष सागर शहा, खजिनदार विकास म्हेत्रे, आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.
संजीवराजे म्हणाले, “फलटणच्या विकासात राजकारण येता कामा नये. जुनी झाडे वाचवून, नव्या झाडांची लागवड करून पर्यावरणाचा समतोल राखत शहराचा विकास साधला पाहिजे.”
माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले, “रायगड उभारणाऱ्या हिरोजी इंदुलकरांनी जसा स्वतःचा ब्रँड तयार केला, तसा फलटणच्या बिल्डरांनीही तयार करावा. आपण बारामतीपेक्षा सुंदर इमारती, रस्ते तयार करून फलटण पुढे न्यावे.”
कार्यक्रमाचे प्रस्ताविक किरण दंडिले यांनी केले आणि आभार मंगेश शिंदे यांनी मानले.

HSC Result 2025 Maharashtra : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. राज्याचा एकूण निकाल ९१.८८ टक्के लागला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत १.४९ टक्क्यांनी कमी निकाल लागला आहे. राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून विज्ञान, कला, वाणिज्य व व्यवसाय अभ्यासक्रम व आय.टी.आय. या शाखांसाठी एकूण १४,२७,०८५ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १४,१७,९६९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १३,०२,८७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व उत्तीर्णतेची टक्केवारी ९१.८८ आहे.



चेन्नई, बेंगळुरू, मुंबई, पुणे, अहमदाबाद, जयपूर या शहरांमधून या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. एकूण कमाईच्या बाबतीत रेड-२ ने आतापर्यंत लाइफटाइम कलेक्शनच्या बाबतीत अजय देवगणच्या गोलमाल रिटर्न्स, मैदान, सत्याग्रह, दृश्यम आणि थँक गॉडला मागे टाकले आहे. रेड-२ ची एकूण कमाई किती आहे, हे आपल्याला कालांतराने कळेल.


पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या तपासादरम्यान जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवादी कटाचा धोका निर्माण झाला आहे. केंद्रशासित प्रदेशातील कारागृहांवर हल्ले होत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. येथे पूंछमध्ये सुरक्षा दलांना दहशतवाद्यांचा ठावठिकाणा सापडला असून, तिथून टिफिनमध्ये आयईडी सापडले आहेत. याबाबत सध्या अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलेले नाही. विशेष म्हणजे यातील काही तुरुंगात बडे दहशतवादीही शिक्षा भोगत आहेत. २२ एप्रिलरोजी झालेल्या हल्ल्यानंतर लष्कर अलर्ट मोडवर असून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे.